शेतकऱ्यांना अश्वस्त करून धैर्य देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना घोषीत केली आहे. त्या योजनेच औसा विधानसभा मतदार संघातील गावातून साखर वाटप करून स्वागत करण्यात आले.
औसा तालुक्यातील खुंटेगाव येथे शुक्रवारी सकाळी बँड वाजवत गावातील सर्व मंदिरात नारळ फोडून या योजनेचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या सभेत भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांच यावेळी भाषण झाले. यावेळी पाशा पटेल म्हणाले, 'पंतप्रधानांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेल्या अश्वासानाची पुर्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात होत आहे. नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना घोषीत केली आहे. ती हवामानातील बदलाचा शेती व्यवसायावर होत असलेल्या परिणामाचा संपूर्ण विचार करून केलेली योजना आहे. सध्य परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरणारी या योजनेपेक्षा चांगली योजना असूच शकत नाही असा दावा ही त्यांनी केला.
यापूर्वीच्या पीक विमा योजनेत समुहाच्या नुकसानाशी नुकसान भरपाई जोडली जात होती. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतली जाणार असून त्यानुसार त्याला नुकसानभरपाई मिळणार असून पेरणीपूर्व, पीक शेतात उभे असताना आणि काढणीनंतर काही दिवसाच्या आत काही नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळणार आहे. पीक विम्याचा हप्ताही खूपच कमी ठेवला गेला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी 'अच्छे दिन'ची ही सुरुवात असल्यामुळे साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्याची सुरवात खुंटेगावपासून करण्यात येत असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खुंटेगावचे जेष्ठ नागरिक दिलीप कोल्हे म्हणाले, 'नवी पंतप्रधान योजना ही जुन्या योजनेपेक्षा अनेक बाबतीत सुधारणा केलेली आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट