Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुष्यापासून काय हवे; आत्मपरीक्षण करा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मृत्यू या कल्पनेने आपल्याला अडचण होते. मृत्यूला सामोरे जाताना आम्हाला आयुष्याकडून नेमके काय हवे, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आजार आपल्याला माणूस बनवितो. भौतिक आणि क्षणिक सुखाच्या मागे का धावायला नको हे त्यातून शिकतो. आजार झाल्यानंतर कोण जवळचे कोण दूरचे याची जाणीव होते. यासाठी आपण वेळेचे आणि नात्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे,’ असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोनाली देशपांडे यांनी केले.
सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, पंख फाउंडेशन आणि आस्था फाउंडेशनच्या वतीने आयएमए हॉलमध्ये सन्मानपूर्वक मृत्यू या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे, सेवानिवृत्त न्या. अर्चना गोंधळेकर, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर, एमआयटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद निकाळजे, सुनीता बंडेवार, डॉ. शिवकुमार अय्यर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले, ‘एखाद्या रुग्णाचा मृत्यू होणार असेल तर डॉक्टरांनी रुग्ण व त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्याची कल्पना दिली पाहिजे. कारण प्रत्येकाला चांगला मृत्यू यावा असे वाटत असते, पण पाच टक्के लोकांनाच असा मृत्यू येतो, असे जागतिक पातळीवरील सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. मृत्यूभोवती होणारा भावनांचा कल्लोळ थांबविण्यासाठी सामाजिक सहभाग हवा.’
सेवानिवृत्त न्या. अर्चना गोंधळेकर यांनी सांगितले की ‘आपल्याला कायद्याशिवाय पर्याय नाही. पॅलिएटिव्ही केअर आवश्यक आहे. अनैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत आपल्याकडे अनेक संभ्रम आहेत, पण कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या तर त्यातील सुलभता निश्चितपणे लक्षात येईल.’
डॉ. व्यंकटेश देशपांडे म्हणाले, ‘आपल्याकडे सर्वसाधारणपणे चार प्रकारे मृत्यू येतो. अचानकपणे होणारा मृत्यू, तीव्र आजाराने होणारा मृत्यू, दीर्घ आजाराने होणारा मृत्यू आणि कर्करोगाने होणारा मृत्यू. याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.’
डॉ. मकरंद कांजाळकर यांनी ब्रेथडेड ही संकल्पना उलगडून सांगितली. अवयव बदलल्याने माणसाची ओळख बदलत नसते. आपले अस्तित्व मेंदूमध्येच असते. निकामी अवयव बदलण्याबाबत आपल्याकडे जागरुकता आहे, पण अवयवदानाच्याबाबत अजून तेवढी जनजागृती नाही. त्यासाठी विचार झाला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षणासाठी भक्कम पुरावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राणे समिती आणि बापट आयोगाच्या शिफारशीनुसार दिलेले मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही. मराठा आणि कुणबी जात एकच असल्याचे १८८१ पासूनचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘ओबीसी’ प्रवर्गात दोन टक्के आरक्षण मिळाले तरी दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सोपा होईल, असे मत अभ्यासकांनी मांडले. ‘मराठा आरक्षण - शक्यता आणि अडथळे’ या विषयावरील चर्चासत्रात सविस्तर चर्चा करण्यात आली.

औरंगाबाद जिल्हा मराठा सेवा संघाच्या जगदगुरू तुकोबाराय व्याख्यानमालेअंतर्गत आरक्षण विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. राजर्षी शाहू भवनात शनिवारी सायंकाळी चर्चासत्र झाले. यावेळी मंचावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. पवार, छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा. शिवानंद भानुसे, अॅड. स्वाती नखाते आणि स्वप्नील घुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वक्त्यांनी आरक्षण विषयावर मत मांडले. ‘मराठा आरक्षण संवैधानिकदृष्ट्या टिकण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावे गरजेचे आहेत. तामिळनाडू राज्याप्रमाणे ओबीसी कोट्यात वाढ करता येईल. राज्य सरकारने ‘इबीसी’ मर्यादा वाढवली तरी शेतकऱ्यांच्या मुलांना विशेष फायदा नाही. कारण, शेतकऱ्याचे उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा जास्त नाही. सध्या आरक्षणाबाबत सरकार चालढकल करीत आहे’ असे डॉ. पवार म्हणाले. ‘मराठा समाज मागास कसा असा प्रश्न करून कोर्टाने स्थगिती दिली. राणे व बापट आयोगातून ते सिद्ध झाले नाही. मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे नुकसान होणार नाही, हे पटवून दिल्यास सामाजिक तणाव रोखला जाईल’ असा मुद्दा किशोर चव्हाण यांनी मांडला.

‘विदर्भ, कोकण आणि खान्देशातील मराठा ओबीसी प्रवर्गात आहे. मग उर्वरित भागातील समाजाला कशाच्या मुद्यावर डावलतात याचा उलगडा होत नाही. १८८१ च्या जनगणनेचे सरकारी पुरावे आहेत. मराठा व कुणबी यांच्यातील रोटीबेटी संबंधाचे पुरावे आहेत. शेती कसणारा कुणबी असतो या आधारावर आरक्षण टिकते. ओबीसी प्रवर्गात दोन टक्के वाटा मिळाला तरी शिक्षणात विद्यार्थ्यांना १०० टक्के आरक्षण मिळते हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे,’ असे प्रा. भानुसे म्हणाले. आरक्षणात राज्य सरकार चालढकल करीत असल्यास लढा तीव्र करावा लागेल असे अॅड. स्वाती नखाते म्हणाल्या. तीन फेरीतील चर्चासत्रात उपस्थितांच्या प्रश्नांना वक्त्यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव साठे यांनी केले.

उच्च शिक्षणाचे प्रमाण
‘राज्यात मराठा जातीची लोकसंख्या जवळपास ३२ टक्के आहे. दिल्लीतील समितीच्या अभ्यासानुसार उच्च शिक्षणात मराठा समाजाचे प्रमाण १२ टक्के आणि नागरी सेवेत १५ टक्के आहे. दोन्ही ठिकाणी १५ ते १७ टक्के उणीव आहे. यावरून शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण स्पष्ट होते’ असे स्वप्नील घुमरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँगेस-राष्ट्रवादीचा गंगापुरात विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गंगापूर बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांना हादरा बसला आहे. ही बाजार समिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने ताब्यात घेतली.
या निवडणुकीत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकारी संस्था-सतीश भडके ५५५, सर्वसाधारण मतदार संघ ग्रामपंचायत प्रमिला काळे ३५९, योगेश दळवी ३१८,अनुसूचित जाती जमाती सुभाष तुपे ३६०, आर्थिक दुर्बल घटक मनीषा विक्रम राऊत ३०५, व्यापारी मतदार संघ कल्याण गरड १६६, महेश नावंदर १६७, हमाल मापाडी मतदार संघ अल्ताफ पठाण ४३, सहकारी संस्था सर्वसाधारण मधुकर चव्हाण ५२०, संजय जाधव ५९६, राजाभाऊ दंडे ५३४, अण्णा पाठे ५१९, प्रवीण बाराहाते ५३२, शिवाजी बोडखे ५३१, कैलास शेंगुले ४४३, सहकार संस्था महिला राखीव केशरबाई मदन सुंदर्डे ५६९, कमलाबाई पोपट सोनवणे ५८०, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती उषाबाई नारायण सोलंकर ५९६.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फुलंब्री तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सोमवारी या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून यामुळे फुलंब्री तालुक्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार आहे.
फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावरील शांताई सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल. कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर प्रमुख पाहुणे असतील. भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री नामदेव गाडेकर, विजय औताडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असून भविष्यातील राजकीय उलाढालींसाठी काँग्रेससाठीही धोक्याची घंटा आहे. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, तारूअप्पा मेटे, सुहास सिरसाठ, शिवाजीराव पाथ्रीकर, विकास कुलकर्णी आदींनी केले आहे.

हे सोडणार पक्ष
गणोरी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य अनुराधा चव्हाण, फुलंब्री पंचायत समितीच्या माजी सभापती माधुरी गाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण चव्हाण, संतोष तांदळे, रेखा आटुळे, दादासाहेब उकिर्डे यांच्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यापैकी काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या आठवड्यात निलंबित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटोद्यात पेपर फुटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेत एमएस्सी इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयाचा पेपर तासभर आगोदर सोशल मीडियावर फिरत होता. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील परीक्षा केंद्रावरून हा पेपर बाहेर आला असून, याबाबत एका शिक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या नियमांना केराची टोपली दाखवित हा सगळा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. डी. बी. आघाव प्राचार्य असलेल्या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा चार ऑक्टोबरपासून सुरू आहेत. शनिवारी एमएस्सी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांचा इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयाची पेपर होता. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बीड जिल्ह्यात हा पेपर वॉटस्अॅप ग्रुपवर फिरत होता. पाटोदा येथील पद्‍मभूषण वसंतदादा पाटील कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून पेपर वॉट्स अॅप ग्रुपवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी कॉलेजचे बी. जी. कांबळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सकाळी १० वाजता पेपर होता. त्यापूर्वीच सुमारे तासभर आधी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर फिरत होता. विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ८.५८ मिनिटांनी हा पेपर डाउनलोड करण्यात आला. त्यानंतर तो वॉट्सअॅपवर इतरांना पाठविण्यात आला. रविवारी पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली.

पेपर बाहेर गेलाच कसा?
विद्यापीठ कॉलेजांना प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविते. पेपर सुरू होण्याच्या अर्धातास आगोदर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणे त्याच्या छायांकितप्रती काढणे अपेक्षित आहे. ही सगळी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखेखाली होणे बंधनकारक आहे. असे असताना प्रश्नपत्रिका बाहेर गेलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला ते शिक्षक ज्युनिअर कॉलेजचे असल्याचे कळते. त्यामुळे हे शिक्षक पदव्युत्तर परीक्षेदरम्यान तेथे काय करत होते, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. विशेष म्हणजे परीक्षेबाबत काय काळजी घ्यायची याबाबत याच कॉलेजमध्ये परीक्षा विभागाकडून कार्यशाळा घेण्यात आली होती.

सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यात आलेली आहे. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका वॉट्स अॅपवर आली. त्याप्रकरणाची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

संबंधित शिक्षकावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षक परीक्षेच्या कामकाजात नव्हता, परंतु तो कॉलेजमधील असल्याने तो तेथे आला असेल.
- डॉ. डी. बी. आघाव, प्राचार्य, पद्‍मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज, पाटोदा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाड्या आवरा; पालिकेला साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण गेट, टिळकपथ आणि गुलमंडी या मार्गावर हातगाडीचालकांमुळे दुकानदाराचा व्यवसाय धोक्यात आला आहे. हातगाड्यांमुळे, वाहतूक कोंडी होतेच, शिवाय ऐन दिवाळीत दुकानादारांत येण्यासाठी ग्राहकांना रस्ताच राहत नाही. हातगाडीचालकांना आवरा नाही, तर व्यवहार बंद ठेवू, असा इशारा पैठणगेट, टिळकपथ आणि गुलमंडी येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून पैठणगेट, टिळकपथ व गुलमंडी हा भाग ओळखला जातो. या रस्त्यावर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या राहतात. त्यांच्या त्रासाबाबत व्यापाऱ्यांनी पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस, आणि महापालिकेकडे तक्रार केली आहे. रस्त्यावरील हातगाडीचालक शिस्त पाळत नाहीत, रस्त्याच्या दोन्ही बाजुला हातगाड्या लावतात, ओरडून ग्राहक बोलावतात, दुकानांसमोर हातगाड्या लावतात, त्यांना समजावण्यासाठी गेल्यानंतर अरेरावी, शिवीगाळ करतात, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे.
सणासुदीच्या काळात दुकानादारांनी लाखोंचा माल भरला आहे. पण, हातगाड्यांच्या त्रासामुळे दुकानात ग्राहक येत नसल्याने त्रास होत आहे. पोलिस त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई करतात. त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास दिवाळीत व्यवहार बंद ठेवण्याचा इशारा टिळकपथ, पैठणगेटचे व्यापारी युसूफ मुकाती, हरविंदरसिंग सलुजा, भावेन सुखिया, आनंद परसवाणी, नरेश पुरोहित, महंमद भाई, मजहर परियाणी, जहूर भाई, मकसूद नेवीवाल यांनी दिला आहे.

त्यांना कारवाईची माहिती मिळते
पैठणगेट, टिळकपथ रस्त्यावर महापालिका अतिक्रमण पथक, वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. पथक आल्यानंतर हातगाडीचालक पळून जातात; पथक परतताच ते पुन्हा जागेवर येतात. अनेकदा पालिकेचे पथक येणार असल्याची माहिती त्यांना पूर्वीच मिळते, त्यामुळे कारवाई फसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्री मॅरेथॉनमध्ये धावले ५२० स्पर्धक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
दौलताबाद ते वेरूळ या प्री मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तब्बल ५२० स्पर्धकांनी सहभाग घेतला. पहाटे साडेपाच वाजता ही स्पर्धा सुरू झाली. या मार्गावर २७ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार, आमदार अतुल सावे, एमआयटीचे यज्ञवीर कवडे, मुकुंद भोगले यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. यावेळी रणजित ककड, डॉ. आनंद देशमुख यांची उपस्थिती होती.
दौलताबाद ते वेरूळ या प्री मॅरेथॉन स्पर्धचे आयोजन औरंगाबाद हेरिटेज समिती, औरंगाबाद ब्लक बक्स, एमआयटी, एण्डुरन्स, मॉर्गन यांच्यातर्फे करण्यात आले. या स्पर्धेत ७०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती, प्रत्यक्षात ५२० स्पर्धक सामील झाले. स्पर्धेत १२० पोलिस, विविध कंपन्यांचे कर्मचारी, डॉक्टर, उद्योजक, महिला, मुले, वृद्ध सहभागी झाले.
रविवारी सकाळी झालेल्या स्पर्धेतील सहभागींना विश्रांतीस्थळी पाणी, ब्रेड, सँडविच, चहा, केक देण्यात आले. स्पर्धेनंतर सीआरटीच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली, रिलॅक्झिलच्या प्रीती भानुशाली व सहकाऱ्यांनी वार्मअपसाठी साह्य केले.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत देश विदेशातून धावपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ५ किमी, १० किमी, १५ किमी, २५ किमी या अंतराच्या टप्प्यात होणार आहे.

विद्यार्थ्यांना फटका
स्पर्धेमुळे वेरुळ ते दौलताबाद टी पॉइंट या मार्गावरील वाहतूक कसाबखेडा मार्गे वळवण्यात आली. त्यामुळे परीक्षा व दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्यांना फटका बसला. दौलताबाद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

अनवाणी स्पर्धक
बाभूळगाव येथील जयहिंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक पाटील यांच्यासह अनवाणी धावत स्पर्धा पूर्ण केली. या मुलांच्या जिद्दीची स्पर्धेत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे साकडे

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया हे विकासनिधीच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत आहेत. आम्ही केलेल्या मागण्यांना प्रतिसाद देत नाहीत. अशाने शहरात कामे कशी चालणार ? त्यांना समज द्या, अशा शब्दात भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वडील पंडित अण्णा मुंडे यांचे नुकतेच निधन झाले. मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी सकाळी औरंगाबादमार्गे परळीला गेले होते. सकाळी चिकलठाणा विमानतळावर आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे माजी सभापती दिलीप थोरात, भगवान घडमोडे, अनिल मकरिये यांनी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पदाधिकाऱ्यांनी शहराच्या रस्त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली. पालिका आयुक्त बकोरिया यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘ठिक आहे’
पालिका निधी खर्च करताना प्रत्येक वॉर्डाला समान निधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत आमचे काहीच ऐकून घेत नाहीत. केलेल्या मागण्यांना प्रतिसाद नसतो. अशाने शहरातील विकास कामे कशी होणार ? तुम्ही एकदा बकोरियांना सिरिअसली सांगा, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ठीक आहे’ असे उत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंगीचे बिस्किट देऊन बसमध्ये लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
बसमध्ये सहप्रवाशाने विश्वास मिळवून गुंगीचे औषध असलेले बिस्किट खाण्यासाठी देऊन एका वृद्धाचे रोख १९ हजार रुपये व सोन्याची अंगठी काढून घेतली. औषधामुळे बेशुद्ध झालेला वृद्ध चार दिवसानंतर शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गरीबदास जम्मन कोतवाल (वय ६५ रा. सोयगाव), असे या वृद्धाचे नाव आहे.
सिल्लोड येथील बसस्थानकातून सोयगाव येथे जाण्यासाठी गरीबदास कोतवाल हे चार दिवसांपूर्वी आले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तिने मला शेंदुर्णीला जायचे आहे, असे सांगत त्यांच्यासोबत सलगी वाढवली. बस आल्यानंतर कोतवाल यांच्यासोबत तो बसमध्ये बसला व गुंगीचे औषध मिसळलेले बिस्किट खाण्यासाठी दिले. ते खाल्ल्यानंतर कोतवाल यांना गुंगी आली. त्यानंतर त्या भामट्याने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी, रोख १९ हजार रुपये, असा ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
सोयगाव येथे बस आल्यानंतर गुंगीमधील कोतवाल यांना वाहकाने उतरून दिले. कोतवाल यांच्या जवळच्या एका व्यक्तिने फोन करून त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर कोतवाल यांना औरंगाबाद येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना चार दिवसानंतर शुद्ध आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद येथील जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पण, हा गुन्हा सिल्लोड येथे घडला असल्याने तो सिल्लोड शहर पोलिस ठाण्याकडे शनिवारी सकाळी वर्ग करण्यात आला.

दोन महिन्यापूर्वी सुद्धा लूट
दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील तळणी येथील एका वृद्धाला येथील बसस्थानकावर असेच गुंगीचे औषध देऊन लुबाडण्यात आले होते. शिवाय वसमत येथील वयोवृद्ध महिलेला सुद्धा बिस्किट देऊन लुबाडले होते. या भामट्यांना पकडण्यासाठी सिल्लोड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दिवाळीमुळे गर्दी राहणार असल्याने प्रवाशांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’शिवाय रॉकेल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेशन दुकानांवरील काळा बाजाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आता रेशनवरून अनुदानित रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपले आधार कार्ड; तसेच मोबाइलक्रमांक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करावे लागणार आहेत. अन्यथा १ नोव्हेंबरपासून त्यांना देण्यात येणारा रॉकेलचा कोटा बंद करण्यात येणार आहे.
रॉकेल घेण्यास पात्र असलेल्यांना ३० ऑक्टोबरदपर्यंत आधार कार्ड, मोबाइल क्रमांक स्वस्त धान्य दुकानादर किंवा केरोसिन विक्रेते यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. केंद्र शासन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासानाने अनुदानित केरोसिन मिळण्यास पात्र लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधार कार्डाचा क्रमांक आणि मोबाइल क्रमांक सादर न करणाऱ्या लाभार्थींना रॉकेलचा कोटा देऊ नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ३१ जानेवारी २०१७पर्यंत अशा लाभार्थींचा कोटा राखीव ठेवण्यात यावा, तरीही लाभार्थींनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिले नाहीत तर त्यांचा कोटा रद्द करण्यात येणार आहे. जे लाभार्थी आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक सादर करणार नाहीत ते १ फेब्रुवारी २०१७नंतर अनुदानित रॉकेल घेण्यास पात्र ठरणार नाही. रेशन दुकानावर एका कुटुंबाला चार लिटर रॉकेल दिले जाते, मात्र गेल्या काही जिल्हास्तरावर एलपीजी गॅस धारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात जिल्ह्याला मिळणाऱ्या रॉकेलच्या कोट्यातही घट होत आहे.

काळा बाजाराला आळा
औरंगाबाद जिल्ह्यात १३८० किलो लिटर. रॉकेलचा कोटा प्रत्येक महिन्याला प्राप्त होते. जिल्ह्यात ७ लाख ७६ हजार शिधापत्रिकाधारक असून, यापैकी सुमारे चार लाख कार्डधारकांना प्रतिकार्ड प्रमाणे चार लिटर रॉकेल देण्यात येते, मात्र आता कोटा मिळवायचा असेल, तर आधारकार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे रॉकेलच्या काळ्या बाजाराला आळा बसणार आहे.

कुटुंबप्रमुखाचा संपर्क क्रमांक
आधार कार्डाच्या क्रमांकासोबत शक्यतो कुटुंबाच्या प्रमुखाच्या मोबाइल क्रमांकाची नोंद करण्यात येणार आहे. कुटुंबप्रमुखाकडे मोबाइल नसल्याच कुटुंबातील कोणत्याही एका लाभार्थीचा क्रमांक घेण्यात येणार आहे. लाभार्थींना ही माहिती रेशन दुकानावर किंवा तहसील कार्यालयात द्यावी लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोणत्या लाभार्थ्याला आपण किती रॉकेल दिले, किती लोकांना लाभ मिळाला, याची माहिती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज पळवला. अहिंसानगर भागात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज ओमप्रकाश चांडक (वय ३७, रा. पूर्वा अपार्टमेंट, अहिंसानगर) हे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास किराणा सामान भरण्यासाठी गुलमंडी, मोंढा भागात गेले होते. रात्री सव्वाआठच्या सुमारास ते घरी परतले. यादरम्यान चोरट्यानी त्यांच्या घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रील कापून घरात प्रवेश केला.
बेडरुममधील कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे द‌ागिने असा दोन लाख दोन हजारांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. चांडक घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी जिन्सी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय पोमनाळकर तपास करीत आहेत.

चोरीस गेलेला ऐवज
- ५ तोळ्यांचे सोन्याचा नेकलेस
- ५ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या जोड
- ३ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या
- ४ तोळ्यांचा बोरहार
- १२ हजारांचे चांदीचे जोडवे
- २० हजार रुपये रोख रक्कम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोडीदार असावा नोकरदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जोडीदार उच्चशिक्षित, नोकरदार असावा, अशी अपेक्षा महादेव कोळी समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी झालेल्या बहुतांश मुला मुलींनी केली. रविवारी (२३ ऑक्टोबर) झालेल्या या मेळाव्यासाठी समाजातील राज्यभरातील मुला मुलींनी पालकांसह हजेरी लावली होती.
कै. नारायणराव केशवराव नन्नावरे सेवाभावी प्रतिष्ठानने आदिवासी कोळी समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याचे रविवारी आयोजन केले होते. मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. युवा कोळी महासंघाचे अध्यक्ष चेतन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तापडिया नाट्यमंदिरात सकाळपासून सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातील इच्छुक वधू-वरांनी आपल्या पालकांसह हजेरी लावली. दिवसभरात शंभरावर मुला-मुलींची नोंदणी करण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रामध्ये तरुण-तरुणींना परिचय करून दिला. त्यांनी आपल्या भावी जोडीदारा विषयीच्या अपेक्षा सांगितल्या. परिचय करून देताना दोन मुली व त्यानंतर एक मुलगा असा क्रम ठेवण्यात आला होता. यावेळी बहुतांश सुशिक्षित मुलींनी आपल्याला सरकारी नोकरीतील जोडीदार हवा, अशी अपेक्षा सांगितली. मेळाव्यासाठी आलेल्या मुलांनीही अपेक्षा व्यक्त करताना भावी जोडीदाराच्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले असल्याचे मेळाव्याचे संयोजक सचिन गोदे यांनी सांगितले.

तरुणींची संख्या जास्त
या मेळाव्याला तरुणींची संख्या जास्त होती. बहुतांश मुली उच्चशिक्षित होत्या. एकूण सहभागी विवाहेच्छुकांत सुमारे ६५ टक्के मुली होत्या. तरुण-तरुणींनी परिचय करून दिल्यानंतर काही पालकांना आपल्या पाल्यासाठी अनुरूप जोडीदार मिळाला. मेळाव्यातील परिचय सत्रानंतर सायंकाळपर्यंत सात ते आठ तरुण-तरुणींच्या विवाहाची बोलणी सुरू असल्याची माहिती गोदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद झाली मूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण जनतेशी थेट नाळ असलेल्या जिल्हा परिषदेशी संपर्काचे साधन असलेल्या लँडलाइनचे सातपैकी पाच कनेक्शन गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मूक झाली आहे. प्रशासनाने बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे फटका मात्र सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
जिल्हा परिषदेत संपर्क साधण्यासाठी प्रशासनाने पीबीएक्स सिस्टिममध्ये पाच दूरध्वनी (लँडलाइन) जोडण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. हे फोन आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम विभागाचे आहेत. दर महिन्याला येणारे बिल हे संबंधित विभागाकडून भरले जाणे अपेक्षित आहे, पण गेल्या कित्येक वर्षांपासून या विभागांकडून दूरध्वनी बिल वेळेवर भरले जात नाही आणि टेलिफोन विभागाकडून लँडलाइन कनेक्शन कट केले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; गेल्या तीन महिन्यांपासून पाच फोनचे बिल न भरल्याने त्याची सेवा खंडित करण्यात आली आहे. २३३१५७१ हा संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात जिल्हा परिषदेचा महत्वाचा क्रमांक म्हणून माहित आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेला हा क्रमांक गेल्या महिनाभरापासून बंद आहे.
याशिवाय २३३१५७४ (शिक्षण), २३३१५७५ (महिला व बालकल्याण), २३२९७१५ (समाजकल्याण), २३५३७४४ (बांधकाम) हे फोन बंद आहेत. केवळ २३३१५७२ ( अर्थ) आणि २३३१५७३( सिंचन) विभागाचा फोन नियमितपणे सुरू आहे.
दोन फोनवर जिल्हा परिषदेचा कारभार सध्या सुरू आहे. पीबीएक्स सिस्टम अद्ययाव करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये खर्चण्यात आले. नवीन मशीन बसविण्यात आली. पण फोनच बंद असल्याने या मशीनचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिल भरण्यास टाळाटाळ?
दूरध्वनीचे बिल दर महिन्याला भरण्यास अनेक विभाग टाळाटाळ करतात. सामान्य प्रशासन विभागाकडून ही बिले संबंधित विभागाला पाठवूनही त्याची पूर्तता केली जात नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तत्कालीन सीईओ सुखदेव बनकर यांच्या काळात असा प्रकार घडल्यानंतर संबंधित विभागप्रमुखांना कडक सूचना दिली गेली होती. त्यानंतर अनेक वर्षे सेवा सुरळीत चालली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे खरेदीखत केल्याने वकील गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मागच्या तारखेत बनावट खरेदीखत करून देणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखेने अटक केली. बनावट खरेदीखत करून एका नागरिकाचे घर बळकावल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेकडे चाँदखान युसूफखान नावाच्या व्यक्तीने तक्रार केली. चाँदखान बायजीपुरा भागात अहमदखान यांच्या घरात भाड्याने राहतात. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे शेख नासार नावाचा व्यक्ती आला. त्याने हे घर आपण २००३मध्ये खरेदी केल्याचे सांगितले व खरेदीखताची प्रत दाखविली. त्यावर नोटरीम्हणून अॅड. प्रकाश सुरवसे यांचे नाव होते. घराच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नसल्याची चांदखान यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी अॅड. सुरवसे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी, रहात असलेल्या घराचे बनावट खरेदीखत तयार करून देतो. त्यासाठी २० हजार रुपये लागतील, असे सुरवसे यांनी सांगितले. तडजोडीअंती १५ हजांरात हे बनावट खरेदीखत तयार करून देण्याचे ठरले. याची माहिती चाँदखान यांनी पोलिसांना दिली.

अॅड. सुरवसे यांना सुरुवातीला पाच हजार रुपये व नासेरखानच्या बनावट खरेदीखताची कॉपी चाँदखान यांनी दिली. शनिवारी दहा हजार रुपये व दोन साक्षीदार घेऊन खरेदीखत घेण्यासाठी चांदखान यांना अॅड. सुरवसे यांनी बोलावले. गुन्हे शाखेने सापळा रचून अॅड. सुरवसे यांच्या सातारा परिसरातील घरावर छापा टाकला. त्यापूर्वी पंचनामा करून अॅड. सुरवसे याना देण्यासाठी येणाऱ्या दहा हजारांच्या नोटाचे क्रमांक टिपून घेण्यात आले.

छाप्यामध्ये चाँदखान यांच्या नावावर असलेल्या ५० रुपयाच्या बाँड पेपरवर ९ मे २००४ रोजी करण्यात आलेले बनावट खरेदीखत आढळले. त्याचबरोबर त्यांच्या घरातून २०१५वर्षातील दोन कोर बाँड; तसेच २०१४ व २०१५ वर्षातील बनावट खरेदीखत आढळले. अॅड. सुरवसे यांना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे व पीएसआय सुभाष खंडागळे, नंदकुमार भंडारे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपीला कोर्टात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडअधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.

सरकारी साक्षीदार झाले पंच
बनावट खरेदीखत करण्यासाठी अॅड. सुरवसे यांनी दोन साक्षीदार घेऊन येण्यास सांगितले होते. पोलिसांनी त्यांचे सरकारी पंच या कामासाठी साक्षीदार म्हणून वापरले. यामुळे पोलिसांच्या दृष्टीने प्रकरण मजबूत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ विस्तारीकरण; भूसंपादन जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जागेच्या भूसंपादनाला जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या भूसंपादनासाठी शासनाने २५० कोटी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शासनाकडे दिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय भूसंपादन करू नका, अशी मागणी भूमी बचाव शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी १८२ एकर जमीन संपादन करावी लागणार आहे. त्यासाठी शहराच्या पूर्वेकडे जास्त जमीन घेण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. त्यामुळे चिकलठाणा, मुर्तिजापूर, मुकुंदवाडी येथील शेतकरी व जागा मालकांनी यापूर्वी मागण्या ठेवण्याचा प्रयत्न केला. संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सेच जानेवारी २०१७ मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भूमी बचाव शेतकरी संघर्ष समितीने विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना निवेदन देऊन त्यांच्यामार्फत शासनासमोर मागण्या मांडल्या आहेत.
या निवेदनावर बापूसाहेब पाटील दहिहंडे, भाऊसाहेब वाघ, किसनराव पाटील दहिहंडे, मदनराव नवपुते, नानासाहेब बकाल, सुनील जैस्वाल, गोकूळ नवपुते, रमेश दुतोंडे, मोहम्मद आरिफ शेख, बाबू इनामदार, अजहर मामू, पंकज जगताप यांच्या सह्या आहेत.

समितीच्या मागण्या
२००७ च्या अलाईमेंट नकाशाप्रमाणए पूर्व-पश्चिम दिशेला समान जागा संपादन करावी
अंदाजे हजार घरे विस्थापित होणार असून भूसंपादनापूर्वी त्यांना जागा द्यावी
संपादित जमिनीच्या १२.५ टक्के भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
२०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार बाजारमूल्य किंवा रेडीरेकनरच्या चारपट दर द्यावा
विकासक्षेत्रामध्ये १२.५ टक्के भूखंड दयावा
जमीन मालकाच्या पाल्यास शासकीय नोकरी द्यावी, विमानतळ परिसरातील कंत्राटी कामात प्राधान्य दयावे
संपादित क्षेत्राबाहेरील उर्वरित जमिनीवर व्यावसायिक किंवा निवासी वापराची परवानगी द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणकडून जादा बिलाचा शॉक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
महावितरण कंपनीने ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये जादा बिल आकारुन ग्राहकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे अनेक हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्राहकासह शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणात अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. वीज ग्राहकांना कनेक्शन देण्यापासून ते वीज बिल देयके वसुलीसाठी नागरिकांची अडवणूक केली जात आहे. अनेक जणांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना त्यांना अभय देऊन सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल वसुलीचा तगादा लावला जात आहे. वसुलीसाठी काही ग्राहकांचा वीज पुरवठादेखील खंडित करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर घरगुती नवीन मीटर कनेक्शनसाठी आकराशे रुपये आणि दुकानासाठी १६०० रुपये कोटेशन चार्जेस असताना वीज ग्राहकांची गरज पाहून चक्क २५०० ते तीन हजार रुपये घेतल्याशिवाय कनेक्शन दिले जात नाही. जो कोणी नियम दाखवितो. त्याला विजेची सुविधा देण्यास टाळाटाळ करून चालढकल करीत असल्याचा अनेक तक्रारी समोर येत आहेत.
महावितरणकडून गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वारंवार वीजपुरवठा खंडित करूनही अव्वाच्या -सव्वा बिले आकारणी करण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या महिन्यात आलेल्या बिलापेक्षा चालू महिन्यात आलेल्या बिलामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतीप्रधान भारत देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी अंधार आणि वेठीस धरून बोनस मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरी उजेड अशी अवस्था होत आहे.
आजघडीला शासनाने शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा देण्याचे जाहीर केला आहे. परंतु, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे. बिघाड झाल्याने संपूर्ण वेळ पुरवठा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना कापसाला पाणी देणे जिकरीचे बनले आहे. याबाबतची तक्रार घेऊन आल्यास महावितरणचे शहर व ग्रामीण कार्यालय कुलूपबंद असते. आल्या पावलाने माघारी फिरावे लागत असल्याचे संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्यावर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकरी नागावला तर यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे कबरडे मोडले. सोयाबीन पावसाने ६० % जाग्यावर कोंब फूटून वाया गेले, तर कापूस लाल्यारोगाने कच्चे बोंडे तटून गेल्यामुळे केलेला खर्च निघत नसल्याने आत काय करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
उर्वरित पिकांना जगविण्यासाठी धडपड करताना मात्र, महावितरणच्या मनमानी आणि बेजबाबदार कारभाराने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. सध्या तोंडावर दिवाळीचा सण येऊन ठेपला असताना महावितरण कंपनी शेतकरी नागरिकांचे दिवाळे काढत असल्याच्या जळजळीत प्रतिक्रया व्यक्त केल्या जात आहेत.
या प्रकाराकडे लातूर महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात अभियंता व कर्मचाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखान्यात अडीच वर्षांच्या चिमुकलीचा अमानुष छळ

$
0
0


औरंगाबाद : गुप्तांगावर अन् सबंध शरीरावर चटके, मारहाणीचे वळ असा अमानुष छळ सहन करणाऱ्या अडीच वर्षांच्या हतबल चिमुकलीची हडको एन ९ येथील एका कुंटणखान्यातून सुटका करण्याची धाडसी कामगिरी सोमवारी दामिनी पथकाने फत्ते केली. या ठिकाणावरून पाच नरमाधमांसह दोन महिलांना बेड्या ठोकल्या.
अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेची हकीकत अशी, दामिनी पथक प्रमुख पीएसआय अरुणा घुले यांना सकाळी एका जागरुक नागरिकाने फोन केला. एन ९ परिसरातील रेणुका माता मंदिरामागच्या घरात एका महिलेकडे अडीच वर्षांची मुलगी आहे. ती मुलगी या महिलेची नसून तिचा अमानुष छळ सुरू आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीवरून पीएसआय घुले, स्वाती बनसोडे, पूनम झाल्टे व कोमल निकाळजे यांनी पीसीआर मोबाइलसोबत या महिलेच्या घरी छापा टाकला. या घरात तीन महिला व पाच पुरूष आढळले. ही चिमुकली देखील तेथे होती. या महिला कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आले. प्रमुख आरोपी गीता कृष्णा कदम हिच्यासह दोन महिला व पाच पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना ही माहिती देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार सिडको पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

खरेदी विक्रीची शंका
या मुलीला तिची आई सोडून गेली आहे अथवा हा खरेदी विक्रीचा प्रकार आहे का, याची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीमध्ये या चिमुकलीच्या मोठ्या बहिणीची विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या म‌ाहितीची पडताळणी करण्यात येत आहे. या चिमुकलीबाबत गीताला विचारणा करण्यात आली असता, तिने या मुलीच्या आईला दुसऱ्या विवाह करायचा होता. त्यामुळे तिनेच तिला येथे आणून सोडल्याची माहिती दिली. या मुलीच्या आईचा मोबाइल क्रमांक घेऊन पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला. यावेळी तिने अहमदनगर येथील गावी असल्याचे सांगितले. तिच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

वेश्या व्यवसायासाठी केले प्रवृत्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इतर दोन महिलांमध्ये एक एकोणीस वर्षांची तरुणी आहे. या तरुणीने दामिनी पथकाला माहिती देताना मला देह विक्रीसाठी बळजबरीने प्रवृत्त केल्याचे सांगितले. गीता कदम हिच्या घरी पोलिसांना अनेक मोबाइल, दारू बियरच्या रिकाम्या बाटल्यांचा साठा आदी साहित्य आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीनफिल्ड’ भूसंपादनाबाबत आठवडाभरात बैठक घेणार

$
0
0



unmesh.deshpande@timesgroup.com
औरंगाबादः ‘स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या ‘ग्रीनफिल्ड’चे भूसंपादन युद्धपातळीवर करणे गरजेचे आहे. या संदर्भात आठवडाभरात बैठक घेतली जाईल. शहराची गरज लक्षात घेता ‘पीएमसी’ची नियुक्ती करू,’ अशी माहिती महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. स्मार्ट सिटी अभियानाबद्दल विविध प्रश्नांवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

प्रश्नः स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रीनफिल्ड उपक्रमाबाबत महिनाभरात काय प्रगती झाली ?
उत्तरः‘ग्रीनफिल्ड’ प्रतिष्ठेचा उपक्रम आहे. यात प्रामुख्याने भूसंपादनाची कारवाई करावी लागेल. भूसंपादनाबाबत आठवड्यात बैठक घेण्याचे नियोजन आहे. पालिकेचे सर्व पदाधिकारी, शहरातील प्रमुख राजकीय नेते यांच्याबरोबर बैठक घेऊन भूसंपादनाच्या संदर्भात त्यांच्या सूचना जाणून घेतल्या जातील. त्यांचे सहकार्य या सगळ्या कामात महत्त्वाचे ठरेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करू.

प्रश्नः भूसंपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना नेमकी कोणती ४० टक्के जागा परत मिळेल? या बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.
उत्तरः भूसंपादनाबद्दल उलटसलट चर्चा करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्याची जी जमिनीचे संपादन केले जाईल, त्याच जमिनीचा चाळीस टक्के भाग त्या शेतकऱ्याला परत केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे.

प्रश्नः परत मिळणाऱ्या चाळीस टक्के जमिनीचा शेतकऱ्याला मनाप्रमाणे विकास करता येईल का?
उत्तरः परत केलेल्या जमिनीच्या विकासाचे नियोजन स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेली ‘एसपीव्ही’ करेल. त्यानुसारच शेतकऱ्याने विकास योजना आखावी अशी कल्पना आहे. अन्यथा गुंठेवारी सारख्या वसाहती उभ्या राहतील. जमिनीच्या विकासाचे नियोजन करून दिल्यावर जमिनीची किंमत वाढेल. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. नियोजनामुळे नवीन शहराच्या विकासात एकसारखेपणा येईल.

प्रश्नः पीएमसी नियुक्तीची प्रक्रिया कुठवर आली?
उत्तरः पीएमसीच्या नियुक्तीबद्दल आराखडा तयार ‌केला जात आहे. स्मार्टसिटीसाठी स्थापन केलेल्या एसपीव्हीचे मुख्याधिकारी अपूर्व चंद्रा यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार येत्या मंगळवारी एसपीव्हीच्या अटींना अंतिम रूप दिले जाईल. त्यानंतर टेंडर काढून पुढील महिन्यात पीएमसीची नियुक्ती केली जाईल. शहराची गरज लक्षात घेऊन पीएमसीची रचना केली जाईल. कारण पीएमसी ग्रीनफिल्डसह पॅनसिटीसाठी देखील काम करेल. पीएमसीसाठी टाऊन प्लॅनर, टुरिझम एक्सपर्ट ची नियुक्ती करावी लागेल. कंपनी सचिव, मुख्य वित्त व लेखाधिकारी यांचीही नियुक्ती केली जाईल. त्यासाठी टेंडर काढू. या नियुक्त्यांसंदर्भात शासनाचे काही निर्देश आहेत. त्याचे पालन करून प्रक्रिया केली जाईल.

प्रश्नः पॅनसिटीमधील सिटी बस प्रकल्प कोणत्या स्टेजवर आहे?
उत्तरः पॅनसिटीमध्ये सिटीबस सेवा आणि घरकचरा व्यवस्थापन या महत्त्वांच्या बाबी आहेत. दोन्ही क्षेत्रात लगेच काम सुरू करण्याचे नियोजन आहे. सिटी बस सेवेसाठी ‘आय.टी.डी.पी.’ या एनजीओची मदत घेतली जाईल. पुण्यात ‘बीआरटीएस’साठी या संस्थेने मोठे काम केले आहे. सिटी बस संदर्भात एसटी महामंडळाशी देखील चर्चा करू. सध्या शहरात किती सिटी बस सुरू आहेत, शहराचा विस्तार लक्षात घेता येत्या काळात किती बसची गरज आहे, मार्ग कसे असावेत, थांबे कसे आणि कुठे असावेत यासाठी एसटी महामंडळाची मदत घेतली जाईल. सिटी बस सुरू करण्यापूर्वी चांगल्या दर्जाचे रस्ते, चांगले बसथांबे, चांगला बसडेपो असणे गरजे आहे. तसे नियोजन करू. त्यासाठी ‘आय.टी.डी.पी.’ संस्थेची मदत मिळेल. हे सर्व करून शहरात पॅनसिटीच्या माध्यमातून सिटी बस सुरू होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल.

प्रश्नः सिटी बस सेवेचे धोरण कसे आहे?
उत्तरः सिटी बस चालवण्याचे तीन पर्याय आहेत. ‘पीपीपी’तत्वावर सेवा चालवावी, पीएमटी सारखी सिटी बस चालवावी किंवा एसपीव्हीने (स्पेशल पर्पज व्हेकल) स्वतः सिटीबस सेवा सुरू करावी. यापैकी कोणता पर्याय निवडायचा हा निर्णय एसपीव्ही करेल. एसपीव्हीच्या पहिल्या बैठकीतही या बद्दल चर्चा झाली. सिटी बससाठी ‘बीआरटीएस’सारखे नेटवर्क शेंद्रा ते वाळूज या औद्योगिक पट्ट्यात उभारण्याचा मानस आहे. त्यासाठीचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. येत्या काळात या औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होईल. हे लक्षात घेऊन तेथे बीआरटीएसची योजना आखली जाईल.

प्रश्नः घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात नियोजन काय आहे?
उत्तरः घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात राज्य सरकारने काही संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्था प्रत्येक शहरात जाऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात ‘डीपीआर’ तयार करतील. तो तयार झाल्यावर महापालिका व एसपीव्ही बरोबर चर्चा करून त्याला अंतिम केले जाईल. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात प्रत्यक्ष काम सुरू होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी ते नक्षत्रवाडी जलवाहिनीला प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे जायकवाडी ते नक्षत्रवाडी हे काम शासनाची परवानगी घेऊन प्राधान्याने सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली.
समांतर जलवाहिनीसंदर्भात कंपनीने दाखल केलेले अपील हायकोर्टाने फेटाळल्यानंतर संपूर्ण योजना आता महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्यासंदर्भात आयुक्त म्हणाले, ‘कोर्टाच्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. समांतर जलवाहिनीचे काम आता महापालिकेला करावे लागणार आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान दोन हजार मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. जलवाहिनीसाठी राज्य व केंद्र सरकारने दिलेले ३२८ कोटी रुपये महापालिकेकडे आहेत. हा निधी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी वापरण्याची परवानगी शासनाकडे मागणार अाहे. परवानगी दिल्यावर लगेचच काम सुरू केले जाईल. त्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची प्रत सोबत जोडण्यात येणार आहे.’
मुख्य जलवाहिनीचे काम झाल्यावर शहरांतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला जाईल. पाणीपुरवठ्याचे महापालिकेचे साहित्य कंपनीकडे आहे. ते ताब्यात देण्यासंदर्भात कंपनीला पत्र दिले जाणार आहे. पाणीपट्टी वसुलीबद्दल कंपनीकडून तपशील मागवला आहे. त्यानुसार पाणीपट्टी वसुलीचे नव्याने नियोजन करता येईल, असे त्यांनी सांगितले.

उपद्रवी कर्मचाऱ्यांना काढणार
हर्सूल तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी मंगळवारी चाचणी घेतली जाणार आहे. त्यात काही दोष आढळला नाही, तर लगेचच हर्सूल तलावातून पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजनेसाठी कंपनीचे काही कर्मचारी उपद्रवी ठरण्याची शक्यता आहे. त्यांना तात्काळ सेवामुक्त केले जाईल. अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याते काम सुरू आहे, असे चहल म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईबाबत विद्यापीठाचे मौन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमएस्सी इनऑरगॅनिकच्या पेपरफुटी प्रकरणाला दोन दिवस उलटले. मात्र, छोट्या-मोठ्या प्रश्नांवर कारवाईची भाषा करणाऱ्या प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. संबंधित केंद्राला विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी भेटही दिली नाही.
शनिवारी इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयाचा पेपर बीड जिल्ह्यात व्हॉटस् अॅप ग्रुपवर तासभर आधी फिरत होता. पाटोद्यातील पद्मभूषण वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरून या पेपरला पाय फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एका शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, विद्यापीठाकडून सोमवारी याबाबत कोणतीच प्रक्रिया झाली नाही. या प्रकारामुळे परीक्षा केंद्रांवरील गोपनियतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाकडूनही गोपनीयता बाळगली जात आहे. तसेच प्रकरणाबाबतचा आढावाही प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे अशा कॉलेजांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सूचनांना केराची टोपली
परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका डाउनलोड करताना काय निकष पाळावेत, हे विद्यापीठाने २७ सप्टेंबरलाच कॉलेजांना कळविले होते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका विद्यापीठातून पाठविण्याची वेळ सकाळी ८.३०, प्रश्नपत्रिका डाउनलोड करून लिंक बंद करण्याची वेळ ९ वाजता. दुपारच्या सत्रात प्रश्नत्रिका पाठविण्याची वेळ १२.३० व डाउनलोडची वेळ १ वाजता. कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी गोपनीय कक्ष नेमण्यात आले आहेत, त्या ठिकाणी वेब कॅमेरा बसविणे बंधनकारक आहे. विद्यापीठाने सांगितलेल्या वेळेतच प्रश्नपत्रिका डाउनलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक तेवढ्याच छायांकीत प्रती करून घेण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची आहे. प्रश्नपत्रिका डाउनलोड केलेल्या आहेत, त्याची काटेकोरपणे नोंद घेणे आवश्यक. छायांकीत प्रतीची नोंद आवश्यक. प्रश्नपत्रिका डाउनलोड करेपर्यंत गोपनीय कक्षामध्ये केंद्रप्रमुखांनी उपस्थित रहावे, नेमून दिलेल्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेशास सक्त मनाई, केंद्रप्रमुखानाच मोबाइल वापरण्यास परवानगी याची सर्व जबाबदारी केंद्रप्रमुखांची राहील. अशा स्पष्ट सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. पाटोद्यात या सूचनांना केराची टोपली दाखवली. केंद्रावर ८.५८ वाजता पेपर डाउनलोड केला. प्रश्नपत्रिका डाउनलोड करताना संबंधित शिक्षक गोपनीय कक्षामध्ये आलेच कसे, परीक्षा केंद्रप्रमुखांनाच मोबाइल वापरण्याची परवानगी असताना, संबंधित शिक्षक मोबाइल घेऊन आला कसा, केंद्रप्रमुखांनी शिक्षिकाला रोखले कसे नाही, एवढे काटेकोरपणे निकष असताना ते पाळले का गेले नाहीत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

४ नोव्हेंबरचा पेपर पुन्हा पुढे
आठवड्यात दोनवेळा (१५ व २० ऑक्टोबर) पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाने ४ नोव्हेंबरचाही पेपर पुढे ढकलला आहे. मोर्चाचे कारण देत हा पेपर पुढे ढकलला आहे. हे पेपर आता १७ नोव्हेंबरनंतर घेतले जाणार आहेत.

कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेबाबतचा अहवाल आल्यानंतर तो कुलगुरूंसमोर ठेवला जाईल. त्यानंतर प्रशासन काय तो निर्णय घेईल. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झालेली आहे. पोलिस चौकशी करत आहेत. - डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images