Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादमध्ये आग; फटाक्यांची दुकानं खाक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाक्यांच्या बाजारपेठेला भीषण आग लागली असून त्यात दीडशेहून अधिक फटाक्यांची दुकानं जळून खाक झाली आहेत. आगीमुळं जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे.

औरंगपुरा भागात असलेल्या जिल्हा परिषद मैदानात दरवर्षी फटाक्यांचा मोठा बाजार भरतो. या बाजारपेठेत दीडशे ते दोनशे स्टॉल असतात. नेहमीप्रमाणे यंदाही इथं बाजार भरला होता. दिवाळीच्या निमित्तानं खरेदी-विक्रीची लगभग सुरू असताना अचानक आग लागली. फटाक्यांचे स्टॉल एकमेकांना खेटून असल्यानं काही कळण्याच्या आतच ही आग भडकली आणि एकच गोंधळ उडाला. बघता-बघता धुराचे लोट हवेत उसळले. त्यामुळं स्टॉलधारक व लोकांची पळापळ झाली. आगीत दीडेशहून अधिक स्टॉल खाक झाले. इतकंच नव्हे, मैदानात उभ्या असलेल्या अनेक चारचाकी व दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या.

शॉटसर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या, टँकर पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून बऱ्याच अंशी आग आटोक्यात आल्याचं समजतं. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून पुढील चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगीला फायर ब्रिगेड जबाबदार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फटाका दुकानांना लागलेल्या आगीला अग्निशमन दल (फायर ब्रिगेड) जबाबदार आहे. या विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळे घडले. त्यांच्यावर कारवाई करा,’ अशी एकमुखी मागणी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली.
औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १४० दुकाने जळून खाक झाली. या घटनेची दखल घेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी दुपारी तीन वाजता पालिकेतील दालनात तातडीची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधीपक्षनेते अय्युब जहागीरदार, गटनेते राजू वैद्य, गजानन बारवाल, नासेर कुरैशी, नगरसेवक विजय औताडे, शिवाजी दांडगे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी झनझन यांच्या कार्यद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत घडलेल्या घटनेला त्यांनाच जबाबदार धरले. राजू वैद्य म्हणाले, ‘या सर्व घटनेला अग्निशमन विभाग आणि शिवाजी झनझन जबाबदार आहेत. झनझन यांना कुणाचेही ऐकण्याची सवय नाही. त्यांची मानसिकता फार वाईट आहे. अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून औरंगपुऱ्यात फक्त दोन मिनिटांत गाडी आली, असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. दोन मिनिटांत गाडी येऊच शकत नाही. झनझन यांचा हलगर्जीपणा या सर्व घटनेला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई करणार नसाल, तर आम्हाला बैठकीला बोलावू नका.’ उपमहापौर प्रमोद राठोड यांनीही प्रशासनाला टार्गेट केले. ‘फटाका मार्केटसाठी अग्निशमन दलाची गाडी नव्हती. दुकानांना दिलेले सर्व सिजफायर निकामी होते व बोगस होते. दुकानांना अग्निशमन दलाने कोणत्या आधारे परवानगी दिली,’ असा सवालही त्यांनी केला.

दोषींची गय नाही
महापौर त्र्यंबक तुपे यांनीही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्तांना केली. यावर बोलताना बकोरिया म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल. कारवाईच्या संदर्भात संशय घेऊ नका. दोषींची गय केली जाणार नाही,’ अशी ग्वाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

प्रशासन अपयशीः आयुक्त
फटाके आगप्रकरणात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याची कबुली आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बकोरिया म्हणाले,‘फटाक्यांचा एवढा मोठा बाजार भरलेला असताना तेथे फायर ब्रिगेडची गाडी असायला हवी होती, पण गाडी नव्हती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. फटाक्याची दुकाने शहराच्या मध्यवस्तीत असायला नकोत, पण गेल्या अनेक वर्षांपासून औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे मार्केट थाटले जाते. त्यामुळे महापालिकेनेही परवानगी दिली. पुढच्यावर्षी मात्र फटाका बाजार शहराच्या बाहेर हलविले जाईल. येत्या काळात अशा घटना घडू नयेत म्हणून अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर प्रत्येक मार्केटमध्ये उभे केले जातील. आगीच्या प्रकरणात पोलिस आयुक्त, महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असती, तर ट्रॅप झाले असते असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रॅप झालेला नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली हे लगेच सांगता येणार नाही. चौकशीनंतर काही दिवसांत स्पष्ट होईल.’

उपमहापौर संतापले
‘जास्त बोलू नका, गप्प बसा,’ असे आयुक्त म्हणताच उपमहापौर कमालीचे संतापले. ‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले. या शाब्दिक चकमकीमुळे बैठकीत वातावरण तणावाचे बनले होते. बैठक अर्ध्यावर आलेली असताना उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभापती दिलीप थोरात यांचे आगमन झाले. खुर्चीवर बसल्यावर राठोड यांनी आगीच्या प्रकरणावरून आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना टार्गेट करणे सुरू केले. आपल्या निष्काळजीपणामुळे हे सगळे घडले. प्रशासन कमी पडले, त्यांनी योग्य नियोजन करायला हवे होते. पाण्याचे बंब फटाका बाजारात ठेवायला हवे होते, पण याकडे दुर्लक्ष केले,’ असे राठोड तावातावाने म्हणत होते. या प्रकारामुळे बकोरिया देखील संतापले. ‘जास्त बोलू नका, गप्प बसा’ अशा शब्दांत त्यांनी राठोड यांना बजावले. आयुक्तांच्या अशा बोलण्यामुळे रोठाड अधिकच संतापले. ‘जास्त बोलू नका,’ असे म्हणून ‘तुम्ही आम्हाला धमकवता का,’ असा सवाल त्यांनी केला. ‘लोक आम्हाला शिव्या देतात, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही बोलणारच,’ असे राठोड म्हणाले, पण बकोरिया यांनी त्यानंतर या वादाकडे लक्ष दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ब्रिगेडचा बंब नेमका आला कधी ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
फायर ब्रिगेडचा बंब घटनास्थळावर नेमका कधी पोचला, हे सांगताना महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांची भंबेरी उडाली. दोन मिनिटात गाडी पोचली असे सांगता सांगता झनझन बारा ते पंधरा मिनिटांवर जाऊन पोचले.
फटाक्याच्या दुकानांना आग लागल्यानंतर महापालिकेत महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच महापौरांनी झनझन यांना अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी केव्हा पोचली, असा प्रश्न विचारला. तेव्हा झनझन म्हणाले, ११ वाजून ४३ मिनीटांनी कॉल आला होता आणि ११ वाजून ४५ मिनिटांनी फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळावर होती. केवळ दोन मिनिटात गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या या विधानाला तुपे, राजू वैद्य, गजानन बारवाल यांनी आक्षेप घेतला. दोन मिनिटांत गाडी औरंगपुऱ्यात येऊच शकत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे झनझन थोडे विचलित झाले. ते म्हणाले, नाही नाही आठ मिनिटांत गाडी आली. तेवढ्यात आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी हस्तक्षेप केला. झनझन यांना ते म्हणाले, औरंगपुरापासून तुमचे कार्यालय किती दूर आहे ते सांगा. झनझन म्हणाले, तीन किमी अंतरावर. त्यावर आयुक्त लगेचच म्हणाले, मग आठ मिनिटांत औरंगपुऱ्यात गाडी कशी काय येऊ शकते? या प्रश्नामुळे झनझन पुन्हा गडबडले. ते म्हणाले, नाही - नाही बारा ते पंधरा मिनिटे लागली असतील. झनझन यांच्या या गोंधळामुळे आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
यानंतर आयुक्त बकोरिया यांनी अग्निशामक दलाच्या कार्यालयात गाड्या उभ्या न करता फटाका मार्केटमध्ये उभ्या करण्याचे आदेश झनझन यांना दिले. बंब तीन, की सात? फायर ब्रिगेडच्या किती गाड्या आहेत असा प्रश्न महापौरांनी विचारला तेव्हा झनझन यांनी तीनच गाड्या असल्याचे सुरुवातीला सांगितले, नंतर सात गाड्या असल्याचे ते म्हणाले. एका गाडीची क्षमता १४०० ते ४५०० लिटर पाणी वाहून नेण्याची आहे असे ते म्हणाले. दिवाळी संपेपर्यंत कोणतीही गाडी फायर ब्रिगेडच्या कार्यालयात ठेऊ नका. ज्या ज्या ठिकाणी फटाका मार्केटला परवानगी दिली आहे, त्या त्या ठिकाणी गाड्या उभ्या करा असे आदेश आयुक्तांनी झनझन यांना दिले. काही कारखाने व दवाखान्यांकडे आग विझविण्याच्या सात गाड्या आहेत. दिवाळीच्या सणापुरत्या या गाड्या ताब्यात घ्या, संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवा, अशी सूचनाही बकोरिया यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकनास भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगीत ज्या व्यावसायिकांची दुकाने बेचिराख झाली, त्यांना नुकसान भरपाई देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत दुपारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत आगीतील नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला. महापालिकेने जिल्हा परिषदेच्या मैदानावर १८० दुकानांना परवानगी दिली होती. त्यापैकी १४० दुकाने लावण्यात आली होती. एका दुकानात फटाक्यांचा पाच लाखांचा माल आहे असे गृहीत धरण्यात आले. त्याशिवाय दुकानासाठी वापरण्यात आलेले साहित्य, आगीत जळालेली वाहने याची गोळाबेरीज करून बारा ते पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असे मत अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी ज्यांना परवाना (लायसन्स) देण्यात आले, त्यांच्यापैकी फारच कमी जणांची दुकाने होती. त्यांच्याकडचा परवाना घेऊन अन्य व्यावसायिकांनीच दुकाने थाटली, अशा व्यावसायिकांची संख्या सुमारे नव्वद टक्के आहे. त्यामुळे दुकान परवानाधारकाच्या नावावर आणि नुकसान मात्र परवानाधारक नसलेल्या व्यावसायिकाचे झाले असे स्पष्ट झाले. त्यामुळे मूळ परवानाधारकाला मदत न मिळता ज्या व्यावसायिकाचे प्रत्यक्ष नुकसान झाले, त्यालाच मदत मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या संदर्भात महापौर त्र्यंबक तुपे स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करू, असे महापौर म्हणाले.
शासनाकडून मदत मिळेपर्यंत महापालिकेच्या पातळीवरून काही मदत करता येते का, याचाही विचार करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मदतीचा निर्णय करू असे महापौर म्हणाले. त्याला आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी समर्थन दिले. नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी प्रत्येक दुकानदाराला एक लाख रुपये मदत करा, असे पत्र महापौरांना दिले. या पत्राचाही विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मिनिटांत कॉलनी रिकामी!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आग लागली अन् तीन मिनिटांत स्वातंत्र्यसैनिक कॉलनी रिकामी झाली. कानठळ्या बसवणारा आवाज, धुराचे लोट आणि गोंधळाच्या स्थितीत रहिवाशांनी घर सोडले. फटाका मार्केट आणि कॉलनीत केवळ सिमेंट पाइपमुळे मोठे अंतर होते. अन्यथा, आगीची झळ अनेक घरांना बसली असती.
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानालगतच स्वातंत्र्यसैनिक कॉलनी आहे. दरवर्षी कॉलनीच्या संरक्षक भिंतींपर्यंत फटाके स्टॉल असतात. मात्र, यावर्षी भूमिगत गटार योजनेचे मोठे पाइप असल्यामुळे स्टॉल आणि कॉलनीत अंतर राखले गेले. फटाका दुकानांना आग लागल्याचे कॉलनीतील रहिवासी अजय बोरीकर यांनी पहिल्यांदा पाहिले. तातडीने घरात येऊन त्यांनी सर्व सदस्यांना बाहेर काढले. घरातील गॅस सिलिंडर व वाहने मोकळ्या जागेत नेऊन ठेवली. शेजारील घरातील सर्वांना मदत करीत अवघ्या तीन मिनिटांत कॉलनी रिकामी केली. घर क्रमांक सात, आठ आणि नऊ मैदानालगत असून त्यांना झळ बसण्याची भीती होती. आग भडकल्यामुळे दीडशे फुटांपेक्षा अधिक उंच ज्वाळा झेपावल्या. फटाके फुटत असताना स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरांच्या गच्चीवर व इतरत्र फटाके पडले. फटाक्यांची ठिणगी पुन्हा दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरली असती. त्यामुळे सर्व रहिवासी धास्तावले होते. आगीचे लोळ झेपावत असताना बघ्यांची धावपळ सुरू झाली. आगीने वेढलेले स्टॉल कॉलनीजवळ असल्यामुळे ‘पाणी आणून आग विझवा’ असे बोरीकर यांनी सांगितले. मात्र, बहुतेक बघे मोबाइलद्वारे आगीचे शूटिंग करण्यात मग्न होते. फटाक्यांच्या आवाजात कुणाचा आवाज कुणाला ऐकू जात नव्हता. पोलिसांनीही रहिवाशांना दुसरीकडे थांबण्यास बजावले. गोंधळ वाढत असताना बोरीकर आणि इतर रहिवाशांनी मदतकार्य केले. सावजी, जिंतूरकर, बोरीकर यांचे घर सर्वांत अलीकडे असल्यामुळे नुकसान होण्याची भीती होती. सुदैवाने, कॉलनीचे नुकसान झाले नाही. मात्र, अर्धा तास आगीचा थरार पाहून सर्वजण भयभीत झाले.

कॉलनीत फटाके उडाले
जि. प. मैदानावर आग लागल्यानंतर फटाके फुटू लागले. रॉकेट, आतिषबाजीचे फटाके उंच उडून सर्वत्र पडत होते. स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत ठिकठिकाणी फटाके पडले. वाहनावर ठिणगी पडून आग लागू नये म्हणून तरुणांनी खबरदारी घेत वाहने दूर उभी केली. पाण्याच्या टाक्यांवरही फटाके पडले. औरंगपुऱ्यातही फटाक्यांचे जळालेले तुकडे दिसत होते.


आग लागल्याचे पाहिल्यानंतर तातडीने सर्वजण घरातून बाहेर पडलो. काही घरात वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना मदतीसाठी धावलो. फटाक्यांच्या आवाजात कुणालाच बोलणे ऐकू येत नव्हते. कॉलनीजवळची झाडे आगीत होरपळली. - अजय बोरीकर, रहिवासी

मैदानावर मोठे पाइप असल्यामुळे स्टॉल आणि कॉलनीत अंतर आहे. अन्यथा, कॉलनीला खेटून स्टॉल असतात. योग्य खबरदारी घेतली नसल्यामुळे आग लागली, पण कॉलनीतील रहिवाशांना स्थलांतर करावे लागले. - प्रसाद मोहनपूरकर, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका मार्केट आग; तपास गुन्हेशाखेकडे वर्ग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद मैदानावरील फटाका स्टॉल आगप्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद केली असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. दोषींवर कडक कारवाई करू, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिला.
आयुक्त म्हणाले, ‘मैदानावर १८६ परवानाधारकांपैकी १४० फटाका स्टॉल होते. आग लागताच सातव्या मिनिटाला आम्ही पोहचलो. शॉटसर्किटमुळे आग लागली नसावी असा प्राथमिक अंदाज वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगीचे कारण स्पष्ट नाही. त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांत येईल. स्टॉल परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना होती, आगीचे बंब येण्यास उशीर झाला का, यासंबंधी महापालिकाही चौकशी करत असून त्यांचा अहवाल सोमवारी येईल.’

संयुक्त पंचनामा
महसूल व पोलिस विभागाच्या सहा पथकांतर्फे संयुक्त पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. मैदान परिसरात तात्पुरत्या स्वरुपात पोलिस मदत केंद्र सुरू केले आहे. जळालेल्या वाहनांचे इंजिन चेसीस नंबर आदी मिळवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. याकामी आरटीओ पथकाने काम सुरू केले असून, वाहनधारकांना पुढील आठवड्याभरात विमा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहोत,’ असे अमितेशकुमार यांनी सांगितले.

असोसिएशनचा अतिविश्वास नडला
‘फटाका मार्केटच्या सुरक्षेसंदर्भात फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यांच्या अडचणी, प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही स्वरुपाची अडचण नाही, सुरक्षेबाबत दोनशे टक्के खात्री आहे, असे दावे केले. तरीही ही घटना घडली,‘ अशी खंत अमितेशकुमार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एनजीटी' आदेशाची अंमलबजावणी नाही

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
फटाके केवळ दिवाळी व्यतिरिक्त लग्न समारंभ आणि विजयी मिरवणुकीतही फोडले जातात. त्यामुळे शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्फोटके नियंत्रण विभाग मिळून राज्याचे फटका सुरक्षितता धोरण ठरवा, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते. मात्र, सरकारने या धोरणाला हरताळ फासल्याचे उघड झाले आहे.
नागपूरचे कार्यकर्ते डॉ. रवींद्र भुसारी यांनी पर्यावरणहित याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (पश्चिम विभाग) तत्कालीन न्या. विकास किनगावकर व डॉ. अजय देशपांडे यांनी ६ नोव्हेंबर २०१५ रोजी फटाक्यांच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागांना विविध प्रकारचे आदेश दिले होते. प्रदूषण मंडळाने, महापालिका-नगरपालिकांनी बहुतेक आदेशांचे पालन केले नसल्याचे १९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या नोटीसमध्ये याचिकाकर्त्याचे वकील असीम सरोदे व पर्यावरणवादी विवेक ढाकणे यांनी नमूद केले होते. जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांच्या स्टॉलमधील सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता या स्टॉलमध्ये अग्निरोधक यंत्रणा होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अग्निरोधक यंत्रणा असली तरी छोट्या सिलेंडरने आग नियंत्रण झाले नाही. मुळात हे सिलेंडर केवळ शोभेचे ठरले. मैदानावर अनेक सिलेंडर निकामी असल्याचे दिसून आले. दिवाळीत फटाक्यांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी नियम धाब्यावर बसवून फटाके विक्री करणाऱ्यांवर आवश्यक कायदेशीर कारवाईसह भरघोस दंड आकारण्याचे आदेश हायकोर्टाने राज्यातील सर्व पालिकांना दिले होते. या आदेशाचीही अंमलबजावणी झाली नाही. औरंगाबाद महापालिकेनेही आदेशाचे पालन केले नाही. जिल्हाधिकारी-उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभर फटाकेविरोधी समित्या स्थापन करून स्फोटके नियंत्रण विभाग, प्रदूषण मंडळ, महापालिका, पोलिस आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी फटाके विक्रीची दुकाने, गोदामे, कंपन्यांना अचानक भेटी देऊन अनधिकृतरित्या आयात केलेले चीनी फटाके जप्त करणे, अधिक आवाजाचे फटाके जप्त करणे, पर्यावरण स्वच्छता निधी जमा करणे असे वेगवेगळे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते. या आदेशांचीही अंमलबजावणी झाली नाही.

दाट लोकवस्तीत परवानगी कशी ?
‘कोट्यवधींचा कोळसा झाला, पण त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे. शहराच्या दाट वस्तीत फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देण्यात येऊ नये, असा आदेश असताना प्रशासनाने जिल्हा परिषद मैदानांवर परवानगी का दिली ? परवानगीची कायदेशीर तपासणी झाली पाहिजे,’ अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली.

दोन स्टॉलमध्ये अंतर नाही
स्टॉलला परवानगी देताना प्रत्येक स्टॉलमधे अंतर असले पाहिजे. त्याचा नकाशा तयार करणे आवश्यक आहे. फायर ब्रिगेडच्या गाडीची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. आग लागल्यानंतर बाहेर कसे पडायचे याचीही जागा ठरलेली पाहिजे. या आदेशाचीही अंमलबजावणी प्रशासनाला करत आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिक कॉलनीचा सात वर्षांपासून लढा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरविण्यात येणारा फटाका बाजार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथून हलवावा यासाठी स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील रहिवासी २००९ पासून लढा देत आहेत. रहिवाशांनी त्यासाठी कोर्टाचाही दरवाजा ठोठावला होता. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप यामुळे फटाका बाजार हटलेला नाही. आजच्या दुर्घटनेनंतर रहिवाशांचा लढा पुन्हा समोर आला आहे.
शहरातील महत्वाचा फटका बाजार आज सकाळी लागलेल्या आगीने भस्मसात झाला. मुख्य वस्तीत आणि अतिशय वर्दळीच्या परिसरात हा बाजार भरविला जातो. मध्यवस्ती, नागरिकांची वर्दळ, प्रदूषण आणि काही गंभीर प्रकार घडला, तर सुरक्षेचा प्रश्न गंभीर होईल, त्यामुळे हा बाजार इतरत्र हलविण्यात यावा, ही मागणी कॉलनीवासी अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन, राजकर्त्यांकडे करत आहेत. दिवाळीच्या काळामध्ये दरवर्षी सुरक्षेबाबत कॉलनीवासी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडतात, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. चार दिवसांचा बाजार असतो, तुम्हाला काय होते, सुरक्षेचे आम्ही पाहू अशी उत्तरे रहिवाशांना राजकारण्यांकडून मिळत आली आहेत. त्यातच आज झालेल्या दुर्घटनेमुळे कॉलनीवासीयांसाठी हा प्रश्न किती गंभीर होता, याची प्रचिती आली आहे.

राजकीय हस्तक्षेप
रहिवाशांचा लढ्यात राजकीय पुढारी हस्तक्षेप करत आले आहेत. आपले हितसंबध जपण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी भावनिक मुद्दा करतात, रहिवाशांवर दबाव आणतात, चार दिवसांसाठी काय होते, तुम्हाला काही होत नाही, अशी दमबाजी करीत अशा प्रकारची मागणी करू नका असेही रहिवाशांना स्थानिक राजकीय पुढारी, काही लोकप्रतिनिधींकडून सांगितले जाते, अशी प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये आहे. हितसंबंधांमुळे रहिवशांची मागणी नेहमीच अडगळीत टाकण्यात आली.

कोर्टात धाव घेणार
प्रशासनाचे दुर्लक्ष, त्यात शनिवारची दुर्घटना लक्षात घेत स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील रहिवासी पुन्हा कोर्टात कॅव्हेट दाखल करणार आहेत. पोलिस आयुक्तांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले.


आम्ही सातत्याने फटाका बाजार शहराबाहेर मोकळ्या जागेत भरविण्यात यावा अशी मागणी करीत आलो आहोत. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. राजकीय नेत्यांकडूनही तशीच उत्तरे आम्हाला मिळतात. या भीषण आगीमुळे आमची मागणी का गरजेची होती, हे आज तरी प्रशासनाला कळेल. सायंकाळी ही दुर्घटना घडली असती तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे.
- अशोक मतसागर, अध्यक्ष, स्वातंत्र सैनिक कॉलनी सोसायटी

आम्ही प्रशासनाला अनेक वर्षांपासून फटाका बाजाराबाबत गांभीर्याने सांगतो आहोत. आमचा लढा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासकीय, राजकीय पातळीवर फटका बाजाराबाबत सुरक्षेपेक्षा भावनिक मुद्दा केला जातो. - अनिल वाळुंजकर, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४० मिनिटांत राखरांगोळी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन दिवाळीत शहराच्या मध्यवस्तीतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर शनिवारी अग्न‌ितांडव झाले. फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत १४० स्टॉल्स बेचिराख झाले. सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या या आगीत दहा चारचाकी, तीन रिक्षा तर ८७ दुचाकी भस्मसात झाल्या. या दुर्घटनेची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी दिले आहेत.
सकाळी ११.३७ वाजता फटाका बाजारातील एका दुकानाला आग लागली आणि बघता-बघता आगीने संपूर्ण बाजार कवेत घेतला. फटाका दुकानदार आणि आसपासच्या तरुणांनी आग विझविण्याचे कसोशीने प्रयत्न केले, पण अखेरचा फटाका जळेपर्यंत आग धुमसतच राहिली. उशिरा पोचलेल्या अग्निशमन दलाने आपल्या फुटक्या पाइपांमधून पाण्याचा मारा केला. तोही निरुपयोगी ठरला.
फटाका असोसिएशनच्या दाव्यानुसार या आगीत ४० ते ५० कोटींचे, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार दहा कोटींचे, तर अग्निमशन दलाच्या दाव्यानुसार १२ ते १५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेनंतर पोलिस यंत्रणेने शहरातील अन्य फटाका बाजारांची सुरक्षा व्यवस्था वाढविली असून, खबरदारी म्हणून तेथे अग्निशमन दलाचे बंब तैनात करण्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी फटाका बाजारात हळूहळू गर्दी होत होती. स्वातंत्र्यसैनिक कॉलनीकडील प्रवेशद्वारालगत असलेल्या एका दुकानामागून आगीला सुरुवात झाली. काही कळण्यापूर्वी आगीने रौद्र रूप धारण केले. एका कोपऱ्यातून आग लागल्याचे पाहून सभु कॉलेज तसेच शिवाई ट्रस्टकडील प्रवेशद्वारातून लोक सैरावैरा पळत सुटले. ही आग पाहता पाहता संपूर्ण मैदानावरील दुकानांमध्ये पसरली. फटाक्यांचे आवाज आजूबाजूच्या परिसरात घुमू लागले. धुराचे लोट आकाशात पसरले. फटाके खरेदीसाठी आलेले नागरिक तसेच फटाका व्यापाऱ्यांच्या दुचाकी, चारचाकी या बाजाराच्या मध्यभागी, मोकळ्या जागेत होत्या. या गाड्यांनीही पेट घेतला आणि काही वेळातच त्यांचा कोळसा झाला. मध्यवस्तीत एवढी मोठी दुर्घटना होऊनही पोलिस उशिराने पोचले. अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी २० मिनिटे उशिराने पोचले. त्यामुळे आगीचे लोण अधिक वेगाने पसरले. तोपर्यंत खासगी टँकरची रांग लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद, स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील लगतची घरे, तसेच निराला बाजार परिसर रिकामा करण्यात आला. फटाक्यांनी पेट घेताच लांबवर उडणारे फटाके वाट मिळेल तिकडे पडले. काही फटाक्यांची तीव्रता एवढी होती की निराला बाजार, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, सभु कॉलनी, औरंगपुरा, नाथ मंदिरासमोरील मैदानापर्यंत काही फटाके पडले. चहूबाजूंनी धुराचे लोट पाहून नागरिकांनी जिल्हा परिषद मैदानाकडे धाव घेतली. समर्थनगर, पैठणगेट, औरंगपुरा, नागेश्वरवाडीकडून येणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य पाहून रुग्णवाहिका बोलाविण्यात आल्या. त्या मैदानापर्यंत पोचण्यास अडचण झाली. पोलिसांनी बघ्यांना हुसकावण्यासाठी सौम्य छडीमार केला.
आगीचे रौद्र रूप पाहून मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते तातडीने धावले. मैदानावरून लोकांना बाहेर काढल्यानंतर आग विझविण्यासाठी या मंडळींनी मोठी मदत केली. केवळ ४० मिनिटांत मैदानावरील सर्व स्टॉल्स जळून खाक झाले. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तसेच खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण आणि आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष मदत केली. दरम्यान, पोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत एकूण नुकसानीचा प्राथमिक अंदाज कळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्यावतीने ५६ वे राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन ६ ते ८ नोंव्हेबर दरम्यान उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विक्रम काळे यांनी दिली. यावेळी संमेलनाध्यक्ष एम. डी. देशमुख उपस्थित होते.
राज्यभरातून सुमारे २५०० प्रतिनिधी या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन ६ नोव्हेबर रोजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्‍ते होणार आहे. यावेळी कामगार मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह डझनभर आमदार यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.
या अधिवेशनात विविध मान्यवर शोध निंबधाचे वाचन करतील. ज्ञानरचनावाद व वैज्ञानिक दृष्‍टी‌कोन या विषयावर अॅड. मुक्ता दाभोळकर, शैक्षणीक सा‌माजिक प्रबोधन व सांस्कृतीक राष्ट्रवाद यावर अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, शिक्षण विस्तार व गुणवत्ता या विषयावर लातूरचे प्रा. अनिरुद्ध जाधव, परीक्षेचे बदलते स्वरुप या विषयावर गंगाधर गव्हाणे, शिक्षण काल, आज आणि उद्या या विषयावर उत्तम कांबळे मनोगत व्यक्त करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका मार्केटमध्ये उरले फक्त सांगाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर पोलिस व महसूल विभागाने पहाटेपर्यंत पंचनामे केले. दुसऱ्या दिवशी या मैदानावर फक्त जळालेल्या वाहनांचे सांगाडे उरले होते. मुंबईच्या स्फोटक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, त्याची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
फटाका मार्केटला लागलेल्या आगीमध्ये शनिवारी १४० दुकाने जळून खाक झाली आहे. शंभरावर वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीच्या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखा व महसूल विभागाच्या सहा पथकांनी पहाटेपर्यंत या दुकानाचे पंचनामे केले. घटनेनंतर पोलिसांनी या मैदानाचा ताबा घेतला आहे. मैदानाच्या तिन्ही प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मैदानावर जळालेल्या वाहनांचे केवळ सांगाडे शिल्लक असून, त्यावर पंचनाम्याचे त्यांचे क्रमांक टाकण्यात आले आहेत. रविवारी सकाळी मुंबईवरून आलेल्या एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंटच्या (स्फोटके विभाग) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सुमारे दीड तास पाहणी केली. हे अधिकारी गोपनीय अहवाल शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आगीत अंदाजे १० कोटीचे नुकसान झाल्याची शक्यता पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली.

आगीचे कारण अस्पष्ट
प्रथमदर्शनी दुकान क्रमांक ४७ ते ४८ ला आग लागल्याचे दिसून येत आहे, मात्र आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. यासंदर्भात व्यापाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्नितांडवात १३ कोटींचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका मार्केटच्या झालेल्या अग्नितांडवामध्ये सुमारे १३ कोटी रुपयांची राखरांगोळी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महसूल विभागाने या दुर्घटनेच्या पंचनाम्यानंतर शासनाकडे अहवाल पाठवला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटनेत नुकसान भरपाईचा पर्याय नसल्यामुळे ‌आता मदतीची संपूर्ण भिस्त मुख्यमंत्री मदत निधीवर आहे.
भीषण आगीत १४० स्टॉल्स बेचिराख झाले. वाहनधारक व फटाका व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. यानुसार दोन तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार करण्यात आली. त्यांनी केलेल्या पंचनाम्यानंतर घटनेचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये फटाका दुकाने, जळालेल्या दुकानांची संख्या, फटाक्यांची दुकाने, वाहने यांच्या नुकसानीची संपूर्ण माहिती पाठवण्यात आली आहे. हे नुकसान १३ कोटी रुपयांच्या घरामध्ये गेल्याची माहिती शासनाला पाठवण्यात आली.

भरपाईची सीएमकडे मागणी
दरम्यान, शासन निर्णयानुसार आग लागून झालेल्या नुकसानीच्या भरपाई करण्याची कोणतीही तरतूद नसल्यामुळे आता नुकसान भरपाईची भिस्त मुख्यमंत्री मदत आहे. आगीत दुर्घटनेतील व्यावसायिकांना भरपाई देण्याची शिफारस महापौर त्र्यिंबक तुपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका बाजाराला आग शॉर्ट सर्किटमुळे नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगीचे कारण शोधण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका मार्केटची पाहणी केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसल्याचा दावा महावितरण कार्यालयाच्या सूत्रांनी केला.
शनिवारी औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका मार्केट आगीत भस्मसात झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा आरोप या दुर्घटनेनंतर करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर रविवारी सकाळी महावितरणाचे इलेक्ट्रिकल निरीक्षक ए. एस. मुजावर आणि पांडव यांनी औरंगपुरा फटका मार्केटची पाहणी केली. त्यांनी वीज कनेक्शन देणाऱ्या मीटरची तपासणी केली. याशिवाय फ्युज आणि इलेक्ट्रिकल केबलचीही तपासणी केली. या पाहणीत वीज मीटर जळाले नसल्याचे दिसून आले. याबरोबर ट्रिपिंग झाल्याचे स्पष्ट नाही. यामुळे प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किटमुळे फटाका बाजाराला आग लागली नाही, असा महावितरणचा दावा आहे. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदविले. यावेळी अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, कार्यकारी अभियंता अर्शद खान यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उ‌पस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काहीशी भीती; सुरक्षेबाबत दक्षता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्य फटाका बाजारात शनिवारी लागलेल्या भीषण आगीत फटाका बाजाराचे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणच्या फटाका बाजारात सुरक्षेबाबत दक्षता घेण्यात आली. टीव्ही सेंटरला अग्निशमन दलाची गाडी दिवसभर उभी होती. इतर ठिकाणी व्यापाऱ्यांनीही दक्षता बाळगत, छोटे-छोटे सुरेक्षेचे उपाय केल्याचे चित्र होते. नागरिकांमध्ये काहीशी भीती असल्याने फटाका बाजारात गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी ‘मटा’ला माहिती दिली.
जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजाराच्या भीषण आगीचा परिणाम आज शहरातील अन्य फटाका बाजारांवर दिसला. शहरात फरशी मैदान, टीव्ही सेंटर, राजीव गांधी मैदान, एन-२, त्रिमूर्तीनगर, शिवाजीनगर परिसरात फटाका बाजार आहेत. दुपारपर्यंत या बाजारात गर्दी रोडावलेली होती. सुरक्षेबाबत व्यापारी आणि प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली. पोलिस आणि महापालिका प्रशासनाचे पथकांनी भेटी दिल्या होते. राजीव गांधी मैदानावरील फटाका बाजारात असोसिएशनतर्फे तीन वेळा मैदानावर पाणी मारण्यात आले. प्रत्येक दुकानासमोर पाण्याची टाकी, तर वाळू भरलेली एक बादली ठेवण्यात आली आहे. या मैदानावर फटाक्याची ३० दुकाने आहेत.
टीव्ही सेंटरच्या फटाका बाजारातही अशीच सुरक्षेची काळजी घेण्यात आल्याचे चित्र आहे. येथे ६६ फटाका स्टॉल आहेत. कालच्या घटनेनंतर अग्निशमन दलाची गाडी बाजारात उभी होती. महापालिकेचे कर्मचारीही येथे उपस्थित होते. फरशी मैदानावरही ३० दुकाने आहेत. तेथेही अशाच प्रकारची दक्षता घेण्यात आली आहे. कालच्या घटनेनंतर शिवाजीनगर, त्रिमूर्तीनगर परिसरातील फटाका बाजारात सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी पाण्याचे टँकर उभे केलेले आहेत. कालच्या घटनेचा विक्रीवर परिणाम झाल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

आम्ही सुरक्षेच्याबाबत सुरवातीपासून काळजी घेतो. फायर इस्टिंगविशरसारखे उपाय, प्रत्येक दुकानासमोर पाण्याने भरलेल्या टाक्या, वाळूने भरलेली बादली ठेवलेली आहेत. आज आम्ही मैदानावर तीनवेळा पाणी मारले आहे. कालच्या घटनेने नागरिकांमध्ये भीती असून, गर्दी फारशी नाही.
- मुरलीधर पाटील, एकता फटका स्टॉल, अविष्कार कॉलनी.

टीव्ही सेंटरच्या फटाका बाजारात ६६ दुकाने आहेत. सुरक्षेबाबत आम्ही काळजी घेतोच. प्रत्येक दुकानासमोर फायर इस्टिंगविशर, पाण्याच्या भरलेल्या टाक्याही आहेत. कालच्या घटनेनंतर अग्नीशामन दलाची गाडीही उभी आहे. प्रशासनाकडूनही पाहणी केली जात आहे.
- मनोज गायके, अध्यक्ष, टीव्ही सेंटर फटाका बाजार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ध्या तासात बेचिराख...; हंगामी व्यावसायिक हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीत सर्वसामान्य व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः हंगामी व्यवसाय करून चरितार्थ चालवणारे व्यापारी अडचणीत आले आहेत. दागिने मोडून, कर्ज काढून अनेकांनी फटाक्यात गुंतवणूक केली होती. अर्ध्या तासात फटाक्यांची राख झाल्याचे पाहून अनेकांना अश्रू आवरले नाही.
सणासुदीत तात्पुरता व्यवसाय करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असलेल्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. हंगामी व्यवसायावर शेकडो कुटुंबं अवलंबून असतात. दिवाळीच्या सणात आकाशकंदिल, शोभेच्या वस्तू, पणत्या, फटाके, मूर्ती यांची विक्री करण्यासाठी औरंगपुरा भागात दुकाने थाटली होती. जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांची दुकाने जास्त होती. या दुकानांना शनिवारी सकाळी आग लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व दुकाने खाक झाली. दुकाने जळताना पाहून व्यावसायिकांना अश्रू आवरले नाही. कर्ज काढून, घरातील दागिने मोडून, उसनवारीचे पैसे घेऊन अनेकांनी दुकान सुरू केले होते. गुंतवणूक वसूल झालेली नसताना सर्व काही क्षणात संपले. फटाक्याच्या व्यवसायात तुलनेने चांगला नफा असल्यामुळे तरुणांनी एकत्रित दुकान थाटले होते, पण आगीत व्यवसाय संपल्याचे पाहून त्यांना रडू कोसळले.
‘मागील पाच-सहा वर्षांपासून व्यवसाय करतो. माझ्यासाठी फटाक्यांचा व्यवसाय उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता. नुकसान भरून काढणे मला कठीण आहे,’ असे अजय सलामपुरे या तरुणाने सांगितले. फटाक्यासह कार, दुचाकी आणि इतर ऐवज जळाल्याचे पाहून एक तरूण व्यावसायिक स्तब्ध झाला. व्यावसायिकांची आर्थिकृष्ट्या होरपळ करणारी दुर्घटना विसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

जीव बचावला
फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे पाहिल्यानंतर अनेकजण सैरावैरा धावत सुटले. पैसे किंवा फटाके घेऊन निघण्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे वाहनांसह सर्व काही सोडून दुकानदार धावत सुटले. माल वाचवण्यासाठी वेळ मिळाला नसल्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले. विशेषतः मध्यमवर्गीय तरूण व्यावसायिक कोलमडून पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९ महिन्यांत ८ व्यक्तींचे अवयवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात अवयवदानाची चळवळ सुरू होऊन ९ महिने झाले आहेत आणि केवळ ९ महिन्यांत ८ ‘ब्रेन डेड’ रुग्णांकडून ३५पेक्षा जास्त अवयवांचे दान झाले. यामध्ये ६ हृदय, ८ यकृत, १६ मूत्रपिंड आणि किमान ८ ते १० नेत्रांचे (आयबॉल) दान होऊन त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे. यातील सर्व ‘आयबॉल’सह १६ पैकी १५ मूत्रपिंडांचे औरंगाबाद शहरात व नांदेड शहरात प्रत्यारोपण झाले आहे. मात्र अजूनही ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची शासकीय सुविधा नसल्याने जवळजवळ निम्म्या वेळेला हृदय प्रत्यारोपण झालेले नाही.
१६ जानेवारी २०१६ रोजी मराठवाड्यातील पहिले अवयवदान शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये झाले आणि त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे आठवे अवयवदान झाले. यामध्ये सहा वेळा औरंगाबाद शहरात, तर दोन वेळा नांदेड येथे हे अवयवदान झाले. विशेष म्हणजेच औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एकदा, तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोनदा अवयवदान झाले.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान झाले. मराठवाड्यात अवयवदान वाढत असताना, ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकवेळा हृदय व यकृत प्रत्यारोपण झाले नसल्याचे किमान तीन ते चार वेळा स्पष्ट झाले.
विमानाची शासकीय सुविधा नाहीच

हृदय, यकृतासह विविध अवयवांची तात्काळ वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी किमान एक स्वतंत्र ‘एअर अॅम्ब्युलन्स’ सज्ज ठेवणार असल्याचे राज्य शासनाने मागेच जाहीर केले होते. मात्र ही घोषणा करून कित्येक महिने लोटले असले तरी अद्यापही ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. २७ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील अवयवदानावेळी केवळ विमानाची सोय झाली नाही म्हणून हृदयाचे अवयवदान होऊ शकले नाही. सर्वांत पहिल्या अवयवदानातही विमानाची सोय झाली नाही म्हणून हृदयाचे अवयवदान होऊ शकले नव्हते. काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे झालेल्या अवयवदानावेळीही विमानाची सोय झाली नव्हती; म्हणूनच तिथेही हृदय व इतर अवयवांचे दान होऊ शकले नसल्याचे समोर आले आहे.

विमानाची शासकीय सुविधा नाहीच
हृदय, यकृतासह विविध अवयवांची तात्काळ वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी किमान एक स्वतंत्र ‘एअर अॅम्ब्युलन्स’ सज्ज ठेवणार असल्याचे राज्य शासनाने मागेच जाहीर केले होते. मात्र ही घोषणा करून कित्येक महिने लोटले असले तरी अद्यापही ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. २७ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील अवयवदानावेळी केवळ विमानाची सोय झाली नाही म्हणून हृदयाचे अवयवदान होऊ शकले नाही. सर्वांत पहिल्या अवयवदानातही विमानाची सोय झाली नाही म्हणून हृदयाचे अवयवदान होऊ शकले नव्हते. काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे झालेल्या अवयवदानावेळीही विमानाची सोय झाली नव्हती; म्हणूनच तिथेही हृदय व इतर अवयवांचे दान होऊ शकले नसल्याचे समोर आले आहे.

एका वेळसाठी तब्बल १२ लाख?
हृदय किंवा यकृत किंवा अन्य कोणत्याही अवयवाची विमानाद्वारे राज्यात वाहतूक करण्यासाठी किमान १२ लाखांचा खर्च येतो आणि राज्याबाहेर अवयव घेऊन जाण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त खर्च लागतो. हा सर्व खर्च रेसिपिएंट म्हणजेच ज्या रुग्णामध्ये संबंधित अवयवांचे रोपण होते त्याला हा खर्च सोसावा लागतो, असेही समजते. जेव्हा विमान वाहतुकीचा खर्च सोसण्याची आर्थिक क्षमता रुग्णाची नसते तेव्हा हृदय किंवा अन्य कोण्याही अवयवाचे प्रत्यारोपण होत नाही, हेही यानिमित्ताने समोर आले आहे. त्यामुळेच अवयवांच्या वाहतुकीसाठी शासनाच्या वतीने पूर्णपणे स्वतंत्र ‘एअर अॅम्ब्युलन्स’ हवी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

अवयवदान चळवळ वाढीसाठी ब्रेन डेड रुग्णांचे विविध अवयव काढण्यासाठी ‘नॉन ट्रान्स्प्लान्ट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) वाढण्याची गरज आहे. खरे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे सेंटर हवेत, पण अजूनही नोंदणीकृत फार कमी सेंटर आहेत. सेंटरच्या माध्यमातूनच अवयवदानाची चळवळ वाढू शकेल. अर्थात, ‘एअर अॅम्ब्युलन्स’ची शासनाची स्वतंत्र सुविधा असल्याशिवाय ही चळवळ पूर्णक्षमतेने वाढू शकणार नाही.
– डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसी अध्यक्ष

नांदेडसारख्या तुलनेने छोट्या शहरातही अवयवदान होऊ शकते. इच्छा असेल तर निश्चितपणे मार्ग निघू शकतो. सर्व टीमच्या अथक प्रयत्नांमुळेच कमी कालावधीत दोनदा अवयदान झाले. तब्बल २० ते २५ जणांची टीम रुग्णालयाचे दैनंदिन काम सांभाळून अवयवदानासाठी अखंडपणे कार्यरत होती.
– डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड

अवयवदानाचे योगदान असे
हृदय ः ०६
यकृत ः ०८
मूत्रपिंड ः १६
आयबॉल ः १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीजी’चा गुंता सुटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शैक्षणिक वर्षापासून विभाग व कॉलेजस्तरावरील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एकसारखेपणा आणण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाची घोषणा हवेत विरली आहे. एकसारखेपणा नसल्याने विभाग व कॉलेजांच्या परीक्षेचे वेळापत्रकही एकसारखे नाही. विभागांच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित नाहीतर, कॉलेजांच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत.
विद्यापीठाने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत कॉलेज आणि विद्यापीठस्तरावर सुसूत्रता आणण्यासाठी बदल करण्याचे संकेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच दिले होते. अभ्यासक्रम, परीक्षेच्या वेळापत्रकता सुसूत्रता आणण्याची घोषणा कागदावरच राहिली आहे. कॉलेज व विद्यापीठस्तरावरील पदव्युत्तर अभ्यासक्रमात सारखेपणा आणण्याबाबत प्रक्रियाही करण्यात आली, परंतु त्याला मूर्त रूप मिळाले नाही. शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपले, तरी विद्यापीठाची घोषणा पूर्णत्वास गेली नाही. शैक्षणिक वेळापत्रकात, अभ्यासक्रम सारखेपणा नसल्याने परीक्षांचे वेळापत्रकही वेगवेगळे आहे. कॉलेजस्तरावरील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत, तर विद्यापीठ विभागातील परीक्षांचे वेळापत्रक ठरलेले नाही.

विभागांच्या परीक्षेचे वेळात्रक निश्चित नाही
अभ्यासक्रमात एकसारखेपणा असेल, तर परीक्षेतही सुसूत्रता आली असती. कॉलेज आणि विभागांमधील परीक्षा एकाच वेळापत्रकानुसार झाली असती. प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही एकसारखे असले असते. अभ्यासक्रम एकसारखा करण्याची घोषणा करण्यात आली होती, पण प्रशासनाला त्याचा विसर पडला. त्यामुळे कॉलेजांचे व विभागांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत एकसूत्रता येऊ शकलेली नाही. एकीकडे कॉलेजमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत, तर विभागातील परीक्षांचे वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. दिवाळीनंतर विभागांच्या परीक्षा होतील. त्यातही विभाग-विभागांच्या परीक्षांमध्येही एकवाक्यता नसते. स्वायत्ततेच्या नावाखाली विभागनिहाय वेळापत्रक वेगळे असल्याचे दरवर्षी समोर येते.

सुसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सध्या विद्यापीठात अधिकार मंडळे, अभ्यास मंडळेही नाहीत. त्या अडचणीमुळे ही बाब राहिली आहे. अधिकार मंडळे अस्तित्वात आल्यानंतर ही बदल शक्य होतील.
- डॉ. सतीश पाटील, बीसीयूडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

पीजी कॉलेज.......१५२
एमए विषय.........१६
एमएस्सी विषय....२१
एमकॉम.............२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका दीडशे कोटीत करणार ४४ रस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरात चांगले व दर्जेदार रस्ते असावेत, यासाठी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून ४४ रस्त्यांचे काँक्रिटीकरण (व्हाइट टॉपिंग) करण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे. सर्वसाधारण सभेनेही त्याला मान्यता दिली असून, येत्या काळात टप्प्या टप्प्याने या रस्त्यांची कामे सुरू केली जाणार आहेत.
शहराचे ऐतिहासिक, शैक्षणिक व औद्योगिक महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेने रस्त्यांच्या कामाचा निर्णय घेतला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात प्रथमच रस्त्यांची कामे होणार आहेत.
४४ रस्त्यांच्या यादीत शहराच्या मध्यवर्ती भागातून खडकेश्वर मंदिर, बीबी का मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, सोनेरी महल, विद्यापीठ परिसराकडे जाता यावे यासाठी निराला बाजार ते खडकेश्वर, औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौक ते नेहरू भवन, सिटी क्लब; तसेच औरंगपुरा भाजीमंडी ते सुराणा कॉम्प्लेक्स मार्गे सिटीचौक, मकाई गेट ते बीबी का मकबरा हे रस्ते व्हाईट टॉपिंगचे करण्यात येणार आहेत. सातारा खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर यारस्त्यावरील पुलापर्यंतचे काम करण्यात येणार आहे. जटवाडा येथील जैन मंदिर, हर्सूल तलाव, स्मृतिवन व जळगावकडे जाणारा हडको एन १२ अण्णाभाऊ साठे चौक ते हडको कॉर्नर ताज हॉटेलपर्यंत या रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात येणार आहे.
सिडको एन १ पोलिस चौकी पासून सिडको बसस्थानक, एपीआय कॉर्नरपर्यंतचा रस्ता आणि महावीर चौक ते रेल्वे स्टेशन चौकापर्यंतचा रस्ता व्हॉईट टॉपिंगच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी दीडशे कोटींचे नियोजन करण्यात आले आहे, असे तुपे यांनी स्पष्ट केले.

शासकनाकडे प्रस्ताव सादर
प्रामुख्याने पर्यंटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम प्राधान्याने केले जाणार आहे. निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शासनाकडून निधी मिळेपर्यंत डिफर्ड पेमेंटवर ही कामे सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’साठी ४६३ कोटी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीचे जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत काम करण्यासाठी ४६३ कोटी रुपये लागतील. एवढा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी चर्चा केली.
समांतर जलवाहिनीचे काम आता महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकारने दिलेले ३२८ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत आहेत. त्यातून जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन पालिकेचे प्रशासन करीत आहे. या कामासाठी ३२८ कोटी रुपयांचा निधी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यासाठी बकोरिया यांनी शुक्रवारी मुंबईत मनिषा म्हैसकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समांतर जलवाहिनीबाबत प्रस्ताव सादर केला.
मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी ४६३ कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे वाढीव निधी उपलब्ध करून देऊन योजना पालिकेच्या माध्यमातून करण्यासाठी परवानगी द्यावी, असे आपण म्हैसकर यांना सांगितले, अशी माहिती बकोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. म्हैसकर यांनीही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी शासनातर्फे मदत करण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र शासनाने निधीची तरतूद करून समांतर जलवाहिनीच्या योजनेला परवानगी दिली, तर लगेचच पुढची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे बकोरिया म्हणाले.

योजना महापालिकेच्याच ताब्यात
समांतर जलवाहिनीची योजना महापालिकेच्याच ताब्यात आली आहे. आमच्या विनंतीवरून कंपनी काम करीत आहे. त्यामुळे कंपनीच्या ताब्यात ही योजना आहे, असे होत नाही असेही बकोरिया यांनी स्पष्ट केले. कंपनीकडे असलेले १२४ कर्मचारी महापालिकेबरोबर काम करीत आहेत. त्यांचे पेमेंट महापालिका करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापूस उत्पादनात अतिवृष्टीमुळे घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्याच्या काही भागात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणाचा कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जमिनीतील अतिरिक्त पाण्यामुळे कपाशीवर लाल्या रोग पडला असून बोंडअळी, फुलकिडे व पांढरी माशी या रोगांनी पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षी जास्तीच्या पावसाचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात १० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. नगदी पीक हातचे गेल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम जाणवत आहे.
खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाल्यानंतर कापसाची लक्षणीय लागवड झाली. कापसाचे क्षेत्र कमी करून डाळवर्गीय पिके घेण्यावर कृषी विभागाचा भर असूनही शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दिली. किमान पाच हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळणे अपेक्षित असल्यामुळे क्षेत्र वाढले. औरंगाबाद कृषी विभागातही कापसाची लक्षणीय लागवड झाली. जिल्ह्यात तीन लाख ८१ हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र आहे. पिकाच्या वेगवेगळ्या टप्प्यात पावसाची गरज असताना दीड महिना खंड पडला होता. सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस झाला. सतत आठ दिवस पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन व मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला. नांदेड, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस जास्त होता. जिल्ह्यात सिल्लोड व फुलंब्री तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. विशेषतः नदीकाठच्या पिकांची अवस्था बिकट आहे. जमिनीत पाणी असल्याने पिकांना ‘नत्र’ घेता येत नाही. काही काळ ही परिस्थिती कायम राहिल्यास कपाशीवर ‘लाल्या’ रोग पडतो असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. सध्या तीन तालुक्यात ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. रसशोषक किडी वाढण्यासाठी ढगाळ वातावरण कारणीभूत ठरले आहे. फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडअळी या रोगांनी झाडांवर परिणाम झाला आहे. पावसात फवारणी शक्य नसल्याने ठिकठिकाणी नुकसान झाले. तीन दिवस शेतात पाणी राहिल्यास नुकसानीची तीव्रता जास्त असते. अतिवृष्टीचा दुष्परिणाम झाल्यामुळे कापूस उत्पादनात १० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्यामुळे जवळपास निम्मे उत्पादन घटले आहे. लागवड आणि मशागतीवर मोठा खर्च झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या क्षेत्राचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कापसाची प्रत खराब
शेतात साचलेले पाणी तातडीने बाहेर काढणे आवश्यक असते. तसेच पिकाचे नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट व युरियाची फवारणी करतात. या उपाययोजना करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले. मात्र, इतर ठिकाणी नुकसान झाले आहे. जास्तीच्या पाण्यामुळे बोंडे परिपक्व झाली नाही. याचा परिणाम उत्पादनावर झाला असून कापसाची प्रत बिघडली आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला नाही; मात्र, ढगाळ हवामानाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तातडीचे उपाय करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती दिलीहे. काही ठिकाणी कापसाची प्रत खराब होऊन अतिवृष्टीच्या प्रमाणानुसार उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- प्रकाश उगले, उपविभागीय कृषी अधिकारी

यावर्षी कापसू, तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातच पंचनामे करू असे कृषी विभागाने जाहीर केले आहे. पण, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचेही पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे.
- विश्वंभर हाके, शेतकरी, आडगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images