पासपोर्ट काढण्यासाठी शहरातून दररोज किमान २५ जण मुंबईला जात आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक जण असतो. त्यांना एक दिवसासाठी सरासरी ४४०० रुपये खर्च करावे लागत आहेत. या हिशेबाने वर्षाकाठी शहरातील नगारिकांना सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा भुर्दंड पडत आहे.
औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालयाचे मुंबई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जावे लागते. पासपोर्ट काढणारी व्यक्ती आणि त्याचा सहकारी यांचा प्रवास, जेवण, कार्यालयीन खर्च, टॅक्सी आदीसाठी सरासरी ४४०० रुपयांचा खर्च होतो. दररोज ५२ जणांचा एक दिवसाचा खर्च एक लाख १४ हजार ४०० रुपये खर्च आहे. वर्षभरातील कार्यालयीन कामकाजाच्या २५१ दिवसात सुमारे दोन कोटी ८७ लाख १४ हजार ४०० रुपये खर्च होत आहे, असा दावा हारूण मुकाती इस्लामिक सेंटरतर्फे करण्यात आला आहे.
शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही केली आहे. त्याचा विचार करून परराष्ट्र मंत्रालयाने या मागणीची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट