टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्यातील सहा लोकसभा मतदारसंघाचे चित्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. या सर्व मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. बीड मतदारसंघातून ३६, परभणीत १७, नांदेड व उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १४, लातूरमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत. या सहा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. \B
नांदेडच्या रिंगणातून ४१ उमेदवार बाहेर
\B
नांदेड: उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघातून ३१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता १४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नांदेडमधून ५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी १० जणांनी गुरुवारी माघार घेतली होती. अशोक चव्हाण (काँग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), अ. रईस अहेमद (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), अब्दुल समद (समाजवादी पार्टी) यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी), मोहन वाघमारे (बहुजन मुक्तीपार्टी), सुनील सोनसळे (बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी), श्रीरंग कदम, अशोक चव्हाण, मनीष वडजे, महेश तळेगाकवर, माधवराव गायकवाड, रंजीत देशमुख व शिवानंद देशमुख (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत.
\Bउस्मानाबादेतून पाच जणांची माघार
\B
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून २३ जणांनी ३७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १४ उमेदवार रिंगणात आहेत. अतुल विक्रम गायकवाड (अपक्ष), अर्चना राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), काकासाहेब बापूराव राठोड (अपक्ष), नवनाथ दशरथ उपळेकर (अपक्ष), बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे (अपक्ष) यांनी शुक्रवारी उमेदवारी मागे घेतली. रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे: राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (शिवसेना), अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पक्ष), दीपक महादेव ताटे (भापसे पार्टी), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (भारतीय बहुजन क्रांती दल), विश्वनाथ सदाशिव फुलसुरे (क्रांतिकारी जयहिंद सेना), तुकाराम दासराव गंगावणे, जगन्नाथ निवृत्ती मुंडे, सय्यद सुलतान लडखान, डॉ. वसंत रघुनाथ मुंडे, नेताजी नागनाथ गोरे, शंकर पांडुरंग गायकवाड, आर्यनराजे किसनराव शिंदे (सर्व अपक्ष). ही माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
\Bबीडमधून १७ जणांची माघार
\B
बीड: बीड लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी अखेरच्या दिवशी १७ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ३६ उमेदवार रिंगणात आहेत. यात राष्ट्रीय पक्षाचे दोन, नोंदणीकृत पक्षाचे आठ आणि २६ अपक्ष उमेदवार असल्याची माहिती निवडणूक जिल्हा निर्णय अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात २३११ मतदान केंद्र व १४ उपमतदान केंद्र असून निवडणुकीसाठी दहा हजार २३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदारांना मार्गदर्शन व तक्रारी नोंदविण्यासाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक १९५०, जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक २२४६०४ कार्यान्वित केला आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आठ असे एकूण ४८ भरारी पथक नियुक्त केले आहेत.
\Bलातूरमधून दोघांची माघार \B
लातूर: लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता या मतदारसंघातून १० उमेदवार अंतिम झाले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामंत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थकुमार दिगंबर सूर्यवंशी (बहुजन समाज पक्ष), अरुण रामराव सोनटक्के (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दत्तू प्रभाकर करंजीकर (बहुजन मुक्ती पार्टी), रुपेश शामराव शंके (स्वतंत्र भारत पक्ष), मधुकर संभाजी कांबळे, पपिता रावसाहेब रणदिवे व रमेश निवृत्ती कांबळे (अपक्ष). ही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आली.
\Bपरभणीतून चौघांची माघार \B
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत १७ उमेदवार राहिले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ पैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. छाननीच्या दिवशी राजा भगदावानदास जोंधळे या उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी दादाराव गणपतराव पंडित, डॉ. धर्मराज चव्हाण व निहाल अहमद कौसडीकर यांनी अर्ज मागे घेतले. शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव, राष्ट्रवादीतर्फे राजेश विटेकर, वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान, भाकपचे राजन क्षीरसागर हे प्रमुख उमेदवार आहेत.
\Bहिंगोलीतून २८ उमेदवार \B
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अर्ज केलेल्या ३४ पैकी सहा उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतली. या मतदारसंघांत आता २८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. इंगोले पिराजी गंगाराम, चक्रधर पांडुरंग देवसरकर, ढोले विठ्ठल नागोराव, डॉ. मनीष वडजे, ॲड. शिवाजीराव जाधव, अॅड. गंगाधर रामराव सावते यांनी माघार घेतली. वानखेडे सुभाष बापुराव (काँग्रेस), हेमंत पाटील (शिवसेना), मोहन फत्तुसिंग राठोड (वंचित बहुजन आघाडी) या प्रमुख उमेदवारांसह २८ उमेदवार रिंगणात आहेत.
\Bमतदान यंत्र वाढणार \B
एका मतदान यंत्रावर १६ नावे बसू शकतात. त्यामुळे परभणी मतदारसंघात १७ व्या उमेदवारासह नोटाचा पर्यायाकरिता दुसरे मतदान यंत्र ठेवावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रात दोन यंत्र दिसणार आहेत. बीड मतदारसंघात ३६ उमेदवार, तर हिंगोलीत २८ उमेदवार असल्यामुळे तेथेही मतदान यंत्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.
\Bप्रमुख उमेदवार \B
\Bनांदेड:\B अशोक चव्हाण (विद्यमान खासदार, काँग्रेस), प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), अब्दुल समद (समाजवादी पार्टी) यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)
एकूण उमेदवार १४
\Bउस्मानाबाद:\B राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर (शिवसेना), अर्जुन सिद्राम सलगर (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान (बहुजन समाज पक्ष)
एकूण उमेदवार १४
\Bबीड:\B डॉ. प्रीतम मुंडे (विद्यमान खासदार, भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रा. विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी)
एकूण उमेदवार: ३६
\Bलातूर:\B मच्छिंद्र गुणाजी उर्फ गुणवंतराव कामंत (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुधाकर तुकाराम श्रृंगारे (भाजप), रामराव नरसिंग गारकर (वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थकुमार दिगंबर सूर्यवंशी (बहुजन समाज पक्ष)
एकूण उमेदवार १०
\Bपरभणी:\B संजय उर्फ बंडू जाधव (विद्यमान खासदार, शिवसेना), राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), राजन क्षीरसागर (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), आलमगीर खान (वंचित बहुजन आघाडी)
एकूण उमेदवार १७
\Bहिंगोली:\B हेमंत पाटील (शिवसेना), सुभाष वानखेडे (काँग्रेस), मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)
एकूण उमेदवार