म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोन वेळेस मतदारांना यादीमध्ये नाव नोंदवण्याची संधी देण्यात आली. २३ व २४ फेब्रुवारी तसेच २ व ३ मार्च रोजी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेमध्ये निवडणूक विभागाकडे नवीन मतदारांचे १७ हजार १८५ अर्ज आले. आता या अर्जांची छानणी होऊन मतदारांचे नाव पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून 'वोटर व्हेरिफिकेशन अॅण्ड इनफॉर्मेशन प्रोगाम' अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी तसेच २ व ३ मार्च रोजी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी नवीन मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ९९६ अर्ज औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघातून प्राप्त झाले आहेत. तर ५३८ हे सर्वात कमी अर्ज फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आले आहेत. यादीमध्ये नावनोंदणी करण्यासाठी मतदारसंघाच्या प्रत्येक मतदान केंद्रावर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. \Bमतदारसंघनिहाय प्राप्त अर्ज\B मतदारसंघ.................... अर्ज सिल्लोड.......................१४४४ कन्नड.........................१७७५ फुलंब्री.........................५३८ औरंगाबाद (मध्य)...........२९३० औरंगाबाद (पश्चिम)........३९४६ औरंगाबाद (पूर्व)............३९९५ पैठण........................६६३ गंगापूर......................८२१ वैजापूर....................१६७३ ---------------------------. एकूण.....................१७,१८५
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट