यावेळी मात्र पैठण वगळता सर्व तालुक्यांमधून भाजपचे उमेदवार निवडून आले. औरंगाबाद तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी दहा पैकी पाच जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले. फुलंब्री तालुक्यात तीन जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. खासदार चंद्रकांत खैरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी कन्नडची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वैजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या पारड्यात केवळ दोन जागा आल्या. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनी घवघवीत यश मिळविले. गंगापूरमध्ये चार जागा भाजपने जिंकल्या. खुलताबादमध्ये तर विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. पैठण तालुक्यात शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांनी नऊ पैकी सात जागा जिंकून ‘भाजपसाठी पैठण बहोत दूर है’ याची प्रचिती दिली. भाजपला गेल्या निवडणुकीत केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र हा आकडा २२ वर पोचल्याने भाजपने ग्रामीण भागात मुसंडी मारली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट