Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नेत्यांची प्रतिष्ठा कन्नड तालुक्यात पणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल वाजला असून प्रचाराची पहिली फेरी सुरू झाली आहे. यावेळी सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असून १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे. परिणामी, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्याएवढेच महत्त्व सरपंच निवडणुकीस प्राप्त झाले आहे.
या टप्प्यात तालुक्यातील नाचनवेल-कोपरवेल, कुंजखेडा व बहीरगाव या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. इतर ग्रामपंचायती तुलनेने लहान असल्या तरी तालुक्यातील नेत्यांच्या गावात निवडणूक होत असल्या त्याकडे तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यात शिवराई, सिरसगाव, चिंचखेडा खुर्द, हिवरखेडा नांदगीरवाडी, वासडी, मेहगाव, देवपूळ या गावांचा प्रामुख्याने समावेश आहे.
शिवराई येथे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख दिलीप मुठ्ठे व त्यांचा पत्नी तालुका महिला आघाडीच्या प्रमुख हर्षाली मुठ्ठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सिरसगावमध्ये दूध संघाचे संचालक काँग्रेसचे गोकुळसिंग राजपूत, चिंचखेडा खुर्दमध्ये बाजार समितीचे संचालक प्रकाश घुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलमध्ये चुरस पाहवयास मिळत आहे. हिवरखेडा नांदगीरवाडी येथे बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, जिल्हा बँक संचालक अशोक मगर यांच्या पॅनलमध्ये लढत आहे. वासडी, मेहगाव, पळशी, खातखेडा साखरवेल व देवपूळ ग्रामपंचायतवर शिवसेना तालुकाध्यक्ष केतन काजे यांनी आपले निकटवर्तीय उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

सर्वांचे लक्ष केंद्रित

सरपंचपदाची थेट निवडणूक, १४ व्या वित्त आयोगातून मिळणारा थेट निधी यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष निवडणुकीवर केंद्रित केले आहे. थेट निवडून येणारा सरपंच आपलाच व्हावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल विद्यार्थ्यांना बिनापाण्याची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले आहे, पाऊसदेखील उशिरा का होईना चांगला झालेला आहे, तरीदेखील ‘क्रीम ऑफ दि सोसायटी’ असलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना महिन्यापासून शब्दशः बिनापाण्याची तीव्र शिक्षा भोगावी लागते आहे. ऐन नवरात्रात आणि चक्क दसऱ्याला असंख्य विद्यार्थ्यांना केवळ स्नानासाठी नव्हे तर चक्क शौचालयालाही पाणी मिळाले नसल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे. त्याचवेळी पिण्याचे पाणी मिळत नसल्याची स्थिती मागच्या काही वर्षांपासूनही कायम आहे. असे असतानाही घाटी प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) पदवीस्तरीय विद्यार्थ्यांसाठी घाटी परिसरात मुलांचे वसतिगृह आहे. वसतिगृहाच्या समोरासमोरील दोन्ही इमारतींमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी राहतात. वैद्यकीय विद्यार्थी; त्यातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाजातील ‘क्रीम’ समजले जाते; परंतु दोन्ही वसतिगृहात राहणाऱ्या
विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे नरकयातना सोसाव्या लागत आहेत.
एकतर दोन्ही इमारतींमध्ये सुविधांपेक्षा असुविधाच जास्त आहेत. दोन्ही इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यातही जुनी इमारत अतिशय वाईट अवस्थेत आहे. जागोजागी प्लास्टर निघालेले आहे. वसतिगृहाची जुनी इमारत अनेक ठिकाणी गळते. त्याचप्रमाणे वसतिगृहाला घाण-अस्वच्छतेचा वेढा तर वर्षावर्षे कायम आहे. वसतिगृहातील अनेक खिडक्या-दरवाजे तुटलेले आहेत. खोल्यांमधील अनेक कॉट-कपाटे-टेबल-खुर्च्या तुटलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वाकड्या-तिकड्या कॉटवरच झोपावे लागते. पंख्याची सोयदेखील विद्यार्थ्यांना स्वतःची स्वतःच करावी लागते. कितीही आर्जवं केली, लेखी निवेदने दिली तरी कोणीही दखल घेत नाही, म्हणून किरकोळ दुरुस्ती विद्यार्थ्यांना स्वतःची स्वतःलाच करावी लागते. साफसफाईदेखील पुरेशी होत नाही. एकीकडे अशी स्थिती असताना अधिष्ठातापदी डॉ. कानन येळीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी लक्ष घातल्यानंतर काहीअंशी साफसफाई सुरू झाली होती. तुटलेल्या तोट्या, काही दरवाजे बसविण्यात आले. मात्र आता पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा प्रश्न तर सुटण्याऐवजी अधिकाधिक गंभीर होत आहे.
मागच्या महिन्यापासून विद्यार्थ्यांना वापरण्यासाठीचे पाणीच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जुन्या इमारतीमध्ये वापरण्यासाठी पाणीच मिळत नसल्याने तब्बल दीडशे-दोनशे विद्यार्थ्यांना समोरच्या वसतिगृहात जाऊन स्नान-शौच्चासाठी पळापळी करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ३०० विद्यार्थ्यांना मोजक्याच चालू स्थितीतील बाथरुम-टॉयलेटचा वापर करावा लागत असून, गर्दी आणि वेटिंगमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या नशिबी चक्क कुचंबणा येत आहे. पाणीच नसल्याने स्वच्छतादेखील होत नसून, जिकडे-तिकडे दुर्गंधीचे फटके सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रार करुनही ना रेक्टरने ढुंकून बघितले ना प्रशासनाने,
अशी दुर्दैवी कहाणी विद्यार्थ्यांनी कथन केली. ऐन परीक्षेच्या व सणाच्या काळात विद्यार्थ्यांना बादल्या घेऊन इकडे-तिकडे पळावे लागत आहे.
कॅनचे पाणी पिण्याची वेळ
दोन्ही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रोज कॅन मागवावे लागतात. त्याशिवाय पिण्याचे पाणी मिळण्याचा कुठलाही पर्याय विद्यार्थ्यांकडे नाही. हा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. दोन्ही इमारतींमधील वॉटर कुलरची स्थिहीही गंभीर असून, एकाही वॉटर कुलरमधून पुरेसे व स्वच्छ पाणी मिळत नसल्याची स्थिती गेल्या काही वर्षांपासून कायम आहे.
विद्यार्थ्यांनी गार्डनसाठी साफसफाई सुरू केली; परंतु जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करताना पाइप फुटले आहेत. त्यानंतरही टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. लवकरच दुरुस्ती होईल.– डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता, घाटी

मटा भूमिका
अक्षम्य दुर्लक्ष

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परवडच चालू आहे. गेल्या महिन्याभरापासून वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणीही मिळालेले नाही. हे घाटी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले आहे. आज महापालिका घाटीला मुबलक पाणी देत असली तरी रुग्णांची सेवा करणाऱ्या आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पिण्यालाच नव्हे तर शौचालयालाही पाणी मिळू नये ही बाब दुर्देवी म्हणावी लागेल. घाटी प्रशासनाने यात लक्ष घालून त्यांना पाणी कसे मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. घाटीतील विद्यार्थ्यांच्या वसत‌िगृहाची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. अस्वच्छ असलेल्या परिसरातच त्यांना दिवस काढावे लागत आहेत. हे काही चांगले चिन्ह नाहीत. औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद शहरातील आरोग्याची काळजी घेणाऱ्या हॉस्पिटलच्या अव्यवस्थेवर याआधी अनेकवेळा कोरडे ओढले आहेत. तरीही घाटीचे प्रशासन ढीम्म आहे. रुगणांना, नातेवाईकांना तसेच घाटीत शिकणाऱ्यांना सोयीसुविधा पुरवा असे कोर्टाने बजावले आहे. तरीही राज्यशासन त्याकडे लक्ष देत नाही. ही खेदाची बाब आहे. औरंगाबाद खंडपीठाने वेळोवेळी राज्यसरकारला जाब विचारला आहे, परंतु राज्यसरकार सुविधा पुरविण्यासाठी हमीपत्र घेते, पण या हमीपत्राची अंमलबजावणी करीत नाही. या वसत‌िगृहाला अस्वच्छतेच्या वेढ्यातून काढण्याचा संकल्प घाटी प्रशासनाने गांधी जयंतीपासून केला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ अधिसभा निवडणूक रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर विद्यापीठांचे निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑगस्ट अखेरीस निवडणूक होणे बंधनकारक होते, पण तांत्रिक अडचणी दाखवत विद्यापीठ प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम चार महिने लांबणीवर टाकला आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. ऑगस्ट २०१७पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते, मात्र मतदार नोंदणी, अर्ज छाननी, मतदार यादी आक्षेप या कारणांनी निवडणूक कार्यक्रम तीन महिने लांबणीवर पडला. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होईल अशी शक्यता कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम अधिकारी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे यांनी निर्णय घेतलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, तरी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात प्राचार्य (दहा जागा), प्राध्यापक (दहा जागा) आणि पदवीधर अधिसभा सदस्य (दहा जागा) अशा ३० जागांसाठी निवडणूक आहे. या प्रवर्गात पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त जाती-जमाती व महिलांसाठी प्रत्येकी एक अशा एकूण दहा जागा आहेत. जुलै महिन्यात पदवीधर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. अर्ज छाननी झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले होते. पण, ऑगस्ट अखेरपर्यंत छाननी झाली नसल्यामुळे निवडणूक वेळापत्रक कोलमडले.
दिवाळीच्या सुट्या १५ ऑक्टोबरपासून असल्यामुळे त्यापूर्वी निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती, पण आता दिवाळीनंतर निवडणूक होण्याची चिन्ह आहेत.

संघटनांच्या हस्तक्षेपाचा फटका

प्रशासनाने अधिसूचना काढल्यानंतर ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यासह राज्यातील इतर विद्यापीठांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, ‘बामू’त प्रशासकीय कामकाजाच्या दिरंगाईचा फटका बसला आहे. प्रत्येक प्रक्रियेत संघटनांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे कामकाज करणे कठीण झाले आहे. या अडचणीत निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानाची नासधूस, मारहाण; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जमिनीच्या जुन्या वादावरून औषधी दुकानाची नासधूस करत दुकानमालकाला मारहाण करणाऱ्या १० ते १२ आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता गुरुवारपर्यंत (५ ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी दिले.
या प्रकरणी सय्यद सलीमोद्दीन (रा. लाडसावंगी, ता. करमाड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीचे लाडसावंगी परिसरात औषधी दुकान असून, ते रविवारी (१ ऑक्टोबर) नेहमीप्रमाणे दुकानावर गेले होते. त्यावेळी सादिक गनीमियाँ शेख (वय ३८, रा. लाडसावंगी) व जमाखान मोहम्मद शेरखान (वय ४४, शहानूरमियाँ दर्गा, औरंगाबाद) यांच्यासह त्यांचे १० ते १२ साथीदार आले. त्यांनी जुन्या वादातून लाठ्या-काठ्या व गजाने मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाची नासधूस करून गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी सादिक शेख व जमाखान शेरखान या दोघांना अटक केली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर केले असता पसार साथीदारांना अटक करणे तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू-गज जप्त करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार विरोधात शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर

$
0
0

सरकार विरोधात शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर
गॅस, भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महागाईने सर्वसमान्यांचे बजेट कोलमडत असून गॅस, भाजीपालासह जीवनावश्यक वस्तुंचे दर नियंत्रणात ठेवा, अशी मागणी करत शिवसेना महिला आघाडी सोमवारी महागाई विरोधात रस्त्यावर उतरली. चुलीवर भाकरी करून, भाजीपाला, घरगुती पदार्थ आणून महिला आघाडीने निषेध केला. क्रांतीचौकात हे आंदोलन करण्यात आले.
महागाई विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात राज्य, केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महागाईसह निदर्शनात जीएसटी, नोटबंदी, कर्जमुक्ती अशा प्रश्नाबाबतचे फलक महिलांच्या हाती होते. सरकारचे करायचे काय, सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस, शेतकऱ्यांच्या गळ्याला फास, नोटाबंदीचा निषेध, महागाई कमी झालीच पाहिले, इंधन दरवाढ कमी करा, अशा घोषणा महिलांनी दिल्या. समान कर प्रमाणे समान दर ठेवा, जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. महिलांनी यावेळी भाजीपाला सोबत आणत सरकारचा निषेध व्यक्त केला. क्रांतीचौकात निदर्शने झाल्यानंतर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संपर्कप्रमुख प्रा. मनिषा कायंदे यांच्या ने‌तृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. त्यामुळे शिवसेना रस्त्यावर उतरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या कला ओझा, रंजना कुलकर्णी, आनंदी अन्नदाते, सुनीता आऊलवार यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निदर्शनस्थळी शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकारी बदला; सोयगावात मागणी

$
0
0

सोयगावः नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून विकासकामात अडथळा निर्माण करून सत्ताधारी नगरसेवकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप करत भाजप नगरसेवकांनी राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांच्याकडे मुख्याधिकारी बदलण्याची मागणी केली आहे.
सोयगाव नगर पंचायतीमध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. ‘मुख्याधिकारी हे शहर विकासाच्या आड येऊन राजकारण करत आहेत. शहरातील विकास कामाबाबतचे ठराव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचू देत नाहीत. नगर पंचायतीचा कागदोपत्री कारभार अपूर्ण ठेवून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नगराध्यक्ष कैलास काळे यांनी केला. सुरेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव येथे सत्कार करून नवीन मुख्याधिकारी देण्याची गळ घालण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोन दिवसांत नवीन मुख्याधिकारी नियुक्तीचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन बनकर यांनी दिले आहे. यावेळी मंगेश सोहनी, गटनेता योगेश मानकर, रऊफ देशमुख, वसंत बनकर, सुनील ठोंबरे, संजय मोरे, जितेंद्र झंवर, विजय वानखेडे, सुनील गव्हांडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद पिछाडी

$
0
0

समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद पिछाडी
जमीन खरेदीत नागपूर सर्वात पुढे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची सरळ खरेदीने वेग घेतला असताना औरंगाबाद आणि नगर जिल्हे मात्र या प्रक्रियेत पिछाडीवर आहेत. औरंगाबादमध्ये ६ तर नगरमध्ये केवळ १ हेक्टर जमिनीची खरेदी झाली आहे.
समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीसाठी विदर्भातून चांगला प्रतिसाद मिळत असून जमीन खरेदी प्रक्रियेमध्ये नागपूर, अमरावती, वर्धा तसेच ज्या नाशिक जिल्ह्यांमध्ये या महामार्गासाठी तीव्र विरोध झाला. तेथेही मोठ्या प्रमावणावर जमीन खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही जमिनीबाबत असलेल्या अनेक तक्रारींचा निपटारा आणि खरेदी प्रक्रिया दोन्ही सुरू असले तरी जिल्ह्यात केवळ ६ हेक्टर तर नगर जिल्ह्यात प्रशासन केवळ एक हेक्टर जमीनच संपादित करू शकले. समृद्धी महामार्गासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत नागपूर जिल्ह्यात ७७ हेक्टर, वर्धा ५८ हेक्टर, अमरावती, ५१.७९ हेक्टर, वाशिम ३५.८१ हेक्टर, बुलढाणा २१.६६ हेक्टर, जालना ५ हेक्टर, नगर १ हेक्टर, औरंगाबाद ६ हेक्टर, नाशिक ७३.८९ हेक्टर, ठाणे १३.३९ हेक्टर जमीनीची खरेदी प्रक्रिया झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज वेगाने खरेदी प्रक्रियेत वाढ होत आहे.
या समृद्धी महामार्गासाठी तब्बल ९ हजार ३६४ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गासाठी आतापर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये ३४३.९२ हेक्टर जमीनीचे खरेदी व्यवहार पूर्ण करण्यात आले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना २४३ कोटी ९३ लाख रुपयांचा मोबदलाही देण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये गावनिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक
महामागार्साठी जमीन खरेदी प्रक्रियेत पिछाडीवर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये प्रशासनाकडून नायब तससीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी व संचिकेचा प्रवास कमी करून कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी हे अधिकारी काम करणार आहेत. हे अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन खरेदी प्रक्रियेसाठी प्रयत्न करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील अनेक सिग्नलवर सध्या भीक मागणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये लहान बालकांचा वापर देखील केला जात आहे. वाहनांच्या गर्दीत ही बालके जीव मुठीत धरून भिक मागताना दिसून येतात. पोलिसांच्या वतीने मध्यंतरी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
शहरात सध्या भीक मागणाऱ्यांची चलती सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भिकाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. अंध, अपंगात्वाचा फायदा घेत भीक मागणाऱ्यांसोबतच धडधाकट मंडळी देखील या धंद्यात पडल्याचे दिसत आहे. सिग्नलवर अशा भिकाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे.
लहान मुलांचा वापर
क्रांतीचौक सिग्नल हा शहरातील महत्त्वाचा सिग्नल आहे. या सिग्नलवर या भिकाऱ्यांची संख्या जास्त दिसून येते. यामध्ये लहान बालकांचा समावेश आहे. पाच ते दहा वर्षांपर्यंतची ही ‌चिमुकली मुले वाहनांच्या गर्दीत धोकादायक पद्धतीने ‌फिरून भीक मागताना दिसतात. सिग्नलवर प्रत्येक वाहनधारकाला घाई असते. अशा परिस्थितीमध्ये ही मुले फिरत असतात आणि यांना हे काम करण्यास भाग पाडणारी मंडळी मात्र उडडाणपुलाखाली बसून असतात.
शहरातील उडडाणपूल या बेघर भिकारी कुटुंबीयाची आश्रयस्थाने बनली आहेत. क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली तर अनेक ‌कुटुंबीयांनी बस्तान थाटले आहे. भिकाऱ्यांच्या या ओंगळवाण्या प्रदर्शनामुळे परिसराला बकालपणा आला आहे. इतर उडडाणपुलाखाली देखील थोड्या फार प्रमाणात हीच परिस्थिती आहे.
पोलिसांची कारवाई
शासनाच्या वतीने मध्यंतरी मुस्कान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अशा भीक मागणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जात होते. यासाठी स्वतंत्र पथक देखील पोलिस दलात नेमण्याचे आदेश देण्यात आले होते. काही महिने ही मोहीम सुरळीत पार पडली. यावेळी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मंडळीना अटकाव केल्यामुळे ही मंडळी गायब झाली होती. आता मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.

शहरात मध्यंतरी मुस्कान मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अशा भीक मागणाऱ्या मंडळीवर अंकुश ठेवण्यासाठी बेगर स्क्वॉडची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस दीदी, दामिनी पथक व जापू पथकाचा समावेश राहणार आहे.
- डॉ. दिपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विरमगावमध्ये अधानेंच्या दोन गटांत टक्कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या विरमगावात यावेळी चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. यंदा प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार असल्याने मतदारांमध्येही उत्सुकता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजप-शिवसेना युती तुटल्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसत आहे. विरमगावमध्ये भाजप व शिवसेनेच्या पाठिंब्याने दोन पॅनलमध्ये थेट लढत होत आहे.
विरमगाव हे शिव पार्वती संगमेश्‍वर मंदिरासाठी प्रसिद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव अधाने आणि पंचायत समितीचे उपसभापती भाजपचे गणेश अधाने हे याच गावचे. या निवडणुकीत जिल्हा दूध संघाच्या संचालिका विद्यमान सरपंच सविता देवीदास अधाने या भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरपंचपदाची निवडणूक लढत आहेत. शिवसेना पुरुस्कृत पॅनलने त्यांच्याविरुद्ध प्रियंका संजय अधाने यांना रिंगणात उतरवले आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही पॅनलने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सत्ता खेचून आणण्यासाठी विद्यमान सरपंच व विरोधकांच्या बैठका सुरू आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या रणसंग्रामात दोन्ही अधाने गटांकडून आपापली राजकीय ताकद अजमावत आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या नात्यागोत्याचे राजकारण आणि विकास कामातील योगदानाचा प्रभाव हे मुद्दे आहेत. उमेदवाराचा प्रभाव, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, भावकीचे राजकारण यावर सत्तेचे गणिते ठरणार आहेत.
या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब, पंचायत समिती उपसभापती गणेश जिजाबा अधाने, देवीदास अधाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, तालुकाप्रमुख राजू वरकड शिवसेना संघटक गणेश भिकन, अधाने, विठ्ठलराव अधाने, शंकरराव अधाने या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भावकीचे राजकारण

उमेदवारांचा प्रभाव, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, भावकीचे राजकारण यावर सत्तेचे गणिते ठरणार आहेत. विशेषतः दोन्ही पॅनलमध्ये ‘अधाने’ हेच उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इतर गावांपेक्षा भावकीचे राजकारण जोरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मनपा आयुक्तांच्या निवासास्थानामध्ये घुसून गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्यध्यक्ष विनोद पाटील व माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देवीची मूर्ती विसर्जन करण्यावरून शनिवारी दुपारी घडला होता.
या प्रकरणी मनपाचे सुरक्षा अधिकारी बाबू सांडू जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, विनोद पाटील, अभिजित देशमुख व २० ते २५ कार्यकर्त्यांसह देवी मूर्ती विसर्जनासाठी सिडको-एन १२ येथील विसर्जन विहिरीवर गेले होते. तेथील पाणी दूषित असल्याने ते मुर्तीसह मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांचा बंगल्यावर गेले. त्यांनी सोबत आणलेली मूर्ती बंगल्याच्या आवारात ठेवत विसर्जन कोठे करावे, या कारणावरून तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांचा गळा धरला; कार्यकारी अभियंता आर. एस. चहल यांना शिवीगाळ केली. वॉचमन कैलास वाणी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करीत ते निघून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधगावकर राज्य साहित्य पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवार चॅरिटेबल ट्रस्ट (माथला, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्यातर्फे दिले जाणारे रुपाली दुधगावकर राज्य साहित्य पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार इंद्रजित घुले, सुचिता खल्लाळ, श्रीकांत देशमुख, श्रीधर अंभोरे, विद्याधर म्हैसकर यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते बुधवारी विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सरस्वती भुवन संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी खासदार अॅड. गणेश दुधगावकर व प्राचार्या डॉ. संध्या दुधगावकर यांची उपस्थिती राहील. इंद्रजित घुले (काव्य), सुचिता खल्लाळ (काव्य), श्रीकांत देशमुख (ललित), श्रीधर अंभोरे (चित्रकार), आणि विद्याधर म्हैसकर (कादंबरी) या प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. श्रीकांत भोंबे, जयराम खेडेकर, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. एकनाथ पांडवे, भागवत काकडे, वीरा राठोड हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांच्या हक्काचे ठिकाण धोक्यात

$
0
0

पक्ष्यांच्या हक्काचे ठिकाण धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सलीम अली सरोवराच्या संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणे, वाढता मानवी हस्तक्षेप, घाण आदी कारणांमुळे तलावाचे अस्तित्व व जैवविविधतेवर परिणाम होत आहे. सिडकोतील ऑक्सिजन हब असलेले व पक्ष्यांच्या विहारासाठी हक्काचे असलेले हे ठिकाण धोक्यात आले आहे, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. या प्रश्नांकडे महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सलीम अली सरोवर हा शहरातील एकमेव पाणथळीचा तलाव आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या तलाव परिसरात १३० हून अधिक प्रकारचे पक्षी तसेच विविध प्रकारचे किटक, साप आढळतात. मध्यंतरी येथे जपानी उद्यान उभारण्याच्या महापालिकेने निर्णय घेतला होता. त्यावर पर्यावरण अभ्यासक, प्रेमींनी नागरिकांसाठी शहरात अनेक उद्याने आहेत, एखादे पक्ष्यांसाठी राहू द्या, नवे उद्यान येथील जैवविविधतेच्या मुळावर येईल, असे म्हणत कडाडून विरोध केला होता. प्रकरण कोर्टात गेल्यानंतर नवीन बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून या सरोवराच्या संवर्धन, संरक्षणकडे दुर्लक्ष होत आहे, परिणामी तलावाचे अस्तित्व व जैवविविधता धोक्यात आली आहे, असा आरोप पर्यावरण प्रेंमीकडून होत आहे. तलाव परिसरात कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नाही.
परिसरात अतिक्रमण वाढत असून अनेक उपद्रवी लोक तलाव परिसरात अनाधिकृत प्रवेश करतात. छुप्या पद्धतीने मासेमारी होत असून वृक्षतोडही केली जात आहे. सांडपाणीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे, घाण केरकचरा टाकला जात असल्याने पाणी दूषित होत आहे, असा आरोप होत आहे.
या प्रकारामुळे पक्ष्यांच्या विहारासाठी असलेले हक्काचे ठिकाण, जैवविविधता धोक्यात आणि शहराच्या मध्यवर्ती असलेले एक महत्त्वाचे ऑक्सिजन हब धोक्यात आले आहे, असा आरोप वन्यजींव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यांनी करत महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ वसतिगृहात समुपदेशन

$
0
0


विद्यापीठ वसतिगृहात समुपदेशन
औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून, विद्यार्थ्यांचे परिपूर्ण समुपदेशन करतानाच वसतिगृह अधीक्षकपदी बाळासाहेब जाधव यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहांची दूरवस्था झाली आहे. जुन्या इमारतींची नियमित देखभाल नसल्यामुळे जीर्ण झाल्या आहेत. कालावधी संपलेल्या इमारती पाडून अत्याधुनिक वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहे. या परिस्थितीत दरवर्षी शेकडो विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेतात. जेमतेम दोन विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या खोलीत चार विद्यार्थी राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी आर्थिक क्षमता नसल्यामुळे इतरत्र राहत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नवीन वसतिगृह बांधावे अशी मागणी जोर धरीत आहे. स्वच्छता आणि पाणी या मुद्यांवरही विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. नवीन वसतिगृह नसल्यामुळे रोष वाढत आहे. समस्या कायम असतानाच छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. २९ ऑगस्ट रोजी अमोल काकडे आणि १२ सप्टेंबर रोजी गणेश कोपरवाड या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांशी योग्य समन्वय साधण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पुन्हा वसतिगृह अधीक्षकपदी बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती केली. १९९० ते २०१७ अशी तब्बल २७ वर्षे जाधव अधीक्षकपदी होते. विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्येत योग्य मार्गदर्शन करणे आणि नियमित संपर्कात राहणे जाधव यांचे वेगळेपण आहे. मात्र, जून महिन्यात जाधव यांची जीव-रसायनशास्त्र विभागात बदली झाली होती, पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १२ सप्टेंबर रोजी जाधव यांच्याकडे पुन्हा अधीक्षकपद सोपवले.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन नियोजन करीत आहे. अभ्यास, संधी आणि जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांशी खुली चर्चा करून व्यक्त होण्याची संधी दिली जात आहे. वैफल्यग्रस्त विद्यार्थ्यांना समुपदेशनाचा फायदा होईल असा प्रशासनाचा उद्देश आहे. काही वक्त्यांच्या माध्यमातून मुलांशी खुला संवाद साधला जाणार आहे.
विद्यापीठात एकूण नऊ वसतिगृहे असून विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी विशेष नियोजन करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह, सिद्धार्थ संशोधन छात्र वसतिगृह, कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वसतिगृह, विदेशी विद्यार्थी वसतिगृह, शहीद भगतसिंग वसतिगृह, विद्यार्थी विश्रामगृह ही मुलांची वसतिगृहे असून मातोश्री जिजाऊ वसतिगृह, क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले वसतिगृह ही मुलींसाठी आहेत. नऊ वसतिगृहांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मागील आठवड्यात विद्यार्थिनींनी निकृष्ट जेवण मिळत असल्यामुळे आंदोलन केले. यानंतर दर्जेदार जेवण पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून विद्यार्थ्यांशी पुरेसा संवाद ठेवला जात आहे. दररोज सायंकाळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून अडचणी सोडवल्या जातात. अगदी वैयक्तिक अडचणीतही मदत केली जाते. पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- बाळासाहेब जाधव, वसतिगृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी दीपा क्षीरसागर

$
0
0

लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी दीपा क्षीरसागर
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचे लेखिका साहित्य संमेलन यंदा बीड येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या दीपा क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी अॅड. उषा दराडे यांची निवड झाली आहे. यासाठी डॉ. सतीश साळुंके यांनी ठराव मांडला, तर अनुमोदन डॉ. भास्कर बडे यांचे होते. या आधीच्या मसापच्या लेखिका संमेलनात ज्येष्ठ साहित्य‌िका अनुराधा वैद्य, डॉ. छाया महाजन, डॉ. वृषाली किन्हाळकर, रेखा बैजल आदींची अध्यक्षपदी निवड झाली होती.
‘रिपाइं’चा आज मेळावा
औरंगाबादः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शिर्डी येथे हीरक महोत्सवी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबर रोजी आयोजित मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार दिलीप गांधी आदींची उपस्थिती राहणार असल्याचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी कळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...उठा उठा दिवाळी आली; महाग प्रवासाची वेळ झाली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऐन दिवाळीत लांब पल्ल्यांच्या एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्यामुळे शिवनेरी बसचे औरंगाबाद - पुणे दरम्यानचे भाडे तब्बल १३३ रुपयांनी महागले आहे.

१४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान साध्या बसच्या प्रवासात १० टक्के, निमआराम बसच्या प्रवासासाठी १५ टक्के आणि वातानुकुलित बससेवेत २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सणासुदीत रस्त्यांवर गर्दी होऊ नये यासाठी पुण्याहून औरंगाबादला येण्यासाठी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गाड्या पुण्याच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविदयालयाच्या मैदानावरून सोडण्यात येणार आहेत. या काळात औरंगाबादमधून विविध शहरांमध्ये जाण्यासाठी २९ जादा बस सोडण्यात येणार आहेत. विदर्भासाठी निघणाऱ्या बस जादा बस सिडको आगारातून सोडण्यात येतील, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.

शिवनेरीचे दर
औरंगाबाद - पुणे ६५६ (जुना दर) ७८६ (नवा दर)
औरंगाबाद - पुणे ३४० (जुना दर) ३९५ (नवा दर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ व्यंकटेशनगरात सात लाखांची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निवृत्त कृषी अधिकारी अंकुश गुलाब कोलते यांच्या व्यंकटेश नगरातील घरातून बारा तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, रोख एक लाख तीस हजारांसह एकूण जवळपास सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

कोलते यांचा व्यंकटेशनगरातील प्लॉट क्रमांक ८७ येथे ‘केशव’ नावाचा सहा खोल्यांचा बंगला आहे. रविवारी रात्री बंगल्यामध्ये अंकुश कोलते, त्यांची वृद्ध आई, पत्नी, मुलगा, सून, ऑस्ट्रेलियातून आलेली मुलगी व नातू असा परिवार बाहेरील खोल्यामध्ये झोपला होता. पहाटेच्या दरम्यान चोरट्यानी त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या बेडरूमच्या खिडकीचे ग्रील काढून प्रवेश केला. बेडरूमचा दरवाजा चोरट्यांनी आतून लावून घेतला. बेडरूममधील दोन कपाट, ड्रॉवर फोडले. सकाळी सहा वाजता कोलते कुटुंब उठल्यानंतर त्यांना बेडरूमचा दरवाजा आतून लावलेला आढळला. यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. जिन्सी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात कोलते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरमालकाच्या चपलांचावापर
विशेष म्हणजे चोरटे ही धाडसी चोरीकरण्यासाठी घरात कोलते परिरवारांच्याच चपला घालून वावरले. त्यामुळे आरोपींचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. चोरटे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. कोलते यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर लोखंडी बाक ठेवलेला आहे. हा बाक चोरट्यांनी उचलून नेत बंगल्याच्या मागील बाजूस नेला. या बाकवर उभे राहून त्यांनी खिडकीचे ग्रिल काढले. चोरट्यांनी यावेळी आपली चप्पल मुख्य दरवाज्यासमोर काढली व तेथे असलेली कोलते यांची चप्पल घालत घरात व परिसरात वावरले. चोरी केल्यानंतर पुन्हा आपली चप्पल घालत चोरटे पसार झाले. यामुळे श्वान पथकाला चप्पलेच्या वासावरून आरोपीचा माग काढणे शक्य झाले नाही. दरम्यान, कोलते यांची मुलगी तेजस्विनी ऑस्ट्रेलियात आर्किटेक्चर म्हणून स्थायिक झाली आहे. सुटीनिमित्त ती औरंगाबादला आली होती. बँकाना सणानिमीत्त सुट्ट्या असल्याने तिने खरेदीसाठी एक लाख तीस हजारांची रक्कम बँकेतून काढून ठेवली होती. चोरट्यांनी या मुलीची ही रक्कमही लंपास केली.

गुन्हेशाखा अनभिज्ञ
दरम्यान घरफोडीचा ऐवढा मोठा गुन्हा घडल्यानंतरही गुन्हे शाखेला याची अजिबात माहिती मिळाली नव्हती. दुपारपर्यंत गुन्हेशाखा तसेच वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ होते. घटनास्थळी देखील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत भेट दिलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद, नगरच्या जलतरणपटूंचे यश

$
0
0

औरंगाबाद, नगरच्या जलतरणपटूंचे यश
महापौर करंडक जलतरण स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका व औरंगाबाद जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महापौर करंडक राज्यस्तरीय निमंत्रित जलतरण स्पर्धेत अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहा पदके जिंकून उल्लेखनीय यश मिळवले.
महापालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावावर ही स्पर्धा झाली. महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, उपायुक्त रवींद्र निकम, शालेय समिती सभापती शोभाताई, मधुकर वैद्य, महापालिका क्रीडा विभाग प्रमुख संजीव बालय्या, जलतरण संघटनेचे सचिव अभय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये विष्णू लोखंडे, स्मिता काटवे, सागर बडवे, आदिती निलंगेकर, डॉ. सुनील देशमुख, श्रीनिवास मोतीयेळे, मोहंमद कदीर खान, बशारत खान, गणेश जाधव, रमेश मोरे या खेळाडूंचा समावेश होता. अमृत बिऱ्हाडे व डॉ. संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अभय देशमुख यांनी आभार मानले. या स्पर्धेत औरंगाबादसह अहमदनगर, नांदेड, जळगाव, बीड, हिंगोली, धुळे, बुलडाणा, नाशिक, जालना अशा विविध जिल्ह्यांतील ३६८ जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पंच म्हणून मदन बाशा, स्मिता काटवे, सागर बडवे, श्रीनिवास मोतीयेळे, ओजस बोरसे, कमलेश नगरकर, गणेश कुलकर्णी, कैलास झोळगे, राहुल जंपलवार, मनीषा कुनसावळीकर, अजय पाल, विशाल गायकवाड यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल ः १०० मीटर फ्रीस्टाइल - पुरुष : १. जय बोरा (अहमदनगर), २. अक्षय ठाकूर (नांदेड), ३. तन्मय जगताप (अहमदनगर). महिला - १. एकता कुलकर्णी (अहमदनगर), २. मेघना कुलकर्णी (अहमदनगर), ३. सृष्टी कुनसावलीकर (नांदेड).
२५ मी. बॅकस्ट्रोक (६ वर्षे) - मुले : १. तेजस वाणी (जळगाव). मुली - १. अश्वांजली पाटील (बीड), २. गार्गी उदावंत (बीड), ३. रिद्धी नगरकर (जळगाव).
५० मीटर बॅकस्ट्रोक (८ वर्षे) - मुले : १. वाल्मिक कुलकर्णी (अहमदनगर), २. रोहन सोनवणे (औरंगाबाद), ३. अमरजितसिंग राजपूत (अहमदनगर). मुली - १. अक्षता कोरंगा (औरंगाबाद). (१० वर्षे) - मुले : १. रूद्रेक्ष ठाकरे (औरंगाबाद), २. साईराज तालीमकर (औरंगाबाद), ३. आदित्य राऊत (अहमदनगर). (१२ वर्षे) - मुले : १. हर्षल चौधरी (जळगाव), २. नवज्योतसिंग भोसीवाले (नांदेड). मुली - १. एकता कुलकर्णी, २. श्रेया पटवा, ३. जिविका मराठे (जळगाव). (१४ वर्षे) - मुले : १. श्रेयस वखरे (अहमदनगर), २. चेतन हुंडीवाला (औरंगाबाद), ३. मेया नगरकर (जळगाव). (२५ वर्षे) - पुरुष : १. रवीराज पवार (औरंगाबाद), २. सुरज पवार (औरंगाबाद), ३. जय बोरा. महिला - १. मेघना कुलकर्णी, २. सृष्टी कुनसावलीकर, ३. समृद्धी काटवे (औरंगाबाद). (३५ वर्षे) - पुरुष : १. सुबोध तांदळे (औरंगाबाद), २. श्रीनिवास कुलकर्णी (औरंगाबाद). महिला - १. अंजना शिंदे (नांदेड), २. अश्विनी मारकांडे (औरंगाबाद). (५५ वर्षे) - पुरुष : १. बाशारत खान (औरंगाबाद), २. मुकेश बाशा (औरंगाबाद). महिला - १. कांचन बडवे (औरंगाबाद). (५६ वर्षांपेक्षा अधिक) - पुरुष : १. विष्णू लोखंडे (औरंगाबाद), २. ई. एम. मगर (औरंगाबाद), ३. फुलचंद तांदळे (औरंगाबाद).
१०० मीटर बटरफ्लाय (महिला) - १. एकता कुलकर्णी, २. मेघना कुलकर्णी, ३. स्वरूपा रावस (अहमदनगर).
५० मीटर फ्रीस्टाइल (६ वर्षे) - मुले : १. सोहम कटारे (औरंगाबाद), २. यशमित चोरडिया (अहमदनगर), ३. तेजस वाणी. मुली - १. अश्वांजली पाटील, २. मिहिका शेळके (औरंगाबाद), ३. सिद्धी राजेभोसले (औरंगाबाद). (८ वर्षे) - मुले : १. वाल्मिक कुलकर्णी, २. रोहन सोनवणे, ३. गांधीश झोळगे (जालना). मुली - १. अक्षता कोरंगा, २. रागिणी अंबावड (नांदेड), ३. रिचा बिहाणी (अहमदनगर). (१० वर्षे) - मुले : १. आदित्य राऊत, २. नील मंत्री (जालना), ३. साईराज तालीमकर. मुली - १. डिंपल चौधरी (जळगाव), २. मेघना मेहेत्रे (अहमदनगर), ३. अपला कुलकर्णी (अहमदनगर). (१२ वर्षे) - मुले : १. हर्षल चौधरी, २. नवज्योतसिंग भोसीवाले, ३. आदित्य धन्नावत (जालना). मुली - १. एकता कुलकर्णी, २. जिविका मराठे, ३. निरूत्ती पिनलवार (नांदेड). (१४ वर्षे) - मुले : १. श्रेयस वखरे, २. चंद्रशेखर खराडे (बीड), ३. अभिरभानू धारवाडकर (औरंगाबाद). मुली - १. इरा पंडित (औरंगाबाद), २. धनश्री जाधव (जळगाव), ३. श्रेया झोळगे (जालना). (२५ वर्षे) - महिला : १. मेघना कुलकर्णी, २. समृद्धी काटवे, ३. सृष्टी कुनसावलीकर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमायतबाग गोळीबार: दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील हिमायतबाग येथे २०१२ साली एटीएस पथकातील पोलिसांवर गोळीबार करुन हवालदार शेख आरेफ यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद अबरार उर्फ मुन्ना उर्फ इस्माईल अब्दुल बाबुखाँ (३२, रा. चंदननगर, इंदौर, मध्य प्रदेश) व आरोपी मोहम्मद शाखेर हुसेन उर्फ खलील अखिल खिलजी (२०, रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मंगळवारी (३ ऑक्टोबर) ठोठावली, तर इतर दोन आरोपींना सबळ पुराव्याअभावी मुक्त केले.

निकाल देताना, आरोपींनी बाँबस्फोट घडवून आणले असून, देशविघातक कारवायांमध्ये आरोपींचा समावेश असल्याचे मतही कोर्टाने नोंदविले.

विशेष म्हणजे या प्रकरणी ११ सप्टेंबर २०१७ रोजी कोर्टात सुनावणी सुरू झाली व २७ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली; म्हणजेच अवघ्या १६ दिवसांत सुनावणी पूर्ण झाली आणि सहाव्या दिवशी कोर्टाने शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात पकडलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध ‘खुनाचा प्रयत्न केल्याचा’ गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार आरोपींना सुनावणीसाठी वेगवेगळ्या कारागृहातून औरंगाबादच्या जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्यापैकी काहींचे ‘इन कॅमेरा’ जबाबही नोंदविण्यात आले होते.

२६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत आलेल्या सशस्त्र आरोपींना पकडण्यासाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या पथकाने हिमायतबागेत सापळा रचला होता. या वेळी आरोपींनी एटीएस पथकावर गोळया झाडण्यास सुरुवात केली होती. यात पोलिस हवालदार शेख आरेफ यांना गोळी लागली होती. बचावासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी अझहर ऊर्फ खलील कुरेशी ठार झाला होता, तर दहशवादी मोहम्मद शाकेरच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. या प्रसंगी पाठलाग करून एटीएसने आरोपी अबरार यास पकडले होते. यानंतर पोलिसांनी अन्वर हुसेन (रा. लाभारिया, इंदौर, मध्य प्रदेश) याला अटक केली होती. आरोपींकडून ४ गावठी कट्टे, २ रिव्हॉल्व्हर, १७ जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. पकडलेल्या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध विशेष कोर्टात दोन महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

वेगवेगळ्या कलमात शिक्षा

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी २३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये तत्कालिन पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, तत्कालिन एटीएस प्रमुख नवीनचंद्र रेड्डी, तत्कालिन हवालदार शेख आरेफ, डॉ. कैलास झिने, डॉ. पांचाळ, तत्कालिन पोलिस आयुक्त संजय कुमार आदींची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन आरोपी मोहम्मद अबरार व आरोपी मोहम्मद शाखेर यांना कोर्टाने कलम ३७० अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, तर ‘आर्म्स अक्ट’अन्वये दोघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी ठोठावली. तर, सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आरोपी जफर हुसेन इक्बाल हुसेन कुरेशी (३३, रा. खंडवा, मध्य प्रदेश) व आरोपी अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (४०, रा. इंदौर) यांना मुक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी वायरमनच्या पगारासाठी लाच !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणच्या कन्नड कार्यालयातील अर्धांगवायून आजारी असलेल्या वायरमनचा एप्रिल महिन्याचा पगार काढण्यासाठी त्याच्या पत्नीकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणाच्या कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. भगवान सुदाम रायकर (वय ४०), असे त्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेलया माहितीनुसार, कन्नड येथे कार्यरत एक वायरमन आजारपणामुळे घरीच असल्याने त्याला एप्रिलचा पगार मिळालेला नव्हता. पगार काढण्यासाठी वायरमनच्या पत्नीकडे कन्नड विभागीय कार्यालयचे कनिष्ठ लिपिक भगवान सुदाम रायकर यांनी दहा हजार रुपये व वीस हजार रुपये सीपीएफ अपलोड करण्यासाठी मागितले. पती आजारी असतानाही लाच मागत असल्याने या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागामार्फत तक्रारीची पडताळणी करण्यात आले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. हॉटेल स्वामी समर्थ भोजनालय, टेबल क्रमांक ७ वर भगवान सुदाम रायकर याला दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी व अप्पर पोलिस अधीक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, अश्वलिंग होनराव, संदीप अव्हाळे, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहयो घोटाळ्यात उपसरपंच अपात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेत ७९ लाख ५३ हजार ६१३ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवत तीन तत्कालीन ग्रामसेवक, दोन कनिष्ठ अभियंता विरुद्ध शिस्तभगाची कारवाई, तसेच उपसरपंच बाजीराव राठोड यांना पद व सदस्यपदावरून काढून टाकण्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी दिले आहेत. या शिवाय अपहार झालेली रक्कम अधिकारी आणि उपसरपंच बाजीराव राठोड यांच्याकडून वसूल करण्यातचेही आदेश आहेत.
पारूंडी तांडा येथे ३५ मातीनाला बांध, दोन सिमेंटनाला बांध, दोन रोपवाटिका, तीन शेततळे, अशा एकूण ४२ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या. या कामांची पाहणी पथकामार्फत केली असता केवळ दहा मातीनाला बांधकामे झाली असून सिमेंटनाला बांध हे प्रशासकीय मान्यता दिलेल्या गटात आढळले नाही. दोन पैकी एक रोपवाटिका, तर तीन पैकी एकही शेततळे झालेले नाही.
या कामात ७९ लाख ५३ हजार ६१३ रुपयांचा हपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात ६ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फेरचौकशीचे आदेश दिले होते. यामध्ये तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच बाजीराव राठोड यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित केले होते. यामध्ये औरंगाबाद खंडपीठाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांच्यावर कारवाईचे आदेश

अप्पर विभागीय आयुक्तांनी तत्कालिन ग्रामसेवक एस. एल. वावरे, एस. बी. पाटील, के. बी. गव्हाणे, कनिष्ठ अभियंता फणसे, के. एस. शिंदे यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उपसरपंच बाजीराव राठोड यांना अपात्र घोषित करून सदस्य पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले. पंचायतीच्या उर्वरित कार्यकाळासाठीही राठोड अपात्र राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>