Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाडेकरूने घातला २० लाखांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इलेक्ट्रॉनिक व्यवसायासाठी २० लाख रुपये उसने घेऊन दोन भावांनी घरमालकीणीची फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर २०१३ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत गारखेडा भागात घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा परिसरातील श्रीहरीनगर येथे ६२ वर्षांच्या सेवानिवृत्त शिक्षिका राहतात. त्यांच्याकडे गेल्या पाच वर्षांपासून राजेश्वर ईरान्ना बोमटे व राम ईरान्ना बोमटे (रा. गागलेगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) हे दोघे भाडेकरू होते. त्यांची शहरात इलेक्ट्रॉनिक्सची दोन दुकाने होती. बोमटे बंधूंनी या शिक्षिकेला दिवाळीनिमित्त जास्त माल भरायचा असून चार महिन्यांसाठी २० लाख रुपये ऊसने द्या अशी विनंती ऑक्टोबर २०१३ मध्ये केली. त्यापोटी कोरे चेक देतो, असे दोघांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बोमटे बंधुंच्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत घरमालकिणीने त्यांना दहा लाख रुपये रोख व दहा लाखांचा एचडीएफसी बँकेचा चेक दिला. चार महिन्याची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत दिली नसल्याने त्यांनी दोघांकडे पाठपुरावा केला. पण, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, काही दिवसांनंतर ते अचानक घर सोडून गावाकडे निघून गेले. त्यानंतर या महिलेने नांदेड जिल्ह्याताली बोमटे यांच्या गावी जाऊन त्यांच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. पण, त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर या महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन मद्यपींना पाच दिवसांचा कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याबद्दल तिघांना पाच दिवस कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा रेल्वे कोर्टाचे न्यायधीश एम. ए. हुसेन यांनी सुनावली. या आरोपींना मंगळवारी मुकुंदनगर येथे अटक करून तीन दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने जलदगतीने हा निकाल दिला.
मुकुंदवाडी परिसरातील मुकुंदनगर भागातील इंदिरा मार्केट येथे सार्वजनिक ठिकाणी काही जण मद्यपान करत असल्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली होती. विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या आदेशानुसार पथकाने मंगळवारी येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी नाना अण्णा बागल (वय २८), नितीन मारुती पवार (वय ३८) व राजू मोतीराम पालवे (वय २८ तिघे रा. मुकुंदवाडी) हे मद्यपान करताना आढ‍‍ळले. त्यांना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ८४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी कॉन्स्टेबल बालाजी चालनिवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी तपास करून शुक्रवारी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले. कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत पाच दिवसांचा कारावास एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या ३० हॉकीपटूंची निवड

$
0
0

औरंगाबादच्या ३० हॉकीपटूंची निवड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुणे येथे १८ ते ३० मार्च या कालावधीत होणाऱ्या हॉकीच्या राष्ट्रीय निवड चाचणीसाठी औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेतर्फे ३० खेळाडूंची निवड करण्यात आली.
साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत वरिष्ठ, ज्युनिअर, सबज्युनिअर गटात एकूण ५२ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यापैकी ३० खेळाडूंची निवड करण्यात आली. वरिष्ठ गटात महेंद्र चाकाले, अक्षय करपे, आशिष चेट्टी, पवन शिंदे, दिलीप शर्मा, संतोष बामणे, सायदा शेख, उज्ज्वला मानवतकर, प्रियांका वडमारे, नेहा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. ज्युनिअर गटात अविनाश मोरे, शशांक दुरूकर, दीपक खोब्रागडे, ललित दरवाई, कुणाल वानखेडे, प्रणय तिरोडे, आमेद खान, सत्यम निकम, शीतल कुचेकर, अनिता शर्मा, दीपाली डहाळे, पूनम वाणी, प्रियांका वाहुळ, आम्रपाली चोरमारे यांची निवड झाली. सबज्युनिअर गटातून स्वप्नील बोराडे, अनुज राजकुमार, सुजैन जरूपुल्ला, आमेद खान, किसन चव्हाण, गणेश जाधव यांची निवड करण्यात आली.
जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे, रवींद्र दुपारे, डॅनियल फर्नांडिस, शेख साजीद, शामसुंदर भालेराव, नम्रता साहुजी, समीर शेख, संजय तोटावाड, नीतेश परदेशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याच्या वाट्याला निराशाच

$
0
0

औरंगाबाद : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याच्या वाट्याला काही भरीव आले नाही, अशा प्रतिक्रिया शहरातील उद्योजक, व्यापारी आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केल्या. दुष्काळ आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर विभागाला या अर्थसंल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्या फोल ठरल्याचे या जाणकारांनी सांगितले.

जीएसटी मध्ये होणारे बदल लक्षात घेता या बजेटमध्ये टॅक्स या विषयावर मोठा हात लावला नाही. ते अपेक्षित होते. राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर शेतीविषयक प्रस्ताव प्रामुख्याने पुढे घेतले जातील. उद्योग आणि उद्योगासंदर्भातील पायाभूत सुविधा लक्षात घेता या बजेटमध्ये फार मोठे निर्णय घेतले असे वाटत नाही. मिहान विमानतळ, अमरावती, कराड ही नावे वाचताना औरंगाबादचे नाव दुर्लक्षित झाले असे वाटते. अनुसचूति जाती व नवबौद्ध प्रवर्गातून उद्योजक निर्माण व्हावे म्हणून २५ कोटींची केलेली तरतूद क्रिएटिव्ह वाटते. मराठवाडा व विदर्भाला गेल्यावर्षीप्रमाणे उद्योगांना सवलतीच्या दरात वीज म्हणून १००० कोटी या वर्षीही दिलेले आहेत. त्याचा नक्कीच उपयोग होईल. मराठवाड्याचा विचार करता बॅकलॉगचा विचार करून ज्याप्रमाणे विदर्भाला ९७९ कोटी हे कृषीपंपासाठी दिले आहेत. त्याचप्रमाणे मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाला मोठा निधी दिला असता तर संयुक्तिक राहिले असते, पण केवळ १५ कोटींवर मराठवाड्याची बोळवण करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प. - मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष सीएमआयए

राज्याचा अर्थसंकल्प फारसा उत्साहदायक नाही. उद्योजकांसाठी काही नवीन घोषणा अपेक्षित होत्या. मेक इन इंडियाबाबत पूर्वी मोठ्या घोषणा केल्या, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी काही तरतुदी अर्थसंकल्पात व्हायला हव्या होत्या. तसे दिसले नाही. लघुउद्योजकांना ज्या योजनांची अपेक्षा होती त्यावर फोकस केलेले नाही. - सुनील किर्दक, उपाध्यक्ष मासिआ

सर्वसाधारणपणे समाधानकारक बजेट. वीज बिलासाठी १००० कोटीची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योग आकर्षित होण्यास मदत होईल. नवीन उद्योग येऊ शकतात. केंद्र व राज्य सरकारने सात, आठ क्लस्टरला मंजुरी दिली आहे. त्यासाठी ५६० कोटींची तरतूद केली आहे. त्याचा फायदा उद्योग व उद्योजकांना होणार आहे. रास्त दरात उत्पादने उपलब्ध होतील. पायाभूत सुविधा व महिला सक्षमीकरणासाठी चांगली तरतूद केली आहे. सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. जीएसटी लागल्यानंतर नवसंजीवनी मिळेल. - विजय लेकुरवाळे, अध्यक्ष मासिआ

खूप घाईगडबडीने आणि अतिउत्साहामध्ये विरोधकाच्या विरोधी वातावरणासुद्धा अर्थमंत्र्यांनी सर्वसमावेशक असाच अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्मार्ट सिटी व ग्राम योजनेची जे प्रयोजन केले, त्यांचे नेमके काय फलित येईल, हे योजना पूर्ण झाल्यावरच सांगता येईल. व्यापारी दृष्टिकोनातून राज्यातील व्यापार वृद्धीसाठी भरीव अशी तरतूद, नवीन योजना जाहीर होईल, अशी अपेक्षा होते. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात याबाबत काहीसा नाराजीचा सूर आहे. - अजय शहा, अध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नुसताच घोषणांचा पाऊस पाडला. राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अर्थसंकल्पात निश्चित शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल असे सरकारच्यावतीने सांगण्यात येत होते. मात्र, अर्थसंकल्पात शेतकरी हिताचा कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नाही. यावरूनच या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. खरे तर राज्यातील शेतकरी मानसिक दृष्ट्या खचला असताना त्याला 'आधारा' देण्याऐवजी त्याच्यावर 'आघात' करण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. राज्यातील जुन्याच योजनांची जंत्री आजच्या अर्थसंकल्पात नव्याने वाचली या पलीकडे फार काही हाती लागले नाही. एकंदरीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आजच्या अर्थसंकल्पाने केले आहे. - सतीश चव्हाण, आमदार, राष्ट्रवादी कॉँग्रेस

अर्थसंकल्प केवळ आश्वासनांचा आहे. त्यात विशेष आणि ठोस तरतुदींचा अभाव आहे. उद्योग, शेतकरी, व्यवसाय क्षेत्रासाठी यातून काहीच मिळणार नसल्याने कुणासाठीच फायद्याचा नसलेला हा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्र्यांनी नागरिकांच्या आशांवर पाणी फेरले आहे. सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या सरकारने अल्पसंख्यांकाच्या विकासासाठीची तरतूद वाढविली नाही. देशी आणि विदेशी मद्यावरील कर वाढवून चांगले पाऊल उचलले आहे. औरंगाबादमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील सुविधा वाढवून देण्यासाठी विशेष निधीची केलेली तरतूद स्वागतार्ह. - इम्तियाज जलील, आमदार

शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अर्थहीन असलेला अर्थसंकल्प आज राज्यसरकारने मांडला. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजनेला तरतूद केलेली दिसून येत नाही. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळत नाही. शेततळे व त्याचे प्लास्टिकचे अनुदानासाठी तरतूद नाही. शेती मालाला हमी भाव देण्यासाठी सरकारने कोठेही ठोस पाऊल उचलेले नाही. शेती मालाचे भाव कमी करून शेतकऱ्याची फसवणूक या अर्थ संकल्पात झालेली दिसून येते. उलट पक्षी मोठे उद्योजक व व्यवसायिकांना सवलतीचा वर्षाव केल्याचे या अर्थ संकल्पातून दिसून येते. - डॉ. कल्याण काळे, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...शरण शरण एकनाथा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी पैठण /औरंगाबाद

‘शरण शरण एकनाथा, चरणी माथा ठेविला,’ या तुकोबारायांच्या अभंगाच्या जयघोषात शनिवारी मोठ्या उत्साहत पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेच्या मुख्य उत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या २१ मानाच्या दिंड्यासह जवळपास साडेपाचशे पेक्षा जास्त पायी दिंड्या टाळ मृदंगाचा व हरिनामाचा गजर करत पैठणमध्ये दाखल झाल्या.
नाथषष्ठी मुख्य उत्सवाच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी, संध्याकाळपर्यंत पैठण शहरात अडीचशे पेक्षा जास्त पायी दिंड्याचे आगमन झाले होते. शुक्रवारी रात्रीतून व शनिवारी दिवसभर जवळपास तीन ते चार लाख भाविक पायी दिंड्या, महामंडळाच्या बसने व खासगी वाहनाने पैठण शहरात दाखल झाले होते. राज्यात सगळीकडे समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने यावर्षी वारकऱ्याच्या दिंडया मध्ये वाढ झाली. भाविक व वारकरी यांच्यात उत्साह जाणवत आहे. शनिवारी, शहराचे सर्व अंतर्गत रस्ते वारकरी व भाविकांनी अक्षरशः फुलून गेले होते. नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लाब दर्शन रांगा लागल्या होत्या. नाथ संस्थान तर्फे महिला व पुरुष भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. शनिवारी, संध्याकाळपर्यंत चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी नाथ समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानकडून सांगण्यात आले.दुपारी गावातील नाथ मंदिरापासून ते नाथ समाधी मंदिरापर्यंत वारकऱ्यांच्या व भाविकांच्या मोठ्या लवाजम्यासह नाथांची निर्वाण दिंडी काढण्यात आली. घोडा, जरी पटका, भानुदास महाराजाचे निशाण, झेंडेकरी, विणेकरी, अमृतराय संस्थांनची छत्री, नाथवंशजाच्या छत्र्या, संस्थानिक अमळनेरकर महाराजाची दिंडी, भगवानगडची दिंडी अश्या अग्रक्रमाने चालत या दिंडीने गावातील नाथ मंदिरातून निघून कावळे गल्ली, उदासी महाराज मठ, या मार्गाने समाधी मंदिराच्या पश्चिम द्वाराने मंदिरात प्रवेश केला. चारशे पंधरा वर्षापासून निर्वाण दिंडीची परंपरा सुरू आहे. रविवारी फाल्गुन वद्य ७ नाथ षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी रात्री बाराला छबिना मिरवणूक, व महोत्सवाच्या अंतिम दिवशी सोमवारी फाल्गुन वद्य ८ कालाष्टमी च्या दही हंडी फोडून नाथ षष्ठीची सांगता होणार आहे.

नाथसागरात स्नान

दरवर्षी नाथ षष्ठी उत्सवादरम्यान भाविक व वारकऱ्यांना शुद्ध पाण्यात स्नान करता यावे यासाठी गोदापात्रात पाणी सोडण्यात येते. यावर्षीही धरणातून गोदापात्रात पाणी सोडल्याने आले. मात्र, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नाथ षष्ठीत सहभागी झालेल्या बहुतांशी भाविक व वारकऱ्यांनी गोदापात्रात स्नान न करता सरळ जायकवाडी धरणात स्नान करणे पसंत केले. यामुळे धरणावर शनिवारी सकाळी मोठी गर्दी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्मरणीय संगीतयुगाला उजाळा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाला उजाळा देणारा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, आशा भोसले आणि किशोरकुमार यांनी अजरामर केलेली गाणी ऐकत रसिकांनी ‘वन्स मोअर’ दिला. सरस हिंदी गाण्यांची श्रवणीय शृंखला गुंफली गेली.
साठच्या दशकापासून हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल सांगणारा आरोह निर्मित ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम गायकांनी श्रवणीय केला. अमीन सयानी यांचा रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रम अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. या कार्यक्रमाला उजाळा देणारा ‘बिनाका गीतमाला’ तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी रात्री रंगला.
गायक नीरज वैद्य, संगीता भावसार आणि संदीप यांनी विविध लोकप्रिय गाणी सादर केली. ‘जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात’ या गाण्याने नीरज यांनी कार्यक्रम सुरू केला. मोहम्मद रफी यांचे गाणे तन्मयतेने रंगवत नीरज यांनी रसिकांची दाद मिळवली. संदीप यांनी ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे’ गाणे सादर केले.
‘अहसान तेरा होगा मुझपर’ या युगूलगीतातून संगीता भावसार आणि नीरज वैद्य यांनी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ उभा केला. कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण निरंजन, प्रशांत सावंत, रणजीत, फहीमभाई, अन्वरभाई यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रेषित रुद्रावार यांनी केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मैफल उत्तरोत्तर रंगली
‘जंगली’ चित्रपटातील या गीताला ‘वन्स मोअर’ मिळाला. ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’, ‘बोला राधा बोल’, ‘जिस दिल मे बसा था प्यार तेरा’, ‘बहारों फूल बरसाओं’ अशा सरस गाण्यांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर चौकात भुयारी मार्ग!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावीर चौकात उड्डाणपूल उभारूनही वाहतुकीची व पादचाऱ्यांची कोंडी कायम राहिल्यामुळे या ठिकाणी आता भुयारी मार्ग करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. त्याचे शनिवारी सादरीकरण करण्यात आले.
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला व काही सूचना केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक बी. यू. चामरगोरे यांनी नगरनाका ते चिकलठाणा या जालना रस्त्याच्या कामाबद्दल माहिती दिली. प्रस्तावित भुयारीमार्गाची रुंदी व उंची एवढी ठेवली जाईल की, त्यावरून लहान-मोठी सर्वप्रकारची वाहने ये-जा करू शकतील. पूर्व - पश्चिम असा हा भुयारीमार्ग असेल, असे चामरगोरे यांनी यावेळी सांगितले. चौकातील महावीर स्तंभाला धक्का न लावता भुयारीमार्गाचे काम केले जाईल. महर्षी दयानंद चौकात (दूध डेअरी चौक) आणखी एक भुयारीमार्ग तयार केला जाणार आहे,’ असे चामरगोरे म्हणाले. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
बैठकीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते. नगरपालिकानिहाय कामाचा आढावा खैरे यांनी घेतला. यावेळी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, उपमहापौर स्मिता घोगरे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख राजू वैद्य, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते गजानन मनगटे, ओमप्रकाश वर्मा यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

विजेचे खांब हटवणार
‘जालना रोडवरील वीजेच्या तारा व खांब हटविण्यासाठी महावितरणकडून ४५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. या रस्त्यावरील सर्व विजेच्या तारा भूमिगत केल्या जातील. रस्त्याच्या खालून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या मात्र स्थलांतरित केल्या जाणार नाहीत. त्या आहे त्याच स्थितीत राहतील. जलवाहिन्यांवरून काँक्रिटीकरण केले जाईल. महापालिका जेव्हा नवीन जलवाहिनी टाकेल, तेव्हा ती रस्त्याच्या बाजूने टाकली जाईल. जालना रोडच्या कामाचे टेंडरिंग झाले आहे. लवकरच काम सुरू होईल,’ असा दावा चामरगोरे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा स्वतंत्र राज्य करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मराठवाड्याचे स्वतंत्र राज्य करा. यासाठी पुढील काळात मोठी चळवळ उभारू,’ असा इशारा शनिवारी मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला.
पत्रकार परषिदेला मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले, द्वारकादास पाथ्रीकर, जे. के. जाधव, भगवानराव कापसे, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, रत्नाकर खंडागळे आदीची उपस्थिती होती. मराठवाडा मुक्ती मोर्चाची सविस्तर भूमिका विशद करताना उगले म्हणाले, ‘विदर्भ वेगळा होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. देशात हिंदी भाषकांचे दहा राज्ये आहेत. या तुलनेत मराठी भाषकांची तीन राज्ये झाली तर काय हरकत आहे ? मराठवाड्याचा जेवढा भू भाग आहे. त्या क्षेत्रफळाचे जगभरात ६० देश आहेत. इतकेच नव्हे तर देशात मराठवाड्यापेक्षा लहान असलेली दहा राज्ये आहेत. भौगोलिक, विकासात्मक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून मराठवाडा हे स्वतंत्र राज्य करावे. मराठवाड्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. राज्याच्या निर्मितीपासून पाहिले तर कुठेच दखल घेतली जात नाही. मराठवाड्याच्या हक्काचा पैसा पश्चिम महाराष्ट्रात वळविला जातो. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन फक्त पश्चिम महाराष्ट्रातच का ? वर्षानुवर्षे मागणी करूनही बीडला काही किलोमीटरची रेल्वे केली गेली. स्वातंत्र्यापासून आपल्यावर अन्याय झाला आहे. विदर्भाचीही परिस्थिती अशीच आहे. प्रशासकीय दृष्टीने छोटे राज्य अत्यंत प्रभावी असतात, असे मत १९५५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते. हिंदी भाषेची एवढी राज्ये असू शकतात तर मराठीची का नाही ? तेलगू भाषकांची तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश ही राज्ये झाली. विदर्भ आणि मराठवाड्याचा भूभाग ४८ टक्के आहे तरी या भूभागाला ७२ टक्के पाणी ५२ टक्के भूभागासाठी २८ टक्के पाणी त्यात ही २८ टक्के पाण्यापैकी सहा टक्के पाणी मराठवाड्याला आणि २२ टक्के पाणी विदर्भाला दिले जाते. एवढा अन्याय सहन करण्यापेक्षा वेगळे राज्य मागितलेले काय वाईट आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वेगळे राज्य मागणीला मराठवाड्यातील राजकारणी कारणीभूत आहेत. आयआयएम, विधी विद्यापीठ, कृषी आयुक्त कार्यालय, जलसंधारण कार्यालय, साई या संस्था मराठवाड्यातून दुसरीकडे पळविल्या. मराठवाड्यातील पुढारी याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गप्प आहेत. चार महिन्यांपूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की उत्तराखंड वेगळे झाले त्यावेळेस २७००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता आता तोच अर्थसंकल्प ७२००० कोटींचा आहे. त्यामुळे छोटे राज्य झाले पाहिजे या विचारांचे आमचे मत असे यावेळी सांगण्यात आले.

गुरुवारी मेळावा
‘स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे गुरुवारी २३ मार्च रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे दुपारी तीन वाजता होणाऱ्या मेळाव्याचे उद्घाटन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते होईल. द्वारकाभाऊ पाथ्रीकर अध्यक्षस्थानी असतील. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येईल. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत,’ असे संयोजक प्रा. बाबा उगले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मनोधैर्य’ प्रकरणे तपासाच्या प्रतीक्षेत

$
0
0


पृथा वीर, औरंगाबाद
मनोधैर्य योजनेच्या जिल्ह्यातील १२ प्रकरणांमध्ये पीडितांपर्यंत पोचण्यास यंत्रणेला अनेक अडचणी येत असून, निधी आहे, पण लाभार्थी नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १५६ पीडितांना लाभ मिळाला असून, या सर्व लाभार्थींना सुमारे ३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, अद्यापही १० पीडितांचे बॅँकेत खाते नाही आणि १२ प्रकरणांतील पीडिता दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे समजते. या १२ जणींना शोधायचे कसे, हा प्रश्न जिल्हा महिला व बालविकास विभागासमोर आहे. बलात्कार, लैगिंक अत्याचार, अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्याच्या मनोधैर्य योजनेस मध्यंतरी पुरेसा निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील ८९ पीडितांना अर्थसहाय्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. राज्यात २०१३ पासून ही योजना कार्यान्वित झाल्यावर २ ऑक्टोबर २०१३ ते २०१४ पर्यंत ४८ प्रकरणांसाठी ८७ लाखांचा निधी वाटप झाला. २०१४ नंतर या योजनेस निधीच आला नाही. मग थेट जून २०१६ मध्ये मिळाला. सध्या सर्व मंजूर लाभार्थींसाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, दिलेल्या पत्त्यांवर पीडिताच राहत नाहीत अशी माहिती विभागाने दिली आहे.

योजनेचे स्वरूप
'मनोधैर्य'अंतर्गत पीडितांना किमान २ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. अल्पवयीन पीडितेसाठी ७५ टक्के व २५ टक्के अशा दोन स्वतंत्र एफडी वयाच्या १८ वर्षांपर्यंत काढल्या जातात. १८ वर्षांवरील पीडितांना ‌७५ टक्के रक्कम ३ वर्षांसाठी एफडीमध्ये ठेवावी लागते. प‌ीडिता किंवा तिचे कुटुंबीय स्वतःहूनही मदतीसाठी अर्ज करू शकतात. पीडिता हयात नसेल तर तिच्या वारसांना अर्ज करता येतो.

मनोधैर्य योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला असून सर्व लाभार्थींपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बॅँकेत खाते नसणाऱ्या लाभार्थींसाठी सातत्याने स्टेट बॅँक ऑफ हैदराबादशी संपर्क साधतो. मेजर केसमध्ये पीडितेच्या नावावरच्या राष्ट्रीयकृत बॅँकेतच निधी देण्यात आला आहे. - रेश्मा चिमंद्रे, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक कलेचे माध्यम निराळे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘टीव्हीत माणूस आहे त्यापेक्षा लहान दिसतो आणि चित्रपटगृहातील पडद्यावर आहे त्यापेक्षा मोठा दिसतो. तर नाटकात माणूस आहे तेवढाच दिसतो. म्हणून कलांचा आनंद थिएटरमध्येच घेतला पाहिजे. चित्रपट माध्यम तर चित्रपटगृहाशिवाय जाणून घेणे शक्य नाही,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. शिरीष देशपांडे यांनी केले. ना. गो. नांदापूरकर व्याख्यानमालेत ते बोलत होते.

मराठवाडा साहित्य परिषदेने दोन दिवसांची ना. गो. नांदापूरकर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत शनिवारी सायंकाळी ‘चित्रपट कसा पहावा’ या विषयावर डॉ. देशपांडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकाव ठाले-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रपट, नाटक व साहित्य क्षेत्राचे वेगळेपण सांगत देशपांडे यांनी विषय उलगडला. ‘चित्रपट कादंबरीप्रमाणे थांबणारा नसतो. एका प्रवाहात चित्रपट सुरू असल्याने रसिक वेगळ्या पद्धतीने आनंद घेतात. काहीजण सोबतच्या मित्रांसोबत चर्चा करतात. काही प्रेक्षक चित्रपटात पुढे काय घडणार हे सांगत असतात. शिवाय आपल्या व्यवसायाप्रमाणे एखाद्या प्रेक्षकाची प्रासंगिक प्रतिक्रिया उमटते. प्रत्येक प्रेक्षक दृष्टिकोनानुसार चित्रपट अनुभवतो. चित्रपटाप्रमाणे आपण प्रत्यक्षात वागू शकत नाही. आपल्यात नसलेल्या शक्यता आपण चित्रपटात पाहतो,’ असे देशपांडे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाले-पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. दादा गोरे यांनी केले.

पटकथेवर आज व्याख्यान
नांदापूरकर व्याख्यानमालेचा रविवारी सायंकाळी समारोप होणार आहे. व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी डॉ. शिरीष देशपांडे ‘चित्रपटाची कथा आणि पटकथा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यानाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आशां’चे काम दिशादर्शक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती करताना आरोग्य सुविधा पुरविण्याचे महत्वाचे काम आशा स्वयंसेविकांकडून होत आहे. पोलिओमुक्त भारत, सुरक्षित बाळंतपण यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे काम समाजासाठी दिशादर्शक असून भविष्यात जिल्ह्याच्या प्रगतीसाठी याचा निश्चितच उपयोग होईल,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी येथे केले.
ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका पुरस्कारांचे वितरण शनिवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी, समन्वयक संपदा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्ष २०१६ -१७ मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आशा स्वयंसेविकांना पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्कार घेतल्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात काही स्वयंसेवकांनी अनुभवकथन केले. सीइओ अर्दड म्हणाले, ‘हा कार्यक्रम जिल्ह्याच्या मानाने छोटा आहे. आपल्याकडे कार्यरत असलेल्या सर्व आशा स्वयंसेविका निस्पृह पद्धतीने काम करतात. ५१ प्रकारची कामे करतात. परिस्थितीवर मात करून सेवा पुरविण्याचे काम करून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. यापुढे तुमच्या कुटुंबीयांसोबत कार्यक्रमास बोलाविण्यात येईल. लोककल्याणाचे तुमच्या हातून होत असलेले काम आदर्श आहे,’ असे अर्दड म्हणाले. डॉ. बी. टी. जमादार यांनी प्रास्ताविक केले. संपदा चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

काम दसपटीने चांगले
‘२०१० -११ मध्ये दहा हजारांचे बक्षीस होते ते आज ९० हजारांवर पोचले याचा अर्थ तुमचे कामही दसपटीने चांगले झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कामाचे प्रतिबिंब तुमच्या कामातून उमटते. यापुढे तुमचे काम असेच सुरू ठेवा. स्वच्छ भारत अभियानातही तुमचा सहभाग आवश्यक आहे. गावातील महिलांना यात सहभागी करून घेतले की जिल्हा पाणंदमुक्त होण्यास विलंब होणार आहे. तुमच्या कृतीतून हे दाखवू द्या,’ असे आवाहन अर्दड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीईएस’च्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न

$
0
0


औरंगाबाद : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न उघड झाला. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीपल्स बचाव कृती समिती आणि दलित अत्याचारविरोधी सर्व पक्षीय कृती समितीने शनिवारी पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांची भेट घेऊन केली.
नागसेनवनातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण कॉलेजच्या पूर्वेस असलेल्या जागेवर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमणाचा प्रयत्न झाला, असा आरोप आंबेडकरी अनुयायांनी केला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात पीईएस बचाव कृती समितीतर्फे शुक्रवारी तातडीने शारीरिक शिक्षण विभागाच्या सभागृहात बैठक घेऊन संताप व्यक्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब, वंचित घटकांना शिक्षणाची दारे खुली केली. काही समाज विघातक कृत्य करणाऱ्यांनी मात्र संस्थेची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, एक इंचभर जमीनही जाऊ देणार नाही असा निर्धार बैठकीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. शुक्रवारी रात्री जिन्सी पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला. शनिवारी पुन्हा उपायुक्त संदीप आटोळे यांची भेट घेऊन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न रोखण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, माजी सभापती रतनकुमार पंडागळे, अॅड. रमेश खंडागळे, रामभाऊ पेरकर, मिलिंद शेळके, मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ, गौतम खरात, यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खोटी तक्रार दिली
पीईएसमध्ये कधी काळी ठेकेदार असलेल्या बाबा सिद्दिकीने जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. दबाव आणण्याच्या उद्देशाने मिलिंद बनसोडे या कार्यकर्त्याच्या विरोधात अपहरणाची खोटी तक्रार दिली आहे, असा आरोप समितीने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये तीन भावंडांचा बुडून मृत्यू, आई वाचली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे. जिशान, सानिया आणि अफ्फान अशी या मुलांची नावे आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बुडणाऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी या मुलांच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र गावकऱ्यांनी बुडणाऱ्या आईला वाचवले.

या तीन दुर्दैवी मुलांची आई परवीन शेख कपडे धुण्यासाठी कामखेडजवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. आई कपडे धूत असताना अचानक जिशान पाय घसरुन पाण्यात पडला. हे सानिया आणि अफ्फानने पाहिल्याबरोबर ते दोघे जिशानला वाचवण्यासाठी लगबगीने पाण्यात उतरले. मात्र यांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बु़डू लागली.

शेजारीच कपडे धूत असलेल्या परवीन यांनी आपली मुले बुडत आहेत हे पाहताच आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांनीही पाण्यात उडी घेतली. दरम्यान, गटांगळ्या खाणाऱ्या जिशान, सानिया आणि अफ्फान यांना पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

तीन मुले पाण्यात पडली आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईनेही बंधाऱ्यात उडी घेतली आहे, हे पाहताच आसपास असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या आणि परवीन यांचा प्राण वाचवला.

बंधाऱ्यात बुडून मृत्यू पावलेल्या या दुदैवी मुलांचे वडील शेतकरी आहेत. शिवाय त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय आहे.

एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवांची बाजी लावणाऱ्या या तीन भावंडांचा दुदैवी मृत्यू झाल्याने कामखेडा गाव आणि बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडितअण्णा मुंडे यांचे ह्रदयविकाराने निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे बंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. परळीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.

पंडितअण्णांना गेल्या महिन्यात २८ सप्टेंबरला ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. त्यावेळी त्यांना लातूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते.

पंडितअण्णा हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे वडीलबंधू आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चे वडील होत. पंडितअण्णा यांनी दोन वेळा बीड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. याबरोबर संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे, तसेच परळी बाजारसमितीचे ते संचालक होते.

पंडितअण्णांनी राजकारणाची सुरूवात आपले बंधू दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या सोबतच केली. गोपीनाथ मुंडे राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकाऱणाची जबाबदारी पंडितअण्णा पार पाडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजांना धक्का; परळीत धनंजय मुंडेच

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । परळी (बीड)

परळी-वैजनाथ नगरपरिषदेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावा-बहिणींमध्ये रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत पंकजा यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड आणखी मजबूत करत ३३ पैकी २७ जागा जिंकल्या असून भाजपच्या पदरात अवघ्या ४ जागा पडल्या आहेत. परळीच्या नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांनी 'मी हा पराभव स्वीकारत आहे', अशी प्रतिक्रिया निकालांनंतर दिली.

परळीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पंकजा यांच्या नेतृत्वाने कमाल केली होती. त्या निकालांचीच पुनरावृत्ती परळीत होईल, असे आडाखे बांधले जात होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे सगळे अंदाज फोल ठरवले आणि परळीतील आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भाजप आणि पंकजांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपने परळीची निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभा घेतली होती. त्यामुळे भाजपसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे. पंकजा यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी पराभव मान्य केला आहे. या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. शरद पवार एखाद्या ठिकाणी प्रचाराला गेले आणि तेथे पराभव झाला तर तो पवरांचा पराभव आहे, असे आपण म्हणतो का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

धनबळ हरलं, जनशक्ती जिंकली: धनंजय मुंडे

भाजपने धनबळ वापरलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी आणल्या, तरीही परळीतील जनशक्तीने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. नगरपालिकेत आम्ही करत असलेल्या भरीव कामांना मिळालेली ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया या विजयावर धनंजय मुंडे यांनी दिली.

परळी-वैजनाथ नगर परिषद निकाल


पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी - २७
भाजप - ४
शिवसेना - १
काँग्रेस - १
एकूण जागा - ३३

- नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोजिनी हालगे ५ हजार १४४ मतांनी विजयी. हालगे यांना १८ हजार १७६ मते तर भाजपच्या मेनकुदळे यांना १३ हजार ३२ मते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेंव्हा त्यानं हजेरीपटावरून जात खोडली...

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

'जात नाही ती जात', असं सांगत अनेकजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जातीचं समर्थन करत असतात. त्यामुळे जातीही नष्ट होत नाहीत आणि जातीमुळं होणारं नुकसानही टाळता येत नाही. बीडमध्ये मात्र रोहन भोसले या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं जातीविरोधात लढण्याचं धाडसी पाऊल उचललयं. त्यानं शाळेच्या हजेरीपटावरून स्वत:ची जात आणि धर्मच खोडून काढला असून त्याच्या या कृतीचं सर्वजण कौतूक करत आहेत.

आष्टी तालूक्यातील पारगावच्या जिल्हा परिषद शाळेत रोहन शिकतो. रोहन शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. तो देव आणि धर्मही मानत नाही. शाळेतील हजेरीपटावर विद्यार्थ्यांच्या नावासमोरच्या कॉलममध्ये त्याची जात आणि धर्म लिहिला जात असल्याचं त्याला खटकत होतं. त्यामुळं त्यानं शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गात शिक्षक नसल्याची संधी साधत हजेरीपटावरून स्वत: जात खोडून टाकली. जवळ पेन नव्हता, त्यामुळं वर्ग मैत्रिणीचा पेन घेऊन त्यानं हजेरीपटावरून जात काढून टाकण्याचं मिशन फत्ते केलं.

रोहननं जात खोडल्याचं घरी कळताच त्याचे आई-वडिल घाबरले. पण गावकरी आणि शिक्षकांनी त्याच्या या कृतीचं समर्थन केल्यानं रोहनच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना जे संस्कार देतो, ते रोहनमुळे खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं त्याचे शिक्षक सागंतात. रोहनच्या या कृत्याचा अभिमान असून त्याचा हा संकल्प सरकारी पातळीवर राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

शिवराय, फुले आणि आंबेडकर प्रेरणास्त्रोत

इतर मुलांसारखं टाइमपास करणं आणि खेळणं यात रोहनला इंटरेस्ट नाही. तो नियमितपणे किर्तन ऐकतो. वाचन करतो आणि घरच्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत असतो. या तीन महापुरुषांच्या विचाराच्या पगड्यातूनच त्याला हजेरीपटावरून जात खोडण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात येतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या जन्मानंतर चहा,नाश्ता आणि दाढी फ्री

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गावात मुलींचा घटलेला जन्मदर वाढविण्यासाठी बीडमधील एका गावानं न्यारीच शक्कल लढवली आहे. मुलगी जन्माला आली तर मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी-कटींग फुकट करून देण्यात येत असून त्यांना चहा-नाश्ताही फुकट देण्यात येत आहे. त्यामुळं मराठवाड्यात हे गाव चर्चेचा विषय झाले आहे. शिवाय आधीच स्त्रीभ्रूण हत्येनं बदनाम झालेल्या बीडचा 'बेटी बचाव' मोहिमेचा हा अनोखा 'बीड पॅटर्न' असल्याचं बोललं जात आहे.

स्त्रीभ्रूण हत्येमुळं बीडचे नाव खुप खराब झालं होतं. त्यामुळे या बीडचा जन्मदर ही प्रचंड कमी झाला होता. बीडच्या कुंबेफळ या गावाची स्थितीही काही वेगळी नव्हती. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन तरूण पुढे आले. अशोक पवार आणि भागवत थोरात असं त्यांचं नावं. मुलगी जन्माला आल्यास मुलीच्या वडिलांची सहा महिने फुकटात दाढी-कटींग करण्याचं पवार यांनी जाहीर केलं. तर भागवत थोरात यांनी मुलीच्या बापाला चहा आणि नाश्ता मोफत देण्याचं जाहीर करून उपक्रमही राबवायला सुरुवात केली. आर्थिक झळ बसत असली तरी या दोघांनी गावच्या हितासाठी हा उपक्रम हाती घेतला आणि गावकऱ्यांना उपक्रमाची माहिती देण्यासाठी आपआपल्या दुकानांवर फलकही लावले. या उपक्रमाचं गावकऱ्यांनी स्वागतही केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images