Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘गांधी विचारांचा प्रभाव कायम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सध्या कोणताही राजकीय पक्ष गांधी विचाराने चालत नाही. गांधीवादी विचारांचा प्रभाव असलेली माणसं कमी झाली आहेत. तरीसुद्धा महात्मा गांधी कधीच विस्मरणात जाणार नाहीत. कारण अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी त्यांनी देशाला सत्य, अहिंसा, सत्याग्रह, उपोषण, मौन, बहिष्कार ही शस्त्रे दिली’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त प्रा. जयदेव डोळे यांचे ‘मोहन की बात’ या विषयावर व्याख्यान झाले. मराठी विभागाच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी व्याख्यान पार पडले. यावेळी मंचावर अध्यासन केंद्र संचालक डॉ. दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सद्यस्थितीत गांधी विचारांच्या पैलूंवर प्रा. डोळे यांनी भाष्य केले. ‘जयंती आणि पुण्यतिथीपुरतेच गांधीजी उरले असे म्हणतात. भारतात गांधींचे महत्त्व ओसरले तरी जगात महत्त्व वाढत आहे. कारण, जगाला सहिष्णुतेचे महत्त्व सांगण्याची ताकद गांधी विचारात आहे. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे गुरू होते. तर एका मराठी माणसानेच गांधीजींची हत्या केली. त्यामुळे महाराष्ट्रात गांधीजींचे महत्त्व उरले नाही’ असे प्रा. डोळे म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दासू वैद्य यांनी केले. ‘सध्या धर्माच्या नावाने अधर्माचा अतिरेक सुरू आहे. चांगल्या विचारांच्या स्मरणासाठीच नव्हे, तर स्मृतीभ्रंश टाळण्यासाठी गांधी विचारांवरील व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. पुन्हा नव्याने गांधी विचारांचा जागर करण्याची गरज आहे’ असे वैद्य म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन बाभूळगावकर यांनी केले, तर रामप्रसाद वाव्हळ यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलह सोडवला

‘हिंदू संस्कृतीतील कलह सोडवण्याची पद्धती गांधीजींनी सर्वमान्य केली. सत्याग्रह, मौन हे अन्यायाविरूद्ध लढण्याचे शस्र दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्राचा उपवास केला. मात्र, त्यांनी कधीच आत्मक्लेश केला नाही. कारण, संघ परिवार आत्मक्लेश न मानता परक्लेश मानतात’ अशी टीका प्रा. डोळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समिती संचालकाचे दुर्बल घटक प्रमाणपत्र रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
कृषी उत्पन्न बाजर समितीचे आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक राजेंद्र भिमाशंकर कराळे (हिंगोणी) यांचे आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी रद्द केले आहे. कराळे यांच्याविरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी कारभारी भानुदास जगताप (शिवसेना) यांनी तक्रार केली होती.
बाजार समितीच्या अठरा जागांसाठी २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. कराळे यांची नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात एक हेक्टर ७० आर बागायती जमीन, विहीर असल्याची नोंद सातबारावर आहे. या जमीनीचे मुल्यांकन २६ लाख ४५ हजार २०० रुपये असून त्यांच्या मालकीचे वैजापूर शहरात दोन अकृषक प्लॉट आहेत. ते एलआयसी एजंट आहेत. पण, तहसीलदारांनी शहानिशा न करता कराळे यांना वार्षिक १९ हजार ५०० रुपये उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र दिले अशी तक्रार तहसीलदार व कराळे या दोघांच्या विरोधात करण्यात आली होती. जगताप यांनी तहसीलदारांकडे केली होती. त्यावर कारावी न झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दावा केला होता. याप्रकरणी अर्जदारातर्फे अॅड. के. एस. त्रिभुवन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ निधीच्या व्याजाचाही फडशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीवरील व्याजाचाही पालिकेच्या ड्रेनेज विभागाने फडशा पाडल्याचा गंभीर आक्षेप लेखापरीक्षण अहवालात घेण्यात आला आहे. शासनाच्या परवानगीशिवाय व्याजाची रक्कम वापरता येत नाही, असे असताना व्याजाची रक्कम वापरण्याची शासनाकडे केवळ विनंती करून सर्वसाधारण सभेसमोर व्याज वापरण्याचा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी अनियमितता आहे, असा उल्लेख अहवालात आहे.

महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी मिळालेल्या शासकीय अनुदानाच्या रकमेवरील व्याज योजनेचा वाढीव खर्च भागवण्याची वापरणे आवश्यक आहे, असे नमूद केले. तसा प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता, परंतु शासनाच्या नगरविकास खात्याच्या दहा जून २०१६च्या परिपत्रकानुसार व्याजाची रक्कम वापरण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. असे असताना शासनाची परवानगी न घेता १६४ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीवरील व्याज ड्रेनेज विभागाने योजनेच्या वाढीव कामासाठी वापरले. व्याज वापरण्यासंदर्भात ड्रेनेज विभागाने शासनाची परवानगी प्राप्त झाल्याचे पत्र लेखापरीक्षण विभागाला उपलब्ध करून दिले नाही. शासनाच्या परवानगीपूर्वीच व्याजाची रक्कम योजनेच्या विविध वाढीव खर्चासाठी वापरण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. शासनाच्या परवानगीपूर्वी असा प्रस्ताव ठेवणे संयुक्तिक आहे का, याबाबत संबंधित विभागाचा खुलासा लेखापरीक्षण विभागाने मागवला असता महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेवून व्याज वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. प्रकल्पातील वाढीव कामे व महापालिकेचा हिस्सा भरून काढण्यासाठी व्याजाची रक्कम वापरण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे, परंतु विभागाचा हा खुलासा समाधानकारक नाही, असे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जबाबदारी निश्चित करा
शासनाची परवानगी न घेता शासनाकडे केवळ विनंती करून सर्वसाधारण सभेच्या समोर अनुदानातील मिळालेल्या रकमेवरील व्याज वापरण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करणे ही मोठी अनियमितता आहे, असा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कार्यवाहीअंती अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस देखील अहवालात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धावपटूंनी फूड सप्लिमेंट टाळावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत आहात म्हणजे खूप काही वेगळा आहार घेण्याची, फूड सप्लिमेंटची आवश्यकता नाही. भात, पोळी, वरण हाच आहार सर्वोत्तम आहे,’ असे प्रतिपादन ‘आयर्न मॅन’ मिलिंद सोमण यांनी येथे केले.

एमआयटी व औरंगाबाद ब्लॅक बक्स यांच्यातर्फे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटूंसाठी आहार व तयारी या विषयावर मार्गदर्शन करताना मिलिंद सोमण हे बोलत होते. धावपटूंशी संवाद साधताना सोमण म्हणाले, ‘खूप मोठी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असेल, तर त्यासाठी विशेष आहार ठरवला जाऊ शकतो, परंतु एक-दीड तास सराव, व्यायाम करणाऱ्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला व नेहमी जे खातो तोच आहार घ्यावा. आपल्या शरीराला त्याची सवय असते आणि शरीर या आहारातून आवश्यक सारे घटक मिळवते. अनावश्यक फूड सप्लिमेंट्स पचविण्याची, स्वीकारण्याची शरीराची तयारी नसते. त्यामुळे ते टाळावेत. प्रक्रिया केलेले, फ्रोजन पॅक्ड, रिफाइंड, पॉलिश्ड अन्नपदार्थ खाऊ नयेत. यातून फॅट वाढण्याची शक्यता असते. परदेशातून येणाऱ्या तथाकथित पौष्टिक आहारामागे अनेकजण धावतात. ते चुकीचे आहे. त्याची आपल्याला बिलकुलच आवश्यकता नाही, असे सोमण यांनी स्पष्ट केले.

आपण कितीही फिट असाल, रोज व्यायाम करत असाल तरी आपल्याला काहीही खाण्याची परवानगी नाही. चांगल्या, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शरीराला घातक खाणे नाकारलेच पाहिजे. जंकफूड, शुगर, मध्यपान हे अतिशय घातक आहे, असेही ते म्हणाले. मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी करायचा सराव, आहार याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

घोरपडे यांचा सत्कार
औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित एमआयटी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने ‘आयर्न मॅन’ मिलिंद सोमण यांनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंशी संवाद साधला. एमआयटी महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात मिलिंद सोमण यांच्या हस्ते टी-शर्ट्सचे तसेच पदकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ब्लॅक बक्सचे मुकुंद भोगले, मुनीष शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मंगेश पानट यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या प्रसंगी मॅरेथॉनपटू नितीन घोरपडे यांचा सोमण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्राध्यापकांची भरती सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सहाय्यक पदभरतीवरील बंदी तत्काळ उठवून प्राध्यापकांची भरती सुरू करावी, महाविद्यालयातील वाढणारी विद्यार्थीसंख्या पाहून विना अनुदानित तुकड्यांना त्वरित अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी नेट सेट, पीएचडी पात्रताधारक प्राध्यापकांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मराठवाडा, खान्देशचे प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२५ मे २०१७ रोजी शासनाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे २०१२ ते २०१७ च्या पदनिश्चितीनुसार व त्यापूर्वी रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीवरवर गदा आलेली आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी नेट-सेट, पी.एचडी आदी शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण होत आहेत, मात्र त्या प्रमाणात यूजीसीचे निर्देश असूनही शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यूजीसीने वेळोवेळी रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचित केले आहे, मात्र संबंधित विद्यापीठे त्यांच्या अंतर्गत असलेलेल्या महाविद्यालयांना सक्तीचे निर्देश देत नाहीत, सूचनांना केराची टोपली दाखवत आहेत. घटनेची पायमल्ली करण्यात येऊन जागा भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. शासनोनही वेळोवेळी प्राध्यापक पदभरतीवर कपात केली. तासिका तत्वावर काम करणाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यावर उदरनिर्वाह होत नाही म्हणून सीएचबी हे पद बंद करून कायम स्वरुपी नियुक्ती करावी, सहाय्यक प्राध्यापकांच्या ५० टक्के भरती ऐवजी १०० टक्के भरतीला मान्यता द्यावी, सामाजिक शास्‍त्रातील सहाय्यक प्राध्यापकाच्या दुसऱ्या पदाला मंजुरी द्यावी, वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी २०१५ – १६ चा कारभार गृहित धरून पद मान्यता देण्यात यावी, तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव कायम नियुक्ती झाल्यानंतर ग्राह्य धरण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आमदारांनी केले दुर्लक्ष
आतापर्यंत विधानसभा, विधान परिषदेत शिक्षक आमदारांनी आवाज उठवणे गरजेचे होते, मात्र त्यांना आमच्या मागण्यांची पूर्तता करण्यात रस नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. निवदेनावर डॉ. संदीप पाथ्रीकर, प्रा डॉ. भारतसिंग सलामपुरे, प्रा. डॉ. सतीश डाके, प्रा. डॉ. वावरे, प्रा. दत्तात्रय पानसरे, प्रा. पठाण मकसुद, डॉ. एस. एस. वाघमारे, प्रा. सुभाष जोगदंड, प्रा. आर. जी. गाढे प्रा. के. डी. भरकड, प्रा. अनिता पारगावकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सवलतींचा पाऊस

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, औरंगाबाद
ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवल्यामुळे विविध कंपन्या आणि शो रूमने अक्षरशः सवलतींचा पाऊस पाडला आहे. व्यापारी वर्गाला येणाऱ्या काळात ग्राहक वाढेल, अशी अपेक्षा आहे.

इलेक्ट्रॉनिक्स् बाजाराचा प्रतिसाद पाहता यंदा मोबाइल, एलडी टीव्ही, रेफ्र‌िजरेटर, वॉशिंग मशिन्स यात उलाढाल अधिक होईल या आशेने सर्व वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे, अशी माहिती शहरातील नामांकित व्यापाऱ्यांनी दिली. सराफा बाजारात झळाळी आहे. दसऱ्यानिमित्त सराफा बाजारातही उत्साही वातावरण आहे. शुक्रवारी सोन्याचा दर प्रती तोळा ३० हजार ६०० रुपये एवढा होता. यामुळे बाजरात चैतन्याचे वातावरण आहे. दागिन्यांसह, निरंजन, आपट्यांच्या पानांना मागणी असेल असे व्यापारी सांगत आहेत. गेले काही महिने स्लो डाउनचा सामना करणाऱ्या वाहन मार्केटमध्ये धूम आहे. आज अनेक नवीन वाहने रस्त्यावर धावताना दिसणार असून या क्षेत्रात दोन हजार ते तीन हजार दुचाकी वाहने विकली जातील, पण फोर व्हीलरबाबत कोणीही काहीही अंदाज व्यक्त करायला तयार नाही.

कापड, इलेक्ट्रॉ‌निक्स गॅझेट, टू-फोर व्हीलरसह सोन्याच्या मार्केटवर जीएसटी, नोटबंदीचे सावट आहे. तरीही सण म्हटले की खरेदीला उधाण येईल. - अजय शहा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

गृहनिर्माण क्षेत्रात ‘अच्छे दिन’ असून दसऱ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनात २५० फ्लॅट, रो-हाउसचे बुकिंग झाले आहे. - रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई

वित्तीय संस्था, बँका यांच्या सवलती असल्याने बाजारात ग्राहकांसाठी खरेदीला मोठा वाव आहे - रवी धामणगावकर, स्टेट बॅँकेचे अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या प्रचाराला आजपासून सुरुवात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
नांदेड पालिका निवडणुकीचा रणसंग्राम विजयादशमीच्या दिवशी म्हणजे ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भाजपच्या प्रचाराचा नारळ काळेश्वर मंदिरातून फोडण्यात येणार आहे. यावेळी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजितसिंग ठाकूर, आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांची उपस्थितीती राहणार आहे.

काळेळेश्वर येथे सकाळी १० वाजता होत असलेल्या प्रचाराची सुरुवात पक्षाच्या सर्व ८१ उमदेवार उपस्थित राहणार आहेत. येथून गुरूद्वारा, गायत्री मंदीर व गाडीपुरा येथील हनुमान मंदीरात दर्शन घेवून उपस्थितांना मान्यवर मार्गदर्शन करतील. या प्रचारात आजारी असल्याने भास्करराव पाटील खतगावकर येणार नाहीत. माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, सूर्यकांता पाटील या शिवसेना आमदार चिखलीकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रचार समारंभास उपस्थितीत राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या प्रसिद्धी पत्रकांत त्यांची नावे नाहीत. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर हे या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.
पक्षातील व पक्षाबाहेरून आलेल्या पण तिकीट न मिळल्याने नाराज झालेल्या बहुतेक उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असले तरी शिवसेनेमुळे हिंदू मतांचे विभाजन अटळ आहे. अशावेळी काँग्रेसला मिळणारी मुस्लीम मते, आपल्याला मिळाली नाहीत तरी चालेल पण काँग्रेसला मिळू नयेत अशी व्यूहरचना केली जात आहे. ते जमले तरच भाजप उमेदवाराला निवडून येता येणार आहे.
काँग्रेसने तूर्तास प्रचारात आघाडी घेतली असली तर विजयादशमीपासून भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याने निवडणूक प्रचाराची रंगत वाढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांच्या सभा शहरात होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवानबाबांचे जन्मगाव दसरा मेळाव्यासाठी सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगांव लेकींचे जोरदार स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. महाराष्ट्रातून भगवान भक्तांचा विराट जनसमुदाय मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे दुपारी १२ वाजता हेलिकॉप्टरने सावरगांव घाट येथे आगमन होणार आहे.
भगवानगडवर मेळावा घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर संत भगवानबाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा घेण्याची विनंती सावरगांव घाट येथील ग्रामस्थ व संत भगवानबाबांच्या वंशजांनी पंकजा मुंडे यांना केली होती, ही विनंती पंकजा मुंडेंनी मान्य केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली. सुमारे पंधरा एकर परिसरात हा मेळावा होणार असून मंडप उभारणीचे तसेच साफसफाईचे काम वेगाने होत आहे.
सावरगांव येथे मेळावा आयोजित करून पंकजा मुंडे यांनी एक नवा अध्याय सुरू केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. सर्वच गावकरी यात हिरिरीने सहभागी झाले आहेत. मंडप उभारणीचे साहित्य स्वतःच्या खांद्यावर घेऊन एकीकडे लोक काम करत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील बाजरी व मक्याचे उभे पीक बाजूला काढून मेळाव्याला येणाऱ्या भक्तांसाठी जागा करून दिली आहे. एवढे भारावून टाकणारे प्रेम उद्याच्या मेळाव्यात दिसून येणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणे पंकजा मुंडे ह्या समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्यामुळे संत भगवानबाबांच्या वंशजामध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने येणार
पंकजा मुंडे यांचे शनिवारी दुपारी १२ वाजता सावरगांव येथे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यांच्यासोबत काही मंत्री व भाजपचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. उद्या जागोजागी गुढ्या उभारून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. राज्यभरातून लाखो भक्त गण मेळाव्याला उपस्थित राहणार असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

डॉ. प्रितम मुंडेंच्या नेतृत्वाखाली महारॅली
दसरा मेळाव्याचे औचित्य साधून खासदार प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी गोपीनाथगड ते सावरगांव घाट अशी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी सात वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या रॅलीस प्रारंभ होणार आहे. सिरसाळा, तेलगांव, वडवणी करून ही रॅली सकाळी नऊ वाजता बीडमध्ये येणार आहे. वंजारवाडी, पिठ्ठी नायगाव, ताबा राजूरी, वांजरा फाटा, कुसळंब मार्गे रॅली सकाळी ११.३० वाजता सावरगांव घाट येथे येणार आहे. भक्तांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन मेळाव्याला विराट संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिफर्ड पेमेंट रस्त्यांनी रोखले शंभर कोटींचे टेंडर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शंभर कोटी रस्त्यांच्या टेंडरसोबत डिफर्ड पेमेंट रस्त्यांचे टेंडर जोडण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. त्यामुळे शंभर कोटींचे टेंडर निघाले नसल्याचे समजते.

रस्त्यांच्या कामासाठी शासनाने शंभर कोटींचे अनुदान जाहीर केल्यावर सर्वच नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या रस्त्यांबद्दलच्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत. आपल्या वॉर्डात, मतदारसंघात शासनाच्या अनुदानातून रस्त्यांची कामे झाली पाहिजेत यासाठी प्रत्येकजण आग्रही होता. विकास आराखड्यातील रस्त्यांचीच कामे अनुदानाच्या रकमेतून करा, अशी अट शासनाने घातल्यामुळे नगरसेवक व नेत्यांच्या मागण्या मान्य करण्यात अडचण येऊ लागली. या अडचणीवर डिफर्ड पेमेंटचा उतारा शोधण्यात आला.

शासकीय अनुदानातून मिळालेल्या शंभर कोटींचे चार टेंडर काढून त्याला प्रत्येकी साडेबारा कोटींचे डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांची एकूण ५० कोटींची कामे जोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. या दोन्ही रस्त्यांच्या कामाचे टेंडर एकाच वेळी काढण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले, परंतु प्रशासनाने शंभर कोटींच्या अनुदानातून करावयाच्या रस्त्यांच्या कामांचीच टेंडर प्रक्रिया सुरू केली. डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांच्या टेंडरचा विषय बाजूला ठेवला.

दोन्ही प्रकारच्या कामांचे टेंडर्स एकदाच काढा असा आग्रह शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांकडे धरला. केवळ शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढले, तर नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या रोषाला धार चढेल आणि त्यांचे समाधान करताना तारांबळ होईल, अशी भावना महापौरांसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. त्यानंतर डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यासाठी टेंडरचा मसुदा तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरूच केले नसल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे शंभर कोटींचे चार टेंडर काढण्याची परवानगी मिळाल्यावर पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह सायंकाळी काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र पालिकेत होते.

कंत्राटदारांचेही सेटिंग ?
शासकीय अनुदानातील रस्त्यांसह डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांची कामे कोणत्या कंत्राटदारांनी घ्यायची याचे सेटिंग झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. या सेटिंगमध्ये काही राजकीय नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोमीलन झाल्याचे वृत्त आहे. नेत्यांच्या मर्जीतले कंत्राटदार रस्त्यांच्या कामात उतरतील आणि त्यांनीच उतरावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ औरंगाबादच्या कलाकारांचे सीमोलंघन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्युपिल्स ऑलिंपिक असोस‌िएशन इंडिया आणि श्रीलंका स्पोर्टस अँड युथ अफेअर्स मिनिस्ट्री यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्युपिल्स ऑलिंपिक स्पर्धेत औरंगाबादच्या कलाकारांनी मोठे यश संपादन केले.

२३ ते २७ सप्टेंबर दरम्यान हॉल दी गॅले येथे झालेल्या स्पर्धांमध्ये अमेरिका, श्रीलंका, कॅनडा आणि पाकिस्तान असे पाच देश सहभागी झाले होते. सांस्कृतिक विषयात होत असलेल्या या पहिल्याच स्पर्धेत औरंगाबादेतील विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य, कराटे, कुस्ती आणि ताईक्वांदो आदी स्पर्धांमध्ये भाग घेतला. यात तनिष्क दीक्षित याला हार्मोनियम वादनाचे सुवर्णपदक मिळाले. त्याने राग वृंदावनी सारंग पेश केला. सुरुवातीची आलापी, गत राग विस्तार आलाप तानांच्या माध्यमातून भारतीय अभिजात संगिताची श्रीमंती त्याने दाखवून दिली. दिग्व‌िजय माथेकर याला स्वतंत्र तबलावादनात सुवर्ण पदक मिळाले. त्याने ताल तीनतालमध्ये उठाण, पेशकार, कायदे, मुखडे, तुकडे, रेला आणि नौहक्का सादर करत सर्वांचीच मने जिंकली. स.भु. प्रशाला औरंगाबाद येथील हे विद्यार्थी असून त्यांना संगीतशिक्षक विश्वनाथ दाशरथे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनाही सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. स.भु.च्या विद्यार्थ्यांचा हा पहिलाच दौरा होता व या स्पर्धेतही त्यांनी पहिल्यांदा भाग घेतला. यावेळी एस. एस. जे. के. फर्नांडो, दिलान सेनारथ, पियाल दर्शना गुरूंगे, मोहंमद रफी शेख आदी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांचे सभुचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, अरुण मेढेकर, मुख्याध्यापक शिरीष मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानी मातेची आजपासून मंचकी निद्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा शनिवारी सकाळी होत आहे. त्यानंतर देवीजीची मंचकी निद्रा सुरू होत असून, ही मंचकी निद्रा ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे.
५ ऑक्टोबरला तुळजाभवानी मातेची सिंहासनावर पुन्हा विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येईल. तुळजापूर येथील कोजागिरी पौर्णिमा व मंदिर पौर्णिमा ५ ऑक्टोबरलाच आहे. याच दिवशी रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना निघेल.
पलंग पालखीची मिरवणूक
तुळजाभवानी मंदिरात शुक्रवारी देवीजीची नित्योपचार पूजा करण्यात आली. दुपारी होमावर धार्मिक विधी व अजबळी, घटोत्थापन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व त्यांचा चमू उपस्थित होता. रात्री नगरहून आलेल्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे, शनिवारी जायकवाडी धरणाचे चार दरवाजे पुन्हा अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. त्यातून दोन हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
जायकवाडीत सध्या शंभर टक्के पाणीसाठा असून तो कायम ठेवून येणाऱ्या पाण्याची आवक पाहून किती विसर्ग करायचा याचे गणित सध्या जलसंपदा विभागाला करावे लागत आहे. शुक्रवारी, सकाळपर्यंत धरणात दोन हजार क्यूसेक आवक सुरु होती तर, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून अनुक्रमे हजार व पाचशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता.
परभणीच्या जिल्हा प्रशासनाने, शुक्रवारी सकाळी पाणी बंद करण्याची मागणी केल्यावर, जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यातून पाणी बंद करुन धरणाची दोन दरवाजे उघडून एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. काही तासातच परभणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा पाण्याची मागणी केल्याने धरणाचा मुख्य दरवाजा बंद करुन डाव्या कालव्यात पाणी सोडणे सुरू करण्यात आले होते.
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये शुक्रवारी चांगला पाऊस पडल्यावर नांदुर मधमेश्वरमधून सहा हजार क्यूसेक विसर्ग होत आहे. यापैकी चार हजार क्यूसेक पाणी जायकवाडी धरणात यायला सुरुवात झाली आहे. धरण शंभर टक्के भरल्याने जलसंपदा विभागाने शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान धरणाच्या २७, १८, १९ व १० क्रमांकाच्या दरवाजांमधून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाण्याची आवक सुरु राहण्याची शक्यता असून आवक मंदावल्यावर रात्री केव्हाही धरणाचे दरवाजे बंद केले जातील असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीजवळ मालगाडीचे इंजिन घसरले

$
0
0

मटा प्रतिनिधी, परभणी

परभणीच्या रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील विद्यापीठ गेटजवळ एका मालगाडीचे इंजिन घसरल्याने सकाळी ८:५० वाजेपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने इंजिन रुळावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. मात्र सध्या एकाच प्लॅटफॉर्मवरून वाहतूक सुरू असल्याने अनेक गाड्या दुपारनंतरही स्टेशनवर अडकुन पडल्या आहेत.

मनमाडहून निघालेली मालगाडी परभणी रेल्वेस्थानकावर सकाळी ८.३० च्या सुमारास पोहचली. मात्र पुढे नांदेडकडे जात असताना ८:५० च्या सुमारास विद्यापीठ गेटजवळ या मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले. त्यामुळे मनमाड आणि नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, इंजिन रुळावर घेण्यासाठी नांदेड येथून अधिकारी आणि कर्मचारी परभणीत दाखल झाले आहेत. तब्बल २५० कर्मचारी हे काम युध्द पातळीवर करीत आहेत. नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक ए. के. सिन्हा हे परभणीत दाखल झाले आहेत.



त्यांच्या नियंत्रणात काम जोरात झाल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत तीन पैकी एका प्लॅटफॉर्मवरील वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. पण दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नसल्याने पूर्णा रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबून ठेवण्यात आल्या. त्यात पुश-पुल, लोकमान्य टिळक एक्सप्रेस, अकोला-परळी एक्सप्रेस या सह इतर गाड्या पुर्णा रेल्वे स्थानकात थांबून राहील्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या बैठकीत गटबाजीवर चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे सोमवारी सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनासाठी सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बैठकीत गटबाजीवर चर्चा रंगली.
सुभेदारी विश्रामगृहावर रविवारी झालेल्या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी, राजेंद्र जंजाळ, महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी, सुनीता आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार खैरे यांनी कोण पदाधिकारी बैठकीला आले नाहीत याची माहिती घेतली. ‘कारण नसताना गैरहजर राहिलेल्यांवर कारवाई केली जाईल. गटबाजी करू नका, मी कोणतीच गटबाजी सहन करणार नाही,’ असा इशारा खासदारांनी दिला. महिला आघाडीच्या रंजना कुलकर्णी यांनीही आपल्या मार्गदर्शनात गटबाजीवर भाष्य केले.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना खासदार खैरे यांनी, जनता महागाईमुळे मेटाकुटीला आल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले. समान कराप्रमाणे राज्य सरकाने समान दर ठेवावेत, अशी मागणी करत शिवसेना महिला आघाडी आंदोलन करणार आहे. ही निदर्शने सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौकात होणार असून त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले जाणार आहे.

राणेंना अधिकार कोणी दिला

नारायण राणे हे साधे कारकून होते, तिकीट विकत होते. त्यांच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली हे त्यांनी सांगावे. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही. रामदास कदम यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘कोंबडी चोर’ माणसाने बोलू नये, असा टोला खैरे यांनी लगावला. राणे हे ज्या पक्षातून आले त्यांच्यावर आरोप करतात, त्यामुळे भाजपने त्यांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे भाजपचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा डिसेंबरअखेर हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३ लाख ५९ हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ८१ हजार शौचालये नऊ तालुक्यांत बांधण्यात आली. उर्वरित ६८ हजारांचे उद्दिष्ट डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल आणि जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्त होईल, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
सीईओ अर्दड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्षभराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका, गावकऱ्यांशी संवाद, यंत्रणेकडून सातत्यपूर्ण काम करण्यात आले. सप्टेंबरअखेर २ लाख ८१ हजार शौचालये बांधण्यात आली असून उर्वरित ६८ हजार शौचालयांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण केले जाईल. शेवटच्या टप्प्यात हे काम पूर्ण करताना अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. गावकरी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनेक गावांमधून शौचालये बांधकामाच्या तक्रारी आल्या आहेत, याबाबत काय ? असे विचारले असता अर्दड म्हणाले, काही गावांमधून शौचालयांच्या कामाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी गुरुवारी आम्ही हनुमंतगाव येथे जाऊन आलो. हे गाव निर्मलग्राममध्ये आहे. त्यामुळे येथे शौचालये बांधताना अनुदानाच्या अडचणी आहेत. मात्र आम्ही त्यावर मार्ग सूचविला आहे. खतियाबाद व वरझडी या गावात सेफ्टी टँक एकेक केल्याच्या तक्रारी केल्या. त्याची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. जिथे बोगस काम झाले असेल आणि ते आढळले तर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशा विश्वास त्यांनी दिला.

दोन तालुक्यात यश

शौचालये बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. जिल्ह्याला २२० कोटींची आ‍वश्यकता असून टप्प्याटप्प्याने येणारे अनुदान प्रशासनाकडून कामे झालेल्या गावांना वितरित केले जात असल्याचे सीईओ अर्दड यांनी स्पष्ट केले. नऊ तालुक्यांपैकी फुलंब्री आणि खुलताबाद हे दोन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मनमानी कारभार करत आहे. आज राज्य घटनेला किंमत दिली जात नसल्याची स्थिती असून अशा बाल्यावस्थेतील लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असा सूर ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ या परिसंवादात निघाला.
साथी प्रवीण वाघ यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात तीन सत्रांमध्ये परिसंवाद पार पडला. यावेळी परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी केंद्र सरकारच्या विविध धोरण, निर्णयांचा समाचार घेतला.
‘वाढती गरिबी-बेरोजगारी व ८० टक्के भारतीय समाज’ या विषयावरील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे हे होते. ‘केंद्र सरकार हे शेतकरी, कामगार, बेरोजगारांचे ‌शोषण करत असून हे घटक ए‌कत्र येऊ नये म्हणून सरकार जातीच्या आधारे फूट पाडत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र शासनाच्या सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्याला १८ हजार रुपये व इतर भत्ते दिली जातात, मग हाच न्याय शेतकरी, शेतमजूर, बांधकामावरील कर्मचाऱ्यांना द्यावा,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. या परिसंवादात लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी विचार मांडले.
‘लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राध्यापक जयदेव डोळे हे होते. या विषयावर प्रा. डॉ. शाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार नजीर शेख आणि दिलीप वाघमारे यांनी विचार मांडले.
तिसऱ्या परिसंवादात ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद’ या विषयावर एसएनडीटी विद्यापीठातील प्रा. डॉ. चैत्रा रेडकर, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, अॅड. विष्णू ढोबळे यांनी भूमिका मांडली. अध्यक्षीय समारोप सेंटर फॉर प्रमोशन ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड सेक्युलरिझमचे अध्यक्ष डॉ. जहीर अली यांनी केला. दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमात शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीजवळ मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले

$
0
0

परभणी : रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे इंजीन रुळावरून घसरल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. यामुळे काचिगुडा-मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

या मार्गावरील हैदराबाद-परभणी ही पॅसेजर पूर्णा येथे रद्द करण्यात आली, तर अदिलाबाद-परळी, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, निजामाबाद-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या अर्धा ते एक तास उशिराने धावल्या. घटनास्थळी विभागीय व्यवस्थापक डॉ. अखिलेशकुमार सिन्हा यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण मांडून दुपारी एकपर्यंत काम पूर्ण केल्याने रेल्वेची वाहतूक काही तासात सुरळीत झाली.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार; इंजिनीअरिंग विभागचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा आहे. परभणी रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मनमाडहून निघालेली मालगाडी पोचली होती, मात्र पुढे नांदेडकडे जात असताना आठ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास विद्यापीठ गेटजवळ मालगाडीचे इंजीन रुळावरून घसरले. त्यामुळे मनमाडकडे आणि नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी नऊपासून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न केले.

इंजिन रुळावर घेण्यासाठी नांदेड येथून अधिकारी आणि कर्मचारी परभणीत दाखल झाले होते. तब्बल २५० कर्मचाऱ्यांनी लोहमार्ग दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे दुपारी १२पर्यंत तीनपैकी एका प्लॅटफॉर्मवरील वाहतूक सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. त्यापूर्वी पूर्णा रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबून ठेवण्यात आल्या. त्यात पूश-पूल, अदिलाबाद-परळी, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, निजामाबाद-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस यांसह इतर गाड्या पूर्णा रेल्वे स्थानकात थांबून ठेवाव्या लागल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या; खून केल्याचा आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवजीवन कॉलनीमध्ये एका २३ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. नंदिनी लखन रापकर (वय २३), असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच वर्षापूर्वी नंदिनीचा विवाह लखन रापकर याच्यासोबत झाला होता. त्यांना सहा महिन्याची एक मुलगी आहे. दसऱ्यानिमीत्त नंदिनी यांना भेटण्यासाठी शनिवारी भाऊ भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी भावाने बहिणीला एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचे पैंजण भेट दिले. यावेळी नंदिनी आनंदात होती, मात्र रविवारी दुपारी नंदिनी यांनी घरातील पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना कुटुंबियांनी आधी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नंदिनी यांच्या माहेरच्यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती फोनवरून देण्यात आल्याने ते हॉस्पिटलमध्ये गेले असता मृत्यू झाल्याचे समजले. कालपर्यंत आनंदात असलेल्या नंदिनी यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न त्यांना पडला. नंदिनी यांच्या अंगावर मारहाणीचे वळ असून गळा दाबून खून केल्याचा आरोप त्यांनी केला. सासरच्या मंडळींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी नंदिनी यांचा पती लखन रापकरसह सासरा व सासूला चौकशी बोलावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा विशेषः स्वच्छतेच्या नावे ‘हे राम’

$
0
0

महात्मा गांधी हे स्वतः स्वच्छता करायचे. नैतिक मुल्यांसोबतच श्रमाचे मूल्य समाजात रुजवण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून याला उजाळा दिला. सरकार स्थापन केल्यानंतर त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यावेळी हातात झाडू घेऊन रस्ते झाडण्याची जणू फॅशनच आली होती. पण, नव्याचे नऊ दिवस सरले व ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पंतप्रधानांच्या वाढदिवसापासून स्वच्छता अभियान पंधरवडा सुरू झाला आहे. या पंधरवड्याचा समारोप गांधी जयंतीनिमित्त रविवारी होत आहे. या निमित्ताने ‘म.टा.’ने शहरातील वर्षानुवर्षे अस्वच्छ असलेल्या खास जागांचा धांडोळा घेतला. त्यावेळी शहराची स्थिती ‘जैसे थे’असल्याचे स्पष्ट झाले. औरंगाबाद हे पर्यटन शहर आहे. पर्यटकांना आपलेसे वाटण्यासाठी शहर स्वच्छ व सुंदर असणे आवश्यक असते. स्वच्छ शहराचा डांगोरा पिटणारे औरंगाबाद शहर बकालपणासाठी प्रसिद्ध आहे. खड्डे, जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. नियोजनशून्य शहराचे दर्शन असे पदोपदी घडत आहे.


‘घाटी’त घाणच घाण चोहीकडे

घाण-अस्वच्छता हे घाटी परिसरातील नेहमीचे चित्र. मागच्या अनेक वर्षांपासून थोड्या-बहुत फरकाने हे असेच चित्र कायम आहे. ‘सर्जिकल बिल्डिंग’मध्ये जाताना बाहेरून दोन्ही बाजुंनी तुंबलेल्या घाणीमुळे दुर्गंधी सहन करावी लागते. ‘मॉर्चुरी’च्या बाजूला वैद्यकीय घनकचऱ्याच्या टेकड्या अजून कायम असतात. ‘मेडिसिन बिल्डिंग’च्या परिसरातही अशीच अस्वच्छता दिसून येते. एवढेच नव्हे, तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या ‘बॉईज हॉस्टेल’ तसेच निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या आजूबाजूला, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या संपूर्ण परिसराला वर्षानुवर्षे घाण-अस्वच्छतेचा वेढा कायम आहे. अनेक अधिष्ठाता बदलल्यानंतरही घाटीतील अस्वच्छतेचे चित्र बदललेले नाही.

सांस्कृतिक मंडळ ते ज्युबली पार्क

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ते ज्युबली पार्क या रस्त्यावर नेहमीच कचरा साठलेला असतो. जवळच जनावरांचे हॉस्पिटलही आहे, सरकारी तंत्रशिक्षण वर्गही चालतात, काही शाळा, खासगी शिकवणी वर्ग, खडकेश्वर मंदिर या परिसरात आहे. त्यामुळे सतत वर्दळ असते. पण, या घाणीचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. या परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यास अधिक वाव आहे, त्याकडे मनपा आणि स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

शहागंजचे ‘आरोग्य’ धोक्यात

शहरातील जुना भाग व, बाजारपेठ अशी ओळख असलेल्या शहागंजमध्ये रस्त्यावरील कचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. शहरी आरोग्य व प्रशिक्षण केंद्रालाच कचऱ्याच्या ढिगांनी वेढलेले आहे. गांधी भवन, पोलिस चौकी, आरोग्य केंद्र अशी महत्त्वाची ठिकाणे, किराणा दुकाने, भाजी मंडई या परिसरात आहे. याच रस्त्यावर हातगाडींची मोठी संख्या असते. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडलेला असतो. येथे महापालिकेने कचराकुंडी ठेवलेली असूनही सर्रास रस्त्यावर कचरा फेकला जातो. अनेकदा कचराकुंडी भरली तरी ती त्वरित उचलली जात नाही. रस्त्यावर टाकलेल्या सडलेल्या भाजीपाल्याची येथे दुर्गंधी पसरलेली असते.

औरंगपुऱ्यात कचऱ्याचे साम्राज्य

औरंगपुरा भाजी मंडई परिसर हा शहरातील मध्यवर्ती भाग आहे. पिया मार्केटसमोरील रस्त्यावर खलील पान सेंटरच्या अलिकडे वर्षानुवर्षे कचरा टाकला जातो. त्यात सडलेल्या भाजीपाल्यापासून घनकचऱ्याचा समावेश आहे. आजूबाजूच्या हॉटेलांमधील उरलेले खाद्यपदार्थ येथेच टाकले जातात. त्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नेहमीच जनावरे फिरताना दिसतात. या मोकाट जनावरांमुळेही वाहनधारकांना सतत अडचण सहन करावी लागते. या कचऱ्यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. येथे मनपाच्या स्वच्छता पथकाचे नेहमीच दुर्लक्ष दिसून येते.

आझाद चौक, रोशन गेट

बजरंग चौक ते आझाद चौक दरम्यानच्या छोट्या नाल्याशेजारी मुख्य रस्‍त्यावर नियमितपणे कचरा फेकला जातो. येथे वर्षाचे बारा महिने कचऱ्याचा ढिग साचलेला असतो. तसेच रोशन गेटच्या बाहेर किराडपुरा रस्‍त्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्‍त्यावर कचरा साचलेला असतो. येथून दररोज दोन ते तीन गाड्या कचरा भरून रोज नेला जातो, तरीही येथील कचरा संपत नाही, तो तेथे पडूनच असतो.


सिडको हडकोत दुभाजक झाले कचराकुंड्या

चिश्तिया कॉलनीपासून बजरंग चौक, टीव्ही सेंटर चौक ते सलीम अली सरोवर, एन ८ या महत्त्वाच्या रस्त्यावरील दुभाजकाचे रुपांतर कचराकुंड्यांत झालेले आहे. चिश्तिया कॉलनी भागात कचराकुंडीच दुभाजकावर ठेवलेली आहे. त्यामुळे परिसरातील हॉटेल, लहान मोठे व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, फेरीवाले, अंडा ऑम्लेटविक्रेते त्यांचा कचरा दुभाजकावर टाकतात. परिणामी, या भागात दुर्गंधी पसरलेली असते. टीव्ही सेंटर चौक ते सलीम अली सरोवर, एन ८ वरील दुभाजकांवरही कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. काही ठिकाणचा कचरा महापालिका उचलत असली तरी या परिसरात कचराकुंड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनाभिमुख शहर निर्मितीचे लक्ष्य

$
0
0

पर्यटनाभिमुख शहर निर्मितीचे लक्ष्य
औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटनाचा खजिना आहे. या खजिन्याचा जागतिक पातळीवर प्रचार आणि प्रसार करून शहरात पर्यटनाभिमुख वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती ट्रॅव्हल्स असोसिएशन औरंगाबाद म्हणजेच ‘टा’चे नूतन अध्यक्ष आशुतोष बडवे मटाशी बोलताना दिली.
ट्रॅव्हल्स असोसिएशन औरंगाबाद (टा) स्थापन करण्याची गरज का भासली?
आम्ही सर्वजण एकमेकांच्या अडीअडचणीसाठी सहकार्य करतोच, पण सगळ्यांनी एकत्रित बसून शहराच्या पर्यटन व्यवसायाचा विकास कसा होईल, याबाबत चर्चा केली. त्यातून पर्यटन विकासासाठी काम करणारी स्वतंत्र संघटना असावी, विचार पुढे आला. असोसिऐशनच्या माध्यमातून औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्स असोसिऐशन औरंगाबाद म्हणजे 'टा' ची स्थापना केली. आम्ही जगभरात जिथे कुठे जाऊ तिथे या संघटनेच्या माध्यमातून औरंगाबादचे प्रतिनिधित्व करू शकतो. यातून औरंगाबाद शहरात पर्यटन वाढविण्यास मदत होईल. हा आमचा या संघटनेमागचा उद्देश आहे.
ट्रॅव्हल्स व्यवसायिकांसमोर सध्या काय आव्हाने आहेत?
ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी बाहेरच्या देशात काही बंधने टाकण्यात आली आहे. आपल्या देशात अशी कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. कोणीही येऊन ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करू शकतो. याला आमचा विरोध नाही. मात्र, सेवा क्षेत्रात चांगल्या कंपन्या याव्यात, उत्पन्न किंवा नफा हाच एकमेव उद्देश न ठेवता पर्यटन विकास आणि आपल्यामुळे अन्य ट्रॅव्हल्स व्यवसायिकांची प्रतिमा मलीन होऊ नये असेच प्रामाणिक व्यवसायिक यावेत हाच आमचा दृष्टिकोन आहे. सध्या ई ट्रॅव्हल्स पोर्टलची संख्या वाढली आहे. बुकिंग करा आणि पर्यटनाला जा, अशा वेबसाइटवर कोणी किती विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सध्या इ ट्रॅव्हल्स पोर्टलचं आव्हान आमच्यासमोर सध्या उभं ठाकलं आहे. लोकांचा आमच्यावरील विश्वास कायम आहे. तोपर्यंत आम्हाला चिंता नाही.
औरंगाबाद शहरात पर्यटन वाढीसाठी 'टा' काय करणार ?
पर्यटन वाढीसाठी विविध कार्यक्रम, विविध जागतिक स्तरावरील परिषदा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. असोसिएशनमधील सदस्यांना विविध राज्यातून तसेच देशातून पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले जाते. अशा ठिकाणी गेल्यावर त्या देशातील पर्यटक व्यवसायिकांचा परिचय होतो. अशा परिचयातील विदेशी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सदस्यांना औरंगाबाद शहरामध्ये आमंत्रित करून त्यांची जागतिक स्तरावरील परिषद आयोजित करण्याचा विचार आहे. 'ट्रॅव्हल्स मार्ट' तयार करण्याचाही आमचा विचार आहे. ट्रॅव्हल्स मार्टच्या माध्यमातून पर्यटन स्थळांची परिपूर्ण माहिती दिली जाईल. पर्यटन वाढीसाठी विविध देशातील पर्यटन विभाग विविध देशात ‌रोड शो कार्यक्रम आयोजित करीत असतो. अशा रोड शोमध्ये येणाऱ्या विविध देशाच्या प्रतिनिधींना औरंगाबादच्या पर्यटन स्थळांबाबत माहिती देऊन त्यांच्या माध्यमातून जगभरात येथील पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत होईल. याशिवाय असो‌सिऐशनच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राची परिपूर्ण माहिती युवकांना देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यामुळे पर्यटन जागृतीही होईल व युवकांना रोजगारही मिळेल.
शहर पर्यटनभिमुख करण्यासाठी काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं का?
पर्यटनाभिमुख वातावरणाचा साधा अर्थ म्हणजे 'अतिथी देवो भव' ही संकल्पना मान्य करून, आपल्या अतिथींचा विश्वास संपादन करणे, त्यांना चांगली सेवा आणि सुविधा देणे असा आहे. आपल्या शहरात असं वातावरण आहे का, असा प्रश्न केला तर नाईलाजाने का होईना पण त्याचं उत्तर ‘नाही’, असं येतं. हा प्रश्न मीच तुम्हाला करतो. बीबी का मकबराच्या जवळ असलेले फुटाणेवाले पर्यटकांना पकडून त्यांना आपल्या वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न करतात. पर्यटकांसोबत वागण्याची ही पद्धत नव्हे. यामुळे या ठिकाणी पर्यटनशिक्षण आवश्यक झाले आहे. शहरातील ग्राहकाकडून एखाद्या प्रवासासाठी जर ४० रुपये घेतले जातात तर विदेशी पर्यटकाकडून १५० ते २०० रुपये घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे योग्य आहे का? पर्यटनासाठी आलेले सर्वचजण श्रीमंत असतात, असं नाही. यामुळे प्रत्येक पर्यटकासोबत चांगला व्यवहार राहिल्यास जास्तीत जास्त पर्यटक शहरात येतील. पर्यटनाभिमुख शहर तयार झाले तर याचा थेट फायदा शहरालाच होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images