Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रहाटकर

$
0
0
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी महापौर विजया रहाटकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने मोठी संधी दिली असून महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण टीमवर्क करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

घोसाळकरांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत फुटीची शक्यता

$
0
0
विधानसभेची उमेदवारी जाहीर होण्याअगोदर संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांच्या वागणुकीमुळे पैठण तालुक्यात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप करीत पैठणमधील कार्यकर्त्यांनी वेगळा गट स्थापन करून स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सिंचन विभागात गैरव्यवहार

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी आलेल्या निधीत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे शनिवारी (१६ ऑगस्ट) उघड झाले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांनी पुराव्यानिशी स्थायी समितीच्या बैठकीत हा गैरप्रकार उघड केला.

मुख्यमंत्री फोटोसेशनात व्यस्त

$
0
0
अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फोटोसेशन करत आहेत अशी टीका आमदार तथा शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्‍हे यांनी केली.

शिक्षण विभाग विकला गेला!

$
0
0
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षण विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरात नियमबाह्य कामांचे कहर केल्याचे शनिवारी (१६ ऑगस्ट) जिल्हा परिषद सदस्यांनी उघडकीस आणले.

सुपर पॉवरचा अकाउंटंट गजाआड

$
0
0
गुंतवणुकीवर दामदुप्पट पैसा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया कंपनीच्या अकाउंटंटला गुन्हे शाखेच्या पोलिसांना शनिवारी पकडले.

...तर मतदानावर बहिष्कार

$
0
0
एलबीटी की, जकात हा प्रश्न राज्य सरकारने पालिकांच्या कोर्टात सोपविला आहे. पालिकेकडून जकात लादण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा निर्णय आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखा आहे. जकात लादली तर, विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा व्यापारी, उद्योजकांनी दिला.

युवक काँग्रेसकडून १३ जागांची मागणी

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर चिंतेत असलेल्या काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने वाढीव जागा मागून आणखी अडचणीत आणले आहे. त्यात भरीस भर म्हणून युवक काँग्रेसनेही १३ जागांची मागणी रेटली आहे.

तरुण शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या

$
0
0
तालुक्यातील दिन्नायतपूर येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पंधरा दिवसांतली ही दुसरी घटना आहे. गजानन गणेश पाचोडे (वय २०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

माजलगावात उमेदवारीसाठी रस्सीखेच

$
0
0
बीड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूक जशीजशी जवळ येवू लागली आहे तसा राजकीय घडामोडीला वेग येऊ लागला आहे. माजलगाव मतदारसंघात विद्यमान आमदारा विरोधात राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्र आले आहेत.

बँकेच्या मनमानीमुळे शेतकरी अडचणीत

$
0
0
शेतकऱ्यांचे हित जोपासण्याकामी सदैव तत्पर व अग्रेसर असणाऱ्या राज्यातील काही जिल्हा सहकारी बँकांची स्थिती कुपोषित बालकासारखी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्जासाठी नाईलाजाने राष्ट्रीयीकृत बँकांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत.

मराठवाडा अद्यापही कोरडाच

$
0
0
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या १६ टक्के पाणीसाठा असून संपूर्ण विभागातील इतर प्रकल्पांमध्ये फक्त १९ टक्के पाणी शिल्लक आहे. या परिस्थितीत संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या छायेत आहे.

३६५ दिवस ५,००० तास घेतले सेवेचे व्रत

$
0
0
‘निःस्वार्थ सेवा’ हा शब्द आजच्या काळात अडगळीत पडला आहे. याला अपवाद ठरलेत, ते हेडगेवार रुग्णालयातील सेवाव्रती. रुग्णालयाच्या विभागांत सेवाव्रतींचे असे काही सुरेख जाळे विणलेले आहे, की ती एखादी शास्त्रोक्त सिस्टीम वाटावी. आश्चर्याची बाब म्हणजे, ही सिस्टीम राबवणारे आहेत साठीपासून ते नव्वदीपर्यंतचे सळसळत्या रक्ताचे ‘तरूण.’

मका, कापूस पिकाच्या शेवटच्या घटका

$
0
0
जिल्ह्यात सलग ३६ दिवस पाऊस पडला नसल्यामुळे खरीप पिके शेवटची घटका मोजत आहेत. जिल्ह्यात ९५ टक्के पेरणी झाली असून पिकांना पाण्याची गरज आहे. कडधान्यानंतर मका आणि कापूस ही मुख्य पिके हातची जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

बरखास्तीचे स्वागत अन् नव्या संस्थेकडून अपेक्षाही

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन मंडळाच्या बरखास्तीचे संकेत दिले असून, त्याऐवजी नवी संस्था सुरू करण्याचे जाहीर केले आहे. नियोजन मंडळाच्या बरखास्तीचे शहरातील काही अर्थतज्ज्ञांनी स्वागत केले आहे, तर पंडित नेहरूंनी सुरू केलेली योजना नवीन सरकार मोडित काढत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उमाप टोळीने फोडली होती कानपूरची बँक

$
0
0
कुख्यात उमाप टोळीने शहरात येण्याच्या तीन दिवस आधी कानपूर येथील मध्यवर्ती सहकारी बँक फोडल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात साडेआठ लाखाची रक्कम लांबवण्यात आली होती. या टोळीचा पसार साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

बेजबाबदारीचे ‘धडे’

$
0
0
‘हे विद्यापीठ शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी कार्य करते’ असे लिहिलेली विद्यापीठ गेटवरील पाटी आता नाहीशी झाली असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा दावा सोडलेला नाही. परंतु हे विद्यापीठ सध्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे.

चुकीच्या धोरणामुळे दुष्काळ

$
0
0
राज्यातील चुकीचे जलनियोजन व विकास धोरण हेच मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीसाठी कारणीभूत असल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी केली. ते रविवारी (१८ ऑगस्ट) आयोजित पत्रकारपरिषदेमध्ये बोलत होते.

वर्षभरानंतर एकदिवसाआड पाणी

$
0
0
‘गेल्या सात वर्षांपासून औरंगाबादवासियांसाठी स्वप्नवत वाटणारा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या दिशेने अंतिम पाऊल पडले आहे. तीन वर्षांत शहर टँकरमुक्त होईल. पुढील वर्षभरात औरंगाबादवासियांना एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल,’ असा दावा महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी रविवारी (१६ ऑगस्ट) केला.

आयुक्तांचे योगदान शून्य

$
0
0
समांतर जलवाहिनी व भूमिगत गटार या योजना मी केंद्रातून खेचून आणल्या. यूपीए सरकारच्या काळात जयपाल रेड्डी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळोवेळी भेटून योजना मंजूर करून आणली. इकडे आयुक्त मात्र योजनेविषयी सांगतात.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images