Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा

$
0
0


वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा

वन्यजींव अभ्यासक यार्दी यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केवळ पोस्टरवर जनजागृती करून उपयोग नाही तर प्रत्यक्ष कृती करत वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी जनजागृती झाली पाहिजे. हवा, प्रदूषण व मानवी अतिक्रमणांनी वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे तो कसा अबाधित राहील यासाठी, अधिक प्रभावी प्रयत्नाची गरज आहे, असे मत वन्यजींव अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी व्यक्त केले.
वन्यजींवाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, यासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी १ ते ७ ऑक्टोबर या कालवधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यानिमित्त ते मटाशी बोलत होते.
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट स्थिती धारण करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळेच वन्यजीवांचा अधिवास कसा संरक्षित राहील, तेथील अन्नसाखळी कशी कायम राहील, मानवी हस्तक्षेप कसा टाळता येईल, यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत, असे यार्दी यांनी सांगितले. प्रदूषण व मानवी अतिक्रमणांनी वन्यजीवांचा अधिवास संपुष्टात येण्याची भीती निर्माण होत आहे. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. केवळ पोस्टर लाऊन जनजागृती शक्य नाही तर त्याचबरोबर अधिक प्रभावीपणे प्रत्यक्ष जनजागृती कशी होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत. वन्यजीवांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिक्षण व जनजागृती हाच वन्यजीव अधिवास टिकवण्याचा खरा उपाय आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीतील दुरस्वस्था; चौकशी समिती अवाक्

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
घाटी हॉस्पिटलच्या शहरातील प्रशिक्षण केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या तीन सदस्यीय चौकशी समितीच्या सदस्यानी हॉस्पिलटलची अवस्था पाहून अक्षरशः तोंडात बोट घातले. यावेळी शहरातील नागरिकांनी पथकासमोर समस्यांचा पाढा वाचला व केंद्राचे प्रपाठक भारत चव्हाण यांच्या बदलीची मागणी केली.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय शिक्षण महविद्यालयाचे पैठण येथे ३० ग्रामीण प्रशिक्षण केंद्रे २५ वर्षांपासून कार्यरत आहे. काही महिन्यांपसून येथील दुरावस्थेबद्दल अनेक नागरीकानी तक्रारी केल्या. त्याची दखल घेतल अधिष्ठातांनी मुख्य प्राध्यपक डॉ. मोहन डोईबळे, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. बीना कुरी व सहाय्यक प्राध्यपक डॉ. विनोद मुंदडा यांची चौकशी समितीची नियुक्त केली आहे. या समितीने शुक्रवारी आरोग्य प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली.
यावेळी ड्रेसिंग रूमची झालेली दुरावस्था, क्ष किरण विभागात धूळ खात पडलेली यंत्रे, शौचालयाची अत्यंत गंभीर परिस्थिती, बंद पडलेले पंखे व विजेची उपकरणे, जागोजागी पडलेला भंगार सहित्याचा ढीग, रुग्णांसाठी पाणी उपलब्ध नसणे, हॉस्पिटल परिसरात वाढलेली काटेरी झुडपे पाहून त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
चौकशी समितीने नागरिकांच्या तक्रारी एकूण घेतल्या. डॉक्टर ड्युटीच्या वेळी उपस्थित राहत नाही, नेहमी औषधांचा तुटवडा असतो, डॉक्टर त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेण्यासाठी रुग्णावर दबाव आणतात, कर्मचारी व डॉक्टर रुग्ण व नातेवाईकांना वाईट वागणूक देतात, आदी तक्रारी नागरिकांनी केल्या.
नागरिकांच्या तक्रारी व केंद्राची दुरावस्था याचा अहवाल अधिष्ठाता यांच्याकडे सादर करणार आहोत. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन समिती सदस्यांनी नागरिकांना दिले.

रुग्णालयाची मागणी

शहरातील शासकीय रुग्णालय शंभर खाटाचे करावे ही पैठणकरांची तीस वर्षांपासूनची मागणी असून वैद्यकीय शिक्षण विभागाने २००२ मध्ये दहाव्या पंचवार्षिक योजनेत याचा समावेश केला व विधानसभेत तसे आश्वासन दिले आहे. याला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. मात्र, आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने शंभर खाटांचे रुग्णालय रखडले आहे. यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी नगराध्यक्ष सूरज लोळगे, दिनेश पारिख, बंडेराव जोशी यांच्यासह नागरिकांनी याप्रसंगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण संस्थेला २५ लाख ‘कॉस्ट’

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
विद्यापीठाची संलग्नता मिळालेली नसताना बॅचलर ऑफ डिझाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थिनींना प्रवेश देऊन आणि त्यांची परीक्षा घेऊन शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी भगवान शिक्षण प्रसारक मंडळ आणि ब्यू मोंडे कॉलेज ऑफ होम सायन्स यांना २५ लाख रुपये कॉस्ट म्हणून सहा आठवड्यात जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले. या रकमेतून याचिकाकर्त्या विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाईपोटी देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

याप्रकरणी समिधा उमेश राठी, प्रियांका तांबट, अर्चना पाझडे, सायली चौधरी, आरती गुंजाळ, वैष्णवी मंधाने, आकांक्षा मिश्रा, साची देशमुख, श्वेता गायकवाड आणि नम्रता उघडे या दहा विद्यार्थिनींनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ब्यू मोंडे कॉलेज ऑफ होम सायन्सने १२ विद्यार्थिनींना बॅचलर ऑफ डिझाइन या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी २०१५-१६मध्ये प्रवेश दिला. प्रवेश शुल्कासह इतर शुल्क मिळून प्रत्येक विद्यार्थिनींकडून ६५ हजार रुपये घेण्यात आले. त्यांची प्रथम सत्राची परीक्षा सप्टेंबर २०१५ आणि द्वितीय सत्राची परीक्षा मार्च २०१६मध्ये घेण्यात आली, मात्र त्यांचे निकाल लावण्यात आले नाही. या विद्यार्थिनींना दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येऊन तिसऱ्या सत्राचीही परीक्षा घेण्यात आली, परंतु कोणत्याही परीक्षेचा निकाल लावण्यातच आला नाही आणि चौथ्या सत्राची परीक्षाच घेण्यात आली नाही.

या सर्व प्रकारामुळे शंका येऊन दहा विद्यार्थिनींनी खंडपीठात धाव घेतली . मार्च १६च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात यावा, चौथ्या सत्राची परीक्षा घेण्यात यावी आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली.

संलग्नता आणि अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी २०१४मध्ये प्रस्ताव व शुल्क पाठविले होते. विद्यापीठाच्या तोंडी मान्यतेनेच प्रवेश देण्यात आले होते. विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आले त्या वेळी संस्थेला ‘एसएनडीटी’ने संलग्नता दिलेली नव्हती, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. त्यांनी २०१७मध्ये संलग्नता दिलेली असून, प्रथम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, मात्र ही परीक्षा मार्च २०१७मध्ये घेतल्याचे दाखविले होते. याचिकाकर्त्याची बाजू पवन लखोटिया यांनी मांडली.

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
- याचिकाकर्त्या विद्यार्थिनींना प्रत्येकी २ लाख रुपये नुकसान भरपाई
- संस्था आणि महाविद्यालयाने आता किंवा भविष्यात कोणत्याही माध्यमातून ही नुकसान भरपाईची रक्कम विद्यार्थिनींकडून वसूल करू नये
- विद्यार्थिनींची इच्छा असेल तर त्यांना अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात यावा,
- शासन, एसएनडीटी महिला विद्यापीठाने संस्था आणि महाविद्यालयाविरुद्ध तीन महिन्यांत योग्य ती कारवाई करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसबीआयचे एटीएम वापरताय? द्या इकडे लक्ष

$
0
0

एसबीआयचे एटीएम वापरताय? द्या इकडे लक्ष

नवे नियम जारी; मिनिमम बॅलन्सच्या दंडाच्या रक्कमेतही घट; ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जर तुम्ही एसबीआयचे खातेदार असाल तर तुम्हाला एक ऑक्टोबरपासून एसबीआयने लागू केलेल्या नवीन नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. बँक खाते व एटीएमसंबंधी बँकेने नवे नियम तयार केले आहेत. याशिवाय मिनीमम बॅलन्सपेक्षा कमी रक्कम खात्यात असेल तर दंडाची जी रक्कम असेल त्यातही बदल करण्यात आला आहे.

एटीएमसंबंधीचे नियम

एसबीआयने आता आपल्या खातेदारांना महिन्यातून ८ वेळा आपली रक्कम काढण्याची सूट दिली आहे. यात ५ वेळा ग्राहक एसबीआयच्याच एटीएममधून पैसे काढू शकतो आणि ३ वेळा एसबीआय व्यतिरिक्त असलेल्या एटीएममधून पैसे काढू शकतो.

आठ वेळा पेक्षा अधिक वेळा खात्यातून एटीएमने रक्कम काढली तर २० रुपये सेवाशुल्क आणि १८ टक्के जीएसटीही द्यावा लागणार आहे. हा जीएसटीचा नियम तर सर्वच बँकांनीही लागू केला आहे. जर तुमच्या खात्यात बॅलन्स कमी आहे आणि त्यामुळे एटीएममधून पैसे काढू शकला नाहीत, तरीही तुम्हाला २० रुपये आणि जीएसटी कर द्यावाच लागणार आहे.

एसबीआयचे बेसिक सेव्हिंग्ज बँक खातेदार जे आहेत त्यांना तर महिन्यातून फक्त ४ वेळाच पैसे काढण्याची सूट दिली गेली आहे. यापेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर ग्राहकाला ५० रुपये आणि सोबत जीएसटीही द्यावा लागेल. जर एसबीआय शाखेच्या एटीएममधूनच पैसे काढले तर २० रुपये द्यावे लागतील, पण एसबीआय व्यतिरिक्त असलेल्या इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढले तर १० रुपये व जीएएसटीही द्यावा लागेल.

मिनिमम बॅलन्स विषयी

‘स्टेट बँक ऑफ इंडियात आता खाते ठेवायचे की नाही’ हा रागाच्या भरात विचार करत असाल तर थोडे थांबा, खाते ठेवा फक्त या नियमांकडे पाहून मग थंड डोक्याने कृती करा असेच म्हणायची वेळ आली आहे. एसबीआयने जरा ग्राहकांना दिलासा दिला आहे.

मिनिमम बॅलन्स ठेवण्यासंबंधी एसबीआयने सूट दिली आहे. दरम्यान, ही सूट देताना ग्राहकांची ४ वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केली आहे. मेट्रो सिटी, अर्बन सिटी, सेमी अर्बन आणि रुरल असे हे चार विभाग आहेत. मेट्रो सिटीत असलेल्या खातेदारांना यापुढे ५ हजारांऐवजी ३ हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे. शहरी भागातील (अर्बन सिटीतील) ग्राहकांना ३ हजार, नीमशहरी भागातील (सबअर्बन सिटीतील) ग्राहकांना २ हजार, ग्रामीण भागातील (रूरल भागात) असलेल्या ग्राहकांना खात्यात कमीत कमी १ हजार रुपये ठेवणे आता बंधनकारक असणार आहे.

या खातेदारांना सूट

पेन्शनर्स, सरकारी योजनांच्या लाभासाठी काढण्यात आलेली बँक खाती यांना मिनिमम बॅलन्सच्या नियमांतून संपूर्णपणे वगळण्यात आले आहे. एसबीआयच्या सूत्रांनुसार यामुळे तब्बल देशभरात ५ कोटी खातेदारांना लाभ होणार आहे.

दंडाच्या रक्कमेतही कपात

मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आकारला जातो तो यापुढेही आकारला जाणार असला तरी दंडाची रक्कम कमी करून एसबीआयने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आधी मेट्रो सिटीजमधील खातेदारांकडून तब्बल ५० ते १०० रुपये जीएसटीसह वसूल करण्याचा निर्णय झाला होता. आता फक्त ३० ते ५० रुपये व जीएसटी घेण्यात येणार आहे. दंडाची रक्कम कपात करण्यात आली आहे. शहरी (अर्बन) खातेदारांची दंडाची रक्कम देखील ४० ते ८० वरून ३० ते ५० करण्यात आली आहे. सेमी अर्बन आणि रूरल खातेदारांसाठी तोच दंड २० - ४० रुपयांपर्यंत घटविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिला गावचा भूगोल

$
0
0

औरंगाबाद ः पुस्तक लिहा किंवा वाचा. ते तुम्हाला आतून समृद्ध करतेच. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा लळा लावणे अती अवघड. उषा गाडे-इंगळे यांनी हे काम तर केलेच, सोबतच त्याही पुढे जाऊन त्यांनी चौथीच्या विद्यार्थ्यांना गावचा भूगोल लिहण्यासाठी प्रेरित केले. बघता-बघता हे पुस्तक आकाराला आले. विशेष म्हणजे जवळगा बेट (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद शाळेत हा आगळा-वेगळा प्रयोग झाला.

जिल्हा परिषद शाळेचे नाव काढले की अनेक ठिकाणी पालक नाक मुरडतात, याला अपवाद जवळगा बेट येथील शाळा ठरली आहे. इथे होणारे नाना शैक्षणिक प्रयोग विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे ठरले आहेत. उषा गाडे-इंगळे यांनीही विद्यार्थ्यांना तेच-तेच शिक्षण देण्यापेक्षा त्यांना वर्गाबाहेर काढले.

प्रत्यक्ष क्षेत्रभेटी करून गावचा भूगोल तयार केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प सुरू होता. आपल्याच गावांबद्दल शास्त्रीय पद्धतीने माहिती घेताना विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. जगाचा किंवा एखाद्या भूप्रदेशाचा भूगोल कसा तयार केला जातो, हेही विद्यार्थ्यांना समजून घेता आले. या प्रयत्नातून ‘माझ्या गावचा भूगोल’ हे पुस्तक साकारले. विद्यार्थी व शिक्षिका उषा गाडे - इंगळे यांच्या हस्तेच शाळेतच या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या भूगोलामध्ये गावच्या चतु:सीमा, क्षेत्रफळ, दळणवळण, प्राकृतिक विभाग, मातीचे प्रकार, खडकांचे प्रकार, जलस्रोत, वनस्पती, प्राणी, घरांची रचना, जलसिंचन, आरोग्य व शिक्षण, पीक पद्धत, शेतीपूरक व्यवसाय, बाजारहाट, आहार, पोशाख-दागिणे, सण-उत्सव, प्रार्थनास्थळे, संदेशवहन, भाषा, शासकीय योजना, शेती कसण्याच्या पद्धती आदी बाबतीत सविस्तर माहिती लिहिण्यात आली आहे. चौथीच्या या छोट्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन हा भूगोल तयार केला आहे. या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी व मुख्याध्यापक अशोक साखरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रश्नावलीतून माहिती संकलन
‘विद्यार्थ्यांना आपल्याच गावाबद्दल फारशी माहिती नसते. ती माहिती व्हावी आणि भूगोल हा विषय त्यांना कळावा व भूगोल विषय आवडावा यासाठी हा उपक्रम घेतला. विशिष्ट प्रश्नावली तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती गोळा करायला दिशा मिळाली. गटांनी काम वाटून दिल्याने प्रकल्प लवकर पूर्ण झाला. विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने हा भूगोल तयार केला आहे. आता विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास हा विषय खूप आवडू लागला आहे,’ अशी माहिती शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद तालुक्यात चार केंद्र संवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान घेण्यात येत आहे. त्यापैकी गोलटगाव, लाडसावंगी, गांधेली आणि रहाळपट्टी तांडा या चार ग्रामपंचायतींचे मतदानकेंद्र संवेदन‌शील असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांनी दिली.
मतदान प्रक्रियेसाठी शुक्रवारी ८४० कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रांवर रवाना झाले. तालुक्यातील ११४ मतदान केंद्रांसाठी १२८ कंट्रोल युनिट (सीयू) आणि २१० बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता राहणार आहे. तालुक्यात १७ निवडणूक निर्णय अधिकारी, तर प्रत्येक मतदान केंद्रांवर चार ते पाच निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह शिपाई व पोलिस कर्मचारीही प्रत्येक मतदान केंद्रांवर तैनात राहणार आहेत. वाहतुकीसाठी १३ बस, तर १६ जीपची व्यवस्था करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आचारसंहिता पथक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवानंद बिडवे, डी. एम. देशपांडे, सारिका कदम, दत्ता निलावाड, रावसाहेब जरे, सुरे आदी काम पाहत आहेत.

१२ वाजेपर्यंत निकाल

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी १६ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर एका ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार असून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात येतील, असे तहसीलदार सतीश सोनी यांनी सांगितले.

लोडशेडिंगबद्दल सूचना

शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी एक दिवस आगोदर मतदान केंद्रांवर पोचलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना लोडशेडिंगचा फटका बसला. या संदर्भात तहसीलदार सोनी यांना विचारले असता ते म्हणाले की, मतदान असलेल्या गावात लोडशेडिंग रद्द करण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकीय अभ्यासक्रम सुरू करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सॅण्डविच अभ्यासक्रमांमुळे उद्योगात आपण केवळ कामच करू शकत नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवे काही घडवू शकतो. विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणारा अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावा,’ असे प्रतिपादन उद्योजिका मोहिनी केळकर यांनी केले. उद्योग परिषदेत त्या बोलत होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या वतीने शुक्रवारी क्रिएशन ऑफ कॉर्पोरेट चॅम्पियन उद्योग परिषद घेण्यात आली. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे, आयक्वॅकटचे डॉ. महेंद्र शिरसाठ, उद्योजक एस. मुजुमदार, व्ही. व्ही. राखुंडे, विवेक सोमाणी, रवींद्र वायभासे, राजेश जवळेकर, प्रताप धोपटे, योगित नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजिका मोहिनी केळकर यांनी परिषदेत विशेष भाष्य केले. ‘भारत तंत्रज्ञाननिपुण होण्याची गरज आहे. सध्याच्या तंत्रज्ञानावर समाधान न मानता पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. विद्यार्थी तांत्रिकद्दृष्ट्या सक्षम असावा आणि उद्योग व शिक्षण प्रणाली यातील दरी कमी व्हावी,’ असे केळकर म्हणाल्या.

यावेळी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र झाले. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी प्रास्ताविकात विभागाच्या वाटचालीसह परिषदेचा उद्देश सांगितला. या परिषदेला विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योजक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ भारनियमनाचे तोडफोडीतून उट्टे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भारनियमन बंद करण्याची मागणी करत शुक्रवारी ‘एमआयएम’ने मिलकॉर्नर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, त्यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पलायन केल्याने आंदोलकांनी मुख्य अभियंत्याच्या केबिनसह कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्यासह महिला सुरक्षारक्षक व एक कार्यकर्ता जखमी झाला.

शहरातील विविध भागात नऊ तासांचे भारनियमन करण्यात आले आहे. यामध्ये मुस्लिम बहुल भागाचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हे भारनियमन कमी करावे, या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने आज दुपारी महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफार कादरी तसेच इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत हजारो लोकांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी गेटवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिष्टमंडळ मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांना भेटण्यासाठी गेले, मात्र त्यापूर्वीच गणेशकर निघून गेले होते. वरिष्ठ अधिकारी नसल्याने आमदार जलील चांगलेच संतापले. दरम्यान गेटवर जमा असलेल्या जमावाला अधिकारी निघून गेल्याचे समजल्याने जमाव संतप्त झाला. कंपाउंड असलेल्या लोखंडी जाळ्या तोडत त्यांनी गेटवरून आत शिरकाव केला. यावेळी गेटवर असलेला पोलिस बंदोबस्त तोकडा पडला. आत शिरलेल्या जमावाने परिसरातील फलक काढून फेकले. खिडक्यांच्या काचावर दगडफेक करीत काचा फोडल्या. महावितरण कार्यालयाच्या परिसरात देखील जमावाने धुडगूस घालत काचा, फोनची तोडफोड केली. दरम्यान मुख्य अभियंत्याच्या केबिनमध्ये दोन एसी चालू असल्याचे दिसल्याने कार्यकर्त्यांनी तेथील एसी काढून फेकले. त्यांच्या टेबलाची काच देखील फोडली. जमाव हिंसक झाल्याचे कळताच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, एसीपी कोळेकर, पोलिस निरीक्षक हेमंत कदम, श्रीपाद परोपकारी, अनिल आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शीघ्र कृती दल पथकाने देखील घटनास्थळ गाठले. जमावाची समजूत काढण्यात आली. दरम्यान, या तोडफोडीप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटीचौक पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

...अन् बकोरिया आले
आमदार इम्तियाज जलील यांनी महावितरणचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना मोबाइल लावत नाराजी व्यक्त केली. बकोरिया यांनी तातडीने महावितरण कार्यालय गाठले. यावेळी जलील, डॉ. कादरी यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत कार्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई तसेच भारनियनमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी बकोरीया यांनी या संदर्भात वरती कळवण्याचे आश्वासन दिले.

पवननगरवासीय आक्रमक
भारनियमनामुळे संतप्त झालेल्या पवननगरातील नागरिकांनी राज्य विद्युत कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. नगरसेवक नितीन चित्ते यांच्या नेतृत्त्वाखाली पवननगरच्या नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन भारनियमनाविषयी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पवननगर अंतर्गत शिवनेरी फिडरवर पवननगर, संत ज्ञानेश्वरनगर व शिवाजीनगर हे भाग येतात. या भागात सध्या सकाळी व सायंकाळी नियमित भारनियमन करण्यात येत आहे. या भागातील नागरिक विद्युत देयके भरण्याची सरासरी ९५ टक्के असूनही भारनियमनाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. बिले भरूनही भारनियन होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्ते यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक शिवाजी दांडगे, राहुल खरात, शोभा वळसे, महेश माळवतकर, पुष्पा रोजतकर, प्रशांत देसरडा, रवी राजपूत, गणेश नावंदर, विजय देशपांडे, गोडबोले, भगवान वळसे, नितीन खरात, घायाळ आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ व्यापारात संयम, श्रद्धा आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फक्त बोलू नका. कृती करा. धडाडी दाखवा. सोबतच संयमाने आणि श्रद्धेने व्यवसाय, उद्योग करा यश तुमचेच आहे,’ असे मत ठाणे येथील उद्योज‌िका डॉ. नम्रता देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केले. त्या रयत ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आयोजित शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळातर्फे आयोजित महाएक्स्पोतील व्याख्यानात बोलत होत्या.

देशमुख म्हणाल्या, ‘आजकाल उद्योग, व्यवसाय फार चलाखीने आणि विकासात्मक नियोजनपूर्वक करावा लागतो. आपण यासाठी पाश्चिमात्य देशातील विचारवंतांचे ऐकतो, पण ते ऐकण्यापेक्षा आपल्याकडील विचारवंतांचे विचार ऐका. पुस्तके वाचा, भगवदगीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. यातून भरपूर काही सिक्रेटस आपल्याला सहज उपलब्ध होतील. कोणताही व्यवसाय-उद्योग श्रद्धेने होतोच. त्याला जोड संयमाची, नियोजनाची दिली, तर त्याला आकार प्राप्त होऊ शकतो. उगीच आततायीपणा करण्यात काहीच अर्थ नाही, पण असेही नाही, मी फक्त नियोजनच करत बसलोय, अंमलबजावणी झालीच नाही, असे नको व्हायला. सर्वसमावेशकता आली की नक्कीच माणूस विचार करायला लागतो. यामुळेच आधी अध्यात्माची जोड देत प्रामाणिकपणे व्यवसाय करा, कष्ट करा, मेहनत करा,’ असे त्यांनी सांगितले. महाएक्स्पो आणि व्याख्यानाच्या नियोजनासाठी नीता देशमुख, पुष्पा काळे, वृषाली देशमुख, रंजना देशमुख, राम पवार, नीलेश काकडे, ज्ञानेश्वर सुरासे हे आयोजक समस्त शिवाई-एमबीएन सदस्य परिश्रम घेत आहेत.

आज समारोप
राज्यस्तरीय उद्योग महाप्रदर्शनाचा शनिवारी समारोप होत आहे. शहानूरमिया दर्गा जवळील श्री हरी पॅव्हेलियन येथे हा महाएक्स्पो भरला असून उद्या व्याख्यानाच्या अंतिम सत्रात सकाळी ११ वाजता उदयोजक मनोज कदम यांचे ‘यशस्वी उद्योजक बनण्याची गुरुकिल्ली’ यावर आणि त्यानंतर ‘भारतीय व्यवसायाला असलेल्या आंतरराष्ट्रीय संधी’ यावर इश्वेद बायोटेकचे सीईओ संजय वायाळ पाटील यांचे व्याख्यान होईल. दुपारी ४ वाजता विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कर्मचाऱ्यांची दिवाळी साडेतीन हजारांनी गोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळी सणाच्या निमित्याने महापालिका कर्मचाऱ्यांना महापौर भगवान घडमोडे यांनी शुक्रवारी प्रत्येकी साडेतीन हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात नऊशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिवाळी सणासाठी बोनस जाहीर करा, अग्रीम रक्कम द्या या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध कर्मचारी संघटनांनी महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. भाजप प्रणित बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या मेळाव्यातही बोनस, सानुग्रह अनुदान, अग्रीम रक्कम यासह अन्यही मागण्या करण्यात आल्या होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी महापौरांना क्रांतिकारी निर्णय घ्या असे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी महापौर भगवान घडमोडे यांनी सर्व पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांच्याशी चर्चा करून सानुग्रह अनुदानाबद्दल निर्णय जाहीर केला. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम रक्कम म्हणून दिली जाईल. अग्रीमसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ९३५ आहे. २,७१५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. गतवर्षी २,४१९ रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. अग्रीम रक्कम, सानुग्रह अनुदान व दिवाळी भेट या सर्वांवर मिळून सुमारे एक कोटी ९६ लाख रुपये खर्च होतील. शनिवारी अग्रीम रकमेचे वाटप केले जाणार असून, सोमवारपासून सानुग्रह अनुदान दिवाळी भेटचे वाटप कर्मचाऱ्यांना केले जाईल, असे लेखा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

शिक्षिकांना २८०० रुपये
महापालिकेतील वर्ग - ३ व वर्ग - ४ चे कर्मचारी, शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या बालवाडी शिक्षिका, सातारा - देवळाई येथील कर्मचारी या सर्वांना प्रत्येकी २८०० रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे. ३२५ कर्मचारी यासाठी पात्र आहेत. आरोग्य विभागातील लिंक वर्कर्स, पर्यवेक्षक, तासिका तत्वावरील शिक्षक यांना प्रत्येकी ११०० रुपयांऐवजी १५०० रुपये दिवाळी भेट दिली जाणार आहे. ५४ जणांना त्याचा लाभ मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जाहीर करूनही मदत न दिल्याने नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
सर्वसाधारण सभेत ठरावाप्रमाणे हर्सूल तलावात बुडालेल्या मृत मुलांच्या कुटुंबांना अद्याप मदत मिळाली नसल्याने पालकांनी कार्टात धाव घेतली आहे. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिकेद्वारे दाद मागितली असता न्या. संजय गंगापूरवाला व न्या. मंगेश एस. पाटील यांनी पालिका आयुक्तांना नोटीस बजावली.

दहावीच्या परीक्षेचा शीण घालविण्यासाठी हर्सूल तलावात पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा ७ एप्रिल २०१४ रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सय्यद जुनेद कादरी सय्यद फैजोद्दिन कादरी जहागीरदार (वय १५), सय्यद जबियोद्दिन कादरी सय्यद युसूफ कादरी जहागीरदार (वय १६, दोघे रा. बुढीलेन), ओसामा जमिरोद्दिन शेख (वय १७, रा. रोहिला गल्ली) व सय्यद मुस्तकीम सय्यद सलीम (वय १७, रा. रहिमनगर, अल्तमश कॉलनी), अशी या चार मुलांची नावे आहेत.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुलांच्या कुुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. पण नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याने सय्यद फैजुद्दीन व इतरांनी गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. या कुटुंबांना तीन महिन्यात मदत देण्याचा आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतरही मदत न दिल्याने पालकांनी अवमान याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने पालिका आयुक्तांना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांची बाजू रमीज मकसूद शेख यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सेनेचा ‘मित्रा’वर बाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून शिवसेनेने मित्रपक्ष भारतीय जनता पक्षावर कुरघोडीचा बाण सोडला आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी करणाऱ्या भाजपच्या कोर्टात महापालिकेतील युतीचा चेंडू येवून पडला आहे.

महापालिकेत शिवसेना - भाजपमध्ये युतीचा लेखी करार झालेला आहे. या करारानुसार पुढील अडीच वर्षांचे महापौरपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. पुढील अडीच वर्षांसाठीचे महापौरपद ओबीसींसाठी राखीव आहे. त्यामुळे शिवसेना या पदावर कोणत्या नगरसेवकाची वर्णी लावणार याबद्दल पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता होती. शिवसेनेच्या २८ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक ओबीसी प्रवर्गाचे आहेत. त्यामुळे शिवसेना नवख्यांना संधी देणार की अनुभवी नगरसेवकांना महापौरपदावर विराजमान करणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे नाव महापौरपदासाठी जाहीर केले. महापौरपदाची निवडणूक २९ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सुमारे पंधरा दिवस अगोदर उमेदवार जाहीर करून भाजपची कोंडी केल्याचे बोलले जात आहे. केवळ महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून शिवसेनेने आम्ही युतीसाठी अनुकूल आहोत, हे स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे भाजपमधील काही घटक महापौरपदाची निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहेत. महापौरपदावर कब्जा करून पुढील अडीच वर्ष शिवसेनेला झुलवत ठेवण्याची त्यांची रणनीती असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला असला, तरी आगामी काही दिवसात भाजपची काय खेळी असेल, याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या गटातील पदाधिकारी स्वतंत्रपणे महापौरपदाची निवडणूक लढवावी या मताचे आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र त्याविरोधात आहेत. मुंबईत तडजोड करून महापौरपद मिळवणे सहज शक्य होते, पण युतीसाठी भाजपने मुंबईचे महापौरपद सोडले. औरंगाबादेतही भाजपची अशीच भूमिका असावी असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.

युतीच्या करारानुसार भाजपला महापौर व स्थायी समितीचे सभापतीपद आम्ही दिले आहे. आता महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप कराराचे पालन करेल असे वाटते. शनिवारी मी औरंगाबादेत आहे. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे. शिवसेनेचा महापौर होण्यात काही अडचण येईल असे वाटत नाही. - विनोद घोसाळकर, संपर्कप्रमुख, शिवसेना

‘महापौर निवडणुकीला बरेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी कोअर कमिटीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.’ - किशनचंद तनवाणी, शहर - जिल्हाध्यक्ष, भाजप

पालिकेतील पक्षीय बलाबल
- शिवसेना - २८
- भाजप - २३
- एमआयएम - २४
- काँग्रेस - ११
- बसप - ५
- राष्ट्रवादी काँग्रेस - ४
- रिपाइं (डेमॉक्रेटिक) - २
- अपक्ष - १७
- एकूण - ११४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्लॉट विक्रीत ३५ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्लॉट विक्रीमध्ये तिघांनी व्यापाऱ्याला ३५ लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. नऊ वर्षांपूर्वी हा वादग्रस्त प्लॉट व्यापाऱ्याला विकण्यात आला होता. या प्रकरणी तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश जगन्नाथ राणा (रा. विजयनगर, गारखेडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये दलाल संतोष काशीनाथ पावटेकर याने ३० ऑगस्ट २००८ रोजी घरी येऊन, सिटी सर्वे क्रमांक १२४८६ मधील प्लॉट क्रमांक ७५ विक्रीस असल्याचे सांगितले होते. राणा यांना विश्वासात घेऊन प्लॉट मालक सुधाकर गंगाधर उदावंत, सरलादेवी उदावंत व संतोश पावटेकर यांनी बनावट कागदपत्र दाखवत हा प्लॉट निर्विवाद असल्याचे भासवले. भरणा पावती बाँडवर करून देत या प्लॉटचे पस्तीस लाख रुपये राणा यांच्याकडून घेण्यात आले. नंतर मात्र राणा यांना प्लॉट वादग्रस्त असल्याचे समजले. उदावंत यांनी २०१६मध्ये देखील हाच प्लॉट डॉ. प्रशांत उदगिरे यांना विकल्याची माहिती राणा यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने राणा यांनी गुरुवारी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत आरोपी सुधाकर, सरलादेवी उदावंत तसेच दलाल संतोष पावटेकरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा मंत्री उद्यापासून नांदेडमध्ये तळ ठोकणार - दानवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
शुन्यातून विश्व निर्माण करणे हीच भाजपची स्टाइल आहे. निवडणूक काय असते हे आमच्या प्रतिस्पर्ध्यांना उद्यापासून समजेल. भाजपचे दहा मंत्री उद्यापासून नांदेडमध्ये तळ ठोकून असणार आहेत. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबाच भाजपला विजय मिळवून देईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ओम गार्डन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी व्यक्त केला.

माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी तयार केलेल्या नंदीग्रामचा नवसूत्री नव संकल्पनामा अर्थात भाजपचा निवडणूक जाहीरनामा पुस्तिकेचे प्रकाशन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रास्तविक केले. त्यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार अमर साबळे, कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित होते.
दानवे म्हणले, ‘सत्ता परिवर्तनाची लढाई नांदेडपासून सुरू होत आहे. राज्य व देशाची सत्ता घेऊनच ती थांबेल. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी संघर्ष यात्रा काढली होती ते जिथे-जिथे गेले तिथल्या मनपा आम्ही जिंकल्या आहेत. आता माझे पाय नांदेडला लागले आहेत. त्यामुळे येथेही आम्हीच जिंकू. आम्ही कायापालट संकल्प जाहीर केला आहे. मुखेडची पोटनिवडणूक आम्ही जिंकलो आहोत.
पालघर, मीरा भाईंदरसह १३ पालिका आमच्या ताब्यात आहेत. १० जिल्हा परिषदेत आमची सत्ता आहे. अकरा तारखेनंतर नांदेड मनपामध्येही आमचीच सत्ता येईल.’
भाजपने पक्षपातीपणा करीत नांदेडला स्मार्ट सिटी घोषीत केले नाही या आरोपाचा समाचार घेताना दानवे म्हणाले, ‘गुरु-त्ता-गद्दी’साठी मिळालेल्या निधीचा येथे गैरवापर केला. १९ नाले गोदावरीत सोडले. दीडशे कोटीचे कर्ज ठेवले. मनपाच्या मालमत्ता, मंगल कार्यालये बीओटी तत्वावर विकली. रस्ते खड्डेमय बनविले. अनेक स्मार्ट सिटीच्या निकषात नांदेड पालिका बसत नव्हती. २०१४ पर्यंत केंद्र राज्यात काँग्रेसची सत्ता असूनही यांना नांदेड आदर्श मनपा बनवता आली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी न होण्यासाठी काँग्रेस नेते व सदोष प्रस्तावच जबाबदार आहेत. भाजप सरकार नव्हे ! आमची सत्ता नसताना आम्ही पुण्याला स्मार्ट सिटी घोषित केले. कुठल्याही बाबतीत आमचे सरकार पक्षपात करीत नाही. भविष्यात मनपा आमच्या ताब्यात आली तर नांदेड स्मार्ट सीटी करण्यासाठी मी येथे येऊन मदत करीन. आमच्या पारदर्शक कारभाराची व विकास संकल्पनाची सर्वांना आस आहे. त्यामुळे येथे आम्हाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आज २० बूथ २५ युथ या संकल्पनेनुसार प्रत्येक प्रभागातून असलेल्या युवकांनी भाजपची सत्ता आणायचा निर्धार केला आहे.’
तुमची लढाई कोणाशी आहे काँग्रेसशी की मित्रपक्ष शिवसेनेशी असे विचारले असता जो समोर येईल त्याच्यासोबत असे म्हणून ते गप्प झाले. आमची सत्ता आल्यावर आम्ही नांदेड मनपाची श्वेतपत्रिका काढू आणि भ्रष्टाचाऱ्याना शिक्षा देऊ असेही दानवे म्हणाले.


निष्ठावंत भाजप कार्यकर्ते वंचीत
या कार्यक्रमात नंदीग्रामचा नवसूत्री नवसंकल्पनामाच्या प्रती सर्व पत्रकारांना वाटल्या गेल्या पण जुने निष्ठावान भाजप कार्यकर्ते त्यापासून वंचीत राहिले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. धनाजीराव देशमुख यांनाही प्रत मिळाली नाही. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी डॉ. माधवराव किन्हाळकर यांना प्रत मागितली पण त्यांच्या जवळही एकच प्रत असल्याने त्यांनी नंतर पाठवतो असे धनाजीरावांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआरपी’मध्ये सर्व कर समाविष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एमआरपीमध्ये सर्व कर समाविष्ट असल्याने त्यावर जीएसटी शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे,’ अशी माहिती सहआयुक्त अशोक कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अशोक कुमार म्हणाले, ‘जीएसटी संदर्भात अन्य माहिती व शंकाचे निरसन करण्यासाठी ६ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मंथन जीएसटी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ग्राहक जागरुकता, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र आणि जीएसटी रिर्टन हे तीन विषय केंद्रीत करून त्यानुसार जनजागृती शिबिर, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले आहे. फळे आणि भाजीपाला या सारख्या अत्यावश्यक वस्तूवर जीएसटी नाही. एमआरपीमध्ये सर्व कर समाविष्ट असल्याने, एमआरपीवर आणि त्यापेक्षा जास्त जीएसटी शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. ब्रॅँडेड आणि पॅकबंद केलेल्या खाद्यपदार्थ भाजीपाला, फळे यांच्यावर ५ ते १२ टक्के जीएसटी लागू आहे. अॅनपॅक आणि विना ब्रँण्ड केलेल्या पदार्थावर जीएसटी नाही. दुकानदाराने विविध वस्तूंच्या जीएसटी पूर्वी आणि जीएसटीनंतर दरांमध्ये तुलनात्मक यादी दर्शविली पाहिजे. जर किमतीवर सूट दिली जात असल्यास सवलतीच्या रक्कम वगळता एकूण मूल्यावर जीएसटी शुल्क आकारले पाहिजे. कर बिलामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दर्शविण्यात आले पाहिजे. व्यापाऱ्यांचा नाहक छळ होणार नाही. यासाठी सरकार छापे टाकणार नाही,’ असे सांगायलाही अशोककुमार विसरले नाहीत. जीएसटी विभागाचे अधिकारी एस. बी. देशमुख, डी. आर. गुप्ता यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर कार्यालयात ग्राहक जागरुकता कार्यक्रम घेण्यात आला.

मराठवाड्यात जनजागरण
जालन्यात ९ तर नांदेड येथे १० ऑक्टोबर रोजी एमएसएमई या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेतील एन ५, सिडको येथील जीएसटी कार्यालयात जीएसटी कर रिर्टन भरणे या विषयावर कार्यशाळा होणार असून, याच विषयी लातूरमध्ये १३ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ आवड ओळखून क्षेत्र निवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आपण आपली आवड ओळखली पाहिजे. त्यानुसार करिअरचे क्षेत्र निवडले पाहिजे. हे क्षेत्र निवडताना कोण काय म्हणतो याचा फारसा विचार करून नका, पण आवडीनुसार करिअर करण्याचे मनात नक्की केल्यावर त्यासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करा,’ असे आवाहन चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करणारे वरूण अग्रवाल यांनी शुक्रवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘विग्ज - २०१७’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात औरंगाबादसह राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आठ ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे, मार्गदर्शन करणारे विविध उपक्रम या दरम्यान राबवले जाणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन प्रा. डॉ. एस. ए. पाटील व प्रा. डॉ. एम. जी. शेख यांनी केले आहे. शुक्रवारी ‘विग्ज - २०१७’ मध्ये वरूण अग्रवाल यांचे भाषण झाले.

अग्रवाल म्हणाले, ‘नवीन काही करताना सुरुवातीला अपयश येतेच. अपयशाने खचून न जाता अपयश पचवून यशाकडे झेप घ्या. काही वेळेस निराशेचे प्रसंग येतात, पण अशा प्रसंगांकडे जास्त लक्ष देऊ नका. आपले आयुष्य फार छोटे आहे. त्यामुळे छोट्या वेळेत चांगले काहीतरी करण्याचा संकल्प करा. प्रत्येक गोष्टीकडे आनंदीवृत्तीने पाहण्यात शिका. युवक हा देशाचा, समाजाचा कणा आहे. त्याने सक्षमपणे उभे राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवूनच काम केले पाहिजे. निर्णय घेतले पाहिजेत,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महागाई, भाववाढ व कर्जमाफी या मागण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
वाढलेले वीज भारनियमन व महागाई यामुळे जनता त्रस्त झाली असून भाजप शिवसेनेच्या राज्य व केंद्रातील सरकारच्या कारभाराचा राष्ट्रवादीने निषेध करीत सरकार विरोधी घोषणा दिल्या. सरकारचे धोरण हे शेतकरी व सामान्य जनतेच्या विरोधात असून यामुळे जगणे देखील मुश्किल झाल्याचा आरोप यावेळी आमदार पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी भवनपासून निघालेला हा मोर्चा सुरुवातीला महावितरणच्या कार्यालयावर गेला. यावेळी वाढत्या भारनियमनाच्या मुद्याकडे लक्ष देत भारनियमन रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर पाहता सामान्य लोकांना दुचाकी गाडी चालवणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे या आंदोलनात दुचाकी गाडीला प्रतिकात्मक स्वरूपात फाशी देऊन बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः बैलगाडी चालवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व धरणे आंदोलन केले.
शेतकऱ्यांचे संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करावी, बेभाव खरेदी होत होत असलेल्या मूग उडीद व सोयाबीनची हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे, आवश्यक नसताना तूर, हरभरा साखर व इतर शेतमाल आयात करून शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान करण्याचे धोरण सरकारने बंद करावे, नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी २०१६ च्या पिकांची झालेल्या नुकसानीपोटी २६० कोटी तातडीने द्यावे, जिल्ह्यात खरीप २०१७ च्या पिकाच्या नुकसानीपोटी देय पीक विम्याची अग्रीम रक्कम तातडीने देण्यात यावी, महसूल विभागाने उस्मानाबाद जिल्ह्याची दाखवलेली हंगामी पैसेवारी ६९ पैसे असून ती वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पैसेवारी जाहीर करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जीवनराव गोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड: वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात शनिवार घातवार ठरला जिल्ह्यातील धारूर आणि माजलगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा कहर झाला. यात वीज पडून धारूर मध्ये पाच ठार तर पाच जखमी झाले तर माजलगाव तालुक्यात एक महिला वीज पडून मृत्यमुखी पडली .

शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले .धारूर आणि माजलगाव तालुक्यातील काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाउस झाला. यावेळी दुपारी चार वाजन्याच्या सुमारास धारूर तालुक्यातील चारदरी येथील शेतात बाजरी काढण्यासाठी गेलेल्या दहा व्यक्ती पावसामुळे भिजू नये यासाठी घागरवाडा माळावर एका झाडाखाली बसल्या होत्या. नेमक्या त्याच झाडावर वीज कोसळली. वीज पडून पाच जणांचा बळी गेला.

आसाराम रघुनाथ आघाव (वय २८), उषा आसाराम आघाव (वय २५), दिपाली मच्छींद्र घोळवे (वय २१), शिवशाला विठ्ल मुंडे (वय २१) आणि वैशाली संतोष मुंडे (वय २५) हे जागीच ठार झाले तर सुमन भगवान तिडके (वय ४५), रुक्मीन बाबासाहेब घोळवे (वय ५२), कुसाबाई नामदेव घोळवे (वय ४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (वय २५), सुरेखा आबासाहेब आघाव (वय १७) हे पाच जखमी झाले. जखमींपैकी चार महिलांवर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एक महिला तीस ते चाळीस टक्के भाजली असून तिच्यावर धारूर येथील हजारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

धारूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी रुग्णालयात भेट देत जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोडशेडिंगच्या विरोधात सेना रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
सर्वसामान्यांसह सर्वच नागरिक महावितरणच्या लोडशेडिंगमुळे मेटाकुटीस आला असून सर्वच छोट्या मोठ्या व्यापारी, शेतकरी यासह सर्वसामान्यांना जबर शॉक बसला आहे. त्यामुळे हे लोडशेडींग बंद करावे या मागणीसाठी शनिवारी मस्तगड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. कार्यकारी अभियंता यांना अर्धा तास घेराव घालून मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी शिवसैनिकांनी शेतकयांचा विचार करा, लोडशेंडीग बंद करा, व्यापायांचा विचार करा लोडशेडींग बद करा, सणासुदीचा विचार करा, शिवसेना जिंदाबाद..... अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. शिवसेनेच्यावतीन तीव्र निदर्शनावेळी महावितरणला कोळसा भेट देण्यात आला.
लोडशेडिंग विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय मस्तगड येथे शिवसेनेचा मोर्चा काढीत निवेदन दिले. यावेळी भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, राऊसाहेब राऊत, संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, पांडूरंग डोंगरे, भरत मदन, सविता किंवडे, विष्णु पाचफुले, बाला परदेशी, हरीहर शिंदे, मुरलीधर शिंदे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणी नसलेली कीटकनाशके बाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ

कीटकनाशक फवारणीच्या बळींचा आकडा वाढत असताना सरकारने केवळ मदतीचा मुलामा जाहीर करीत मूळ प्रश्न कायम ठेवला होता. यावरून संताप व्यक्त होत असतानाच नोंदणी नसलेल्या कीटकनाशक आणि खतांच्या विक्रीवर सरकारने शनिवारी बंदी घातली. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यवतमाळात यासंदर्भातील माहिती दिली. ‘मटा’ने या संपूर्ण घटनांसाठी कारणीभूत कीटकनाशकांवर आधी बंदी घालण्यात यावी, असा मुद्दा लावून धरला होता.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १९ शेतकरी, शेतमजुरांचा बळी गेला. ७००हून अधिक बाधित झाले. तर, विदर्भातील हा आकडा ३३वर पोहोचला आहे. अनेकांनी दृष्टी गमावली. शनिवारी नागपूर जिल्ह्यातील आणखी एक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या सरकारने तातडीने परवानाधारक दुकानातून खत नियंत्रण आदेश १९८५ व कीटकनाशक नियंत्रण मंडळाद्वारे मान्यता प्राप्त कृषी निविष्ठांचीच विक्री करण्यात यावी, बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांची विक्री प्रतिबंध करण्यात येत असल्याचा शासन आदेश कृषी विभागाने काढला.

राज्यात कुठलाही परवाना नसताना पीक वाढ संजीवकाची तसेच खतांची विक्री केली जात होती. या उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत कोणतीही कार्यपद्धती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे कायदेशीर कारवाई करणे अडचणीचे ठरत होते. यावर बंदी आणण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही अनेक कायदेशीर अडचणी होत्या. केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारा मान्यता न मिळालेल्या जैविक कीटकनाशके व पीकवाढ संजीवके वेगवेगळ्या नावावर विकल्या जात
होते. त्यावर शासन गंभीरपणे विचार करीत होते.

राज्यात बोसग कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे सरकारच्या या अध्यादेशाच्या निमित्ताने सिद्ध झाले, असे मत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी व्यक्त केले. या परिस्थितीला मागील तीन दशकांचे कृषी क्षेत्रातील चुकीचे धोरण जबाबदार असून कृषीसह आरोग्य विभागाच्या कुजलेल्या व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे, अशी टीका वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images