औरंगाबाद : धर्माच्या आधारे निवडून आलेले पक्ष आता निष्क्रिय ठरत आहेत. जनतेचा अपेक्षाभंग होत आहे. यामुळे अशा पक्षाची निष्क्रियता जनतेसमोर मांडण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेस अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस यांनी 'एमआयएम'चे नाव न घेता केली. काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीची मराठवाडा विभागीय बैठक मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस यांच्या निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, परतूर, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड येथील काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मत हमद चाऊस यांनी मांडले. यावेळी सत्तार इनामदार, बदर चाऊस, फारूख शेख, असिकोद्दिन खतीब, अब्दुल रऊफ, अमजद पठाण, सुलतान हसन, मजीद बागवान, मसियोद्दिन सिद्दिकी, मोईन कुरेशी, साजेद कुरैशी, सरदार खान, नदीम सौदागर, रवी मगरे, शेख मतीन सह खालेद पठाण आणि अकिल पटेल यांची उपस्थिती होती. …अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नदीम जावेद यांची निवड करण्यात आली आहे. ते मुंबईत पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. त्या बैठकीपूर्वी आपल्या जिल्हा, शहर कार्यकारिणी तयार करून देण्याचे आवाहनही चाऊस यांनी केले. …………
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट