Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

क्रीडा क्षेत्रापासून फारकत!

$
0
0

सुधीर भालेराव, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध नागरी प्रश्नांची चर्चा होत आहे. पक्के रस्ते, मुबलक पिण्याचे पाणी, स्वच्छता या सुविधांइतकेच क्रीडा क्षेत्राचे महत्त्व आहे. मात्र, क्रीडा सुविधांचे आधुनिकीकरण करण्याबाबत लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसत नाहीत. मावळत्या महापालिकेच्या सभागृहात जवळपास वीस नगरसेवक हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित असूनही, क्रीडा क्षेत्राला चालना देणारा एकही मोठा निर्णय घेतलेला नाही.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकेत क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व दिले आहे. या शहरातील महापालिका सातत्याने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देतात. महापौर करंडक स्पर्धेच्यानिमित्ताने या महापालिका नेहमी चर्चेत राहातात. क्रीडा क्षेत्रासाठी या महापालिका बजेटमध्ये मोठी तरतूदही करतात. साहजिकच या महापालिकांशी औरंगाबाद महापालिकेच्या क्रीडा क्षेत्रातील कामांची तुलना होते. या तुलनेत औरंगाबाद महापालिका सर्वात पिछाडीवर आहे. औरंगाबाद महापालिकेची स्थापना झाल्यापासून क्रीडा क्षेत्राशी आपला फारसा संबंधच नाही, अशा पद्धतीने महापालिकेचे क्रीडा क्षेत्रातील काम राहिले आहे. शहरात एका मोठ्या क्रीडा संकुलाची गरज आहे, हे लक्षात घेऊन गरवारे कंपनीने चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत क्रीडा संकुल उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त असलेले कृष्णा भोगे यांनी या प्रोजेक्टमध्ये रस दाखवला आणि महापालिका-गरवारे क्रीडा संकुलाची उभारणी झाली.

क्रीडा संकुलाची उभारणी केल्यानंतर या संकुलातील क्रीडा सुविधांकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही. दरवर्षी बजेटमध्ये तरतूद करण्याची गरज असतानाही क्रीडा संकुलासाठी फारशी तरतूद केली गेली नाही. त्यामुळे गरवारे क्रीडा संकुलाची सद्यस्थिती ही एखाद्या जुन्या वाड्यासारखी झाली आहे. क्रिकेट मैदानाबाबत वेळोवेळी डागडुजी करून वेळ निभावून नेली जाते. या संकुल परिसरातच जलतरण तलाव बीओटीवर उभारण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, तलावाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच हा प्रकल्प अडचणीत सापडला. गेल्या काही वर्षांपासून हा तलाव अर्धवट स्थितीतच आहे.

दोनच क्रीडा संकुले

गरवारे क्रीडा संकुलाची उभारणी झाली त्यावेळी ते शहरातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान होते आणि आजही इतर मैदानांपेक्षा ते मोठेच आहे. तरीही या संकुलाच्या सुविधांचे आधुनिकीकरण करण्याबाबत कधीही गांभीर्याने महापालिका सभागृहात चर्चा झालेली नाही.

हे क्रीडा क्षेत्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. क्रिकेटच्या मैदानाचा उपयोग अनेक वर्षे विवाह सोहळे व इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी होत होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग मात्र क्रीडा संकुलातील सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी कधीही केला गेला नाही. पर्यायाने संकुलातील क्रीडा सुविधांची धुळधाण उडाली. बॅडमिंटन कोर्ट पूर्णतः उखडले आहे. इनडोअर हॉलची सद्यस्थिती पडक्या वाड्यासारखी झाली आहे. या संकुलाच्या विकासाकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही अथवा कधीही सभागृहात गंभीरतेने चर्चाही झाली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

महापौर क्रीडा स्पर्धा

काही वर्षांपूर्वी महापौर करंडक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत होते. मात्र, काही खेळांचा अपवाद वगळता आता या स्पर्धाही घेतल्या जात नाहीत. या स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन शहरात करण्याकरिता महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा.

नागरी क्रीडा केंद्रांची दुर्दशा

महापालिका क्षेत्रात ११३ वॉर्ड तयार करण्यात आले असले, तरी केवळ दोनच क्रीडा संकुले महापालिकेने उभारले आहेत. त्यात गरवारे क्रीडा संकुल आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल या दोन संकुलाचा समावेश आहे. या शिवाय शहरात विविध भागांत एकूण सहा नागरी क्रीडा केंद्रे आहेत. सिडको एन-५, सिद्धार्थ जलतरण तलाव, बन्सीलालनगर, ज्योतीनगर, सिडको एन-३ टेनिस मैदान, एम-२ कम्युनिटी सेंटर, सिडको टाऊनसेंटर या ठिकाणी ही नागरी क्रीडा केंद्रे चालवली जातात. सिद्धार्थ जलतरण तलावाचा अपवाद वगळता इतर क्रीडा सुविधांची स्थिती फारसी समाधानकारक नाही. बहुतेक ठिकाणी खेळाडू, क्रीडा संघटकच आपापल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून सराव करतात.

दर्जा उंचावण्याची गरज

२००३-०४ पासून आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही महापालिकेकडे आलेली आहे. शालेय स्पर्धांसाठी दरवर्षी साधारणः पाच लाखांची तरतूद करण्यात येत होती. गतवर्षी ही तरतूद दहा लाख रुपयांपर्यंत पोहचली. शालेय स्पर्धा आयोजन करताना या स्पर्धेतील खेळाडूंना अपेक्षित सुविधा पुरवण्याबाबत कधीही गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ स्पर्धा उरकरण्यावर भर दिसून येतो. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरही त्यांचा विपरित परिणाम होतो.

शाळा ७७, क्रीडा शिक्षक ६

महापालिकेच्या शहरात एकूण ७७ शाळा आहेत. बहुतेक शाळांना क्रीडांगणे नाहीच. शिवाय अवघे सहा क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील एक-दोन क्रीडा शिक्षकांचा अपवाद वगळता हे क्रीडाशिक्षकही अन्य कामांत व्यस्त असतात. या ७७ शाळांमध्ये जवळपास १७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी हे शिक्षक घेतात. या मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही असे चित्र आहे. मैदानच नाही म्हटले तर क्रीडा साहित्य असण्याच्या प्रश्नच उपस्थित होत नाही. या विषयाची आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही.

मुंबईत महापालिकेच्या मालकीची अनेक मैदाने आहेत. क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याकडे तिथे खूप जागरुकता दिसून येते. औरंगाबादेत मात्र, क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा, साहित्य देण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. हॉकी, अॅथलेटिक्स ट्रॅक्स, कबड्डी, खोखो, व्हॉलिबॉल अशा खेळांची क्रीडांगणे तयार करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. क्रीडा क्षेत्राला चालना देण्याकरिता खेळांसाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी.

- वीरेंद्र भांडारकर, उपसंचालक, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र.

महापालिका हद्दीत अनेक खुली मैदाने आहेत. मात्र, या जागांचा विकास झालेला नाही. प्रत्येक वॉर्डात एक खुले मैदान खेळासाठी विकसित करण्याचे लक्ष्य लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे. मुले, युवक-युवती खेळाकडे वळतील आणि त्यामुळे क्रीडा संस्कृती विकसित होईल. तसेच युवा वर्ग व्यसनाधिनतेपासून दूर होण्यास मदत होऊ शकेल. राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराप्रमाणेच महापालिकेने शहरातील गुणवान खेळाडूंचा गौरव करण्याकरिता पुरस्कार द्यावेत. उदयोन्मुख खेळाडूंना मदत कारवी. त्यासाठी महापालिकेने बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे.

- डॉ. उदय डोंगरे, क्रीडा संचालक, विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोहट्यातील प्रकार सतीचा नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लोहटा (ता. औसा) गावात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पती-पत्नीच्या मृत्यूचा प्रकार दुर्घटना असल्याचे मत महिला आयोगाच्या सदस्या आशा भिसे यांनी व्यक्त केले. हा प्रकार सती जाण्याचा नसल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी म्हटले आहे.

बुधवारी डॉ. चव्हाण व भिसे यांनी लोह‌टा गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांची मते जाणून घेतली. डॉ. चव्हाण म्हणाले, 'लोहट्याचे तुकाराम माने यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी उषा माने यांचा अर्धवट जळालेला मृतदेह तुकाराम यांच्या चितेजवळ सापडला. तो तिथे कसा, केव्हा आला याबाबत कुणालाही माहिती नाही. जेव्हा ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा उषा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाहीत. त्यामुळे सध्या अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.'

भिसे यांनी अॅड. श्रीकांत सूर्यवंशी, चक्रधर शेळके यांच्यासह लोहटा गावाला भेट दिली. माने दाम्पत्याच्या घरी जाऊन नातेवाईक, मुलांचे सांत्वन केले. भिसे म्हणाल्या, 'माने दाम्पत्य दोघेच गावात राहत होते. त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी राहतात. त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. या दुर्घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. गावकरीही बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदाराविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आण्णासाहेब माने यांच्याविरोधात जालना येथील वीजवितरण पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. थकबाकीपोटी गंगापूर येथील शांताई उपसा सिंचन सहकारी संस्थेचा वीजपुरवठा वीजवितरण कंपनीने खंड‌ित केला होता. विनापरवाना व थकबाकी न भरता परस्परच वीजजोडणी करून वीजचोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

याघटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर जि. औरंगाबाद येथील जुने जामगाव येथे शांताई उपसा सिंचन सहकारी संस्था असून या संस्थेकडे वीज बिलापोटी दोन लाख ५९ हजार रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीपोटी वीजवितरण कंपनीकडून डिसेंबर २०१३ मध्ये या संस्थेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यानंतर संस्थेने विनापरवाना व थकबाकी न भरता परस्परच वीजजोडणी करून घेऊन वीज वापरण्यास सुरवात केली होती. दरम्यान, येथे नव्यानेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर हे ३० मार्च रोजी सायंकाळी रूटीन चेकींग करीत असताना सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

याप्रकरणी उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जालना येथील वीजवितरण विभागाच्या पोलिस ठाण्यात शांताई उपसा सिंचन सहकारी संस्थेच्या चेअरमनविरोधात वीजचोरी प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार के. जी. कदम हे करीत आहेत.

थकबाकीपोटी डिसेंबर २०१३ मध्येच शांताई उपसा सिंचन सहकारी संस्थेवर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु, संस्थेचे चेअरमन यांनी विनापरवाना व थकबाकी न भरता खंडीत केलेला वीजपुरवठा परस्परच परत जोडणी केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यानच्या काळात संस्थेने सुमारे तीन लाख युनीट पेक्षा अधिक वीजचोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रिपोर्ट आल्यावरच वीजचोरीचा अधिकृत आकडा समोर येईल.

- प्रशांत तोडकर, उपकार्यकारी अभियंता व तक्रारदार

याप्रकरणी वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यानी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित संस्थेच्या चेअरमनविरोधात वीजचोरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- के.जी. कदम, सहाय्यक फौजदार, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल योजनेचे १० कोटी परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

एकात्मिक झोपडपट्टी घरकुल विकास योजनेतंर्गत सहा वर्षापूर्वी उस्मानाबाद नगरपालिकेला दहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, गेल्या सहा वर्षात या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात उस्मानाबाद पालिका अयशस्वी ठरली. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार दहा कोटी रुपये आणि त्यावरील व्याज सहा कोटी रुपये असे एकूण १६ कोटी रुपये राज्य शासनाला साभार परत करण्याची पाळी उस्मानाबाद नगरपालिकेवर आली.

उस्मानाबाद नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आणि पदाधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे २००९ मध्ये उस्मानाबाद नगरपालिकेच्या दारी आलेली ही घरकुल विकास योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. परिणामी या योजनेसाठी आलेली ही रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे. २००९ मध्ये एकात्मिक झोपडपट्टी घरकुल विकास योजनेसाठी म्हणून आलेली ही दहा कोटीची रक्कम तातडीने घरकुलासाठी खर्ची करणे शासनाला अपेक्षित होते. मात्र, उस्मानाबाद नगरपालिकेने तसे केले नाही.

चार-पाच वर्षानंतर शासन हा निधी विसरून जाईल आणि या निधीचा विनियोग आपल्या सोईनुसार करता येईल असे पालिकेला भासत होते. सदरील विनियोग न केलेला निधी शासनाला स्वतःहोवून परत करावा असे ही या पालिकेला कधी वाटले नाही. घरकुल योजनेची कामे हाती घ्यावीत यासाठी नगर पालिकेतील सत्ताधारी व विरोधी नगरसेवक देखील फारसे आग्रही दिसले नाही. परंतु, शेवटी शासनाकडूनच हा निधी परत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हा निधी शासन दरबारी परत पाठविण्यात आला आहे.

घरकुलाची कामे नगरपालिकेने वेळेवर केली असती तर निधी परत करण्याची पाळी आली नसती. उस्मानाबाद नगरपालिकेत मला येवून अद्याप एक वर्षही झालेला नाही. माझ्या अगोदरच्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील हा उपक्रम आहे.

शशी मोहन नंदा

- मुख्याधिकारी, नगरपालिका, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडकेत तीन जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद-तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि टमटमची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह टमटम चालकांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सिद्धेश्वर वडगावजवळ घडली. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उद्देश राठोड, चंद्रकाला आवटे, अनिता मार्तंड (सर्व जण रा. बावी ता. उस्मानाबाद) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी दुपारच्यावेळी कंटेनर ( क्र. एमएच ४६ एच ७८७८) व टमटम ( क्र. एम. एच. २५ एफ १५७७) या वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर टमटम ५० फुट लांब खरडत गेला होता. त्यामुळे टमटम (सहा आसनी रिक्षाचा) चक्काचूर झाला होता. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. बंटी खंडाळे, अर्चना शिरसट, निर्मला लगदिवे, सुवर्णा लगदिवे, सुभाष बनसोडे, ज्योती शिरसट, जयश्री खंडागळे, अजित पवार अशी जखमींची नावे आहेत.

या अपघातात जखमी झालेल्यांना त्वरीत उपचारासाठी उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने गावकरी व पोलिस पोहचल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गुंडांना तलवारींसह अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एका वीटभट्टी मजुराच्या अपहरणाचा डाव तालुक्यातील तुळजापूर येथील गावकऱ्यांनी उधळून लावला. याप्रकरणी पैठण पोलिसांनी बारामती तालुक्यातील पाच गुंडांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ शस्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर येथील एका वीटभट्टी मजुराचे काहीजण अपहरण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी एम. एच. ४२, के १६२७ या क्रमांकाच्या स्कार्पिओ कारला ट्रक्टर आडवे अडवले. कारमधील पाच गुंडांच्या तावडीतून त्या वीटभट्टी मजुराची सुटका करून घेतली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलिसांनी घटनास्थळी जावून अजित बाळासाहेब बेलदार, राजेंद्र लक्ष्मण माने, अमोल राघू बिसे, मोहन बाबुराव कचरे व नवनाथ अनिल कदम (सर्व रा.तांदुळवाडी ता. बारामती) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांचे वाहन तपासले असता तलवारी व अन्य घातक शस्रे आढळली. शस्र बाळगल्याप्रकरणी या पाच जणांविरुद्ध पैठण पोलिसात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

अपहरणाची सुपारी

तुळजापूर येथील एका वीटभट्टी मजुराने गेवराई येथील वीटभट्टी मालकाकडून कामाची उचल घेतली होती. तो कामाला जात नसल्याने गेवराई येथील वीटभट्टी मालकाने त्याच्या अपहरणाची सुपारी बारामती येथील गुंडांना दिल्याची चर्चा तुळजापूरच्या गावकऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम.जी.एम.विरोधात याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशनकडून (एमजीएम) सिडकोने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर होत आहे. सिडकोने चौकशी करून एमजीएमवर कारवाई करण्यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यास १०हजार रुपये भरण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी भीमसेनाचे अध्यक्ष विशाल कडुबा पाखरे व संजय बापूराव चव्हाण यांनी ही याचिका केली आहे. एमजीएमला भूखंड क्लब, स्टेडियम आणि शैक्षणिक बाबींसाठी देण्यात आला आहे. या भूखंडाचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे, तेच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. क्लब, स्टेडियम आणि जिमखान्याऐवजी एमजीएम परिसरात शाळा, हॉस्पिटल आणि हॉटेल चालविले जाते. स्टेडियम व क्लबच्या भूखंडाच्या जागेचा मूळ वापर बदलून वाणिज्य व व्यावसायिक वापरासाठी आलिशान हॉटेल, कॅफे, खादी व पैठणी केंद्र, जलतरण तलाव आणि पेट्रोल पंप सुरू केला आहे.

सिडकोने शपथपत्र दाखल केले आहे. यास उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी २ आठवडयाची वेळ मागितली. त्यास कोर्टाने मंजुरी दिली. याचिकाकर्त्यातर्फे बी. एल. सगर -किल्लारीकर, एम. बी. संदानशिव यांनी बाजू मांडली. सिडकोतर्फे अनिल बजाज, एमजीएमतर्फे वरिष्ठ वकील आर. एन. धोर्डे, महापालिकेतर्फे संजय पगारे हे काम पाहत आहेत. या याचिकेची १३ एप्रिल रोजी होणार आहे.

व्यावसायिक बाबी बंद करण्याची विनंती

एमजीएमला दिलेल्या भूखंडावरील व्यावसायिक बाबी ताबडतोब बंद करा, चालू असलेली बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपाइंची २४ तासांची डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या २४ तासांत महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय घ्यावा. अन्यथा वेगळी चूल मांडू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी शिवसेना व भारतीय जनता पक्षाला दिला आहे. किमान पंधरा जागा मिळाल्याच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. महापा‌िलकेसाठी शिवसेना-भाजपमध्येच अजून युती झाली नाही, त्यापूर्वीच रिपाइंने हा इशारा दिला आहे.

भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याआधाची या दोन्ही पक्षानी ११३ जागासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत एकमेकांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पावलांवर पाऊल ठेवत रिपाइंनेही गुरुवारी (१६ एप्रिल) हॉटेल कार्तिक येथे ३५ वॉर्डांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अशी माहिती प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली. निवडणूक समितीचे मिलिंद शेळके, दौलत खरात, संजीव ठोकळ, प्रियानंद शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

या जागा हव्यात

भगतसिंगनगर-म्हसोबानगर (वॉर्ड २), रोजाबाग-भारतमातानगर (वॉर्ड १०), पहाडसिंगपुरा-बेगमपुरा ( वॉर्ड १२),नंदनवन कॉलनी-शांतीपुरा (१७), एमआयडीसी चिकलठाणा (वॉर्ड ३८), अयोद्धानगर (वॉर्ड ३९),कोतवालापुरा-गरमपाणी (वॉर्ड ५०), समर्थनगर (वॉर्ड ६८), कोकणवाडी ( वॉर्ड ७४), शिवशंकर कॉलनी-बालाजीनगर (वॉर्ड ७४) किंवा बौद्धनगर (वॉर्ड ७५) यापैकी एक. संजयनगर (वॉर्ड ८४), संजयनगर-मुकुंदवाडी (वॉर्ड ८५), विठ्ठलनगर (वॉर्ड ८७), चिकलठाणा (वॉर्ड ८९), प्रियदर्शनी इंदिरानगर (वॉर्ड १११) किंवा भारतनगर शिवाजीनगर (वॉर्ड ११३) यापैकी एक जागा.

३२ जागांची यादी सेना-भाजप नेत्यांकडे दिली आहे. त्यापैकी किमान १५ जागा रिपाइंला मिळाल्या पाहिजेत. दोन्ही पक्षनेत्यांशी यापूर्वी चर्चा झाली आहे. काही जागा सोडण्याबाबत तयारीही दर्शवली आहे, परंतु निवडणुकीसाठी कमी कालवधी शिल्लक असल्याने जागा वाटपबाबत येत्या २४ तासांत निर्णय घ्यावा. अन्यथा वेगळा विचार करू.

- बाबूराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष, रिपाइं

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घुमानच्या संमेलनावर टीकेची झोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घुमान (पंजाब) येथील नियोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि साहित्यिक गुरुवारी (२ एप्रिल) विमानाने रवाना झाले. तीन ते पाच एप्रिल दरम्यान संमेलन होणार आहे. संमेलनात साहित्यिकांना संधी देण्याऐवजी मसापचे पदाधिकारी स्वतःचे नाव यादीत घुसवून मक्तेदारी निर्माण करीत असल्याची टीका साहित्य वर्तुळात सुरू आहे.

घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेचा चमू विमानाने रवाना झाला. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे, देविदास कुलकर्णी, डॉ. दासू वैद्य, पी. विठ्ठल, सुनंदा गोरे, प्रा. ललित अधाने आणि प्रा. ज्योती अधाने यांचा त्यात समावेश आहे. दिल्लीहून सर्वजण घुमानला बसने जाणार आहेत. शहरातील साहित्यप्रेमी सोमवारी रात्री रेल्वेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनासाठी साहित्यिकांची नावे सूचवण्यास कळवले होते. दरवर्षीप्रमाणे मसापच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःची नावे घुसवली आहेत, अशी टीका प्रकाशक श्रीकांत उमरीकर यांनी केली. इतर साहित्यिक व कवींना संधी देण्याऐवजी स्वतःच घुसखोरी करीत आहेत. परिसंवाद आणि कविसंमेलनातील सहभागी साहित्यिकांचा वकुब पाहिल्यास त्यांना संधी कशी मिळाली, असा प्रश्न पडतो असेही उमरीकर यांनी म्हटले आहे. याबाबतची पोस्ट दोन दिवसांपासून सोशल साइट्सवर गाजत आहे.

साहित्य‌िकांचे टीकास्त्र

घुमान येथील साहित्य संमेलनात दलित, भटके-विमुक्त, आदिवासी आणि पददलितांचे साहित्य आणि संस्कृतीवर एकाही परिसंवादात चर्चा नाही. संमेलन अखिल भारतीय असेल, तर सर्व घटकांना संधी देणे आवश्यक आहे, असे म्हणत शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी संमेलनाचा निषेध केला आहे. याबाबत प्रा. मोहन सौंदर्य, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. युवराज धबडगे, प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. मिलिंद वाव्हळे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे निषेध नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या सूचनेवरून टोलनाका बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

लासूर येथील टोल नाक्याची मुदत ३१ मार्चअखेर संपल्यानंतरही टोलवसुली सरू असल्याने आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांनी गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी टोल वसुली बंद पाडली. लासूर टोलनाका दहा वर्षांपासून नियमांचे पालन न करता सुरू आहे, असा आमदार बंब यांचा आरोप आहे. हा रस्ता हडस पिंपळगाव, बोर दहेगाव या गावाजवळ रस्ता खराब असूनही एमएसआरडीसीमार्फत टोलवसुली सुरू होती.

आमदार बंब यांनी दोन दिवसांपूर्वी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना या पत्र पाठवून ३१ मार्च रोजी संपणार असून या टोल बंद करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रानंतरही वसुली सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी टोलनाका बंद पाडला. यावेळी रज्जाक पठाण, संतोष वाकळे, विनोद वाकळे, दिनेश वरकड, संजय पाटील, बाबासाहेब नरोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्याच्या अपहरणाचा रोशनगेट भागात प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोशनगेट भागातील अरिष कॉलनीतून पत्रकाराच्या दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न बुधवारी (१ एप्रिल) करण्यात आला. तीन अनोळखी व्यक्तींनी मुलाचे वडील व काकांनी फोटो काढण्यासाठी बोलावल्याची थाप मारली. परंतु, मुलाच्या आईने प्रसंगावधान दाखविल्यामुळे त्या तिघांनी धूम ठोकली.

अरिष कॉलनी भागात टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार मोहमद आकेफ हे पत्नी इफत फातेमा व मुलगा अशाज (वय २ वर्षे) यांच्या सोबत राहतात. अरिष कॉलनी परिसरातील वीज पुरवठा बुधवारी रात्री (१ एप्रिल) खंडित झाला होता. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी दार वाजवले. तेव्हा घरात इफत फातेमा व अशाज दोघेच होते. इफत यांनी लगेच दार न उघडता दुर्बिणीतून पाहिले असता तीन जण दिसले. त्यांनी अशाजचा फोटो आयडी काढायचा असून त्याला आकेफ व त्यांचे दीर आमेर यांनी बोलावल्याचे सांगितले. त्यांनी विचारूनही नावे सांगितले नाहीत. त्यामुळे संशय आल्याने इफत फातेमा यांनी पतीला फोन करते असे सांगून गॅलरीतून भाडेकरूंना बोलावले. हे लक्षात येताच तिघांनी दुचाकीवरून पलायन केले. दरम्यान याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरवाडीतही घेतला शोध

मोहम्मद आकेफ यांची एन आठ परिसरात सासरवाडी आहे; त्या तिघांनी अरिष कॉलनीत येण्यापूर्वी अशाजचा तेथे शोध घेतला. त्यांच्या वृद्ध आजीसासूंकडे अशाजची चौकशी केली. घरात कसे आलात, अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा किंग जोशींच्या याचिका फेटाळल्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नांदेड पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला गुटखा किंग जगदीश जोशी यांनी आव्हान दिलेल्या तीन याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या.आय. के.जैन यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे पोलिसांना जोशी यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात गुटखा बंदी असतानाही नांदेड जिल्ह्यात गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून नांदेड गुन्हे शाखेने विविध ठिकाणी कारवाई करून गोवा, बाबा,आरएमडी, माणिकचंद अशा विविध कंपन्यांचा दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्तकेला. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाणे ,कंधार व हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक रोहित सावंत यांनी विविध गुटखा कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटीस बजावल्या. गोवा गुटखा ब्रॅण्ड असलेल्या जेएमजी ग्रुपचे मालक जगदीश मोहन जोशी (रा. मुंबई) वगळता अन्य मालकांचे जबाब पोलिसांनी नोंदविले; मात्र जगदीश जोशी यांनी पोलिसांच्या नोटीसला उत्तर देऊन खंडपीठात आव्हान दिले. गुटखा विक्रीशी आपला संबंध नसल्याने नोटीस रद्द करावी अशी विनंती केली. सुनावणीत सरकारतर्फे आर. के. लड्डा यांनी बाजू मांडली. त्यानंतर खंडपीठाने पोलिसांना फौजदारी संहितेच्या कलम ४१ (अ) अन्वये चौकशीचा अधिकार आहे, त्यामुळे पोलिस चौकशी करू शकतात असा निर्वाळा देऊन जगदीश जोशी यांनी दाखल केलेल्या तीनही याचिका फेटाळून लावल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अट्टल सातपुते’ जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१ एप्रिल) दुपारी शहानूरमिया दर्गा चौकात करण्यात आली. या टोळीतील सदस्यांवर सव्वाशे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहानूरमिया दर्गा परिसरातील पाकिजा रसवंतीमागे काही संशयीत आरोपी एकत्रित आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी हे सातही आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सचिन चंद्रकांत त्रिभूवन (रा. हर्षनगर), अजय रमेश ठाकूर (रा. साईनगर), रवी रमेश गायकवाड (रा. ब्रिजवाडी), सिद्धार्थ रमेश गायकवाड (रा. कबीरनगर), दीपक चंद्रभान क्षीरसागर (रा. मिलींदनगर), ईश्वर महादेव गावडा (रा. टाऊन हॉल) व अनिल फुलचंद लाहोट (रा. गांधीनगर) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, हॅक्सॉ ब्लेड, बॅटरी, पक्कड, मिरची पावडर व रोख ५५० रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अण्णासाहेब शेजूळ, सहायक फौजदार शेख आरेफ व पथकाने केली.

गुन्हे वेगळे तरी एकत्र

पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांची गुन्ह्याची पध्दत वेगवेगळी आहे. ते वेगवेगळ्या परिसरातील रहिवासी असून हद्दपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. तरीही हे गुन्हेगार एकत्र आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आरोपी दाखल गुन्हे गुन्ह्याचे स्वरूप

सचिन त्रिभूवन १७ खून, जबरी चोरी, दरोडा

अजय ठाकूर २४ घरफोडीच्या गुन्ह्यात तरबेज

रवी गायकवाड १३ चोरी व घरफोडी

सिद्धार्थ गायकवाड १६ घरफोडी, जबरी चोरी व दरोडा

दीपक क्षीरसागर ३१ चोरी, घरफोडी व जबरी चोरी

ईश्वर गावडा १४ घरफोडी, चोरी

अनिल लाहोट ११ घरफोडी, चोरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीनगर होणारच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे औरंगाबादेच नाव संभाजीनगर होणारच, असे सांगत भाजप नेत्यांनी भावनिक मुद्याचा आधार घेतला आहे. वॉर्डातून उमेदवारी कोणा एकालाच मिळणार आहे, इतर निष्ठावंताना महामंडळासह अन्य संधी मिळेल, असे गाजर दाखवत बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, महिला कार्यकर्त्यांना न्याय द्या, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना नको, असे म्हणत कोअर कमिटीच्या सदस्यांना काही महिला कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची घटना मेळाव्याआधी घडली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा शहानूरमियाँ दर्गा रोडवरील श्री हरी पॅव्हेलियन येथे गुरुवारी (२ एप्रिल) आयोजित करण्यात आला होता. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार अमर साबळे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, किशनचंद तनवाणी, प्रवीण घुगे, डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, शिरीष बोराळकर, संजय जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

युतीबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होईल, असे याप्रसंगी बोलताना पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगत यंदा महापौर भाजपाचाच होणार, असा विश्वासही व्यक्त केला. मानगुटीवर बसलेले समांतरचे भूत उतरविणारच, असे सांगत त्यांनी नागरिकांना पुरेसे पाणी माफक दरात देऊ, असे आश्वासन दिले. राज्यात सत्तेत येताच केवळ रस्त्यांसाठी भाजप सरकारने ३१ कोटी रुपये या शहराला दिले. यापुढे विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल, प्रसंगी जागतिक बँकेतून कर्ज काढू, असेही लोणीकर नमूद केले. तिकीट एकालाच देता येईल, मात्र इतरांनी नाराज होऊ नये, निष्ठावंताना पक्षाकडून योग्य संधी दिली जाते. महामंडळावरील नियुक्तीपासून योग्य त्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खासदार साबळे यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे झाली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदींना मेळाव्यासाठी निमंत्रित केले होते. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. मेळाव्याची वेळ दुपारी तीन वाजेची होती, परंतु सायंकाळी साडेचारपर्यंतही अपेक्षित गर्दी झाली नव्हती. त्यामुळे रिकाम्या खुर्ची सभास्थळावरून बाजूला नेण्याची वेळ भाजपावर आज आली.

आमदारांनी जोडले कार्यकर्त्यांना हात

मेळावा सुरू होण्यास थोडा वेळ राहिलेला असतानाच उमेदवारीच्या मुद्यावरून काही महिला कार्यकर्त्यांनी निवडणूक समितीचे आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांच्यासह अन्य सदस्यांना घेराव घातला. पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, नातेवाईक यांनाच उमेदवारी मिळणार असेल तर पक्षाशी एकनिष्ठ काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना केव्हा संधी मिळणार, असा सवाल करत पक्षनेत्यांना धारेवर धरले. भाजपच्या महिला कार्यकर्त्या खूपच आक्रमक झाल्या होत्या. इतक्या की एका महिला कार्यकर्त्याला शांत करण्यासाठी आमदार अतुल सावेंनी अक्षरशः हात जोडले. अजून कोणाचेही तिकिट फायनल केलेले नसून प्रबळ, योग्य उमेदवारांनाच संधी मिळेल, असे सांगत नेत्यांनी मेळाव्यापूर्वी आलेले हे विघ्न दूर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये युती संकटात

$
0
0

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीवर संकटाचे मळभ निर्माण झाले आहे. सकारात्मक वळणावर सुरू असलेली चर्चा अचानक संकटाच्या वळणावर पोहचली. त्यामुळे शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना सायंकाळी अचानकपणे विमानाने मुंबईला बोलावण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम यांच्या निवासस्थानी या सर्वांची बैठक रात्री आठच्या सुमारास सुरू झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युतीवरून दोन्हीही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद औरंगाबादच्या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथील साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुनील बळीराम राठोड (वय १०), सुमीत मोहन जाधव ( वय ९), अजित अंबादास चव्हाण (वय ११) आणि तानेश सुभाष राठोड (वय १०, रा. सर्वजण आष्टाकासार ता. लोहारा) अशी मरण पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. चौघे मिळून गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हंगरगा येथील साठवण तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हंगरगा गावात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटननगरीत पर्यटकांची दैना

$
0
0

तुषार बोडखे, औरंगाबाद

खड्डेमय रस्ते, प्रचंड धूळ, वाढते प्रदूषण, बेपत्ता मार्गदर्शक फलक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे औरंगाबाद शहराचा पर्यटन व्यवसाय अक्षरशः रसातळाला गेला आहे. देश-विदेशातील लाखो पर्यटक समस्यांचा सामना करीत पर्यटनस्थळांपर्यंत पोहचतात आणि निराश होतात. महापालिका प्रशासनाने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या नाहीत. परिणामी राज्याची पर्यटन राजधानी बकाल झाली आहे.

राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा औरंगाबाद शहराला मिळाला आहे. वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी ही जगातील दोन प्राचीन वारसास्थळे जिल्ह्यात आहेत. शहरात बीबी-का- मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, सलीम अली सरोवर अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. तसेच जिल्ह्यात गौताळा अभयारण्य, म्हैसमाळ, सारोळा ही वन पर्यटनस्थळे आहेत. शहरात मुक्काम करून पर्यटनाचा पर्यटकांचा बेत असतो; मात्र प्राथमिक सोयीसुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रत्येक पर्यटनस्थळाला अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. शिवाय खराब रस्ते आणि कचराकुंड्यांनी पर्यटन राजधानीची रया घातली आहे. जगभरातील लाखो पर्यटक शहरात येत असूनही रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बसस्थानकावर पर्यटकांसाठी माहिती केंद्र नाही. पर्यटनस्थळी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून पर्यटकांची लूट करीत आहेत. हा प्रकार शहराची वाईट प्रतिमा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून महसूल मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल याचा विचार महापालिका प्रशासनाने केला नाही. या उदासिनतेमुळे शहरातील पर्यटनस्थळांचा बट्टयाबोळ झाला आहे. शिर्डीसह इतर तीर्थस्थळांना पर्यटक औरंगाबाद शहरातूनच जातात. या काळात शहरातील पर्यटनस्थळे पाहण्यावर त्यांचा भर असतो. अर्थात, पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी शहरात स्वतंत्र यंत्रणा नसल्याने पर्यटकांची फसवणूक होते. त्यामुळे वैतागलेले पर्यटक दुसऱ्या शहरात गेल्याचा अनुभव पर्यटन व्यावसायिकांना आला आहे. शहराचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे प्रशिक्षित गाइड नाही. पर्यटनस्थळ पाहण्यापूर्वी पूर्वेतिहास जाणून घेण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांची घोर निराशा होते. रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांच्याकडून फसवणुकीचा अनुभव आल्यामुळे औरंगाबाद शहर पर्यटनासाठी अयोग्य असल्याचा संदेश जगभर पोहचत आहे. शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून उद्याने आणि स्मारके विकसित करण्यात आली आहेत. या ठिकाणांची शहरातील नागरिकांनाच माहिती नाही. ज्योतीनगरमधील कवितेची बाग, सहकारनगरमधील लोककला उद्यान, विश्वभारती कॉलनीतील भारतमाता मंदिर, सलीम अली सरोवर अशी अनेक ठिकाणांची दुर्दशा झाली आहे. या उद्यानांच्या नियमित देखरेखीसाठी पुरेसा निधी नाही आणि मनपा प्रशासनाला अजिबात स्वारस्य नसल्यामुळे शहराचे आकर्षण केंद्र उजाड झाले आहेत.

सर्वात गचाळ शहर

औरंगाबाद शहरात पर्यटकांशी संवाद साधल्यानंतर हे शहर किती बकाल आहे याची खात्री पटते. शहरातील प्रत्येक रस्ता खड्ड्यांनी गांजलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुभाजकांचे सुशोभीकरण नसल्यामुळे शहर बकाल दिसत आहे. तालुका पातळीवरील गावांप्रमाणेच सुविधांची वानवा आहे. आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर असा नव्वदच्या दशकात लौकिक मिळवलेल्या शहराचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे. शहराच्या गचाळपणाबाबत विदेशी पर्यटक प्रतिक्रिया नोंदवत असल्यामुळे स्थानिक संयोजक आणि हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. या प्रकारामुळे पर्यटकांची संख्या कमी होऊन पर्यटन व्यवसाय नामशेष होण्याची भीती आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या लहान शहरात पर्यटनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या शहरातील सुविधांमुळे दरवर्षी पर्यटकांचा ओघ वाढत असून औरंगाबादची बकालपणामुळे रया गेली आहे.

पर्यटकांची लूट

विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा बसस्थानक येथून हॉटेल किंवा पर्यटस्थळांपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही. मोजक्याच सिटी बस धावत असल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांचे रेटकार्ड नसल्यामुळे पर्यटकांची हमखास फसवणूक होते. अगदी मध्यवर्ती बसस्थानक ते औरंगाबाद लेणीसाठी अडीचशे रुपये रिक्षाभाडे आकारल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पर्यटक पैसे देण्यास तयार असतात; मात्र फसवणुकीची भावना निर्माण झाल्यास पर्यटनावर परिणाम होतो, असे पर्यटन अभ्यासक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. पर्यटनाबाबत जर्मनी, स्वित्झर्लंड या देशातील सेवांचा आपल्या शहराने अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

समन्वयाचा अभाव

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी महापालिका प्रशासनाचा योग्य समन्वय नाही. शहरातील पर्यनटस्थळांची माहितीपत्रके मोठी हॉटेल्स आणि एमटीडीसी कार्यालयात ठेवण्याबाबत वारंवार प्रस्ताव पाठवण्यात आला; मात्र मनपा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. परिणामी पर्यटकांची गैरसोय कायम आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी मनपा सांस्कृतिक महोत्सव भरवला नाही. तसेच पर्यटन समिती नेमली नसल्यामुळे पर्यटननगरीत पर्यटनाची दैना झाली आहे.

जिल्ह्यातील लहान-लहान पर्यटनस्थळांना विकसित करून पर्यटकांपर्यंत माहिती पोहचवणे गरजेचे आहे. एमटीडीसी पर्यटनस्थळांच्या प्रसारासाठी काम करीत आहे. जयपूर शहरात गेल्यानंतर 'आपण किती सुंदर शहरात आलो' अशी पर्यटकांची भावना होते. तर अगदी उलट भावना औरंगाबाद शहरात येते. अस्वच्छता, खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे पर्यटकांच्या मनात प्रतिकूल प्रतिमा निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. स्थानिक पातळीवर समिती नेमून त्यांनी काम करावे. शहराचा प्रत्येक बाबतीत विकास करताना पर्यटनाचाही विचार झाला पाहिजे. शहराचा विकास संस्कृती आणि पर्यटनावरही अवलंबून असते. सध्यातरी पर्यटनाबाबत प्रचंड उदासिनता आहे.

- आरती पाटणकर, सदस्य, पर्यटन सल्लागार समिती.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची वेबसाइट तयार करण्याची गरज आहे. परराज्यात सुटीच्या कालावधीपूर्वी पर्यटनस्थळांची पुरेपूर जाहिरात अपेक्षित आहे. रेल्वे स्टेशन, बसस्टँड आणि विमानतळावर पूर्णवेळ माहिती सेवा केंद्र सुरू करणे शक्य नसल्यास पर्यटकांना माहितीपुस्तिका उपलब्ध करून द्यावी. शहरातील दुभाजकांचे सुशोभीकरण आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांना पर्यटक मित्र बनवून त्यांच्याकडे माहितीपुस्तिका ठेवा. बीबी- का-मकबरा, पाणचक्की परिसरात काटेकोर स्वच्छता ठेवून पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करा. अनधिकृत विक्रेते हटविण्यासाठी दुकानांसाठी गाळे बांधा. त्यामुळे अतिक्रमणाचा वेढा पडणार नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी सध्यातरी पर्याय दिसत नाही; मात्र रेटकार्ड जाहीर केल्यास पर्यटकांची फसवणूक होणार नाही.

- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकासह विवाहितेने लातूरात जाळून घेतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

पाच तोळे सोन्यासाठी सासरच्या मंडळींनी लातूर शहरातील माताजीनगर परिसरात राहत असलेल्या विवाहितेचा छळ केला. त्यामुळे छळाला कंटाळलेल्या विवाहितेने तीन वर्षाच्या बालिकेसह जाळून घेतल्याने दोघींचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरातील माताजीनगर भागात नितीन चंद्रशेखर काळे हा पत्नी जान्हवी (वय २५), तीन वर्षांची मुलगी सुमित्रा तसेच कुटुंबियासह राहत होता. काही वर्षांपुर्वी त्याचा विवाह झाला होता. विवाहाच्यावेळी मान-पान आणि हुंडा देण्याचे ठरले. परंतु, त्यापैकी काही रक्कम जान्हवीच्या माहेरची मंडळी देऊ शकली नाही. यासाठी तिला मारहाण करणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार वारंवार होऊ लागला.

हा प्रकार सहन न झाल्याने जान्हवीने गुरुवारी पहाटे तीन वर्षाची मुलगी सुमित्रासह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात त्या दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे गजानन भातलवंडे आणि कर्मचारी घटनास्थळी पोंहचले. परंतु, त्या दोघींचाही तोपर्यंत मृत्यू झाला होता. यानंतर भारत दयानंद डांगे (रा. भंगार चिंचोली) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी पती नितीन, दीर सचिन आणि सासू नंदा चंद्रशेखर काळे या तिघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडकेत तीन जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

उस्मानाबाद-तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि टमटमची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह टमटम चालकांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सिद्धेश्वर वडगावजवळ घडली. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उद्देश राठोड, चंद्रकाला आवटे, अनिता मार्तंड (सर्व जण रा. बावी ता. उस्मानाबाद) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी दुपारच्यावेळी कंटेनर ( क्र. एमएच ४६ एच ७८७८) व टमटम ( क्र. एम. एच. २५ एफ १५७७) या वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ठार तर आठ जण जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर टमटम ५० फुट लांब खरडत गेला होता. त्यामुळे टमटम (सहा आसनी रिक्षाचा) चक्काचूर झाला होता. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. बंटी खंडाळे, अर्चना शिरसट, निर्मला लगदिवे, सुवर्णा लगदिवे, सुभाष बनसोडे, ज्योती शिरसट, जयश्री खंडागळे, अजित पवार अशी जखमींची नावे आहेत.

या अपघातात जखमी झालेल्यांना त्वरीत उपचारासाठी उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने गावकरी व पोलिस पोहचल्याने जखमींना तातडीने मदत मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच गुंडांना तलवारींसह अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एका वीटभट्टी मजुराच्या अपहरणाचा डाव तालुक्यातील तुळजापूर येथील गावकऱ्यांनी उधळून लावला. याप्रकरणी पैठण पोलिसांनी बारामती तालुक्यातील पाच गुंडांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ शस्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर येथील एका वीटभट्टी मजुराचे काहीजण अपहरण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी एम. एच. ४२, के १६२७ या क्रमांकाच्या स्कार्पिओ कारला ट्रक्टर आडवे अडवले. कारमधील पाच गुंडांच्या तावडीतून त्या वीटभट्टी मजुराची सुटका करून घेतली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलिसांनी घटनास्थळी जावून अजित बाळासाहेब बेलदार, राजेंद्र लक्ष्मण माने, अमोल राघू बिसे, मोहन बाबुराव कचरे व नवनाथ अनिल कदम (सर्व रा.तांदुळवाडी ता. बारामती) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांचे वाहन तपासले असता तलवारी व अन्य घातक शस्रे आढळली. शस्र बाळगल्याप्रकरणी या पाच जणांविरुद्ध पैठण पोलिसात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

अपहरणाची सुपारी

तुळजापूर येथील एका वीटभट्टी मजुराने गेवराई येथील वीटभट्टी मालकाकडून कामाची उचल घेतली होती. तो कामाला जात नसल्याने गेवराई येथील वीटभट्टी मालकाने त्याच्या अपहरणाची सुपारी बारामती येथील गुंडांना दिल्याची चर्चा तुळजापूरच्या गावकऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images