Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दलित-ओबीसींचा लातुरात महामोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसह अन्य दहा मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी आणि मुस्लीम समाजाच्या वतीने सोमवारी महामूक मोर्चा काढण्यात आले. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामुळे शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानावर मशाल प्रज्वलित करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चासाठी लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या महामूक मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हा क्रिडा संकुलावरून निघालेल्या मोर्चात महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांच्या वतीन पाच युवतींनी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, मूळ आरक्षणाला हात न लावता ओबीसी, भटक्या विमुक्तांना विधानसभा, लोकसभेत राजकीय आरक्षण देण्यात यावे, ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी कायदा लागू करण्यात यावा, तंटामुक्त गाव समित्या बरखास्त करण्यात याव्यात, सच्चर समितीचा अहवाल लागू करुन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, एमपीएससी स्पर्धा परीक्षेतील आरक्षण पूर्ववत करावे, केंद्र सरकारच्या २०११च्या सुधारित ‘जीआर’ची अमंलबजावणी करून सर्व ओबीसी व विमुक्त जाती, भटक्या जमाती , विशेष मागास प्रवर्गास सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात याव, सहकारी साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था सरकारने ताब्यात घेऊन स्वतः चालवाव्यात, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊस उत्पादकांची ‘संजीवनी’वर मदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
गेल्या काही वर्षात वैजापूर तालुक्यातील ऊस लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. कमी पर्जन्यमान व सिंचन सुविधांचा अभाव यामुळे ऊस लागवड दोन हजार हेक्टरवरून ५०० हेक्टरवर आली आहे. यावर्षी तालुक्यातून केवळ १५ हजार टन ऊस गाळपासाठी कारखान्याकडे जाण्याची शक्यता आहे.
वैजापूर तालुक्याच्या गंगथडी भागातील १८ गावातील ऊस दरवर्षी शेजारील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी पाठवला जातो. संजीवनीच्या झोनमधील लाडगाव, कापूसवाडगाव, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा, नांदूरढोक, पुरणगाव, नारायणपूर, हिंगोणी, भऊर, डवाळा, खंबाळा, नगिनापिंपळगाव, सुराळा, भग्गाव आदी १८ गावातील जवळपास ३०० ऊस उत्पादक शेतकरी संजीवनी कारखान्याला ऊस पाठवतात. तालुक्यातील परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखाना १४ वर्षांपूर्वी बंद पडला. त्यानंतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाताहत सुरू झाली. या शेतकऱ्यांना शेजारच्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश ऊस गाळपासाठी संजीवनी कारखान्याकडे पाठवला जातो.
मागील वर्षी संजीवनी साखर कारखान्याने प्रति टन २७०० रुपये भाव दिला होता. यावर्षी त्यापेक्षा जास्त भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसात तालुक्यातील १८ गावांतील ऊस तोडणीला सुरुवात होणार आहे.

गळित हंगाम १० नोव्हेंबरपासून
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कारखाना यावर्षी ऊसाला काय भाव देणार हे आत्ता सांगता येणार नाही. मात्र गळित हंगाम सुरू झाल्यानंतर त्याची माहिती मिळू शकेल, अशी माहिती वैजापूर येथील संजीवनी कारखान्याच्या कार्यालयातील सुरेश मगर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यातील ७६पैकी किती वृक्ष वाचवणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ७६पैकी किती झाडे तुम्ही वाचवणार, असा सवाल महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केला आहे. या रस्त्याच्या कामाचा तपशील सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याचा अर्ज विचारार्थ ठेवण्यात आला होता. या विभागातर्फे दिल्लीगेट ते हर्सूल टी पॉइंट या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. रुंदीकरणात या रस्त्यावरील ७६ झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती या विभागाने महापालिकेकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अर्जावर वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांशी आयुक्त बकोरिया यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना, त्या रस्त्यावरील किती झाडे तुम्हा वाचवू शकता, ते सांगा असे कळविण्याचे आदेश उद्यान अधीक्षकांना दिले. जास्तीत जास्त झाडे वाचवून रस्त्याचे काम करावे, असे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या कामाचा आारखाड तयार करून तो सादर करा. त्यानंतर वृक्षतोडीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही बकोरिया यांनी स्पष्ट केले.
दमडीमहल परिसरातून विकास योजनेच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्यासाठी ३० ते ३५ झाडे तोडावी लागणार आहेत. ही वेड्याबाभळीची झाडे आहेत. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत ही झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली. एमजीएम परिसरात डॉ. बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन तयार केले जाणार आहे. स्मृतिवनचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर या परिसरातील जेवढी झाडे तोडली जाणार आहेत, त्यांच्या बदल्यात झाडे लावण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. एक झाड तोडले तर दहा झाडे लावली जातील असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

झाशीची राणी उद्यानातील वृक्ष तोडणार
झाशीची राणी लक्ष्मीबाई उद्यानात ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. तेथील पिंपळ आणि निलगिरीचे झाड अडथळा ठरत आहे. निलगिरीचे झाड तोडण्यास या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. पिंपळाचे झाड तोडण्यासंदर्भात स्थळपाहणी केल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे आयुक्त बकोरिया यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनी’स्तापायन!

$
0
0


टीम मटा, औरंगाबाद
एटीएमसमोर सकाळी सातपासून सुरू झालेली न संपणारी रांग, पुढे जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड. बॅँका गर्दीनी तुडूंब भरलेल्या. घामेघूम होत सर्व कामे सोडून पैसे काढण्यासाठी आलेले नागरिक. शहरातील प्रत्येक बॅँकेची शाखा हाउसफुल्ल. प्रत्येक एटीएमवर ओसंडणारी गर्दी. अन्यथा खाली ओढलेले शटर. मंगळवारीही पैशाच्या मनस्तापात नागरिकांना फक्त वणवण करावी लागली.

शहागंजमध्ये रांगा
बँका आणि एटीएम सोमवारी बंद राहिल्यामुळे मंगळवारी पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या. शहागंज येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादसुद्धा त्याला अपवाद नव्हते. सकाळी नऊपासून नागरिक उभे होते. एटीएमसमोरील रांग गेटपर्यंत पोचली अन् गर्दीत चलबिचल सुरू झाली. महिला व पुरुष वेगळ्या रांगेत असले, तरी नियोजन विस्कळ‌ित झाले. दुपारी बारापूर्वी एटीएम बंद झाले अन् गर्दीत चलबिचल झाली. पैसे संपल्यामुळे पुन्हा पैसे कधी भरले जातील, असा प्रश्न निर्माण झाला. शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोरील एचडीएफसी बँकेचे एटीएम बंद होते. एटीएमबाहेर सूचनेचा कागद चिकटवला होता. मात्र, अनेकजण एटीएम उघडण्याची वाट पाहत राहिले. या परिसरातील सर्वच एटीएमची हीच अवस्था होती.

बँक कॉलनी, शहानूरवाडीत बंद
सहकार बँक कॉलनी ते शहानूरवाडी परिसरातील सर्व एटीएम मंगळवारी दुपारी बारानंतरही बंदच होते. यातील काही एटीएम, तर मागच्या दोन दिवसांपासून बंद आहेत. सहकार बँक कॉलनीच्या चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादचे एटीएम सेंटर दिवसभर बंद होते. त्यामुळे बँकेसमोर रस्त्यापर्यंत रांगाच रांगा होत्या. याच चौक परिसरातील बडोदा बँकेचे एटीएमही बंद होते व कॅश नसल्यामुळेच एटीएम बंद असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याच भागातील महाराष्ट्र बँक, आयसीआयसीआय बँकेची वेगळी स्थिती नव्हती. संग्रामनगर उड्डाणपुलाखालील मलकापूर बँकेचे एटीएमदेखील काही दिवसांपासून बंद असल्याचे सांगण्यात आले. याच भागातील एसबीआयच्या एटीएम सेंटरवर ‘बंद’चा फलक झळकत होता. पोदार शाळेजवळील आंध्र बँकेचीही हीच स्थिती होती.

टीव्ही सेंटर, रोजाबाग परिसर
एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे टीव्ही सेंटर, रोजाबाग, एन ९ परिसरातील सर्व एटीएम मशीन सायंकाळपर्यंत बंद होत्या. यामुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी केली. दुपारी रोजाबाग पसिरातील एसबीएच, आयसीआयसीआय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एसबीआय, टीव्ही सेंटर परिसरातील एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, आयडीबीआय, अॅक्सिस व सेंट्रल बँकेचे एटीएम पैशाअभावी बंद होते. यामुळे नागरिकांनी थेट बँका गाठल्या व रांगेत उभे राहून पैसे काढले. मात्र, दुपारनंतर बँकांमधील पैसे संपले. त्यामुळे ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात येत होत्या. अनेकांनी सुटे नसल्यामुळे नोटा घेण्यास नकार दिला व शंभराच्या नोटेसाठी दुसऱ्या दिवशी बँकेत येऊ असे सांगितले. दुपारी तीननंतर पैशाची वाट पाहात असलेल्या बँकांमध्ये दुपारनंतर शंभराच्या नोटा देणे बंद करण्यात आले. केवळ ज्यांना भरणा करावयाचा आहे, अशा लोकांसाठी काउंटर सुरू ठेवण्यात आले होते.

युनियन बॅँकेत भागमभाग
एन चार सिडकोच्या युनियन बॅँक शाखेसमोर नागरिक चांगलेच घामाघूम झाले. सकाळी नऊला रांगेत उभ्या असलेल्या महिलेला पाऊणच्या दरम्यान पैसे मिळाले. बॅँकेचे एटीम बंद असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रांगेत बहुतांश व्यावसायिक, पेपर एजन्सी असणाऱ्यांचा भर होता. दैनंदिन व्यवहारांचा चांगलाच खोळंबा झाल्याने कितीही वेळ होणार असला तरी नागरिकांनी बॅँकेत उभे राहण्याची तयारी ठेवली होती. जेवणाच्या सुटीतही कुणी जागेवरून हलायला तयार नव्हते. उभे राहून कंटाळा आल्यावर घामाघूम झालेल्या महिला जागेवरच बसून राहिल्या.

सिटी चौकात टोकन
सिटीचौक - जुनाबाजार परिसरात असलेल्या बॉम्बे मर्कंटाइल बँकेने एटीएममधून नोटा काढणे सोपे व्हावे म्हणून टोकण पद्धत लागू केली होती. त्यामुळे एटीएमबाहेर गर्दी असली तरी नागरिकांमध्ये रेटारेटी झाली नाही. टोकण मिळाल्यामुळे दिवसभरात पैसे नक्की मिळतील अशी अनेकांची धारणा होती, पण दुपारनंतर एटीएम सुरूच झाले नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सिटीचौक, जुनाबाजार, बुढीलेन भागात विविध बँकांची सात एटीएम केंद्र आहेत. त्यात बीएमसी बँकेसह आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. सातपैकी फक्त दोन एटीएम सुरू होते. त्यातील एक एटीएम बीएमसी बँकेचे, तर दुसरे अॅक्सिस बँकेचे होते. बीएमसी बँकेच्या एटीएमवर सकाळपासूनच गर्दी होती. बँकेच्या आवारात नागरिकांना बसण्यासाठी खुर्चा टाकण्यात आल्या होत्या. त्याच ठिकाणी दोन काउंटर मांडण्यात आले होते. ज्यांना एटीएमचा वापर करायचा नाही त्यांना या काउंटरवरून पैसे काढण्यासाठीच्या पावत्या भरून देण्यात येत होत्या. दुपारी दीडपर्यंत बँकेचे एटीएम व्यवस्थितपणे सुरू होते. बीएमसी बँकेसमोर पटेल आर्केडमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. दुपारी तीनच्या सुमारास बँकेच्या पथकाने या एटीएममध्ये नोटांचा भरणा केला आणि पथक निघून गेले. एटीएममध्ये नोटा भरल्या जात आहेत, असे कळाल्यावर नागरिकांची रांग लागली. बँकेचे पथक निघून गेल्यावर नागरिकांनी एटीएम मशीनमधून नोटा काढण्याचा प्रयत्न केला, पण नोटा आल्याच नाहीत. या केंद्रावर सायंकाळपर्यंत नोटांसाठी नागरिक झटत होते.

गारखेडा, आकाशवाणी चौकात गर्दी
गारखेड्यात एचडीएफसीने समोरील आवारात मांडव टाकला होता. सातत्याने एटीएममधील पैसे संपू नये यासाठी दक्षता घेण्यात येत होती. सकाळ ते संध्याकाळ या बँकेच्या आकाशवाणी शाखेत दोनदा पैसे भरण्यात आले. बँकेसमोर नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बँकेमध्ये दोन हजारांच्या नोटा आहेत. मात्र, ग्राहक स्वीकारण्यास तयार नाही. ज्यांना दोन हजारांच्या नोटा हव्या आहेत, त्यांना आम्ही पैसे उपलब्ध करून देत आहोत. सकाळपासून रांगेत असलेल्या सर्व नागरिकांना आम्ही नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे बँकेकडून वारंवार सांगण्यात येत होते. गारखेड्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विजयनगर, शिवशंकर कॉलनी, जयविश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी या भागातील नागरिकांनी गर्दी केली होती. बँकेच्या काउंटरवर सेवानिवृत्तांच्या मदतीने ग्राहकांना नोटा बदलून दिल्या जात होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधकांचे धाबे दणाणले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आघाडीच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी संगीता कैलास गोरंट्याल यांच्या नावाची घोषणा होताच केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या विरोधकांचे धाबे दणाणले असून, नगराध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारही मिळाला नाही, हीच गोरंट्याल यांच्या विजयाची नांदी आहे. त्यांच्या विक्रमी मताधिक्क्यांचा नवा इतिहास घडेल, असा विश्वास आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केला. तथापि, पालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून यावेत, यासाठी एकदिलाने प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जालना पालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता गोरंट्याल यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अब्दुल सत्तार हे होते. यावेळी माजीमंत्री डॉ. शंकरराव राख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, अशोक सायन्ना यांची उपस्थिती होती.
आमदार राजेश टोपे म्हणाले, ‘धर्मनिरपेक्ष विचारधारेचे समर्थन करणारे दोन्ही पक्ष असून, मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडी करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण करण्यात आली. पालकमंत्री असतांना, डीपीडीसीसह विविध योजनांतून शहराच्या विकासासाठी निधी दिला तर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिष्ठा पणाला लावून, जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना पुर्ण केली. या विकास कामांच्या बळावरच जनता पुन्हा एकदा आघाडीच्या हाती सत्ता देईल, उच्च शिक्षीत असलेल्या संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेत विकासाची परंपरा अधिक समृध्द होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात अब्दुल सत्तार म्हणाले, ‘सव्वादोन लाख लोकसंख्या असलेल्या जालना शहरात युतीला उमेदवार न मिळणे हाच आघाडीचा खरा विजय आहे. गोरंट्याल यांनी केलेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा परिपाक म्हणून जालन्यात आघाडीला संपुर्ण अनुकूल वातावरण झाले आहे. अब्दुल रशिद यांच्या मैत्रीमुळे गोरंट्याल यांचे मताधिक्क्य वाढण्याबरोबरच पालिकेत आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया म्हणाले, ‘प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मोठ्या संख्येने सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे सांगून, राष्ट्रवादीने नगर परिषदेत साथ दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्ये आम्हीही त्यांची साथ कायम ठेवू.’
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सर्वधर्म समभाव विचारांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडी झाली असून, आज आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने हेच वातावरण निवडणुकीपर्यंत राहिल्यास आघाडीचे पन्नास नगरसेवक विजयी होतील, असे सांगून, प्रत्येकाने निवडणूक सोपी न घेता डोळ्यात तेल घालून, काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
सूत्रसंचलन राम सावंत यांनी तर आभार तय्यब देशमुख यांनी मानले. यावेळी रामप्रसाद कुलवंत, ज्ञानदेव पायगव्हाणे,राजेंद्र राख, ज्ञानेश्वर भांदरगे, नवाब डांगे,बाबुराव मामा सतकर, विजय चौधरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलाढाल दहा टक्क्यांच्या आत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरात सुरू असलेल्या चलनकल्लोळाने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. दोन दिवसांपासून जाधववाडीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघा पाच टक्के व्यवहारही रोखीने झाला नाही. यापेक्षा जास्त झालेल्या व्यवहार उधारीवर होता. तोही एकूण दहा टक्क्यांच्या आत.
जाधववाडीतील व्यवहाराची माहिती देताना पवार ट्रेडिंगचे संचालक व बाजार समितीचे माजी संचालक हरीश पवार म्हणाले, ‘बाजारात माल घेवून येणारे शेतकरी चेक घ्यायला तयार नाहीत. आमचा माल विका, परंतु चेक देवू नका. पैसे द्या असे म्हणत आहेत. सध्या त्यांना देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना चेक देवू शकतो अथवा माल उधारीवर घेवू शकतो. मात्र, माल उधारीवर घेण्यासही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना चेक घेण्याची तयारी असेल, तर बाजारात माल आणा असे सांगितले आहे. या निर्णयामुळे बाजार समितीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. पवार ट्रेडिंग कंपनीची रोजची उलाढाल ७-८ लाखांवरून ७० हजारांपर्यंत घसरली आहे.’

पट्टीसह चेक घ्या
बाजार समितीचे सचिव व्ही. ए. शिरसाट म्हणाले, ‘बाजार समितीमधील व्यवहार सुरळित सुरू आहे. शेतकरी विकलेल्या मालापोटी आडत व्यापाऱ्यांकडून चेक घेत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात जावून व्यापार करत असलेल्यांना माल विकू नये. ज्यांना माल विकला त्याच्याकडून पट्टी घेवून धनादेश घ्यावा आणि तो बँकेत जमा करावा. कोणत्याही व्यापारी व दलालांना माल विकू नये. माल विकल्यानंतर पट्टीची मागणी आवश्य करावी. फसवणूक झाल्यास व्यवहाराला बाजार समिती जबाबदार राहणार नाही,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदाबामुळे नादुरुस्त रोहित्रांचे प्रमाण वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद व जालना जिल्हयात अनधिकृत वीज जोडण्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत व आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिला आहे.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व रोहित्र दुरुस्ती एजन्सीची आढावा बैठक नुकतीच जालना येथे पार पडली. या बैठकीत ताकसांडे यांनी हे आदेश दिले. ‘औरंगाबाद व जालना जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ५५१ शेतीपंप वीज जोडण्या आहेत. त्यांना २४,५९३ रोहित्रांद्वारे चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. काही शेतकरी आकडे टाकून व अनधिकृतरित्या वीज घेत असल्याने दाब वाढून रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे,’ असा दावा ताकसांडे यांनी बैठकीत केला.
शेतीपंपांना ऑटोस्विच न लावता कॅपॅसिटर बसवावेत. त्यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन सुरळीत, योग्य दाबाने वीजपुरवठा मिळेत, असे आवाहन करण्यात आले. अनधिकृत व आकडे टाकून वीज वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले. या बैठकीला औरंगाबाद ग्रामीणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, जालन्याचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) सुदाम खंडारे, प्रभारी अधीक्षक अभियंता पवन कछोट, देवेंद्र जायस्वाल यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंत्यांची उपस्थिती होती.

कडक कारवाई करा
रोहित्र नादुरूस्त झाल्यास त्याची दुरूस्ती व वाहतुकीचा संपूर्ण खर्च महावितरण करते. रोहित्र दुरुस्ती किंवा वाहतुकीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कड कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

४१२ रोहित्रांना प्रतीक्षा यादी
एप्रिल ते १० नोव्हेंबर २०१६ पर्यंत २५७१ रोहित्र अतिदाबामुळे नादुरुस्त झाले. त्यापैकी २३६४ रोहित्र बदलून दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ११५० व जालना जिल्ह्यातील ११७५ रोहित्रांचा समावेश आहे. २८७ नादुरूस्त ट्रान्सफार्मर प्रतीक्षा यादी व उपलब्धतेनुसार बदलून देण्यात येत आहेत. तसेच वॉरंटी कालावधीमधील १३५ नादुरूस्त रोहित्र एजन्सीच्या उपलब्धतेनुसार बदलून देण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीवर बलात्कार; प्राध्यापकास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अल्पवयीन विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या प्राध्यापकास गुरुवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी मंगळवारी दिले.
याप्रकरणी वाणिज्य शाखेत अकरावीच्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने दौलताबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित आरोपी प्रा. राहुल गंगाधर सोनवणे (रा. ताहराबादा, सटाणा, जि. नाशिक) याने परीक्षेत नापास करतो, अशी धमकी देत महाविद्यालयात तसेच लासूर येथील लॉजवर जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ दरम्यान वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून दौलाताबाद पोलिस ठाण्यात प्रा. राहुल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी तपास करून आरोपीला नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद येथून मोबाइलच्या लोकेशनद्वारे शोधून मंगळवारी (१५ नोव्हेंबर) अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, प्रकरण गंभीर असून, आरोपीचा अन्य कोणी साथीदार आहे का, याचा तपास करणे बाकी आहे, तसेच दोघांची वैद्यकीय तपासणी बाकी असल्याने सहाय्यक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने गुरुवारपर्यंत (१७ नोव्हेंबर) पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...‘ती’ तिसऱ्याच्या गळ्यात माळ घालते!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खुर्ची अन् सत्ता. एकाकडे पाहते, दुसऱ्याला नजरेत गुंतवूण ठेवते. अन् तिसऱ्याच्या गळ्यात माळ घालते. अगदी तसेच आता शंभर अन् पन्नासाच्या नोटेचे सुरू आहे. एटीएमचा नंबर येईपर्यंत पैसा संपतो. त्यामुळे रांगेतला ग्राहक अन् बॅँक अधिकाऱ्यांची भंबेरी उडत आहे.
चलनकल्लोळानंतर आजपर्यंत फक्त एकदाच रिझर्व्ह बॅँकेकडून शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि बँक ऑफ महाराष्ट्राला पैसे देण्यात आले.
स्टेट बँक अमरप्रीत हॉटेल चौकातील व्यवस्थापक नंदकिशोर मालू म्हणाले, ‘स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सुमारे १०० कोटी रुपये आले होते. यात दोन हजारांच्या नोटांचा भरणा अधिक होता. शंभर आणि पन्नासच्या नोटा आल्याच नाहीत.’ महाराष्ट्र बँकेच्या सिडको शाखेचे कॅशिअर राजेंद्र देवळे म्हणाले, ‘महाराष्ट्र बँकेलाही अजून रिझर्व्ह बँकेकडून पैसे आलेले नाहीत. उपलब्ध रोकडेवर नागरिकांची निकड भागवली जात आहे. अजून पैसा आवश्यक आहे.’

१२०० कोटींचे नवे चलन येणार
सिडकोतील स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ ‌अधिकारी म्हणाले, ‘गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँकेकडून पैसा येईल याची प्रतीक्षा सुरू आहे. काल परवा मीडियात येत असलेल्या कंटेनरच्या बातम्या चुकीच्या आहेत. कंटेनर जुन्या नोटांना घेण्यासाठी आल्या होत. नव्या नोटा अजून मुबलकपणे उपलब्ध झाल्या नाहीत. किमान १२०० कोटींचे नवे चलन येणे अपेक्षित आहे. ते थोड्या दिवसांत हे चलन मिळेल यात काही शंका नाही.’

शहराची गरज
- २००० कोटींची मागणी
- १००० कोटी एटीएमसाठी
- ३०० कोटी पुरवठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमरग्यात ९१ लाखांच्या नोटा जप्त

$
0
0

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने ९१ लाख ५० हजार रुपये जप्त केले. उमरगा येथील चौरस्ता भागात वाहन तपासणी करीत असताना संशय आल्याने पथकाने जीपची तपासणी केली. त्यावेळी ही रक्कम जप्त केली.
जीपच्या (क्रमांक - एम एच- १३ बीएन - ८६५६) चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम कोणाची आहे व कोठे नेत असल्याची कागदपत्रे न दिल्याने संशय वाढला आहे. शाखा अभियंता सय्यद यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ही रक्कम कॅरीबॅगमध्ये होती. त्या बॅगवर ‘लोकमंगल’ या संस्थेचा लोगो असल्याची माहिती उमरगा ठाण्याचे निरीक्षक गोपाळ रांजनकर यांनी दिली.

उमरगा चौरस्ता येथे सापडलेली ९१ लाखांची रक्कम लोकमंगल बँकेची आहे. लोहारा येथे लोकमंगलचा कारखाना आहे. त्याचे पेमेंट लोकमंगल बॅँकेच्या उस्मानाबाद शाखेतून दिले जाते. संबधित पेमेंट करून राहिलेली रक्कम सोलापूर लोकमंगल शाखेत जमा करण्यासाठी आणली जात होती. रक्कम मोठी असल्याने गाडीची व्यवस्था करण्यात आली होती.
- दिनकर देशमुख, सरव्यवस्थापक, लोकमंगल बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका मार्केट आग; आठवड्यात नावे उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगपुरा फटाका मार्केटमधील आगीला जबाबदार असलेल्या संशयित आरोपींची नावे येत्या आठ दिवसात समोर येतील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावर अससेल्या फटाका मार्केटला २९ ऑक्टोबर रोजी भीषण आग लागली. फटाका असोसिएशसच्या माध्यमातून थाटण्यात आलेल्या १४० दुकाने, शंभर वाहने या आगीत जळून खाक झाली. पण, कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी औरंगाबाद शहर फायर वर्क्स डिलर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष विलास पूनमचंद खंडेलवाल व इतर पदाधिकारी; तसेच संभाजीनगर फटका असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. दरम्यान, खंडेलवाल वगळता अन्य संशयित आरोपी कोण तसेच आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलिस आयुक्तांना विचारले असता त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणा तसेच आगीस कारणीभूत ठरलेल्यांची नावे येत्या आठ दिवसात उघड होईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाचे कार्यालय पाडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘आमचे अतिक्रमण काढण्यापूर्वी अगोदर नगरसेवकाचे अतिक्रमित कार्यालय पाडा,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी पालिका पथकाकडे केली. या जनरेट्यामुळे समतानगरात काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा कुरैशी यांचे कार्यालय बुधवारी पाडण्यात आले.
समतानगर चौक ते कोटला कॉलनी रस्ता शहर विकास योजनेनुसार ४० फूट रुंदीचा आहे. पालिकेला या रस्त्याचे काँक्रिटीकरण करायचे आहे. पाण्याच्या टाकीपासून ते समतानगरच्या चौकाकडे जाताना अर्ध्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. उर्वरित रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अतिक्रमणांमुळे रखडले होते. पालिकेच्या नगररचना विभागाने सहा महिन्यापूर्वीच अतिक्रमणांचे मार्किंग केले, पण त्यावेळी नागरिकांनी दिवाळी झाल्यावर घरे पाडा अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी एम. एम. खान, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता पी. डी. पाठक, इमारत निरीक्षक आर. एस. राचतवार यांनी क्रांतिचौक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
समतानगर चौकातून पाण्याच्या टाकीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूची सात अतिक्रमित बांधकामे पाडली. रस्त्याच्या कामात बाधित होणारे एक धार्मिक स्थळ देखील पाडले. यावेळी काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो हाणून पाडला. बांधकामे पडणारच असे लक्षात आल्यावर नागरिकांनी विरोधाची भूमिका घेतली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची बांधकामे बाधित झालेली आहेत. तीही पाडा, अशी मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. मात्र, जनरेट्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली.

अन् पाच फूट पाडापाडी
‘नागरिकांनी नगरसेवकाचे कार्यालय अतिक्रमित आहे, त्याच्यावर कारवाई करा,’ अशी मागणी केली. काँग्रेसच्या रेश्मा कुरैशी या वॉर्डाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे पती अशफाक कुरैशी घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी त्यांनी कार्यालय अतिक्रमित नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांच्या रोषापुढे त्यांचे म्हणणे खोटे पडले. पालिकेच्या पथकाने कुरैशी यांचे कार्यालय पाच फुटांपर्यंत पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्सूल तलावात आढळले दोन मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हर्सूल तलावात बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास सहा वर्षांय बालकासह एका ४० वर्षांच्य व्यक्तीचा मृतदेह आढळला. घटनास्थळी असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत दोन पांढरे कापड आढळले. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव शेख शकील असून, मृत बालक हे माजी नगरसेवक अब्दुल कादर उर्फ अजीम यांचा मुलगा असल्याचे हर्सूल पोलिसांनी सांगितले.
हर्सूल तलाव परिसरात तैनात सुरक्षा रक्षकांना पाण्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे दुपारी निदर्शनास आले. माहिती मिळताच हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी योगेश राऊत व सतीश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही माहिती वरिष्ठांना, अग्निशमन दलास दिली. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातील बालकांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी एक दुचाकी बेवारस आढळली. त्यामुळे पाण्यात अन्य कुणीही आहे का, याचा शोध घेतला असता एका सुमारे ४० वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव शेख शकील (रा. मिटमिटा) असून, बालकाचे नाव अब्दुल नाफे (वय ६ वर्षे, रा. भडकलगेट) आहे. शकील व अब्दुल कादर हे जवळचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुचाकीच्या डिक्कीत पांढरा कापडा
घटनास्थळी आढळून आलेल्या दुचाकीची (एमएच २० सीव्ही ८७१) पोलिसांनी तपासणी केली त्यात पांढऱ्या रंगाचे कापड असल्याचे दिसून आले. मृत व्यक्तीच्या खिशात एक मोबाइल, शंभराच्या काही नोटा, वीज बिल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला अधिष्ठात्यांना विद्यार्थ्यांनी कोंडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागण्या मान्य होत नसल्याने संतापलेल्या शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी कॉलेजच्या अधिष्ठातांना दुपारी दोनपासून दालनात कोंडले. सायंकाळी सात वाजता पोलिसांनी त्यांची सुटका केली.
कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी १७ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे. दिवाळी सुटीनंतर कॉलेज सुरू झाले, परंतु मागण्यांबाबत कलासंचालनालय, शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आज दुपारनंतर आंदोलन तीव्र केले. कॉलेजचे प्रभारी अधिष्ठाता भरत गढरी यांच्या दालनात ठिय्या मारला. आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या प्रशासनाने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्षेप असणाऱ्या शिक्षकांना हटवावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली. सायंकाळपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. कलासंचालकांना फोन लावण्यात आला, पण या नियुक्ती रद्द करणे शक्य नसल्याचे संचालकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सायंकाळी प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता. सात वाजता पोलिसांनी पाचारण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना दालनाबाहेर काढत अधिष्ठातांची सुटका केली.

आमच्यास्तरावर विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही शिक्षकांबाबत विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे काय करायचे हे कलासंचालनालय, कलासंचालक किंवा वरिष्ठ ठरवू शकतात. आम्ही याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना तासिकेला बसायला सांगतो आहोत. - भरत गढरी, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय कला महाविद्यालय

विद्यार्थी महिनाभरापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या प्रश्नाबाबत कला संचालनालयाला देणे-घेणे नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थांना हे पाऊल उचलावे लागले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. - स्वप्नील बेगडे, प्रदेश सहमंत्री, अभाविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...रंगभूमीने व्यवसाय केला सप्तरंगी!

$
0
0

unmesh.deshpande@timesgroup.com
रंगमंचावर काम करण्याची आवड होती, पण घर सांभाळून शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या आवडीचे आपल्या व्यवसायात रुपांतर केले. कलाकारांना लागणाऱ्या अन् सहजासहजी न मिळणाऱ्या वेशभूषेची निर्मिती करून विक्री व किरायाने देणे सुरू केले. आता जिल्ह्यातील सुमारे दीडशे शाळा त्यांच्या संपर्कात आहेत. या आगळ्यावेगळ्या कारभारणीचे नाव आहे अर्चना देवधर. त्यांची ही रंगीत वाटचाल.
उस्मानपुऱ्यातल्या पीरबाजारात भाजीवाली बाईच्या पुतळ्याजवळ अर्चना देवधर यांचे अमेय ड्रेसवेल अँड बुटिक आहे. रंगमंचीय वेशभूषा विकणे, भाड्याने देणे हे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप. अर्चना यांचे शिक्षण बीएस्सी आणि डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये झाले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हॉस्पिटलमधून काम केले, पण त्यांची नाळ रंगमंचाशी जुळलेली. त्यामुळे या नोकरीत मन रमेना. शाळा-कॉलेजमध्ये असताना त्यांनी विविध नाटकांमधून काम केले. संगीत नाटकातही त्यांनी भूमिका केल्या. याच क्षेत्रात आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे असे त्यांना सतत वाटू लागले. त्यातून ‘अमेय ड्रेसवेल अँड बुटिक’ हे दुकान सुरू केले.
दुकान सुरू करण्यापूर्वी त्यांनी घरगुती पद्धतीने काम केले. त्यांच्या घराच्याशेजारी राहणाऱ्या एका लहान मुलाला गॅदरिंगसाठी सशाचा ड्रेस शिवून दिला. त्यासाठी घरातील टर्कीश टॉवेलचा उपयोग केला. या ड्रेसमुळे त्या मुलाला गॅदरिंगमध्ये बक्षीस मिळाले. हा ड्रेस अनेकांना आवडला. दहा ते पंधराजणांनी तसाच ड्रेस देवधर यांच्याकडून शिवून घेतला. त्यातूनच त्यांना ड्रेसवेल अँड बुटिक सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
देवधर म्हणाल्या, ‘व्यवसायातील काहीच माहित नव्हते. शुन्यातून सगळे उभारायचे होते. माहिती देणारा कुणी नव्हता, पण अशा परिस्थितीत खचून न जाता खंबीरपणे उभे राहायचे ठरविले. मार्ग सापडत गेला. फक्त रंगमंचाच्या आवडीचे पाठबळ होते. लग्नानंतर स्टेजवर काम करणे बंद झाले, पण नाटकाची आवड काही सुटत नव्हती. वेशभूषा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून रंगमंचाशी जोडले गेले. आवड म्हणून नाटक लिहते. अँकरिंग करते. नाटकांसाठी कितीही जास्त वेशभूषा पुरविण्याची मागणी आली, तरी डगमगत नाही. कलाकारांना दिले जाणारे कपडे स्वच्छच असतात. आमचे कपडे घातलेल्या कलावंताला बक्षीस मिळालेच पाहिजे या ध्येयाने हा व्यवसाय करतो. हे कपडे त्या स्वतःच्या दुकानात शिवते. त्यासाठी पाच महिला मदत करतात. प्रसंगी जास्त ड्रेस शिवून द्यावे लागतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज काढले नाही. घरातीलच साहित्य वापरून वेशभूषा तयार करण्याचे काम सुरू केले. आता दुकानात सात हजार ड्रेस आहेत. भारतीय नाटकांसह विदेशी नाटकांसाठीही आम्ही वेशभूषा शिवून देतो. शेक्सपिअर, हॅरीपॉटर या नाटकासाठी अल्पावधीत कपडे शिवले. वेशभूषा विक्री व भाड्याने देण्याचे शहरात पानदरीबा भागात एकच दुकान होते. लोकांना नवीन काहीतरी हवे असते. आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो,’ असे त्यांनी सांगितले.
व्यवसाय करताना देवधर यांनी सामाजिक भान देखील जपले आहे. सलग तीन वर्ष मराठवाड्यात दुष्काळ होता. ही जाण त्यांनी ठेवली. जालना जिल्ह्यातील एका गावातील शाळेत गेल्यावर्षी गॅदरिंग होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी १८ ते १९ प्रकारचे डान्स बसवले होते. डान्ससाठी आवश्यक असलेल्या वेशभूषा भाड्याने घेण्यासाठी त्या शाळेचे शिक्षक देवधर यांच्या दुकानात आले. भाड्यामध्ये काही सवलत द्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्या बोलण्यातील भावार्थ देवधर यांना कळाला. त्यांनी त्यांची अधिक चौकशी केली, तेव्हा शाळेची आणि मुलांची गॅदरिंग करण्याची इच्छा आहे, पण पुरेसे पैसे नाहीत. दुष्काळामुळे गावात काहीच पिकले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे देवधर यांनी त्या शाळेला सर्व वेशभूषा मोफत उपलब्ध करून दिल्या. गॅदरिंग झाल्यानंतर शाळेचे शिक्षक दोन गाड्यांमध्ये बसून भेटायला आले. त्यांनी आभार मानले. ‘व्यवसाय करताना समाजाशी जुळलेली नाळ तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे, कारण चांगली वेशभूषा न मिळाल्यामुळे एका चांगल्या कलावंताचे करिअर संपुष्टात येऊ शकते. हे होऊ द्यायचे नसेल, तर आपण आपले मन मोठे केले पाहिजे,’ असे त्या सांगतात. ‘येत्या काळात कर्ज काढून संपूर्ण रंगमंच उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. अमेय ड्रेसवेलमध्ये सध्या फक्त वेशभूषाच मिळतात. येत्या काळात नाटकासंबंधीचे लाइटस्, साउंड सिस्टीम, मेकअपमन या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. रंगभूमीच्या या प्रेमाने देवधर यांचा व्यवसायही सप्तरंगी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीडीआर’ घोटाळ्याची कागदपत्रे ताब्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मंजूरपुरा टीडीआर घोटाळ्याची कागदपत्रे महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी पोलिसांच्या ताब्यात दिली. ‘आता गुन्हा दाखल करा,’ अशी विनंतीही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली.
मंजूरपुरा येथील नगरभूमापन क्रमांक ७६६१ मधील १५ मीटर रुंद रस्त्यासाठी १९९७ मध्ये भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादनाचा मोबदला देखील त्यावेळी देण्यात आला. त्यानंतर अर्जदार खतीजा बेगम अब्दुल साजेद यांच्यातर्फे ‘जीपीए’धारक (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांनी त्याच जागेच्या ‘टीडीआर’ची मागणी केली. हे प्रकरण ‘मटा’ने चव्हाट्यावर आणले होते. यासंदर्भात हामेद मिर्झा, किशोर राजपूत, शेख हबीब शेख चांद व गजानन बारवाल यांनी आक्षेप दाखल केला. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लेखा विभागाकडून मोबदला देण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती मागवली. भूसंपादनापोटी ३१ मार्च १९९७ रोजी ८ लाख २५ हजार रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व घटनांचा उल्लेख करून महापालिकेच्या प्रशासनाने अब्दुल सिकंदर साजेद यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दिली होती. तक्रार दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यास पोलिस टाळाटाळ करत होते.

पडसाद उमटले
पोलिस तक्रार दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. या संदर्भात ‘मटा’ प्रतिनिधीने सिटीचौक पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा ‘महापालिकेने फक्त तक्रार दाखल केली आहे, पुरक कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे कागदपत्रांची छाननी करून आवश्यक ते जाबजबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करता आली नाही,’ असे सांगण्यात आले. ‘मटा’ ने याचा उल्लेख करून बुधवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली. त्याचे पडसाद पालिका वर्तुळात उमटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगररचना विभागाच्या तीन अधिकाऱ्यांनी दुपारी सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये जावून मंजूरपुरा टीडीआर प्रकरणाची कागदपत्रे सादर केली व गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायटेक बँकांना ग्राहकसेवेचे वावडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्जाचे हप्ते भरण्याची आठवण करून देण्याबरोबर नवनव्या योजनांची माहिती देण्यासाठी राष्ट्रीयकृत, खासगी बँका ग्राहकांना असंख्य ‘एसएमएस’ पाठविण्यास विसरत नाहीत, मात्र नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ग्राहकांची ओढाताण कमी करण्यासाठी कोणत्या एटीएममध्ये पैसे कधी उपलब्ध होतील, बँकेत पैसे भरायला किती वेळ लागेल, याची माहिती देण्याची बँकांना गरज पडली नाही. त्यामुळे खातेदारांची ओढाताण सुरूच आहे.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये खातेदारांच्या रांगा लागल्या. एटीएमसमोरही गेल्या आठ दिवसांपासून रांगा कायम आहेत. बहुतांश नागरिक पैसे काढण्यासाठी दिवसभरात अनेक एटीएम, बँकांत जात आहेत. रोकड संपल्याची उत्तरे त्यांना अनेक बँकात ऐकावी लागतात. अनेक एटीएमबाहेर पैसे नसल्याच्या सूचना लावलेल्या असतात.
बँकांकडे सर्व खातेदारांचे मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आहेत. बँकांत नोटा उपलब्ध आहेत की नाही, कोणत्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध आहेत, नसतील तर कधी उपलब्ध होतील. ही माहिती बँका ‘अलर्ट एसएमएस’च्या माध्यमातून देतील आणि खातेदारांची धावपळ कमी करतील, अशी अपेक्षा होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एसएमएस, ई-मेल पाठविणारी बँकांची ‘सिस्टिम’ आणीबाणीच्या प्रसंगातच कशी गारठली, असा प्रश्न खातेदारांना आहे. एरव्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धडपडणाऱ्या बँकांनी आर्थिक संकटातील खातेदारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना अनेक खातेदारांत आहे.
बँकांचे कॉर्पोरेट ऑफिस किंवा कॉलसेंटर, ग्राहक सेवा संस्था यांच्यामार्फत एसएमएस पाठविण्यात येतात, असे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. शहरात ६०० बँकांपैकी ३५० राष्ट्रीयकृत बँका आहेत. उर्वरित खासगी-शेड्यूल्ड बँका आहेत. त्यांपैकी एकाही बँकेने गेल्या आठ दिवसांत पैसे उपलब्ध असल्याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती एसएमएसद्वारे दिलेली नाही.

कर्ज देताना, त्याची वसुली करताना सिस्टिम ठरलेली असते. त्यासंबंधीचे एसएमएस व ई-मेल बँकेच्या कार्पोरेट ऑफिसमधून पाठविले जातात. रक्कम असल्याबाबत एसएमएस अॅलर्ट करण्याची कुठल्याच बँकेची पद्धत नाही. असे एसएमएस अॅलर्ट पाठविल्यास त्यात असलेली गुप्तता पाळली जाणार नाही. यामुळे अशा पद्धतीचे एसएमएस पाठवले जात नाहीत.
- दिनकर शंकपाळ, विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय राज्यघटना झुगारणारे सत्तेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यघटना ज्यांना मान्य नाही, ते सत्तेवर आहेत. एकाही मंत्र्याने राज्यघटना शपथ घेतली नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनीही हेच केले, हाच आपल्यासमोरील मोठा धोका आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केले.
शहरातील बापू-सुधा काळदाते प्रतिष्ठानतर्फे ‘भारतीय संविधान परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा गांधी मिशनच्या आइनस्टाईन सभागृहात गुरुवारी आयोजित कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेते अॅड. मनोहरराव गोमारे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘भारतीय संविधान आणि आजची सामाजिक परिस्थिती’ विषयावर बोलताना बाबा आढाव म्हणाले, आज देशासमोर बेरोजगारी, कर्जमुक्ती, शेतीमालाचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात सरकारला रस नाही. उच्चशिक्षण घेऊनही तरुणपिढीला नोकरी नसल्याने त्यांना भविष्य नाही. विविध घटनांना अस्मितेचे नाव देऊन समाजात दुरावा निर्माण केला जातो. हे सुजान लोकांनी ओळखले पाहिजे. मूल्याधारित भारत उभा करण्यासाठी अशा प्रश्नांवरील लढा उभारणे गरजेचे आहे. समाजातील विविध प्रश्नांना घेऊन चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढे यायला हवे. संविधान मान्य नसलेले सरकार सत्तेवर आहे. हा धोका ओळखत राज्यघटना बचावासाठीही पुढे यावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी अॅड. गोमारे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन प्रा. आशा देशपांडे यांनी केले, तर प्रा. साधना गायकवाड यांनी आभार मानले.

शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी
सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी असल्याने तरुणांमध्ये आपापसात आसूया निर्माण झाली आहे. बेरोजगारी, शेतीतील प्रश्न हेच सध्या निघणाऱ्या मोर्चातील गर्दीचे प्रमुख कारण आहे. उगवत्या पिढीला भविष्य नाही, ते एकमेकांकडे पाहत राहत आहेत. हे लक्षात घेत शासनाने प्रत्येकाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी, असे आढाव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय कला महाविद्यालयाचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे कला संचालक राजीव मिश्रा यांनी स्पष्ट केले. या समितीत तीन सदस्य असतील. मिश्रा यांनी गुरुवारी महाविद्यालयाला भेट देऊन विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी १७ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे. कॉलेजपातळीवर अनेक मागण्या मान्य झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. विद्यार्थ्यांचा काही शिक्षकांवर आक्षेप आहे. त्यांना हटविण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. बुधवारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कोंडून ठेवले, पोलिसांना त्यांची सुटका करावी लागली. त्यानंतर गुरुवारी कलासंचालक राजीव मिश्रा यांनी महाविद्यालयाला भेट दिली. कॉलेजच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. आंदोलन करत असलेल्या उपयोजित कला, पेंटिंग विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी समिती स्थापन करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शुक्रवारपासून सुरळीत तासिका सुरू होतील, असे सांगण्यात येत आहे.

अंतर्गत राजकारणाची चर्चा
राज्यातील तीन शासकीय कला महाविद्यालयातील ६३ रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात तिन्ही शासकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्यापैकी काहींनी सेवेत कायम होण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातीलच काही प्राध्यापक फूस लावत असल्याची चर्चा आहे. भरती प्रक्रियेतून प्राध्यापक-प्राध्यापकांमधील अंतर्गत राजकारण जोडले जात आहे.

तीन सदस्यांची समिती
महाविद्यालयातील प्रश्नाबाबत तीन सदस्यांची समिती नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील वरिष्ठ प्राध्यापकांचा समावेश असल्याचे सूतोवाच मिश्रा यांनी केले. २३, २४ व २५ नोव्हेंबरदरम्यान समिती काम करेल. महाविद्यालयाला भेट देऊन ती संचालकांना अहवाल सादर करतील.

विद्यार्थी, कॉलेजच्या प्रश्नांबाबत समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती प्रश्नांचा अभ्यास करून अहवाल देईल. तो अहवाल शासनाला सादर करून पुढील निर्णय विद्यार्थ्यांना कळविला जाईल.
- राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ उर्दू शाळांतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेच्या आहवानानंतर हे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर मुव्हमेंट फॉर पीस या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लिम आरक्षण आंदोलन या संघटनेने १७ नोव्हेंबर रोजी सर्व उर्दू शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काळ्या फिती लावाव्यात, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील अनेक उर्दू माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून अध्ययन केले. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी दुपारी काही शाळेच्या विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी मोहम्मद मोईनोद्दिन, युनूस पटेल, अहेमद सिद्दिकी, आबेदा बेगम, इरफान रऊफ यांच्यास‌ह मोहसीन अहेमद, मिर्झा स‌लीम बेग आणि मग्दुम फारुखी यांची उपस्थिती होती. या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रतिनिधींनी आरक्षण देण्याची मागणी केली.

धरणे आंदोलन
डॉ. राजेंद्र सच्चर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गुरुवारी मुव्हमेंट फोर पीस संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याशिवाय महेमूद उर रहेमान कमिटीच्या अहवालात दिलेल्या शिफारशींचीही अमलबजावणी करण्यात यावी. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी १५ कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा; तसेच सच्चर कमिटीने सुचविलेल्या शिफारशींची अमलबजावणी कारावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात ए. एच. हुसैन, अमजद वाहेद हुसैन, मेराज सिद्दिकी, अब्दुल वाजेद कादरी यांच्यासह दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images