उस्मानबाद जिल्ह्यातील ७१ शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०१५ ते ५ जुलै २०१५ दरम्यान जिल्ह्यात आत्महत्येद्वारे जीवनयात्रा संपविली. यापैकी ३९ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळाली. २५ शेतकरी कुटुंब हे मदतीस अपात्र ठरले आहेत. तर ७ जणांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थ सहाय्य करण्यासाठी सासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये जे प्रकरण बसत नाहीत, अशांचीच प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. १ जानेवारी २०१५ ते ५ जूलै २०१५ दरम्यान जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे जीवनयात्रा संपविली. यापैकी ३९ शेतकरी कुटुंबे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर २५ कुंटूबे मदतीस अपात्र ठरली. तर ७ जणांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला वैतागून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यासाठी पॅकेजची घोषणा केल्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र सुरूच आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये जे प्रकरण बसत नाहीत, अशांचीच प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट