डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकप्रशासन विभागातर्फे आज ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान’ विषयावर एक दिवसाच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. विभागाच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर डॉ. सतीश दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. वाघमारे म्हणाले,‘जगातील सर्व राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून चांगल्या घटकांचा समावेश राज्यघटनेत केलेला आहे. त्यामुळेच भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात उत्कृष्ट आणि व्यापक स्वरुपातील लिखित राज्यघटना आहे. समाजातील प्रत्येक वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी भारतातील विविधतेचा सखोल अभ्यास केला. घटना हा असा कायदा आहे, जो कधीही रद्दबदल होत नाही.’ राज्यघटनेबाबत फक्त सुशिक्षित लोकांनाच माहिती असून, चालणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला माहिती असणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या हक्क आणि कर्तव्याबाबत जागरूक रहायला हवे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले,‘समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य हे राज्यघटनेचे मूलभूत आधार आहेत.’ डॉ. दांडगे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना हा विषय विद्यापीठाने सक्तीचा करून सजग नागरिक होण्यासाठी पाऊल उचलले आहे.’ डॉ. ह. नि. सोनकांबळे सूत्रसंचालन केले. डॉ. शाम सिरसाठ यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट