Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाणी वाटपाचा कायदा बदलण्याचा घाट

$
0
0
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ मधील तरतुदींमुळे सरकारची डोकेदुखी वाढली. त्यामुळे आता हा कायद्यात बदल करण्याचा घाट सरकारने घातला आहे.

वाढीव अर्थसंकल्प ‘जैसे थे’ ठेवण्याचे पालिकेला आदेश

$
0
0
औरंगाबाद महापालिकेने २०१३-१४ साठी २८५ कोटी रुपयांचे वाढीव अर्थसंकल्प मंजूर केला. या वाढीव अंदाजपत्रकाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कार्यक्रमामुळे पेशंट ताटकळत

$
0
0
कॅन्सर विशेषोपचार केंद्राच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमात अडथळा नको म्हणून कॅन्सर रुग्णांना तासभर अडवून ठेवण्यात आले.

रुग्णांच्या जीवाशी खेळ

$
0
0
घाटी हॉस्पिटलतंर्गत उभारण्यात आलेल्या मराठवाडा कॅन्सर विशेषोपचार केंद्रात वर्ष उलटून गेले तरी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध झालेले नाही. ३०९ मंजूर पदांपैकी तब्बल १५० पदे अजूनही रिक्त असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

खड्डेमुक्तीसाठी कर्जाचा रस्ता

$
0
0
रस्त्यांच्या कामांसाठी महापालिका पन्नास कोटी रुपयांचे कर्ज काढणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत येणार असून तो मंजूर व्हावा, यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत.

खाडेची माया ५० कोटींपर्यंत?

$
0
0
सार्वजनिक बांधकाम खात्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता गजानन शंकर खाडेच्या बँक लॉकरची तपासणी शुक्रवारी करण्यात आली. तसेच गजानन खाडे याने त्याच्या नोकरीच्या काळात सेवा बजावलेल्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाची चार पथके रवाना करण्यात आली आहे.

ज्ञान विज्ञान कॉलेज नव्वदीत

$
0
0
हैदराबाद मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे, औरंगाबादचे शासकीय ज्ञान विद्यान कॉलेज उद्या रविवारी ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठवाड्यात उच्च शिक्षणाचा प्रारंभ करणारे हे पहिले कॉलेज, नव्वदीतही दिमाखात वाटचाल करीत आहे.

लोकसभेच्या सहा जागा लढणार

$
0
0
लोकसभेच्या सहा तर विधानसभेच्या ५२ जागा स्वबळावर लढविणार आहे, जर सेक्यूलर पक्षांनी युतीचा प्रस्ताव ठेवल्यास त्यासंदर्भात विचार केला जाईल, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

वर्षभरात रस्त्याची चाळणी

$
0
0
सिल्लेखाना ते पैठणगेट या शहरातील महत्त्वाच्या रस्त्याची वर्षभरातच चाळणी झाली आहे. या रस्त्यावर खर्च करण्यात आलेले दीड कोटी रुपये पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसत असून, या रस्त्याच्या एकूणच कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

पालिकेच्या नावाने ‘ढोल बजाव’

$
0
0
शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने झोपेचं सोंग घेऊन खड्ड्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या महापालिकेला जागे करण्यासाठी अखेर अखिल भारतीय छावा संघटनेने वसंतराव नाईक चौकात ढोल वाजवून आंदोलन केले.

रस्त्यांसाठी रुपयाही दिला नाही

$
0
0
महापालिकेला रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने एक रुपयाही दिला नाही. सरकारने २००५-०६ मध्ये मराठवाडा पॅकेजच्या अंतर्गत पालिकेला रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये दिले होते, त्यानंतर आतापर्यंत एक रुपयाही दिला नाही, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी दिली.

उत्पन्न वाढवून रस्ते करणार

$
0
0
शहरातील रस्त्यांची कामे करायची आहेत हे आता पक्के ठरले आहे, असा निर्धार पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘रस्त्यांच्या कामासाठी पालिकेचे उत्पन्नही आम्ही वाढवणार आहोत व कमी व्याजाचे कर्जही काढणार आहोत.’

आणि झोपी गेलेले, जागे झाले

$
0
0
रस्ते आणि त्यावरचे खड्डे या संदर्भात जनसामान्यांच्या मनात रोष निर्माण झाल्यावर रविवारी पालिकेचे आयुक्त, महापौर व अन्य पदाधिकारी रस्त्यांच्या कामांसाठी एकवटले.

शेतक-यांनी भरले नाही एकदाही वीज बिल

$
0
0
सिल्लोड तालुक्यातील ५ हजार ५४५ शेतकऱ्यांनी शेतीच्या पंपाचे कनेक्शन घेतल्यापासून एकदाही वीज बिल भरले नाही. या शेतकऱ्यांकडे १३ लाख ४७ हजार रूपयांची थकबाकी आहे, अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता अरूण गायकवाड यांनी दिली.

LBT भरला नाही : बीअर शॉपीला सील

$
0
0
स्थानिक संस्थाकर (एलबीटी) भरला नाही म्हणून महापालिकेने तीन बीअर शॉपीला शनिवारी सील ठोकले.

कृषी विभाग खडबडून जागा

$
0
0
अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, याबाबतचे वृत्त ‘मटा’मधून प्रकाशित होताच कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे.

गिरिजा प्रकल्पात १० टक्के पाणी

$
0
0
खुलताबाद शहरासह तालुक्यातील बारा गावे आणि फुलंब्री तालुक्यातील सहा गावांची तहान भागविणाऱ्या येसगाव येथील गिरिज मध्यम प्रकल्पात दहा टक्के पाणीसाठा झाला आहे.

२ मध्यम, ५३ लघू प्रकल्प भरले

$
0
0
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या सहा-सात दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात पाणी साठी वाढू लागला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील ‘रूईभर’ व ‘कुरनूर’ हे दान मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ५५ प्रकल्प शंभरटक्के भरले आहेत.

२५ सप्टेंबरला ‘हज’साठी पहिली फ्लाईट

$
0
0
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेसाठी २५ सप्टेंबरला पहिले विमान उड्डाण करणार आहे. हज यात्रेसाठी आठ ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ विमानांचे उड्डाण होणार आहे.

जनशताब्दी एक्सप्रेस सीएसटीपर्यंत सोडा

$
0
0
औरंगाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे डब्बे वाढविल्यानंतर ही रेल्वे दादरपर्यंतच जात आहे. ती सीएसटीपर्यंत पूर्ववत सोडावी, अशी मागणी मध्य रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य अजमल खान यांनी केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images