Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीज चोरीप्रकरणात चौथा आरोपीस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हडको एन-१२ परिसरात जुलै महिन्यात उघडकीस आलेल्या वीज चोरीच्या गुन्ह्यातील चौथा आरोपी मोहम्मद समीर मोहम्मद शफी याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टासमोर हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी बुधवारी दिले.
महावितरणचे सहाय्यक अभियंता अविनाश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी एन-१२, हडको परिसरात विद्युत मीटरची पाहणी केली असता, मारोती पवनार याने रिमोटद्वारे १७,२४० रुपयांची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले होते. मयूरनगर येथील सदाशिव राठोड व शरीफ कॉलनी येथील अश्फाक अजीज काझी या दोघांनीही रिमोटद्वारे वीज चोरी केल्याचे उघड झाले होते. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींनी वीज चोरीचे रिमोट शेख समीर याच्याकडून घेतल्याची कबुली दिली होती. अश्फाक काजीच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कुलरच्या कारखान्यात हे रिमोट तयार केले जात होते. पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोहम्मद समीरला हडको येथून अटक केली. त्याच्याकडून २२ विद्युत मीटर, ७ रिमोट, ७ सी. टी., सोल्डरिंग गन, कटर, पकड, सोल्डरिंग वायर, स्क्रुड्रायव्हर आदी एकूण एक लाख १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विद्यापीठाचा वर्ग भरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहा वर्षांपासून औरंगाबादकरांना प्रतीक्षा असलेल्या ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ’चे वर्ग अखेर गुरुवापासून सुरू झाले. इंग्रजी विषयाचा पहिला तास झाला अन् विद्यार्थ्यांसह उपस्थितही भारावले. विद्यापीठात ‘बीएएलएलबी’ अभ्यासक्रम सुरू झाला. राज्यातील तिसरे विधी राष्ट्रीय विद्यापीठ ठरले आहे.

विधी ‌अभ्यासक्रमात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्मितीसाठीा राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू करण्याची चर्चा २००७पासून सुरू होती. औरंगाबादचे हे विद्यापीठ सुरू होण्यास २०१७-१८ शैक्षणिक वर्ष उजाडले. अखेर गुरुवारपासून विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले अन् औरंगाबादच्या लढ्याला यश आले. पहिल्या दिवशी स्वागत समारंभ झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्या. रवींद्र बोर्डे, न्या. दिनेश गंगापूरवाला, कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, बीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ. संजीवनी मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी न्या. बोर्डे म्हणाले, ‘विधी क्षेत्रात करिअर करण्याच्या मोठ्या संधी आहे. विधी विद्यापीठात उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. त्याचा फायदा देशभरातील विद्यार्थ्यांना होईल.’

न्या. गंगापूरवाला म्हणाले,‘विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासाच्या पुढे जाऊन अभ्यास केला पाहिजे.’ कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश म्हणाले,‘सहा महिन्यांत विद्यापीठाचे वर्ग सुरू होत आहेेत. सर्वांच्या मदतीने हे शक्य झाले.’ यावेळी डॉ. एस. जी. गुप्ता यांची ही उपस्थिती होती.

पहिला तास इंग्रजीचा
विधी विद्यापीठात पहिल्या वर्षी बीए एलएलबी हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाला. पहिल्या बॅचचे ६० विद्यार्थी आहेत. देशभरातील विविध राज्यातील विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची तासिका झाली. मेहनाज हक यांना पहिली तासिका घेण्याचा मान मिळाला. अभ्यासक्रमाची ओळख, पुस्तके, परीक्षांचा पॅर्टन, कोर्सबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिल्याचे हक यांनी ‘मटा’ला सांगितले.

राज्यातील तिसरे विद्यापीठ
राज्यात औरंगाबादमध्ये विधी विद्यापीठ सुरू व्हावे याची चर्चा दहा वर्षापासून सुरू होती. कोठे स्थापन करायचे यावरून वाद झाला. जानेवारी २०१३मध्ये औरंगाबादसह नागपूर, मुंबईमध्येही विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय झाला. मुंबई, नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे वर्ग दोन वर्षापूर्वीच सुरू झाले. देशातील २१वे तर राज्यातील औरंगाबादचे तिसरे राष्ट्रीय विधी विद्यापीठ ठरले आहे. देशात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. राज्यात तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत.

पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहोत याचा आनंद आहे. पहिला दिवस अतिशय उत्साहाचा ठरला. आम्हाला शिक्षक, कुलगुरू हे अतिशय चांगले लाभले आहेत. येथील सुविधा अन् मदत पाहून या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो आहे.
- चेतना श्रीवास्तव, विद्यार्थिनी.

पहिला दिवस ओळख करण्यातच गेला. मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी होते. सर्वांची ओळख झाली, सोयीसुविधाही अतिशय दर्जेदार आहेत. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाची तासिका झाली.
- सुमेधकुमार त्रिवेदी, विद्यार्थी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पुरस्कारातही ‘ऐनवेळ’चा फंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळचे प्रस्ताव मान्य करण्याची सवय लागलेल्या महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारातही ‘ऐनवेळ’चा फंडा वापरला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या यादीत उर्दू माध्यमाच्या शिक्षकाचे नाव राहून गेल्यामुळे आयत्यावेळी एका उर्दू माध्यमाच्या शिक्षकाला आदर्श पुरस्कार देण्यात आला.

शिक्षक दिनाच्या एक महिन्यानंतर महापालिकेने गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले. या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्यांच्या नावांबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पुरस्कार वितरणाच्या एक दिवस अगोदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. यादीमधील काही शिक्षकांबद्दल अनेकजणांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. आदर्श शिक्षक पुरस्कारात उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना डावलण्यात आले होते. ही बाब कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या लक्षात आली आणि उर्दू माध्यमाच्या आदर्श शिक्षकाचा शोध सुरू झाला. चेलिपुरा येथील उर्दू माध्यमाच्या शाळेच्या शिक्षीका रशीदुन्नीसा बेगम यांना पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले व त्यांना ऐनवेळी पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, शिक्षण समितीच्या सभापती शोभा बुरांडे, आयुक्त डी.एम. मुगळीकर, उपायुक्त रवींद्र निकम, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक शिवाजी दांडगे, सुरेखा सानप यांची विशेष उपस्थिती होती.

पुरस्कारप्राप्त शिक्षक
देवेंद्र सोळंके, विजय कोल्हे, शशीकांत उबाळे, कामिनी सुरंगळीकर, तिलोत्तमा मापारी, संगीता ताजवे, सुरेंद्र दांडगे, शेख मजहर अन्वर, मनिषा नगरकर यांना महापालिकेने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजकार्य’चे विद्यार्थी रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समाजकल्याण आदिवासी, महिला व बालविकास कामगार विभागातील वर्ग एक, दोन, व तीन संवर्गातील पदे समाजकार्य पदव्युत्तर, पदवी, पदवीधारकांसाठी कायम ठेवण्यात याव्यात, या मागणीसाठी समाजकार्य अभ्यासक्रम पदवीधारक गुरुवारी रस्त्यावर उतरले. राज्यभरात ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

समाजकल्याण आदिवासी, महिला व बालविकास कामगार विभागातील सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय समाज कार्यकर्ता, वसतिगृह, आश्रमशाळा अधीक्षक अशा विविध पदांसाठी समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पदवी पूर्वी बंधनकार होती. राज्य शासनाने ३१ जुलै २०१७ रोजी अर्हता बदलत कोणत्याही पदवीधारकांना अर्ज करता येईल, असा निर्णय घेतला. यावर राज्यभरातील समाजकार्य अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी संतापले आज राज्यभरातील विद्यार्थी अर्हता पूर्ववत करण्यासाठी रस्त्यावर उतरले. औरंगाबादमध्ये शहागंजमधून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

विकासाभिमूख प्रशासनात सर्वांना एमएसडब्ल्यू अनिवार्य करा, समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करा, अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यात सहभागी होते. मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या मांडल्या. संतोष पवार, प्रा. पी. एम. शहापुरकर, गणेश मते, सुनील पवार, मिलींद भोळे, मनोज गाडेकर, जावेद काझी, श्रीकांत करडखेडे, सुवर्ण शिंदे, आकाश कोलते, श्रीकांत सावळे, विठ्ठल जाधव, सोनाली नाभीडे, प्रा. धनंजय कांबळे, प्रा. युसूफ बेन्नुर, प्रा. निलिमा पांडे, प्रा. आर. एन. गावीत यांची उपस्थिती होती.

राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर
राज्यभरातील समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गुरुवारी रस्त्यावर उतरले. विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे मोर्चे काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यासाठी समाजकार्य विद्यार्थी लढा हक्कासाठी समिती समितीही स्थापन करण्यात आली आहे.

समाजकार्य अभ्यासक्रमाचे पदवी, पदव्युत्तरधारकांवर अन्याय करणारा निर्णय शासनाने घेतला आहे. तो निर्णय रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. हा अभ्यासक्रमच ज्या पदांसाठी आहे त्यांना संधी न देता इतरांना देणे अयोग्य आहे.
- संतोष पवार, समाजकार्य विद्यार्थी लढा हक्कासाठी समिती समिती, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलकुंभांसाठी चार कोटी पैठणमध्ये मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
मोडकळीस आलेले शहरातील जुने जलकुंभ तोडून त्याजागी नवीन व जास्त क्षमतेचे जलकुंभ बांधण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्या जलकुंभाच्या कामाला मंजूरी मिळाली असून लवकरच काम सुरू होणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘शहरातील जुनी तहसील कार्यालय, नवीन कावसान व नारळा या भागातील जलकुंभांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. जुन्या तहसील कार्यालयाजवळील जलकुंभ कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. शहरातील हे धोकादायक जलकुंभ पाडून तेथे जादा क्षमतेचे नवीन जलकुंभ बांधण्यासाठी निधी मिळावा याकरिता सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरवठा करत होते. लोणीकर यांनी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून चार कोटी रुपये मंजूर केले आहेत,’ अशी माहिती उपनगराध्यक्षा जोशी यांनी दिली.
नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जलकुंभाच्या कामाला मंजुरी मिळाली असून काही दिवसाच बांधकाम सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटणार आहे, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबाच्या सत्तेविरुद्द कुरणपिंपरीत लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
गेवराई तालुक्यातून पैठण तालुक्यात सामील झाल्यानंतर कुरणपिंपरी येथील ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. तालुक्यात नव्याने सामील झालेल्या या गावात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लक्ष घातल्याने कुरणपिंपरीच्या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पैठणपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेले कुरणपिंपरी हे गाव गेवराई तालुक्यात होते. हे दोन हजार लोकसंख्या व १२९४ मतदार असलेले गाव दोन महिन्यांपूर्वी पैठण तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. गोदावरी नदी काठी असल्याने बागयतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावचा विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. शिवाय ग्रामपंचायतीवर आतापर्यंत एकाच कुटुंबाचे वर्चस्व असल्याने विकास खुंटल्याचा आरोप करत गावातील शिक्षक गुलाम रसूल शेख यांनी स्वतःचे पॅनल उभे करून पटेल कुटुंबासमोर आव्हान उभे केले आहे. गावचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असून तिरंगी लढत होत आहे. लोकहित ग्रामविकास पॅनलतर्फे परवीन रसुल खान शेख, परिवर्तन पॅनलकडून आसमा पटेल व कार्यसम्राट पॅनलतर्फे जेरेमा पठाण सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत. तीन प्रभागातून निवडून द्यावयाच्या नऊ सदस्यांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत कार्यालय बंदच

कुरणपिंपरी ग्रामपंचायतीवर पटेल कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्याच घरातून चालवला जातो. यामुळे वर्षानुवर्ष ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच नाही, सध्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर पिंपळाचे झाड उगवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, सेनेच्या गटातून काँग्रेसचे गट रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
सिल्लोड तालुक्यात समाविष्ट असल्यापासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या खामगावमध्ये सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यावेळी गावातील काँग्रेसचा एक गट शिवसेना, तर दुसरा भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असल्याने या गावाकडे तालुक्याचे लक्ष आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या गंगाधर सोनवणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळी चूल मांडत भाजपकडून पंचायत समिती लढविलेल्या नंंदा मनोहर सोनवणे या सरपंचपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पॅनलमधून सोनवणे यांनी मुलाला सदस्यपदासाठी उभे केले आहे. तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबाराव सोनवणे यांच्या पत्नी महिला काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षा शकुंतलाबाई या शिवसेनेच्या पाठिंब्यावर सरपंचपदाची निवडणुक लढवत आहेत. पंचायत समितीचे शिवसेनेचे माजी सदस्य मोहन सोनवणे यांनी या पॅनलमधून त्यांच्या मुलाला रिंगणात उतरवले आहे. याशिवाय शारदा अंकुश बखळे यांंनी सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
शकुतला सोनवणे यांंनी यापुूर्वी सरपंचपद भुषवले आहे. त्याचे पती आबाराव हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून ते माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे खंदे समर्थक मानले जातात. नंदा सोनवणेे या राजकारणात नवख्या असून त्यांचे पती मनोहर सोनवणे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. नंदा सोनवणे यांचा यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत निसटता पराभव झाला आहे.

लढतीचे भवितव्य

ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यासाठी दोन पॅनलकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच भावकीतील असल्यामुळे वाडी, वस्ती, प्रत्येक घरात राजकारण चांगलेच तापले आहे. तिसऱ्या अपक्ष उमेदवार किती मते घेतात, यावर या लढतीचे भवितव्य ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जेलभरो सत्याग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाकडे दुर्लक्ष करून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ, तसेच काही मुख्य सेविका अंगणवाड्या सुरू करण्यासाठी शिवीगाळ करून अपशब्द वापरून धमकावत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आयटकप्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी जेलभरो सत्याग्रह करून स्वतःला अटक करवून घेतली.
पैठणगेट येथून मोर्चा काढण्यास पोलिसांनी विरोध केल्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पण, परवानगी मिळाल्यानंतर पैठणगेट ते जिल्हा परिषद मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्याग्रह सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सत्याग्रहासाठी ५० ते ७५ महिलांच्या ४० तुकड्या करून प्रमुख नेण्यात आले होते. दुपारी दीड वाजता शालिनी पगारे यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या तुकडीने अटक करवून घेतली. शेवटच्या ४०व्या तुकडीतील सत्याग्रहींना सायंकाळी पाच वाजता अटक झाली. या आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसरात दिवसभर पोलिसांच्या मोटारींची वर्दळ होती. अटक करून सत्याग्रहींना पोलिस मुख्यालयातील परेड मैदानावर ठेवले होते, त्यांची सायंकाळी सहा वाजता सुटका करण्यात आली. मोर्चामध्ये अडीच हजार कर्मचारी सामील झाले होते. संपाच्या २५व्या दिवशी एकजूट दा‍खवून देण्यात आली. २५ दिवसांतील हा पाचवा मोर्चा असतानाही सदस्यांची प्रचंड प्रतिसाद दिला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप सुरू आहे. आंदोलनाचे नेतृत्व प्रा. कॉ. राम बाहेती यांनी केले. यावेळी कॉ. अनिल जावळे, विलास शेंगुळे, तारा बनसोडे, शालिनी पगारे, माया भिवसाने, शिला साठे, मुरली म्हस्के, चंचल खंडागळे, संगीता वैद्य, ‌ललिता दीक्षित, सुनीता शेजवळ यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रिड्रेसल सेल’ स्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रिड्रेसल (फेरमूल्यांकन) निकालात मर्यादेपेक्षा जास्त विलंब होतो. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘रिड्रेसल सेल’ स्थापन करण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. या कक्षाच्या माध्यमातून कमी कालावधीत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यंदा ‘रिड्रेसल’ निकाल रखडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर हजारो विद्यार्थी फेरमूल्यांकनासाठी अर्ज करतात. यंदा दहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मुदतीत निकाल जाहीर न झाल्यास विद्यार्थ्यांचा रोष वाढतो; तसेच पुढील निकालाची प्रक्रिया रखडल्यास सर्वांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर्षी तांत्रिक कारणामुळे रिड्रेसलचे निकाल रखडले आहेत. वेळेत निकालपत्र न मिळाल्यास दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. या निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘रिड्रेसल सेल’ (फेरमूल्यांकन कक्ष) स्थापन करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. नवीन कक्षाद्वारे परीक्षा संचालकांना रिड्रेसलची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाकडून स्वतंत्र माहिती जमा करण्याची गरज राहणार नाही. रिड्रेसल प्रक्रियेत समन्वय साधण्याचे काम नवीन कक्ष करणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवण्यासाठी ‘रिड्रेसल सेल’ स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामुळे रिड्रेसलचे निकाल लवकर लावणे शक्य होईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘एमकेसीएल’च्या तांत्रिक अडचणीमुळे रिड्रेसलचे निकाल लावण्यास उशीर झाला आहे असा दावा परीक्षा विभागाने केला आहे. बी. एस्सीच्या तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी रिड्रेसल अर्ज केला आहे.

‘ट्रान्सस्क्रिप्ट सर्टिफिकेट’ दोन दिवसांत
‘ट्रान्सस्क्रिप्ट सर्टिफिकेट’ (एकत्रित गुणपत्रिका) मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारावे लागतात असल्याची तक्रार येताच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी दखल घेतली. दोन दिवसात सर्टिफिकेट देण्याचे आदेश दांडगे यांनी कर्मचाऱ्यांना दिले. सप्टेंबर महिन्यात प्रभारी संचालक डॉ. राजेश रगडे यांनी राजीनामा दिल्यानंतर डॉ. दांडगे रुजू होईपर्यंत कालावधी गेला. या काळात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. कामकाज लवकर पूर्ण करण्याची सूचना करीत दांडगे यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यशोदे तुझा कान्हा असा खट्याळ भारी’

$
0
0


‘यशोदे तुझा कान्हा असा खट्याळ भारी’
पारंपरिक गवळणीवर आधारीत अल्बमचे नाट्यशास्त्र विभागात नुकतेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लोकसंगीताचा भन्नाट ठेका असलेल्या मराठी अल्बमची लोकप्रियता वाढली आहे. या संगीतात आता ‘यशोदे तुझा कान्हा असा खट्याळ भारी’ या गवळणीची भर पडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात नुकतेच या अल्बमचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.
लोकसंगीतात वेगळी वाट अवलंबत असलेला युवा गीतकार-संगीतकार रोहिदास सोमवंशी याच्या अल्बमचे नाट्यशास्त्र विभागात चित्रीकरण पार पडले. जवळपास शंभर गीतांचे लेखन आणि संगीतबद्ध करण्याचा अनुभव रोहिदासकडे आहे. नाट्यशात्र विभागाच्या सहकार्याने गवळण चित्रीकरणाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. ‘यशोदे तुझा कान्हा असा खट्याळ भारी’ गवळणीचे गायन प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी केले आहे असून ध्वनीमुद्रण मुंबई येथील एल. एम. स्टुडिओत झाले. पारंपरिक तमाशाच्या पार्श्वभूमीवर गवळण चित्रीत करण्यात आली. सात गवळणी आणि कृष्ण यांच्यातील आंतरिक नाते उलगडणारी गवळण फर्मास रंगली आहे. मराठी संगीत वाहिन्यांवर लवकरच रसिकांना गवळण पाहता येईल असे दिग्दर्शक रोहिदास सोमवंशी यांनी सांगितले. या गवळणीचे स्क्रिनप्ले अस्लम शेख यांचे असून छायादिग्दर्शन अविनाश मेड, नेपथ्य, श्रुतिका दुशिंग, प्रकाशव्यवस्था ओमकार घोडके, नृत्य दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले.
मनिषा सराफ यांच्यासह पल्लवी गायकवाड, अस्मिता भारती, रुपाली अल्हाट, मंजुषा गंगावणे, फाल्गुनी राठोड, मेघा अंभोरे यांनी गवळणीची भूमिका केली, तर कृष्णाची भूमिका आशिष झाडके यांनी साकारली. इतर कलाकारात युवराज गवई, राजेश अगुंडे, बाळू बटूळे, पांडूरंग शिनगारे, अभिमान उनवणे, रामा पाटोळे यांचा समावेश होता. वेशभूषा आणि रंगभूषा जॉय भांबळ, श्रुतिका दुशिंग यांनी केली. या अल्बमसाठी नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, ढोलकीपटू कृष्णा मुसळे, डॉ. गणेश चंदनशिवे, योगेश चिकटगावकर, मदन दुबे आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस तालुकाध्यक्षांना चुलत भावाकडून शह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
अजिंठा लेणीशेजारी असलेल्या पिंपळदरी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन चुलत भावांनी पॅनल उतरवल्याने रंगत आली आहे. एका पॅनलचे प्रमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे आहेत, तर दुसऱ्या पॅनलचे प्रमुख गोविंदा लोखंडे हे आहेत.
पिंपळदरीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून १८०० मतदार, तीन प्रभागातून नऊ सदस्य अशी रचना आहे. काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे यांच्या सर्वधर्म समभाव ग्रामविकास पॅनलतर्फे सरपंचपदाच्या उमेदवार पार्वताबाई पाडळे या आहेत. गेविंदा पाराजी लोखंडे, सांडु लोखंडे, रामेश्वर नरवडे, आनंदा चव्हाण यांनी एकत्र येऊन भाजपप्रणित सिद्धेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनल तयार केले आहे. या पॅनलतर्फे तडवी सुरैया मनवर या सरपंचपदाची निवडणूक लढवत आहेत. यावेळी सरपंचपदाची निवड थेट मतदार करणार असल्याने त्याबद्दल उत्सुकता आहे. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पॅनलकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही पॅनल आम्हीच विकास करू, असा दावा मतदारांसमोर करत आहेत. भाऊबंदकी, सगे-सोयरे, नातेवाईक, असे सगळेच निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

रोजगार मिळावा

हे गाव अजिंठा लेणीला लागून आहे या गावातून पर्यटक व्ह्यू पॉइंटवर जातात. त्यामुळे पर्यटन सुविधा निर्माण करून त्यातून रोजगार मिळावा, असी अपेक्षा स्थानिक तरुण मतदार व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ निलंबनात खोडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करा असे आदेश स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिलेले असताना त्यात खोडा घालून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. सभागृहनेत्यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांच्या नावे पत्र दिले व कारवाई संदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्या, अशी विनंती केली आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला व तशी शिफारस आयुक्तांकडे करण्याचे ठरविण्यात आले. तसे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर गुरुवारी पालिकेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांनी आयुक्तांच्या नावे पत्र दिले. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ‘भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्यापासून या योजनेवर अफसर सिद्दिकी हेच काम करीत आहेत. योजना जवळपास पूर्ण होत आली आहे. काही ठिकाणी मुख्य ड्रेनेज लाइनला अंतर्गत ड्रेनेज लाइन जोडणे बाकी आहे. या योजनेच्या कामाचा अनुभव फक्त अफसर सिद्दिकी यांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या कामाचे लेखापरीक्षण करून अंतरिम अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे, परंतु अंतरिम लेखापरीक्षण अहवालाची शासनाच्या स्तरावर किंवा थर्ड पार्टीकडून चौकशी करण्यात यावी व योग्य निर्णय घेण्यात यावा. कारण योजना पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.’

‘स्थायी’च्या मागणीचा नियम तपासून निर्णय
भूमिगत गटार योजनेच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करून स्थायी समितीने या कामाचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्याबद्दल नियम तपासून निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहे.
केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निधीतून शहरात महापालिकेतर्फे भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. या कामाबद्दल स्थायी समितीच्या गेल्या आठ - दहा बैठकांपासून नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. त्यामुळे सभापती गजानन बारवाल यांच्या आदेशानुसार पालिकेच्या मुख्यलेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी लेखापरीक्षण करून अंतरिम अहवाल सादर केला. यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बुधवारी स्थायी समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी लेखापरीक्षण अहवालाच्या अनुशंगाने चर्चा करून भूमिगत गटार योजनेच्या कामाचे नोडल ऑफिसर अफसर सिद्दिकी यांना निलंबित करण्याची मागणी सभापतींकडे केली. त्याचबरोबर पीएमसी म्हणून काम करणाऱ्या ‘फोट्रेस’ कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली. नगरसेवकांनी केलेल्या मागणीची दखल घेवून सभापती गजानन बारवाल यांनी फोट्रेस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अफरस सिद्दिकी यांना निलंबित करण्याची शिफारस त्यांनी आयुक्तांकडे केली. पीएमसी आणि अफसर सिद्दिकी यांच्यावर स्थायी समितीच्या आदेशानुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.

स्थायी समितीने दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आयुक्त डी. एम. मुगळीकर यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘स्थायी समितीने केलेल्या मागणीचे पत्र सभापतींकडून गुरुवारी प्राप्त झाले आहे. त्यात त्यांनी चार मागण्या केल्या आहेत. अफसर सिद्दिकी यांना निलंबित करा, फोट्रेसला ब्लॅकलिस्ट करा, शहर अभियंता सखाराम पानझडे व कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांच्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम करण्यात यावे. या दोन अधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय कंत्राटदाराचे बिल देऊ नये असे सभापतींनी पत्रात मनूद केले आहे. या मागणीचा नियम तपासून निर्णय केला जाईल. पानझडे व कुलकर्णी हे दोन्हीही अधिकारी निलंबित होते, आता पुन्हा त्यांच्याकडे या योजनेचे काम द्यायचे का, बिलांबद्दल त्यांनी केलेल्या शिफारशीचा विचार करायचा का असे देखील प्रश्न आहेत. स्थायी समितीचे सध्या फक्त पत्र आले आहे. बैठकीचे इतिवृत्त आलेले नाही. इतिवृत्त आल्यावर नियम तपासून कारवाईचा निर्णय घेतला जाईल,’ असे मुगळीकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ लोकांची सहनशीलता संपली !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शांततामय मराठा क्रांती मोर्चाची नोंद जागतिक इतिहासात झाली. किमान आता राज्य सरकारने मराठा आरक्षणाची कायदेशीर सोडवणूक करावी. कारण, लोकांची सहनशीलता संपली आहे,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते राज्यस्तरीय मराठा बिझनेस ‘महा एक्स्पो’ कार्यक्रमात बोलत होते.

शिवाई, मराठा विकास मंडळ आणि मराठा बिझनेस नेटवर्क यांनी श्रीहरी पॅव्हेलियन येथे पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान ‘महा एक्स्पो’ आयोजित केला आहे. मराठा महिला उद्योजिकांनी ‘महा एक्स्पो’साठी पुढाकार घेतला आहे. या उद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ‘एमजीएम’चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, रंगनाथ काळे, प्रदीप सोळुंके, नीता देशमुख, पुष्पा काळे, वर्षा कव्हळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शेती आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परखड भाष्य केले. ‘मराठा समाजाचे मंत्री, सहकारी नेते असल्यामुळे या समाजाच्या हाती सर्वच आहे असे वाटते. दुसरीकडे अल्पभूधारक शेतकरी, माथाडी कामगारसुद्धा याच समाजाचे आहेत. अगदी मुलांना शिकवण्याची त्यांची परिस्थिती नाही. विदर्भ वगळता इतर भागात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचा फायदा नसल्याने कुचंबणा होते. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. संयम व शिस्त यांचा आदर्श घालणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची नोंद जागतिक इतिहासात झाली. मात्र, अजूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेऊन तातडीने आरक्षण प्रश्नाची कायदेशीर सोडवणूक करावी. कारण, लोकांची सहनशीलता संपली आहे,’ असे चव्हाण म्हणाले.

खासदार रावसाहेब दानवे यांनी उद्यमशीलता वाढवण्याचे आवाहन केले. ‘मुंबई, पुणे, ठाणे परिसरात उद्योग सुरू करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. मात्र, राज्याच्या इतर भागात सुविधा देऊनही उद्योग उभारणीस तयार नाहीत. दळणवळण सुविधा नसल्याचे सांगतात. डीएमआयसी प्रकल्पात नवीन उद्योग येत आहेत. काही दिवसात औरंगाबाद-जालना जुळी शहरे नावारूपास येतील. सरकारचे कर्तव्य म्हणून उद्योजकांना सहकार्य करू,’ असे दानवे म्हणाले. यावेळी मान्यवरांनी उद्योजकांच्या स्टॉलला भेट देऊन चर्चा केली. या प्रदर्शनात निम्मे स्टॉल उद्योजिकांचे आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता देशमुख, राम पवार यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले. यावेळी उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मानसिकता बदला
‘उद्योजक होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे असते. देशभरातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करा. मराठा समाजातील महिला घराबाहेर पडून उद्योजक होत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. शिवछत्रपतींनी शून्यातून विश्व उभे केले. उद्योजकतेचे धडे गिरवून महिलांनी कुटुंबासह समाजाचा विकास करावा,’ असे चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कामगारांसमोर दानवेंचा प्रचारी दांडपट्टा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप प्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महापौरांना कामगारांची दिवळी गोड करा, अशा सूचना करतील ही अपेक्षा गुरुवारी फोल ठरली. उलट कामगारांना मोदी सरकारच्या निर्णयाची उजळणी करणारे दानवे यांचे प्रचारकी थाटातले भाषण ऐकावे लागले. त्यामुळे त्यांनी डोक्याला हात लावला.

भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत बहुजन कामगार शक्ती महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघातर्फे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचा पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला तनवाणी यांच्यासह महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे, अध्यक्ष अशोक हिवराळे, सचिव कैलास जाधव, उपाध्यक्ष पंडीत दाभाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व भाजपचे नगरसेवक यांची विशेष उपस्थिती होती.

बहुजन कामगार शक्ती महासंघ भाजपच्या कामगार मोर्चाशी संलग्न करतो, अशी घोषणा दानवे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केली. ‘मागण्या मान्य होतील या अपेक्षेसह कामगार आपल्या सोबत आले आहेत. त्यामुळे महापौरांनी असा एखादा निर्णय घ्यावा, की ज्यामुळे कामगार महापौरांचे नाव अनेकवर्ष घेतील,’ असा उल्लेख करून दानवे यांनी घडमोडे यांना महापौरपदाचे दिवस कमी राहिल्याची आठवण करून दिली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी भाजप सरकारनेच इंदू मिलची जागा उपलब्ध करून दिली. इग्लंडमध्ये ज्या घरात डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य होते, ते घर भाजप सरकारने खरेदी केले. महू गावाचा पर्यटकांच्या दृष्टीने विकास केला. मोदी सरकारने या शिवाय दलितांच्या उद्धारासाठी विविध योजना सुरू केल्या,’ असे दानवे यांनी सांगितले. ‘डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने दोनवेळा लोकसभा निवडणुकीत हरवले. डॉ. आंबेडकरांना हरवणाऱ्या काँग्रेस बरोबर दलित समाज आणखी किती दिवस राहणार ? जुन्या गोष्टी मनातून काढा, नवीन प्रवाहात सामील व्हा,’ असे अवाहन दानवे यांनी केले. प्रास्ताविक संजय रगडे यांनी केले. किशनचंद तनवाणी यांनी स्वागतपर भाषण केले. महापौर भगवान घडमोडे, आमदार अतुल सावे यांचीही यावेळी भाषणे झाली.

आश्वासनावर समाधान
कामगारांच्या प्रश्नांना रावसाहेब दानवे यांनी हात न घातल्यामुळे मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली. तनवाणी यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मेळाव्याच्या शेवटी पुन्हा एकदा माईक ताब्यात घेतला. ‘तुमच्या सर्वांची दिवाळी गोड होईल, लवकरच त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल,’ असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ स्वच्छतेच्या महायज्ञात हजारोंचे श्रमदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तोंडाला मास्क, हातात झाडू घेऊन सरकारी अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शहर स्वच्छतेच्या महायज्ञात सहभागी होऊन शहर स्वच्छ केले.

पर्यटन पर्व कार्यक्रमाचा भाग म्हणून शहरातील ४२ ठिकाणी ही मोहीम आयोजित केली होती. निवडलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, उद्यानांची स्वच्छता करत नागरिक, सेवाभावी संस्था, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सकाळी ७ वाजता शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महास्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्तांनी स्वतः हातात झाडू घेऊन शहागंज येथून सिटी चौक, रंगार गल्लीमार्गे गुलमंडी परिसरात स्वच्छता केली. डॉ. भापकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने स्वच्छता केल्यानंतर अभियानाचा गुलमंडी परिसरात समारोप करण्यात आला.

यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी आहे. येथील पर्यटनस्थळांचा वारसा, संस्कृती जतन करण्यासाठी स्वच्छतेला मोलाचे स्थान आहे. आपला परिसर, कार्यालये, आस्थापना, राज्य आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, पर्यटन राजधानीला स्वच्छ आणि सुंदर बननिण्यासाठी आणि स्वच्छतेचा संकल्प तडीस न्यावा, असे आवाहनही डॉ. भापकर यांनी केले.

यावेळी उपायुक्त डॉ. वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, पारस बोथरा, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पर्यटन विभागाचे व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, वनाधिकारी सतीश वडस्कर यांच्यासह हिंदी विद्यालय, विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय, मराठा हायस्कूल, गुजराती विद्यालय, स्काउट गाइड्स, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कार्यालय चकाचक
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, तहसीलदार राजीव शिंदे यांच्या चांदणे चौक ते गुलशन महलपर्यंत स्वच्छता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२१३ ग्रामपंचायतींत आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार ‌शनिवारी जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून शुक्रवारी मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य, मतदान कर्मचारी रवाना करण्यात आले.
जिल्ह्यात पहिल्या टप्‍प्यातील चार ग्रामपंचायतींसाठी नुकतेच वैजापूर तालुक्यात मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील २१३ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये सरपंचपद थेट निवडले जाणार असल्यामुळे निवडणु‌कीत चुरस वाढली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये औरंगाबाद तालुक्यातील ३४, पैठण २२, फुलंब्री १७, सिल्लोड १८, सोयगाव ५, वैजापूर २१, गंगापूर ३५, कन्नड ५१ आणि खुलताबाद तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी ६१२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी ३ हजार ४२१, असे एकूण ४ हजार ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत. २१३ ग्रामपंचायतींमधील ६९२ मतदान केंद्रांवर निवडणुकीसाठी १५२१ बॅलेट युनिट (बीयू) व ७६३ कंट्रोल युनिट (सीयू) यंत्रांची आवश्यकता आहे. तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या औरंगाबाद ११४, पैठण ८१, गंगापूर १०७, वैजापूर ६५, कन्नड १६०, खुलताबाद ३१, फुलंब्री ५७, सिल्लोड ६१, सोयगाव १६.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनचे ‘अच्छे दिन’ सरले

$
0
0

रेशनचे ‘अच्छे दिन’ सरले

सणासुदीत मिळणारे पामतेल, रवा, मैदा, डाळी गायब

बीपीएल लाभार्थ्यांची साखरही बंद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोरगरीब, हातावर पोट असणाऱ्यांसाठी रेशनचे धान्य म्हणजे मोठा आधार. दशकापूर्वी या दुकानांवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी साखर, गहू, तांदूळ यासह रवा, मैदा, पामतेल व डाळी मिळत होत्या, मात्र रेशनचे हे ‘अच्छे दिन’ आता सरले आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पाच महिन्यांपासून बीपीएल कार्डधारकांना मिळणारी साखरही बंद झाली आहे.

रेशनचे अच्छे दिन इतिहासजमा झाल्यामुळे सर्वसामान्यांना आता बाजारातून अन्नधान्याची खरेदी करावी लागत आहे. गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाकडून कार्डधारकांना रवा, मैदा, हरभरा डाळ, तूर डाळ, पामतेल, डालडा आदी वस्तू आवर्जून देण्यात येत होत्या, मात्र गेल्या दहा ते ११ वर्षांपासून रवा व मैदा तसेच हरभरा डाळ, तूरडाळ देणे बंद झाले. त्यापाठोपाठ काही वर्षांपासून रेशन दुकानांमध्ये मिळणारे पामतेलही ठेवण्यात येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी बाजारातून अन्नधान्य विकत घ्यावे लागते. शासकीय धोरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे रेशन दुकानांतून गरिबांना दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या संख्येत घट झाली आहे. आता रेशन दुकानांत केवळ गहू, तांदूळ, साखरेचे वितरण केले जाते, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून बीपीएल कार्डधारकांची साखरही बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेतून तीन रुपये किलो दराने तांदूळ व दोन रुपये किलो दराने गहू देण्यात येत असल्यामुळे दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

उपलब्ध करून दिल्यास वाटप करू

काही वर्षांपूर्वी सणासुदीत रेशनकार्डधारकांना देण्यात येत असलेले रवा, मैदा, डालडा, पामतेल आदी वस्तू शासनाने उपलब्ध करून दिल्या तर आम्ही त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यास तयार आहोत.

डी. एन. पाटील,

राज्य संघटना अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार महासंघ

बीपीएलधारकांची साखर बंद

जून महिन्यापासून जिल्ह्यातील बीपीएल कार्डधारकांना रेशन दुकानांमधुन साखर देणे बंद करण्यात आले असून केवळ बीपीएलमधील अंत्योदयकार्डधारकांना साखर देण्यात येत आहे. यामुळे उर्वरित बीपीएलकार्डधारकांना बाजारातून साखर खरेदी करावी लागत आहे.

बीपीएल कार्डधारकांची संख्या

तालुका………………………… कार्डधारक

औरंगाबाद………………………..५२३८७

औरंगाबाद ग्रामीण…………………..९२८७

फुलंब्री…………………………….७२६३

पैठण………………………………२०५५३

सिल्लोड…………………………….१६९६१

कन्नड…………………………………२५९४७

सोयगाव……………………………….४५८२

वैजापूर………………………………..१८६१५

गंगापूर…………………………………२०२९५

खुलताबाद……………………………..१०४६

एकूण…………………………………१७६९३६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांची पदोन्नती रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ३१ प्राध्यापकांची पदोन्नती रखडली आहे. विद्यापीठ प्रशासनात सूसुत्रता नसल्यामुळे प्राध्यापकांचा रोष वाढला आहे, तर ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्किम’ (कॅस) शिबिर झाल्यास विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील २०० प्राध्यापकांची पदोन्नती होऊ शकते, मात्र प्राध्यापक संघटनांचा रेटा वाढूनही पदोन्नतीचे प्रश्न सुटलेले नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय दिरंगाईचा फटका प्राध्यापकांना सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यानंतर आता प्राध्यापक विद्यापीठ प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहेत. मागील एका वर्षापासून ३१ प्राध्यापकांची पदोन्नती रखडली आहे. या प्रकारामुळे इतर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापकांची नियुक्ती होते. ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्किम’ (कॅस) प्रक्रिया राबवून पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होते. सध्या प्रक्रिया रखडल्यामुळे महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी संबंधित ‘कॅस’ प्रक्रियेचे तातडीने आयोजन केले होते. मागील वर्षीपासून ‘कॅस’ लांबणीवर पडल्यामुळे पदोन्नती पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासन दप्तर दिरंगाई करीत असल्यामुळे प्राध्यापकांच्या ‘बामुक्टा’ संघटनेने १३ ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ‘कॅस’च्या मुद्यावर चर्चा करून कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन देण्यात येणार आहे. ‘कॅस’अभावी रखडलेल्या पदोन्नती तातडीने करण्यासाठी संघटना आग्रही आहे. ‘कॅस’ प्रक्रिया राबवण्यासाठी घटनात्मक समिती असते. कुलगुरूंचा प्रतिनिधी, प्राचार्य, दोन तज्ज्ञ आणि इतर सदस्य अशी समिती पदोन्नतीचा निर्णय घेत असते. समिती तयार करून प्रक्रिया राबवण्याचा मुद्दा अधांतरी आहे.

कार्यक्षेत्रात प्रभाव
विद्यापीठाशी संलग्न औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २०० प्राध्यापकांची ‘कॅस’च्या माध्यमातून पदोन्नती होऊ शकते. याबाबत ‘बामुक्टा’ने कुलगुरूंना निवेदन देऊन जिल्हानिहाय ‘कॅस’ शिबिर घेण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात वेळापत्रक निश्चित झाले नाही. विद्यापीठ प्रशासन आणि सहसंचालक कार्यालयाने दिरंगाई टाळून लवकर पदोन्नतीचे काम करावे अशी मागणी संघटनांनी केली आहे.

मे महिन्यापासून विद्यापीठ प्रशासनाला तीन वेळेस ‘कॅस’ घेण्याबाबत निवेदन दिले. मात्र, अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे प्राध्यापक अडचणीत आहेत. पदोन्नती रखडल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.
- डॉ. राजेश करपे, नेते, ‘बामुक्टा’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केंद्रातील मोदी सरकार फक्त पैसे जमवणारे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
‘मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, सिंचनाचे प्रश्न सोडवू, अशा भुलथापा देऊन सत्तेत आलेले मोदी सरकार केवळ पैसे जमा करणारे सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे जगणे कठीण केले आहे,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर तोफ डागली.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा असा हमी भव जाहीर करा, शासनाने कृषी माल खरेदी करावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी वैजापूर येथे डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून एल्गार मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर आमदार चिकटगावकर यांनी तहसीलदार सुमन मोरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले, अभय पाटील चिकटगावकर, अजय पाटील चिकटगावकर, खरेदी विक्री संघाचे संचालक मंजाहरी गाढे, भागिनाथ मगर, रामचंद्र शेळके यांची उपस्थिती. यावेळी चिकटगावकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिकेचे आसूड ओढले.

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे

कर्जमाफीचे श्रेय घेण्यावरून सरकारमधील मित्रपक्ष भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेने आता कर्जमाफीला विरोध केला आहे. मग शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही याचा जाब कुणीतरी शिवसेनेला विचारला पाहिजे, असे आमदार चिकटगावकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरमधून ऑइल चोरी; टँकरचालकावर गुन्हा

$
0
0

वाळूज महानगरः वाळूज एमआयडीसीमधील इंन्ड्युरन्स टेकनॉलॉजीस लिमिटेड या कंपनीत १८ हजार लिटर आॅइल घेऊन आलेल्या टँकरमधील १७२५ लिटर आॅइल परस्पर विकल्याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंड्युरन्स कंपनीमध्ये शॉकअप्स तयार केले जातात. त्यासाठी इंडियन आॅइल कॉर्पोरेशनकडून शाईनी शिंपी अ­ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. मुंबई यांच्यामार्फत १८ हजार लिटर आॅइल मागवण्यात आले होते. हे आॅइल घेऊन आलेले टँकर (एम एच ०१ जी सी ७८८३) कंपनीत आले. त्यानंतर मोजमाप केले असता आॅइल कमी असल्याचे आढळून आले. त्याबाबत चालकाकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे कंपनी व्यवस्थापकाने टँकरचालकाविरुद्ध एक लाख ८२ हजार ८५० रुपयांचे १७२५ लिटर आॅइल चोरी केल्याची तक्रार वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीनुसार,टँकरचालक अतुलकुमार राम व अशोज सरोज या दोघांविरुद्ध टँकरमधून आॅइल चोरी करून परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images