Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चेहरा ठेवा तजेलदार

$
0
0

औरंगाबाद टाइम्स टीम

हिवाळा तोंडावर असताना चेहऱ्याच्या त्वचेवर बदलत्या हवामानाचा परिणाम झाल्यावाचून राहत नाही. कुठल्याही प्रकारच्या वातावरणात चेहरा तजेलदार राहण्यासाठीच या काही टिप्स...

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक असतं. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो आणि त्वचा तजेलदार दिसते. दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास त्वचेचा तुकतुकीतपणाही कायम राहतो. आपल्या आहाराचा त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे जंक फूड टाळून अधिकाधिक पौष्टिक अन्नाचं सेवन केलं पाहिजे. दैनंदिन आहारात फळांचा समावेश करा.बाहेरून आल्यानंतर दर्जेदार फेसवॉशनंच चेहरा धुवा. आपल्या त्वचेला शोभून दिसेल, असाच फेसवॉश निवडा. मैत्रिणी वापरतात; म्हणून किंवा ब्रॅण्ड आहे, म्हणून फेसवॉश वापरू नका.

त्वचेच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या सौंदर्यतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार, नियमित कालावधीनंतर त्वचेचं क्लीनअप करा. यामुळे चेहऱ्यावरील काळ्या डागांचा प्रश्नही सुटेल. त्वचेच्या आरोग्यासाठी ब्युटी ट्रीटमेंटचं टॉनिकही गरजेचं असतं. कमी खर्चात होणाऱ्या आणि प्रभावी ब्युटी ट्रीटमेंटही हल्ली बाजारात उपलब्ध आहेत. या ब्युटी ट्रीटमेंटचा त्वचेवर कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी अँटिऑक्सिडंट्स आवश्यक असतात. त्यामुळे चहा किंवा कॉफीऐवजी ग्रीन टी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबतच नारळ पाणी आणि लिंबू पाण्याचाही दैनंदिन आहारात समावेश केला पाहिजे.

फेस पॅक: केशरयुक्त दुधाचा फेसपॅक त्वचेला ताबडतोब झळाळी देतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे दुधात एक चमचा केशर टाका. हे मिश्रण चेहरा आणि मानेवार लावा. हे मिश्रण वाळल्यानंतर कोमट पाण्यानं स्वच्छ करा. केशर आणि दुधाच्या मिश्रणामुळे कॉलेजिनचं प्रमाण वाढतं आणि त्वचा सुंदर दिसू लागते. केशर त्वचेचा रंग उजळवतं, तर दुधामुळे त्वचेतील ओलावा कायम राहतो. या पॅकमुळे त्वचेतील कोरडेपणासुद्धा कमी होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीनंतर फळभाज्या महागल्या; कांदा पोचला ४० रुपयांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिवाळीनंतर फळभाज्या महागत असताना पालेभाज्यांच्या दरांत मात्र घसरण झाली आहे. पालेभाज्या आणि मिरच्या स्वस्त झाल्या असून, कांद्यासह फळफाज्या महागल्या आहेत.

पालेभाज्या, मिरचा कमालीच्या स्वस्त झाल्या आहेत. यामुळे दिलासा मिळणार असला तरी कांदा डोळ्यातून अधिक पाणी काढू शकतो. कारण किरकोळ बाजारात कांदा तब्बल ४० ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. फळभाज्यांनी ही डोके वर काढले असून, त्यांचे दर ८० रुपये किलोपर्यंत महाग झाले आहेत. शेवग्याच्या शेंगा २०० रुपये किलोपर्यंत पोचल्या आहेत.

आवक घटली
कांद्यासह फळभाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याची ४३२ क्विंटल आवक झाली. रोज साधारणपणे एक हजार ६०० ते एक हजार ८०० क्विंटल कांद्याची आवक होते. वांग्याची रोज एक हजार २०० ते एक हजार ४०० क्विंटल आवक होते. आज ६३५ क्विंटल आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शेवग्याच्या सुमारे २०० क्विंटल शेंगांची आवक होत असते. आत केवळ २० क्विंटल शेंगांची आवक झाली आहे. दुधी भोपळ्याची रोज ८०० ते ९०० क्विंटल आवक होते. आज केवळ ४३२ क्विंटल आवक झाली आहे.

परतीच्या पावसानंतर कमी आलेले भाज्यांचे उत्पादन, दिवाळी व नंतर कमी होणारा उठाव यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतच आवक नसल्याने किरकोळ बाजारात भाज्या महाग झाल्या आहेत, पण पालेभाज्या स्वस्त आहेत. नवीन कांद्याची आवक नसल्याने कांदा ६० रुपये झाला आहे.
- जर्नादन जाधव, सं‍चालक, संत सावता भाजीपाला केंद्र, एन-तीन सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरांचाच रिक्षा मीटरला टाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑटो रिक्षांचालकांनी मीटरनुसार दर आकारणे अपेक्षित आहे, मात्र शहरात बहुतांश रिक्षाचालक मीटरचा वापर न करता मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे दरआकारणी न केल्यास तक्रार करण्याची मुभा नागरिकांना आहे, मात्र यासंदर्भात गेल्या वर्षभरात प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) एकही तक्रार करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद शहरात १८ हजारांवर रिक्षांचे परमीट वाटप करण्यात आले आहेत. रिक्षांची संख्या वाटप केलेल्या परमीटपेक्षा जास्त असल्याचे मानले जाते. या रिक्षाचालकांच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी आरटीओ पोलिस विभागाच्या एकत्रित कारवाई सुरू केली होती. त्यावेळी ७८१ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यावेळी सुमारे सव्वादोनशे रिक्षा स्क्रॅपही करण्यात आल्या आहेत. या रिक्षांवर परमीट, विमा, लायसन्स नसणे किंवा अवैध प्रवासी वाहतूक आदी कारणांमुळे कारवाई करण्यात आली होती. मीटरनुसार भाडेआकारणी करण्यात आलेली नाही, या कारणावरून एकाही रिक्षावर कारवाई करण्यात आली नाही.

रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांचे हित जपले जावे, म्हणून रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॅरिटी (आरटीए) रिक्षाचे दर निश्चित करते. दर निश्चित करूनही सुमारे ९० टक्के रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारणी करीत नाहीत. ग्राहक मात्र त्याविरोधात तक्रार करीत नाहीत.

रिक्षा चालकांच्या मनमानीविरोधात आरटीओ कार्यालयात तक्रार करण्याची सोय आहे. एका पत्रावर केलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते, मात्र शहरात रिक्षा मीटरबाबत एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी रिक्षा विरोधात मोहिमा सुरूच आहेत, मात्र या मोहिमेदरम्यानही प्रवासी तक्रारी करीत नाहीत.
- श्रीकृष्ण नखाते, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा अर्जांची शाळांना डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा अर्जामध्ये केलेले बदल शाळांसाठी त्रासदायक ठरत आहेत. ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये दहावीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हा ताण अधिक वाढला आहे. अर्जामध्ये बदल करताना विद्यार्थ्याला आधारकार्ड सक्तीसह जन्म प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. दहावीचे नियमित शुल्कामध्ये सात नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

फेब्रुवारी-मार्च २०१८च्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाने एक आठवडा अलीकडे आणले. परीक्षेच्या वेळापत्रकामुळे अर्ज भरण्याच्या तारखांमध्येही यंदा बदल केले आहेत. बारावीसाठी मुदत संपली, तर दहावीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी १६ ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर असा आहे. शाळांना १६ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत सुट्या आहेत. सुट्यांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनाही संभ्रम आहे. नियमित शुल्काप्रमाणे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुट्यांमध्ये गेल्यानं दंडाची रक्कम भरून अर्ज सादर करावे लागतील, अशी स्थिती आहे. यंदा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतही मंडळाने बदल केले आहे. अर्ज भरताना जन्मस्थळासह तालुका, गाव यांची नोंद आणि जन्म प्रमाणपत्राची नोंद बंधनकारक करण्यात आले आहे. आधारकार्डही यंदा बंधनकारक आहे. त्यामुळे शाळांचे काम वाढले आहे. अनेक विद्यार्थी सुट्यांमध्ये बाहेरगावी गेल्यामुळे कागदपत्र जमा करत आणि अर्ज भरताना धावपळ उडाल्याने मुख्याध्यापक, संबंधित जबाबदारी असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

जन्म प्रमाणपत्रासाठी धावपळ
मागच्यावर्षी मंडळाने अर्जात बदल केले यंदाही काही बदल करण्यात आले. गुणपत्रिकेवर आता जन्मस्थळाचा उल्लेख होणार असल्याने अर्जामध्ये बदल करण्यात आले. ऑनलाइनमध्ये विद्यार्थ्याची अधिकाधिक माहिती मागविण्यात आली आहे. ही चांगली बाब असली, तरी ऐन सुट्यांमध्ये प्रमाणपत्र जमवाजमव करणे धावपळ उडवणार आहे. जन्मप्रमापत्र अनेकदा शाळांमध्येच जमा असते. शाळा बदलली तर संबंधित शाळांकडून मागवून घेणे पालकांनाही जिकरीचे ठरते आहे. शाळांना यंदा शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे २७ नोव्हेंबरपर्यंत जमा करायच्या आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी दिवाळीपूर्वीच विद्यार्थ्यांचे कागदपत्र जमा करून सुट्यांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.

यंदा ऑनलाइन अर्जामध्ये बदल करण्यात आले. त्यात तांत्रिक अडचणीपेक्षा कागदपत्र जमा करण्यातच अडचणी जास्त निर्माण होतायेत. सुट्यांमध्येच प्रक्रिया राबविली जात आहे, हे योग्य नाही. अनेकदा विद्यार्थी, पालकांसह बाहेरगावी असतात. आधारकार्डचा प्रश्नही आहे, परंतु हमीपत्र भरून अर्ज भरता येतो. त्यामुळे तरी एक प्रश्न सुटला आहे.
- जयंत चौधरी, मुख्याध्यापक, मुकूल मंदिर हायस्कूल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस जातप्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आदिवासींसारख्या आडनावांच्या साधर्म्याचा फायदा घेऊन बोगस जातप्रमाणत्रांच्या आधारे अनेकांनी मराठवाड्यात शासकीय नोकऱ्या लाटल्या आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी समिती स्थापन करावी, अशी मागणी आदिवासी कोळी ज्येष्ठ नागरिक विकास परिषदेने बुधवारी विभागीय आयुक्तांकडे केली. या मागणीसाठी परिषदेने विभागीय आयुक्तालय परिसरात धरणे आंदोलन केले.
परिषदेचे सचिव आनंदा रेजीतवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नुसार, १ जुलै २०१६च्या निर्णयानुसार औरंगाबाद महसूल विभागात नाम साधर्म्याचा फायदा घेऊन अनुसूचित जमाती बोगस जातप्रमाणपत्रांचा तपास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्तांची नियुक्ती केली आहे. या आदेशानुसार, सर्व आदिवासी जातींसाठी ही चौकशी समिती असणे आवश्यक होते. परंतु जुलै २०१६च्या चौकशी समितीच्या बैठकीत ४५ जमातींपैकी केवळ मन्नेरवारलू, कोळी महादेव, तडवी, राजगोंड, ठाकर, ठाकूर अशा सहा जमातीचेच लोक नाम साधर्म्याचा फायदा घेत असल्याचे नमूद केले आहे. इतर ४० जमातींना चौकशी समितीने नियमबाह्यरित्या वगळले. शासनाने चौकशीचा आदेश सहा जमातींपुरताच दिलेला नाही. त्यामुळे शासकीय आदेशानुसार सर्व अनुसूचित जमातीचे लाभ घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

