बीएसयुपी योजनेत ज्यांची घरे बांधून पूर्ण झाली
आहेत, अशा लाभार्थ्यांना ताबा पावती देण्यासाठी मंगळवारपासून झोननिहाय
विशेष शिबिर घेतले जाणार आहे. ताबा पावती हस्तांतरीत होणाऱ्या लाभार्थ्यांना
बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी याच शिबिरात त्यांची माहिती व इतर तपशिल दिला जाणार
आहे. या शिबिरासाठी उप अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सहा क्षेत्रीय कार्यालयात
प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
बीएसयूपी लाभार्थ्यांसाठी आजपासून शिबिर
↧
↧
परभणी, हिंगोली जिल्ह्यात केबीसीने पाचशे कोटींना गंडविले
केबीसीने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पाच
हजारहून अधिक ग्राहकांना पाचशे कोटींना चुना लावल्याचा अंदाज आहे. मोठे जाळे
असलेले एजंट फरार झाले आहेत. सामान्य गुंतवणूकदार मात्र हैराण झाले आहेत. हिंगोलीत
सोमवारपर्यंत विविध पोलिस ठाण्यात ८० तक्रारी दाखल झाल्या आहेत.
↧
सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना अटक
उदगीर तालुक्यातील जायभायचीवाडी गावाशेजारील खरकाडी नदीवर धुणे धुतल्यानंतर
परत येत असलेल्या अल्पवयीन मुलीवर रविवारी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
त्यानंतर पीडित मुलीस विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या
प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करून चार आरोपींना अटक केली आहे.
↧
महायुतीचे सरकार येणार
राज्यात आगामी काळात महायुतीचे सरकार येणार
आहे. याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी रविवारी परंडा येथे पक्षकार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना केले.
↧
उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ प्रकल्प कोरडे
जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसतानाही अपुऱ्या पावसावर धाडसाने तसेच पुढे
मुबलक पाऊस होईल या आशेने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला. सुमारे ५५
टक्के इतक्या पेरण्या उरकल्या. मात्र, पुनर्वसू नक्षत्रातील दोन पावसानंतर पुन्हा पाऊस गायब
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
↧
↧
पालकमंत्री टोपेंचा यंत्रणेवर वचक नाही
जालना जिल्हयातील सरकारी यंत्रणेवर पालकमंत्री राजेश टोपे यांचा वचक नसल्याचा
आरोप बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनी सोमवारी (२१ जुलै) झालेल्या जिल्हा
नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
↧
टंचाई आढावा बैठकीचे निमंत्रण का दिले नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत
झालेल्या टंचाई आराखडा बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्यावरून सोमवारी (२१ जुलै)
झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत आमदारांनी प्रशासनाला धारेवर
धरले. काही आमदारांनी पालकमंत्र्यांनाही त्याबद्दल सवाल केल्याचे सांगण्यात आले.
या मुद्यावरून बैठकीत चांगलाच गदारोळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
↧
कन्नड नगर पालिकेत घंटागाडीचे लोकार्पण
नगरपालिकेकडून कन्नड शहरातील कचरा उचलण्यासाठी तीन घंटागाडीचे नगराध्यक्ष
संतोष कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी (२१ जुलै) लोकार्पण करण्यात आले. कन्नड
शहरातील कचरा उचलण्यासाठी मोठी वाहने आहेत. पण मोठ्या वाहनांमुळे कचरा लगेच उचलला
जात नव्हता.
↧
वीज उपकेंद्राचा प्रस्ताव जागेअभावी धूळखात
महावितरणकडून तालुक्यात खुलताबाद व वडोद येथे
दोन ३३ के. व्ही. वीज उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पण गेल्या पाच
वर्षापासून जागा उपलब्ध होत नसल्याने खुलताबाद येथील उपकेंद्रांचा प्रस्ताव धूळखात
पडून आहे.
↧
↧
शेट्टी म्हणतात, राज्यात आरोग्यक्रांती झाली
‘राज्यात आरोग्य क्रांती झाली आहे. दिल्लीच्या
मोदी सरकारने महाराष्ट्राला आरोग्य क्षेत्रात बेस्ट परफार्मसचा अवॉर्ड दिला आहे.
संपूर्ण देशात आरोग्य क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे,’ असा दावा
आरोग्यमंत्री सुरेश शेटटी यांनी केला. ते जालना येथील स्त्री व बाल रुग्णालयाच्या
नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात सोमवारी (२१ जुलै) बोलत होते.
↧
योजनांचे मार्केटिंग न केल्याने पराभव
‘लोकसभा निवडणुकीत राज्यातील व केंद्रातील
काँग्रेस आघाडी सरकारच्या लोकाभिमुख योजनाची जाहिरात व मार्केटिंग करून लोकांसमोर जाण्यात कमी पडल्यामुळे पराभव झाला,’ अशी उपरती
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांना झाली आहे.
↧
जप्त वाळूच्या लिलावानंतर वाळू तस्करांना मोकळे रान
तालुक्यातील लाखगंगा व बाभुळगावगंगा येथील नदीपात्रातून जप्त केलेल्या ९४०
ब्रास अवैध वाळुचा प्रशासनाने लिलाव केला आहे. या लिलावातून प्रशासनाला नऊ लाख ८५
हजार रुपयांचा महसूल मिळाला, परंतु
हा वाळूसाठा गावातच नदीपात्रालगत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून अवैध
वाळू उपसा करण्यासाठी रान मोकळे झाले आहे.
↧
पाडळीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंच लीलाबाई शेकुजी बनकर
यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव आठ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर करण्यात आला.
तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ग्रामपंचायत
सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.
↧
↧
दूध संकलनात पाच हजार लिटरने घट
पाऊस नसल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होणार
असल्याची भिती व्यक्त होत असताना जिल्हा दूध संघाचे दररोजचे दूध संकलन पाच हजार
लिटरने कमी झाले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली तर, दुधाचे उत्पादन
घटेल, अशी भिती दूध उत्पादकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुधाळ
जनावरे खरेदीसाठी संघाकडून आगाऊ रक्कम घेतलेल्या अनेक सभासदांनी जनावरे खरेदी केली
नसल्याचे समोर आले आहे.
↧
‘गंगापूरचे पथदिवे शनिवारपर्यंत सुरू’
‘सहा महिन्यापासून बंद
असलेले पथदिवे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून येत्या शनिवारपर्यंत सुरू करणार,’ अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. ऑगस्ट
महिन्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
↧
फुलंब्रीतील कापूस उत्पादक पावसाअभावी अडचणीत
पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरीही तालुक्यात
यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे कापूस उत्पन्नात अग्रगण्य समजल्या
जाणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पावसाला उशीर
झाल्यामुळे तालुक्यात केवळ ७८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात २०
जुलैपर्यंत फक्त ९७ मिलि मीटर पाऊस पडला आहे.
↧
बंदी असूनही नगर जिल्ह्यात मोटारी सुरू
जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू न झाल्याने
धरणातील शिल्लक पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासनाने सिंचनासाठी धरणातून विद्युत
मोटारीद्वारे पाणी उपसा करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. परंतु शेजारील नगर
जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यांतील शेकडो शेतकरी अद्यापही विद्युत
मोटारीव्दारे जायकवाडीतून पाणी उपसा करीत आहेत.
↧
↧
ज्येष्ठ नागरिक संस्थेत गुणवंतांचा सत्कार
प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे
नुकतेच दहावीमध्ये ८५ टक्के तसेच बारावीमध्ये ९० टक्के गुण घेणाऱ्या गुणवंतांचा
सत्कार करण्यात आला. गीताभवनमध्ये हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
↧
... म्हणून सर्वांवर सारखे प्रेम करा !
कितीतरी निर्जीव वस्तुंनी आपले जीवन सुखकारक
केले आहे. त्यामुळे आपली सगळी कामे सोपी झाली आहेत. प्रत्येक सजिवांना जशी आपण
केलेल्या कामाची पोच देतो. प्रसंगी समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर कौतुकाची थाप
मारतो. तशाच थापेची गरज निर्जीव वस्तुंनाही असतेच की.
↧
एन. ए. चे पैसे व्याजासह परत देण्याची मागणी
सातारा परिसरातील एन ए ४५ मध्ये बांधलेली बांधकामे नियमित करण्यासाठी ३
वर्षापूर्वी येथील रहिवाशांकडून १,४४५ रुपयांप्रमाणे लाखो रूपये जमा करण्यात आले. परंतु
त्याचे पुढे काय झाले याचे ठोस उत्तर ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालय देत
नाही.
↧
More Pages to Explore .....