आयुक्तांना यादी

परिषदेने ‘अंध’ या आदिवासी जमातीतील नावांच्या साधर्म्याचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस लोकांची यादी विभागीय आयुक्तांना दिली आहे. ही यादी नांदेड जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी चौकशी करून खऱ्या आदिवासींना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड कोटी थकल्याचा फटका रुग्णांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अनेक विभागातील अनेक उपकरणांच्या वार्षिक देखभालीची रक्कम न भरल्याने उपकरणांच्या दुरुस्तीवर आणि सेवेवर गंभीर परिणाम झाला असून, अनेक उपकरणे नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. त्याचा सर्वाधिक फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. दुर्दैवाने वार्षिक देखभालीची थकित दीड कोटीची रक्कम भरण्यासाठी सध्यातरी कोणतीही हालचाल सुरू नसल्याची स्थिती काम आहे. त्यामुळे निदान हिवाळी अधिवेशनामध्ये तरी देखभालीच्या रकमेसाठी बजेट मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

घाटीतील क्लिनिकल विषयांच्या बहुतेक विभागांमध्ये उपकरणांशिवाय उपचारांमध्ये मोठा अडथळा येतो, अशी स्थिती आहे. आजचे वैद्यकशास्त्र हे ‘एव्हिडन्स्ड बेस’ असल्याचे मानण्यात येते व आधुनिक औषधोपचारांमध्ये विविधांगी उपकरणांचे महत्त्व आहे. त्यामुळेच निदानासाठी, तपासण्यांसाठी उपकरणांशिवाय पर्याय नसल्याची स्थिती एकूणच वैद्यकीय जगतामध्ये निर्माण झाली आहे, मात्र दुसरीकडे अनेक उपकरणांच्या किंमती या लाखांमध्ये, तर काहींच्या कोटींमध्ये आहेत. नवीन ‘व्हर्जन’च्या व उत्तम दर्जाच्या उपकरणांच्या किंमती कोटींमध्ये असल्याचे सहज दिसून येते. अजूनही भारतामध्ये फार कमी उपकरणांची निर्मिती होत असल्याने उत्तम दर्जाच्या उपकरणांसाठी विदेशातील उपकरणांशिवाय पर्याय नसल्याची स्थिती आहे आणि त्यामुळेही विदेशातील महागडी उपकरणे घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. याच कारणामुळे घाटीमध्येही बहुतेक मध्यम व मोठी उपकरणे ही विदेशी आहेत. त्यांची दुरुस्ती व सुट्या भागांच्या किंमतीदेखील खूप जास्त आहेत. याच कारणास्तव या महागड्या उपकरणांच्या वार्षिक देखभालीसाठी (एएमसी-सीएमसी) करार करणे अनिवार्य ठरते. घाटीतील फार मोठा रुग्णभार लक्षात घेता, उपकरणांच्या वार्षिक देखभालीच्या खर्चाला पर्याय नसल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये, मात्र असे असताना दरवर्षी राज्य सरकारकडून अत्यंत तोकडा निधी मिळतो आणि त्याचा रुग्णसेवेवर विपरित परिणाम होतो.

कराराची निम्मीच रक्कम भरली
घाटीच्या वतीने वार्षिक देखभालीच्या करारापोटी एक कोटी ७७ लाख रुपये भरण्यात आले असले तरी अजूनही तब्बल एक कोटी ४३ लाख ६६ हजार रुपये थकलेले आहेत. ही थकीत रक्कम मार्चमध्ये किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु मागणी करुनही ही रक्कम मिळाली नाही. परिणामी, देखभालीचा करार झालेल्या बहुतेक कंपन्यांनी दुरुस्तीच्या सेवा देण्यास नकार दिला आहे. त्याचा फटका बहुतेक विभागांना बसत असून, अनेक विभागातील वेगवेगळी उपकरणे पूर्णपणे किंवा अर्धवट नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. या सगळ्याचा परिणाम गोरगरीब रुग्णांच्या निदान व उपचारांवर होत आहे. याकडे राज्य सरकारने हेतुपुस्सर कानाडोळा केला की काय, असे वाटावे, अशी शंका उपस्थित होत आहे.

‘६४ स्लाइस’ अजूनही नादुरुस्तच
मागच्या दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या ६४ स्लाइस सिटी स्कॅनमागे हेच ‘एएमसी-सीएमसी’चे कारण आहे. या उपकरणाच्या वार्षिक देखभालीचे २५ लाख रुपये थकले आहे. डिसेंबरमध्ये ही थकीत रक्कम दिली जाईल, असे अधिकृत पत्र घाटीकडून संबंधित कंपनीला देण्यात आले; परंतु कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही उपकरण दुरुस्त करून देण्याची विनंती करण्यात आली असता, कंपनीने दोन इंजिनिअरला पाठवले, पण सुटे भाग गेल्याचे सांगून कराराशिवाय सुटे भाग बसवून देण्यास विरोध केल्याचे समजते. ६४ स्लाइस सिटी स्कॅन बंद असल्यामुळे ६ स्लाइस सिटी स्कॅनवर ताण येऊन तेही एकदा बंद पडले होते. अशीच स्थिती बहुतेक उपकरणांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे विसरलेल्या बॅगचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षात विसरलेल्या महिलेची बॅग सेफ सिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मिळाली. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रिक्षा शोधण्यात आली. हा प्रकार मंगळवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडला होता.
मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी एक महिला मंगळवारी दुपारी वाळूज एमआयडीसी येथून रिक्षात बसली पण, रिक्षातून उतरताना बॅग विसरून राहिली. या महिलेने पोलिस आयुक्तालयातील सेफ सिटी प्रकल्प कार्यालयात जाऊन हा प्रकार सांगितला. तेथील पोलिसांनी तत्काळ वाळूज एमआयडीसी ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या महिलेने एम एच २० बी सी ११७२ क्रमांकाच्या रिक्षातून प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. छावणी पोलिस ठाण्याचे चार्ली जवान आर. टी. खिल्लारे व शेख अमजद यांनी त्या रिक्षाचा शोध घेतला असता बॅग सुखरूप होती. बॅगेत मोबाइल, एक हजार रुपये रोख व चार हजारांचे कपडे, असा ऐवज होता. ही बॅग एसीपी डॉ. अनिता जमादार यांच्या हस्ते महिलेला परत करण्यात आली. बॅग शोधण्यासाठी सेफ सिटी प्रकल्पाच्या पीएसआय स्नेहा करेवाड, नजमा तडवी, रेखा गोठवाल यांनी ‌प्रयत्न केले.

पोलिसांनी केली मदत

बॅग हरवल्यामुळे या महिलेची घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते. यावेळी सेफ ‌सिटी प्रकल्पातील महिला कर्मचाऱ्यांनी तिला पैसे देऊन घरी जाण्याची सोय केली. या महिने बॅग सापडल्यामुळे पोलिसांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसंवादमध्ये डॉक्टर, नागरिकांत विसंवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये बुधवारी आयोजित जिल्हा व तालुकास्तरावरील जनसंवाद कार्यक्रमात नागरिक व वैद्यकिय अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली. आरोग्य सेवेबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम गुंडाळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नागरिकांनी आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या सौजन्याने आयोजित जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रार झाल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी संतापले. त्यांनी उर्मट भाषेत आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना तंबी देण्याऐवजी चुकांवर पांघरूण टाकले, असा आरोप बैठकीत नागरिकांनी केला. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपजिल्हा हॉस्पिटल व तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गैरकारभाराबाबत नागरिकांनी तक्रारींचा भडिमार केला. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेल्याने नागरिकांची निराशा झाली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड, पंचायत समिती सभापती इंदुबाई सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी हुगळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी कानडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील बोरनारे, संस्थेचे सचिव आप्पासाहेब उगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदोरीकर, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.

तक्रारींचा भडिमार

हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे रुग्णाला सुविधा मिळत नसल्याने हाल होत आहेत, अशी तक्रार अशोक साळूंके, मोती वाघ, आवेज पठाण, दिपक थोरे यांनी केली. ऋतुराज सोमवंशी यांनी लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्याच्या कामकाजाबाबत तक्रार केली. पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे, डॉक्टरांचे औरंगाबाद येथून अपडाउन, किरकोळ आजारासाठी रुग्णाला औरंगाबादला पाठवणे, बंद सोनोग्राफी यंत्र, ट्रॉमा केअर सेंटरची धुळ खात पडलेली इमारात याबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जगताप यांनी सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी कामगारांचा एक महिन्याचा पगार कपात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी ऐन दिवाळीत चार दिवसांचा संप केला. संपात सहभागी होऊन चार दिवस गैरहजर राहिलेल्या कामगारांना २८ दिवसांच्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. एसटी महामंडळाने एका दिवसासाठी सात दिवसाचे वेतन कपात या सूत्रानुसार कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी केल्याची माहिती मिळाली आहे.
एसटी महामंडळाच्या कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी १७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला होता. पण, हायकोर्टाच्या आदेशाने कामगारांनी संप चार दिवसानंतर २० ऑक्टोबर रोजी मागे घेतला. चार दिवस संप चालल्याने महामंडळ वेतन कपात करणार आहे, अशी चर्चा महामंडळातील कामगारांत सुरू आहे. महामंडळाच्या २००५च्या परिपत्रकानुसार कामगारांनी एक दिवस संप केला, तर सात दिवसाचे वेतन कापण्याचे धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार चार दिवसांच्या संपामुळे कामगारांचे २८ दिवसांचे वेतन कापण्यात येणार आहे. या संदर्भाने एसटी महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाकडून मिळालेल्या आदेशाप्रमाणे जळगाव विभाग नियंत्रक कार्यालयाकडून संपाच्या काळात असलेल्या कामगारांना ‘ना काम ना दाम’ या नियमानुसार वेतन कापण्याचे आदेश काढले आहेत. या कारवाईची माहिती ७ नोव्हेंबरपर्यंत माहिती कामगार विभागात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पद्धतीचे पत्र इतर विभाग नियंत्रकांना जारी करावेत, असे आदेश आहेत. मात्र, औरंगाबाद विभाग नियंत्रकांनी अद्याप वेतन कपातीचे पत्रक काढलेले नाही. एसटी महामंडळाच्या धोरणानुसार हे परिपत्रक काढावे लागणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. महामंडळाच्या या आदेशामुळे चार दिवस संपावर असलेल्या कामगारांचा संपूर्ण महिन्याचे वेतन कपात केले जाणार आहे. चार दिवस संप केला असल्याने चार दिवसांचे वेतन कापण्याला कामगारांचा विरोध नाही. मात्र, चार दिवसांच्या संपाने महिन्याभराचे वेतन कापण्याला कामागारांचा विरोध करणार असल्याचे संकेत कामगारांकडून मिळाले आहेत. एसटीच्या वेतन कपातीच्या निर्णयामुळे आगामी काळात एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्या पुन्हा वाद निर्माण होण्याची भीती आहे.

रावतेंबद्दल नाराजी

संपामध्ये सहभागी झालेल्या कामगारांवर कारवाई करणार नाही, असा शब्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रसार माध्यमांसमोर दिला होता, याची आठवण कामगार करून देत आहेत. आता ते कारवाईबाबत ते गप्प का, असा सवाल एसटी कामगारांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, ज्येष्ठ नाट्यकर्मी, लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब यांचे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७३ वर्षांच होते. नाट्य, साहित्य, संस्कृती, संगीत क्षेत्रात सातत्याने वावर असणारा, लोकरंगभूमीचा व्यासंगी अभ्यासकाचे निधन झाल्याने नाट्य-साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अचलखांब यांच्या निधनाने व्यक्त होत आहे.

डॉ. अचलखांब हे मराठवाड्याच्या नाट्यक्षेत्रातील प्रचंड उर्जा असलेलं उमदं व्यक्तिमत्व होतं. नाटकाचा विषय निघालाही ते त्यासाठी केव्हाही तयार असत. मग ते नाटक बसवणं असो, लिहिणं असो वा नाटकावर चर्चा करणंदेखील असो, अचलखांब नेहमीच पुढे असायचे. विशेषतः लोकरंगभूमी, लावणी, तमाशा यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. या विषयावर केव्हाही, कोणताही प्रश्न त्यांना केल्यास त्याचे संदर्भांसहित उत्तर त्यांच्याकडे तयार असे. लोकरंगभूमी, लावणी, तमाशा यावर मोठे संशोधन करून त्यांनी अभ्यासग्रंथ लिहिले आहेत. जे शैक्षणिक पातळीवर अभ्यासासाठी ठेवण्यात आले आहेत. गावकी हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले.

डॉ. रुस्तुम अचलखांब यांची काल सायंकाळपर्यंत प्रकृती एकदम ठणठणीत होती. मात्र रात्री साडेनऊ वाजता एन ११ येथील त्यांच्या राहत्या घरी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी एन ११ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाट्य, साहित्य, लोकरंगभूमी, संगीत क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. अचलखांब यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

संघर्षपूर्ण वाटचालीतून मिळविले यश

जालना जिल्ह्यातील मौ. मोजपुरी जोड मानेगाव या छोट्याशा गावातून शिक्षणाचा ध्यास घेऊन रुस्तुम अचलखांब यांनी शिक्षणासाठी जालना शहर गाठले होते. घरी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि आर्थिक परिस्थितीही खडतर, गावात शिक्षण घेणेही शक्य नाही अशा परिस्थितीत अचलखांब यांनी लहानपणीच शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यासाठी जालन्याच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला होता. शिक्षण घेत असतानाच अंगी कला होतीच. पुढे कलेचा व्यासंग वाढत गेला. संघर्षातूनच त्यांच्यातला कलावंत घडला. पुढे औरंगाबादला विद्यापीठामध्ये नाट्यशास्र विभाग सुरू झाला. त्यावेळी विभागाचे पहिले संचालक, विभागप्रमुख प्रा. डॉ. कमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नाट्यशास्राचा रितसर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर याच विभागात ते अभिनयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नाट्य विभागात त्यांनी सुमारे ३५ वर्षे नाट्यसेवा केली, अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे अनेक विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तृतीयरत्न या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी सादर केला होता.

लोकरंगभूमीवर वेगाने वाटचाल

लोकरंगभूमीवरील हाडाचे कलाकार असलेले अचलखांब यांनी लोकरंगभूमीवर अत्यंत वेगाने वाटचाल केली. महात्मा फुलेंच तृतीय रत्न हे त्यांनी सर्वप्रथम सादर केले. पुढे ‘अकलेची गोष्ट’, ‘संगीत मनमोहन’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’, ‘शाहिरीचे रंग’ असे अनेक प्रयोग वेगाने मराठवाडाभर त्यांनी केले. त्यांच्यासोबत या काळात विश्वास साळुंके, कांताबाई, शेषराव पठाडे, शोभा दांडगे, विजया शिरोळे हे कलावंत रंगभूमीवर गाजले.

डॉ. अचलखांब यांचे साहित्य

गावकी (आत्मकथन) कैफियत (नाटक), रंगबाजी, अभिनयशास्र (नाट्यशास्र अभ्यास पुस्तक), गांधी, आंबेडकर आणि मी, आधुनिक शाहिरीचे रंग, भारतीय पौर्वात्य आणि तमाशा लोकरंगभूमी, आंबेडकरांचे ग्रंथलेखन एक आकलन, मराठी रंगभूमीचे प्रारंभपर्व, लोकनायक श्रीकृष्ण.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा सभागृहात पाठिंबा; बाहेर विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शहर स्वच्छतेच्या निविदेस मंजुरी देण्यावरून नगर पालिकेच्या विशेष सभेत शिवसेना नगरसेवकांत संभ्रम निर्माण झाला. सभागृहात मंजुरी दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी सभागृहाबाहेर आल्यानंतर ठरावाला विरोध केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
शहर स्वच्छतेच्या ई-निविदांना कार्योत्तर मंजुरी देणे या मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी नगर पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलसा शिवसेना नगरसेवकांनी शहरात स्वच्छता करणाऱ्या आधार मजूर संस्थेच्या कामावर नाराजी व्यक्त करून आधारच्या निविदेस विरोध केला. मात्र, केलेल्या कामाची मंजुरी मिळावी यासाठी संस्थेच्या सफाई कामगारांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी आधार संस्थेला बिल देण्यास सभागृहात मंजुरी दिली. परंतु, बिल अदा करण्याचा ठरावाला पाठिंबा म्हणजे एकप्रकारे निविदेला मंजुरी देणे होय, हे विशेष सभा संपल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे शिवसेना गटनेते तुषार पाटील व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर ठरावाला विरोध केला. यामुळे नगर पालिका परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या सभेत दलितेत्तर नागरी विकास योजनेतंर्गत कामाची निवड, १४व्या वित्त आयोग अंतर्गत कामाची निवड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना याव विषयांवर चर्चा होऊन ठराव एकमताने मंजूर झाल्याची माहिती मुख्याधिकारी सूरज लोळगे यांनी दिली.

काही महिन्यापासून आधार मजूर संस्था व त्यांचे कर्मचारी शहरात स्वच्छतेचे काम करत आहेत. शिवसेना नगरसेवकांनी आधारच्या निविदेस सभागृहात मंजुरी दिली व बाहेर आल्यानंतर विरोध केल्याचा देखावा करत आहेत. शिवसेना नगरसेवकांनी विकास कामात राजकारण करू नये.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

आधारच्या कर्मचाऱ्याना कामाचे दाम मिळावे म्हणून बिल मंजुरीला पाठिंबा दिला. पण, बिलाचे पैसे द्यायच्या ठरावाला मंजुरी म्हणजे आधारच्या निविदेस मंजूरी हे लक्षात आल्यावर आम्ही ठरावाला विरोध केला आहे.
-तुषार पाटील, गटनेता, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोहालकडून तब्बल ९८ जणांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घाटीमध्ये कक्षसेवक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्ती आदेशाद्वारे अनेकांची लाखो रुपयांना फसवणूक करणारा घाटीचा सफाईगार राजेंद्र पोहाल याने किमान ९८ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याला बुधवारी कोर्टात हजर केले असता सोमवारपर्यंत (३० ऑक्टोबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले.
या प्रकरणी किशोर चंद्रभान देहाडे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नातेवाईकाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बनावट नियुक्ती आदेशाद्वारे राजेंद्र चरणसिंग पोहाल (रा. घाटी क्वार्टर) याने दोन लाख रुपये घेतले होते. मात्र नियुक्ती आदेश बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोहालविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी अटक केली. पोहाल याला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्याने १२ व्यक्तींकडून घेतलेल्या २४ लाख रुपयांचा विनियोग कसा, कुठे केला, बनावट नियुक्ती आदेश कोठे तयार केले, अधिष्ठातांच्या नावाने खोट्या सह्या कोणी केल्या, त्याचे साथीदार कोण आहेत, याचा तपास करायचा आहे. त्याच्याकडून संगणक व शिक्के जप्त करावयाचे आहेत. त्यामुळे सात दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शेहनाझ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने संशयित आरोपीला सोमवारपर्यंत (३० ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली.

रॅकेटचा संशय

संशयित आरोपी पोहाल याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने कक्षसेवक पदासाठी ४८ व्यक्तींची, तर लिपिक पदासाठी ५० व्यक्तींची, अशा एकूण ९८ व्यक्तींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, यामागे मोठे रॅकेट असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजाराची लाच घेताना पीएसआय गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक हजार रुपयाची लाच घेताना गंगापूर पोलिस ठाण्याचा पीएसआय भागवत सुधाकर मुठाल याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर पोलिस ठाण्यात एका २२ वर्षाच्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याची पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यात आली आहे. या हजेरीची नोंद घेण्यासाठी पीएसआय भागवत मुठाळ याने शेतकऱ्याला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध‌क विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी दुपारी सापळा रचून हजार रुपयांची लाच घेताना पीएसआय भागवत मुठाळ याला अटक केली. उपअधिक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांतूनच करा प्रवास

$
0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
औरंगाबाद ः औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या योजनेंतर्गत निविदा मागविल्या होत्या. जिल्ह्यातील ८२ कामांसाठी एकही परिपूर्ण प्रस्ताव तयार झाला नाही. परिणामी सर्व निविदा पुन्हा काढाव्या लागणार आहेत. दुसऱ्यावेळी निविदा काढण्यासाठी १४ नोव्हेंबरनंतरच हालचाली होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. परिणामी १५ नोव्हेंबरचा खड्डे भरण्याचा मुहूर्त हुकणार आहे. नागरिकांना मात्र आणखी काही महिने खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उपाययोजना करत नसल्याची सार्वत्रिक ओरड होती. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन राज्यातील रस्त्यांसाठी एक हजार १८७ कोटी रुपये जाहीर केले होते. त्यातून ५२ हजार २३४ किलोमीटरचे रस्ते खड्डेमुक्त केले जातील, असा दावा केला गेला. दोन टप्प्यांतील या कामांसाठी वेळापत्रक तयार केले होते. राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे १५ नोव्हेंबरपर्यंत आणि राज्य महामार्गावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत भरण्याचे नियोजन केले होते, मात्र ‘जीएसटी’ आणि ‘डीएसआर’च्या मुद्यावरून राज्यभरातील कंत्राटदारांनी बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. तीन महिन्यांपासून सरकारी कामे बंद आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामालाही याचा फटका बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागनिहाय आढावा बैठका घेऊन कंत्राटदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. औरंगाबाद विभागात दिवाळीपूर्वी झालेल्या बैठकीत समाधान झाल्याचा दावा करून लवकरच खड्डे भरण्याची कामे सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील ८२ कामांसाठी प्रतिसादच मिळाला नसल्याचे आता समोर आले आहे.

निविदा प्रक्रिया राबविताना एका कामासाठी किमान तीन निविदा येणे अपेक्षित असते. त्यातून कमी दराची निविदा मंजूर केली जाते. जिल्ह्यातील ८२ पैकी केवळ चार कामांना प्रतिसद मिळाला. उर्वरित कामांसाठी एक, दोन निविदाच प्राप्त झाल्या. त्यामुळे सर्व प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे. ही प्रक्रिया १४ नोव्हेंबरनंतर राबविली जाईल. त्यानंतर आलेल्या निविदांचा अभ्यास करून कामे वाटप केले जातील. त्याला किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर कामे होण्यासाठी महिनाभर म्हणजे जानेवारी २०१८ अखेर जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले जातील. तोपर्यंत नागरिकांना खड्ड्यातूनच वाट काढावी लागणार आहे.

जालन्यातही अल्प प्रतिसाद?
औरंगाबाद जालना जिल्ह्यातील १७० कामांसाठी ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून दोन वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराला रस्त्यावरील खड्डे भरणे बंधनकारक असणार आहे. त्यातून दोन हजार २०० किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे भरले जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कामांना जसा अल्प प्रतिसाद मिळाला. तसा जालना जिल्ह्यातही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीची सुरतवरून सुटका, आरोपी गजाआड

$
0
0

अल्पवयीन मुलीची सुरतवरून सुटका, आरोपी गजाआड
लग्नाचे आमीष दाखवून अपहरण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी भागातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन (वय - १७ वर्ष दहा महिने ) मुलीची सुरत येथून मुकुंदवाडी व गुन्हेशाखेच्या पथकाने सुटका केली. २१ सप्टेंबरला ही मुलगी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली होती. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यामध्ये बलात्काराचे कलम वाढवण्यात आले आहे.
मुकुंदनगर परिसरात राहत असलेल्या या तरुणीच्या वडिलांनी याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी सत्यपाल भीमराव वाकोडे याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपासात सायबर सेलने ही मुलगी व संशयित आरोपी सुरत गुजरात येथे असल्याची माहिती तांत्रिक मुद्यावर मिळवली होती. माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा व मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे पथक गुजरातला रवाना झाले. सुरत येथील अमरोली भागातून या दोघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सत्यपाल विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलम वाढवण्यात आले आहे. ही कारवाई एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जी. एस. चव्हाण, पीएसआय हेमंत तोडकर, अनिल वाघ, जमादार धुडकू खरे, भाऊसिंग चव्हाण, हकीम पटेल, नितीन देशमुख, विवेक औटी, प्रदीप कुटे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास निधीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यभरात आतापर्यंत दहा ठिकाणी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले आहे. शासनाकडून निधी मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही निधी मिळालेला नाही. आता पनवेल येथे आयोजित ११ व्या मुस्लिम मराठी संमेलनाच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इकबाल मिन्ने यांनी केली आहे.
राज्यभरात सोलापूर, नागपूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई , नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, जळगाव याठिकाणी दहा सम्मेलन घेण्यात आली आहेत. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातूनच साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. २६ वर्षांपासून हे मंडळ कार्यरत आहे. २६ वर्षांत फक्त १० संमेलने झाली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक हेच आहे. या संमेलनाला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. महाराष्ट्रात २ कोटीहून अधिक मुस्लिम असून बहुतांश मुस्लिम मराठी भाषेवर प्रेम करतात आणि याच भाषेत अभिव्यक्त होतात. असे असूनही प्रत्येकवेळी अर्ज करूनसुद्धा या संमेलनास शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही. ११ वे मुस्लिम मराठी साहित्य सम्मेलन पनवेल येथे ३, ४, ५ नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. बीबी फातिमा मुजावर यांची तर स्वागताध्यक्षपदी रामशेठ ठाकूर यांची निवड झाली आहे. यांच्यासह ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस, विख्यात सुफी विचारवंत प्रा मुहम्मद आझम, प्रा फ. म. शहाजिन्दे, विलास सोनवणे, इतिहास तदन्य चद्रशेखर शिखरे, एस एम मुशरीफ, भाषातदन्य डॉ. पृथ्वीराज तौर, लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. तीन दिवस या संमेलनासाठी सुमारे दहा हजार रसिक, साहित्यिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
केवळ लोकसहभागातून एवढा मोठा कार्यक्रम होणे अवघड आहे. त्यामुळे शासनाने साहित्य संमेलनास २५ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी डॉ. मिन्ने यांनी केली आहे.

असे होतील कार्यक्रम

या संमेलनात विविध परिसंवाद, चर्चासत्र, महापरिसंवाद, कविसंमेलने, मुशायरा, साहित्य संशोधक मेळावा, मुस्लिम कवयित्री संमेलन इ. भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य-संस्कृतीची शुक्रवारपासून मेजवानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे ‘औरंगाबाद ग्रंथोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव २७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर शासकीय विभागीय ग्रंथालय परिसर समर्थनगर येथे होईल.

ग्रंथोत्सवात दोन दिवस ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध व्याख्याने व चर्चासत्र होतील. याची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीने होईल. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सकाळी साडेदरा वाजता उद्घाटन होईल. पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्री रामदास कदम, महापौर बापू घडमोडे, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील ‌सर्व वरिष्ठ अधिकारी प्रमुख पाहुणे असेल.

उद्‍‍‍घाटनानंतर दुपारी साडेतीन वाजता ‘प्रभावी वाचन माध्यमे’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड, विचारवंत जयदेव डोळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक वीरा राठोड यांचा सहभाग असेल. यानंतर संध्याकाळी सात वाजता ग्रंथ वाचक गौरव व ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल. यावेळी ल. म. कडू यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कादंबरी ‘खारीच्या वाटा’ या ग्रंथाचे अभिवाचन होईल. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दोन यावेळेत ‘ग्रंथाने मला काय दिले’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. दिलीप यार्दी अध्यक्षस्थानी असतील. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, श्रीकांत उमरीकर यांचा परिसंवादात सहभाग असेल. यानंतर ग्रंथ वाचक गौरव, ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप होईल. दुपारी तीन ते चारदरम्यान काव्यवाचन होईल. रामदास गवळी अध्यक्षस्थानी असतील. समारोप कार्यक्रम सायंकाळी चार वाजता सुरू होईल, यावेळी अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, सहायक ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल र. सु. ठाकूर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींची उपस्थिती असेल. यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यीक विंदा करंदीकर यांच्या कवितांवर आधारीत ‘रसयात्रा’ हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औताडेंच्या उमेदवारीवरून नाराजीचा सूर

$
0
0

औताडेंच्या उमेदवारीवरून नाराजीचा सूर
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उपमहापौरपदाच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा जुना व नवा असा वाद निर्माण झाला आहे. उपमहापौरपदासाठी दोन्ही वेळेस जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने निष्ठावंत नाराज झाले आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन पदे कशी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अन्य पक्षातून आलेल्या लोकांनाच महत्त्वाची पदे देण्याची प्रथा ‘पार्टी विंथ डिफरन्स’ असे बिरुद मिरविणाऱ्या भाजपात रुढ झाली का, असाही त्यांचा सवाल आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा घोळ निकाली लावत भारतीय जनता पक्षाने विजय औताडे यांना उमेदवारी जाहीर केली, परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय भाजपच्या काही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही रुचलेला नाही.
उमेदवारी अर्ज भरतानाही पक्षाचे काही स्थानिक नेते तसेच महापालिकेचे सदस्यही गैरहजर होते, हे विशेष. कामानिमित्त नेतेमंडळी, नगरसेवक मुंबईला व अन्यत्र असल्याने ते उपस्थित नव्हते, अशी सारवासारव पक्षांकडून केली जात आहे.
दरम्यान, पहिल्या वेळेसही उपमहापौरपद हे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रमोद राठोड यांना देण्यात आले. यंदा राष्ट्रवादीतून आलेल्या औताडेंना संधी मिलाली. गटनेतेपद पुन्हा राठोड यांच्याकडे गेले. तर औताडे यांनीही यापूर्वी आरोग्य सभापतीपद भूषविले आहे. पक्षात अन्य कार्यकर्ते नाही का, अशी संतप्त प्रतिक्रिया एका जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
शहरात राहणाऱ्या औताडे यांच्याकडे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद आहे. असे असताना आता उपमहापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात येत आहे. एकाच व्यक्तीकडे दोन-दोन पदे देण्यामागे कारण काय, इतर पक्षातून आलेल्या लोकांनाच पद मिळणार असेल तर निष्ठावंतांनीही बाहेर जाऊन पुन्हा पक्षात यावे का, असा प्रश्नही नाराज गटाकडून होत आहे.


इच्छुकांची संख्या जास्त व पद एक अशात कोणा एकालाच संधी देता येईल. उमेदवारीची मागणी करणे स्वाभाविक असते, पण निवडीवरून कोणीही नाराज असण्याचे कारण नाही. काही नेते, नगरसेवक कामानिमित्त बाहेरगावी होते. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित नव्हते. म्हणजे ते नाराज आहेत, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चभ्रू अहिंसानगरात कुंटणखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रोडवरील अहिंसानगर या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छाप टाकला. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कुंटणखानाचालक महिलेसह दलाल व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना अहिंसानगर भागातील श्रीराम निवास येथे एक महिला कुंटणखाना चालवत असल्याची माहि‌ती मिळाली होती. या माहि‌तीवरून मंगळवारी रात्री या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी दलाल प्रविण बालाजी कुरकुटे (वय ३५ रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) याच्यासह कुंटणखाना चालक महिला, व देहविक्रीसाठी आलेल्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून तीन मोबाइल, रोख रक्कम, महिलांना ने आण करण्यासाठी वापरण्यात येणारी कार असा एक लाख तेरा हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नंदकुमार भंडारे, साईनाथ महाडीक, संतोष सोनवणे, फारुख देशमुख, विद्यानंद गवळी, शिवाजी भोसले, संजय जाधव, सिद्धार्थ थोरात, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, लालखा पठाण, योगेश गुप्ता, संजिवनी शिंदे, म्हस्के, कांबळे यांनी पार पाडली.

राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी

कुंटणखाना चालवणारी महिला राजकीय पक्षाची माजी पदाधिकारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती या वसाहतीमध्ये वास्तव्यास आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ती घरात येऊ देत नव्हती. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी कठोर भुमीका घेतल्यानंतर ही महिला वरमली.

पाचशे रुपये कमीशन

कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेने ग्राहक आणण्यासाठी प्रविण कुरकुटे या दलालाला ठेवले होते. कुंटणखान्यावर ग्राहकआणण्याचे काम तो रोज करीत होता. ग्राहक पुरवल्यानंतर त्याला पाचशे रुपये दलाली मिळत होती. अहिंसानगर भागातील उच्चभ्रु वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसापासून हा धंदा सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूसह ३७ लाखांची वाहने सिल्लोडमध्ये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार यांच्या पथकाने मंगळवारी अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत चार टिप्परसह जीप, दोन दुचाकी, आठ मोबाइल आदी ३७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
बेकायदा वाळू वाहतूक करणारे तीन टिप्पर भोकरदन येथून सिल्लोड शहरात वाळू घेऊन येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांचे पथक पिंप्री फाटा येथे दबा धरून बसले. या पथकाने एका टिप्परची (एम एच २० सीटी ३९१९) थांबवून चौकशी केली असता त्यात तीन ब्रास विनापरवानगी वाळू आढळली. त्यानंतर एका टिप्परमध्ये ( एम एच २८ बी ८८३०) अडीच ब्रास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील टिप्परमध्ये (एम एच १८ ए ए १४६५) तीन ब्रास वाळू सापडली. हे टिप्पर पोलिस ठाण्यात लावण्यात आले. संशयित आरोपी अंबादास काशिनाथ सुलताने, कालू पठाण (दोघेही रा. तांडाबाजार), सुधाकर साहेबराव चवरे, सुनील भिका जाधव, राजू तुकाराम जाधव (रा. कुंभारी ता. भोकरदन), सुदाम पांडुरंग सरोदे, दत्ता सुभाष सोरमारे (दोघेही रा.नांजा ता. भोकरदन), गणेश रामा बरडे (रा. फत्तेपूर, ता. भोकरदन), ज्ञानेश्वर कडुबा मोरे, आत्माराम हरिभाऊ सोरमारे (रा. लांजा ता. भोकरदन), समाधान उत्तम शेळके (रा. जोमाळा, ता. भोकरदन), कृष्णा बबन खैरे, संतोष चेवचंद खैरनार (रा. दोघेही सिल्लोड) या चालक-मालव त्यांना साह्य करणाऱ्याविरुद्ध पोलिस कर्मचारी विठ्ठल डोके यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पथकातील कर्मचारी कृष्णा घुगे, भुषण चौधरी, व्ही. एस. सोनवणे, विठ्ठल डोके यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images